केळीच्या दरात पुन्हा घसरण, जोर धरू लागली किमान भाव निश्चित करण्याची मागणी

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या समस्या वाढत आहेत. कधी अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान होते तर कधी बाजारात शेतमालाला योग्य भाव मिळत नाही. एकीकडे कांद्याचे भाव गडगडल्याने उत्पादकांची सातत्याने आंदोलने होताना दिसत आहेत, तर दुसरीकडे केळीच्या दरातही घसरण होताना दिसत आहे. नवरात्र संपताच भावात घसरण झाली. 2000 रुपये प्रतिक्विंटलपर्यंत विकल्या जाणाऱ्या केळीचा भाव आता 600-1200 रुपयांवर आला आहे. आता त्याची किमान किंमत निश्चित करण्याची मागणी होत आहे.

दुसरीकडे, राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये केळीच्या झाडांवर सीएमव्ही रोगामुळे फळबागा खराब होत आहेत. त्यामुळे केळीची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना आता दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे. रोगामुळे झाडाची वाढ थांबते.अशा परिस्थितीत शेतकऱ्यांकडे झाडे उपटून फेकून देण्याशिवाय पर्याय नाही. अशा स्थितीत भावात झालेली घसरणही शेतकऱ्यांसाठी संकटापेक्षा कमी नाही.

काय म्हणतात शेतकरी?

महाराष्ट्र केळी उत्पादक संघटनेचे अध्यक्ष किरण चव्हाण सांगतात की, सणानिमित्त बाजारपेठेत केळीला मागणी आहे. मात्र व्यापारी शेतकऱ्यांकडून कमी दराने खरेदी करत आहेत. यातून शेतकऱ्यांना नफा मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या मेहनतीचे खरे फळ व्यापारी खात आहेत. यंदा केळीला काही दिवस विक्रमी भाव मिळाला, मात्र, तो कायम नाही. आता भाव उतरले आहेत. ज्यामुळे नुकसान होत आहे. केळी जनतेसाठी स्वस्त झाली आहे, असे अजिबात नाही.

किमान भाव निश्चित करण्याची मागणी

चव्हाण पुढे म्हणाले, सध्या अनेक जिल्ह्यांमध्ये सरासरी दर्जाची केळी चिप्स बनवण्यासाठी वापरली जात आहे. अशा केळीचा भाव 300 – 450 रुपये प्रतिक्विंटल झाला आहे. , मात्र पहिल्या क्रमांकाच्या दर्जाच्या केळीलाही केवळ ६००- १२०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत भाव मिळत आहे.

गेल्या महिन्यात केळी उत्पादक संघटनेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन केळीचा किमान भाव १८.९० रुपये प्रतिकिलो जाहीर करण्याची मागणी केली होती. त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. दसऱ्यानंतर मुख्यमंत्री पुन्हा केळी संघाची भेट घेणार आहेत. अशा स्थितीत केळी उत्पादकांच्या मागण्या पूर्ण होतील, अशी अपेक्षा आहे.

 

 

 

 

 

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *