Category: बातम्या

  • ‘गोधन खतरे मे है’ सांगणारे, गोधन सांकटात असताना एक शब्दही बोलत नाहीत : पवारांची टीका

    हॅलो कृषी ऑनलाईन : देशासह राज्यांमध्ये लंपीचा कहर वाढत असल्यामुळे एकीकडे पशुपालक हे चिंतित असताना लंपीवरून आता राजकारण ही तापायला सुरुवात झाली आहे. :राजकीय अजेंडा सेट करण्यासाठी ‘गोधन खतरे मे है’ सांगणारे नेते आज गोधन खऱ्या अर्थाने संकटात असताना एक शब्दही बोलत नाहीत. अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे. याशिवाय केंद्रीय माध्यमांवर ही त्यांनी टीका करीत म्हंटले आहे की, “राजकारणासाठी ज्यांचा तिसरा डोळा क्षणार्धात उघडतो तो अद्यापही उघडलेला नाही. चित्ते रुळले असतील तर राष्ट्रीय मीडियानेही लम्पीकडं लक्ष केंद्रित करायला हरकत नाही”.

    लंपी बाबत केंद्र सरकरच्या कारभारावर टीका करणारी फेसबुक पोस्ट रोहित पवार यांनी लिहिली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हंटले आहे की, ” देशात ८२ हजार जनावरं लंम्पी आजाराने दगावली तर लाखो जनावरं लंम्पीग्रस्त असल्याने पशुधनावर आणि पर्यायाने बळीराजासमोर मोठं संकट उभं राहिलंय. राज्याचे पशुसंवर्धन मंत्री स्वतः जातीने लक्ष ठेवून असल्याने काही अंशी दिलासा नक्कीच मिळत आहे.

    अतिरिक्त मदत मिळणं गरजेचं

    मृत पावलेल्या पशुधनास NDRF निकषात असलेल्या मदतीप्रमाणे राज्यसरकार स्वतःच्या तिजोरीतून ३० हजार रुपयांची मदत देत आहे. परंतु सात वर्षे जुने NDRF निकष आणि दुधाळ जनावरांच्या वाढलेल्या किंमती बघता ही मदत पुरेशी नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळं अतिरिक्त मदत मिळणं गरजेचं आहे.
    केंद्र सरकारने लम्पी आजाराला साथीचा रोग म्हणून घोषित केल्यास SDRF मधील ‘आपत्ती निवारण आणि पुनर्वसन’ या सेक्शन अंतर्गत मदत देता येऊ शकते. असं झाल्यास शेतकऱ्यांना राज्य शासनाची ३० हजार आणि SDRF ची ३० हजार अशी एकूण ६० हजार रुपये पर्यंत मदत मिळू शकते. राज्यशासनाने या संदर्भात केंद्राकडे त्वरित पाठपुरावा करायला हवा.

    राजकीय अजेंडा सेट करण्यासाठी ‘गोधन खतरे मे’ सांगणारे नेते आज गोधन खऱ्या अर्थाने संकटात असताना एक शब्दही बोलत नाहीत. राजकारणासाठी ज्यांचा तिसरा डोळा क्षणार्धात उघडतो तो अद्यापही उघडलेला नाही. चित्ते रुळले असतील तर राष्ट्रीय मीडियानेही लम्पीकडं लक्ष केंद्रित करायला हरकत नाही”. अशा पद्धतीने फेसबुक पोस्ट द्वारे त्यांनी केंद्र सरकारची कानउघाडणी केली आहे.

  • Soybean : याला म्हणतात कष्टाचं चीज ! सोयाबीन रोपाला तब्बल 417 शेंगा




    Soybean : याला म्हणतात कष्टाचं चीज ! सोयाबीन रोपाला तब्बल 417 शेंगा | Hello Krushi











































    हॅलो कृषी ऑनलाईन : कमी वेळात चांगले उत्पादन आणि उत्पन्न देणारे पीक म्हणून शेतकरी सोयाबीन (Soybean) या पिकाची लागवड करतात. त्यात मागच्या दोन तीन वर्षांपासून सोयाबीनला बाजारात चांगली किंमत मिळवू लागल्याने अनेक शेतकऱ्यांचा कल सोयाबीन लागवडीकडे आहे. यंदाच्या वर्षी देखील राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाची लागवड केली आहे. मात्र अनेक भागात पावसामुळे सोयाबीनला फटका बसला आहे. बऱ्याच ठिकाणी सोयाबीन वर रोग आणि किडींचा हल्ला झाला आहे. तर काही ठिकाणी शेंगाचा भरल्या नाहीत. असे असताना परभणी मधील एका शेतकऱ्याच्या शेतात एका रोपाला तब्बल ४१७ शेंगा लागल्या आहेत.

