ऐन सणासुदीच्या काळात बिघडू शकते किचन बजेट ; आता तांदुळही महागणार… !

हॅलो कृषी ऑनलाईन : खरीप हंगामात भाताची पेरणी कमी झाल्यामुळे भाताचे उत्पादन सुमारे 60-70 लाख टनांनी कमी होण्याची शक्यता आहे. उत्पादनातील या मोठ्या घसरणीच्या दरम्यान, तांदळाच्या किमती वाढू शकतात. त्यामुळे तांदूळ उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे मात्र सर्वसामान्य माणसाला रोजच्या जेवणासाठी जादा पैसे मोजावे लागणार आहेत.

अशा स्थितीत आधीच मंदावलेल्या अर्थव्यवस्थेवर महागाईचा दबाव आणखी वाढेल. किरकोळ महागाई केवळ 7 टक्क्यांवर पोहोचली आहे. तांदूळ-गहूसारखे खाद्यपदार्थ महाग झाले तर परिस्थिती आणखी बिघडू शकते. आगामी काळातही महागाई उच्च पातळीवर राहील, असा अंदाज तज्ज्ञ आणि विश्लेषकांनी व्यक्त केला आहे. त्याचबरोबर जून-सप्टेंबरमधील अनियमित पाऊस यामुळे धान पिकाची चिंता वाढली आहे.

काय आहे तज्ञांचे मत ?

भारताचे तांदूळ उत्पादन 2021-22 या पीक वर्षात 132.29 दशलक्ष टन होते, जे एका वर्षापूर्वी 1243.7 दशलक्ष टन होते. यंदाच्या खरीप हंगामात तांदळाचे उत्पादन ६० ते ७० लाख टनांनी कमी होईल, असा अंदाज अन्न मंत्रालयाने व्यक्त केला आहे. देशातील एकूण तांदूळ उत्पादनात खरीप हंगामाचा वाटा सुमारे ८५ टक्के आहे. तथापि, काही तज्ञांच्या मते, तांदूळ उत्पादनातील घट हे चिंतेचे कारण नाही कारण भारताचा आधीच अस्तित्वात असलेला साठा सार्वजनिक वितरण प्रणाली (PDS) ची मागणी पूर्ण करण्यासाठी पुरेसा आहे. याशिवाय तुकड तांदळाच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा आणि बिगर बासमती निर्यातीवर 20 टक्के शुल्क लावण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे परिस्थिती हाताळण्यास मदत होणार आहे.

 

 

 

See also  भाजपा ने किया एक दिवसीय विश्वासघात धरना कार्यक्रम

Leave a Comment