सोयाबीनच्या 10 बॅगला शेंगाच लागल्या नाहीत; परभणीत शेतकऱ्याची फसवणूक झाल्याची तक्रार




सोयाबीनच्या 10 बॅगला शेंगाच लागल्या नाहीत; परभणीत शेतकऱ्याची फसवणूक झाल्याची तक्रार | Hello Krushi











































हॅलो कृषी ऑनलाईन : परभणी प्रतिनिधी

खरिपात पेरणी केलेल्या सोयाबीनच्या तब्बल १० बॅगला पेरणी केल्यानंतर ३ महिण्याचा अवधी होऊनही शेंगा न लागल्या नसल्याने एका शेतकऱ्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले असुन बियाणे कंपनीकडून फसवणूक झाल्याने परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यात येणाऱ्या झुवळा झुटा येथील शेतकर्‍याने प्रशासनाकडे तक्रार करत आता नुकसान भरपाई मिळवून देण्याची मागणी केली आहे.

तालुक्यातील जवळा झुटा येथील राजेंद्र सुरेशराव जवळेकर असे फसवणुक झालेल्या शेतकर्याचे नाव असून त्यांनी जवळा झुटा येथील गट क्र . 19 मधील जमीनीमध्ये पाथरी येथील एका कृषी केंद्रावरुन खरेदी केलेले. ग्रीन गोल्ड सिडस या कंपनीचे 10 बॅग सोयाबीन बियाणे खरीप हंगामात पेरले होते.

मात्र सदरील बियाणे पेरणी करून तीन महिने उलटले असून सोयाबीनची फक्त वाढ झालेली असुन अद्यापही या पिकाला शेंग अथवा कसल्याही प्रकारचा माल लागलेला नाही. याप्रकरणी आता या शेतकऱ्याने तक्रारीसाठी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे धाव घेतली असून पिकाची पाहणी करुन संबंधित कंपनी विरुद्ध कार्यवाही करुन पिक नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे.

error: Content is protected !!





Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *