मोठी बातमी ! PM Kisan प्रमाणे राज्यातही ‘मुख्यमंत्री किसान योजना’ लागू होणार…




मोठी बातमी ! PM Kisan प्रमाणे राज्यातही ‘मुख्यमंत्री किसान योजना’ लागू होणार… | Hello Krushi










































हॅलो कृषी ऑनलाईन : शिंदे – फडणवीस सरकार राज्यात आल्यापासून योजनांचा धडाकाच लावला आहे. मुख्यमंत्री पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर शेतकरी आत्महत्या रोखण्याचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यानंतर राज्यातील शेतकऱ्यांच्या साठी अत्यंत महत्वपूर्ण अशी योजना राबवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. केंद्रातील पीएम किसान योजनेच्या धर्तीवर ‘मुख्यमंत्री किसान योजना’ राज्यात लागू केली जाणार आहे. या नव्या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षाकाठी ६ हजार रुपयांचेअनुदान दिले जाणार असल्याची माहिती आहे.

अर्थसंकल्पात तरतूद

मागच्या तीन दिवसापूर्वी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती असून. येत्या आर्थिक वर्षात अर्थसंकल्पात यासाठी तरतूद करण्यात येणार आहे.या आर्थिक वर्षात बजेटमध्ये तरतूद देखील करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना वर्षाला या योजनेद्वारे सहा हजार रुपये देण्यात येणार आहेत.

दरम्यान या योजनेबाबतचे नियम आणि पात्रता अद्याप स्पष्ट करण्यात आलेली नाही. या योजनेमुळे शेतकर्यांना आर्थिक फायदा होणार आहे. राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी योजना ठरणार असल्याचे बोलले जात आहे.

error: Content is protected !!





Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *