लंपी आजाराने पशुधन गमावलेल्या शेतकऱ्यांना सरकारकडून भरपाई मिळवी : अजित पवार

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात लंपी या त्वचारोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होत आहे. पशुधनांमधील वाढता संसर्ग रोखण्यासाठी दूधउत्पादक शेतकऱ्यांमध्ये जागृती आणि जनावरांच्या लसीकरणाचा व्यापक कार्यक्रम राज्य सरकारने हाती घ्यावा. लम्पीग्रस्त जनावरांच्या दुधाबद्दल नागरिकांच्या मनात असलेला संभ्रम, भीती दूर करण्यासाठी मोहीम राबवावी, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत केली.

सरकारकडून भरपाई मिळावी

पुढे बोलताना ते म्हणाले, ‘लम्पी स्कीन’ आजाराकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात राज्यात दूधउत्पादनाचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो, ते राज्याला परवडणारे नाही, असेही पवार म्हणाले. ‘लम्पी स्कीन’ आजाराने पशुधन गमावलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून भरपाई मिळावी. पशुधनाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांकडून सक्तीने कर्जवसुली होऊ नये. या आजाराला विमा संरक्षण नसल्याने ते मिळवून देण्यासाठी सरकारने विमा कंपन्यांशी चर्चा करावी. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात सरकारची भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही पवार यांनी केली.

दरम्यान, देशातील राजस्थान, पंजाब, हरियानासारख्या राज्यानंतर महाराष्ट्रातील पशुधनालाहीविषाणूजन्य ‘लम्पी स्कीन’चा गंभीर धोका निर्माण झाला आहे. सद्यःस्थितीत राज्यातल्या १७ जिल्ह्यांतल्या ५९ तालुक्यांत हजारो जनावरे या आजाराने ग्रस्त असून त्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे.

 

 

See also  नाई संघ सदस्य के निधन पर बिचली खंदक पहुंचे शोकसभा में पदाधिकारी

Leave a Comment