    होय …! आम्ही बोलत आहोत परभणी जिल्ह्यातल्या पालम तालुक्यातल्या मुक्काम खोरस येथील शेतकरी गणेश रामराव दाढे (३२) या शेतकऱ्याबद्दल… खरे तर या भागात सर्रासपणे कपाशीचे पीक घेतले जाते. पण कपाशीच्या पिकाला खर्च येत असल्यामुळे यंदा दाढे यांनी सोयाबीन (Soybean) लागवड करायची ठरवली. पण ते एवढं सोपं नव्हतं. कारण या निर्णयाला घरच्या मंडळींसहित गावातील मित्रपरिवाराचाही विरोध होता. मात्र या सगळ्यांचा सल्ला झुगारत दाढे यांनी सोयाबीनचा घ्यायचे ठरवले. सुरवातीला लोक त्यांच्यावर हसत होते. मात्र त्यांच्या कष्टाचे चीज झाले असून त्यांच्या सोयाबीन पिकाला चांगल्या शेंगा आल्या आहेत.

    दाढे यांनी सोयाबीनचे (Soybean) वाण KDS 726 याची लागवड केली. २५ एकरमध्ये लागवडीसाठी त्यांना १८ बॅगा बियाणे लागले. विशेष म्हणजे या वाणाची बॅग 22 किलोची असते. इतर बॅगा 30 किलोच्या असतात. पिकाचे योग्य व्यवस्थापन केल्यानंतर त्यांना एकरी 15 क्विंटल प्रमाणे विक्रमी 300 क्विंटल पेक्षा जास्त सोयाबीन होण्याची शक्यता आहे.

    खरीप हंगामात घेतल्या जाणाऱ्या सोयाबीनला अतिवृष्टीचा मोठा धोका असतो. पण योग्य व्यवस्थापन केल्यामुळे पीक चांगले आले असून चांगले उत्पादन आणि उत्पन्न मिळेल अशी आशा गणेश रामराव दाढे यांना आहे.

    error: Content is protected !!





  • कांद्यापाठोपाठ आता लसणाचीही तीच तऱ्हा ; शेतकऱ्यांना मिळतोय 5-30 रुपये प्रतिकिलो भाव

    हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात कांद्याच्या गडगडलेल्या भावामुळे कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. आता कांद्याप्रमाणेच लसणाची स्थिती झाली आहे. बाजारात लसणाची किंमत गडगडली आहे. शेतकऱ्यांना मंडईत लसणाचा भाव 5 रुपये किलोपर्यंत मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

    बंपर उत्पादनामुळे अडचणी

    लसणाच्या या दुर्दशेचे कारण म्हणजे बंपर उत्पादन. प्रत्यक्षात यावेळी मध्य प्रदेश, राजस्थान आणि महाराष्ट्रात लसणाचे बंपर उत्पादन झाले आहे. त्याचा परिणाम लसणाच्या भावावर झाला असून त्यात अनपेक्षित घट नोंदवली गेली आहे. मंडईतील व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की, गेल्या तीन दशकांत त्यांनीही लसणाची ही दुर्दशा पाहिली नाही, म्हणजे इतका कमी दर.

    आझादपूर मंडईत लसणाचा भाव 5 ते 30 रुपये किलो

    आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या आझादपूर मंडईत आजकाल लसणाचा घाऊक भाव 5 ते 30 रुपये किलोपर्यंत विकला जात आहे.
    शेकडो किलोमीटरचा प्रवास करून शेतकऱ्यांच्या शेतातून लसूण बाजारात आणला जात असताना बाजारात लसणाचा हा भाव आहे.
    त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आपली पिके पाण्यातही सोडून दिली आहेत. लसणाच्या किमतीच्या दुर्दशेबाबत आझादपूर मंडीतील लसूण व्यापारी असोसिएशनचे सरचिटणीस मोहिंदरसिंग लांबा सांगतात की, दिल्लीत सर्वाधिक लसूण मध्य प्रदेश आणि राजस्थानमधून येतो.

    लांबा यांनी सांगितले की, सध्या आझादपूर मंडईत लसणाचा भाव 5 ते 30 रुपये प्रतिकिलो आहे. मंडईत लसणाचे काम करून ३० वर्षांहून अधिक काळ लोटल्याचे ते सांगतात. पण, लसणाचे दर इतके कमी झालेले त्यांनी कधी पाहिले नव्हते. लांबा यांनी सांगितले की, दररोज 10 ते 12 वाहने मंडईत येत आहेत.

    लसणाच्या दरात वाढ होण्याची शक्यता नाही

    सध्या श्राद्धाचा काळ सुरू आहे. त्यामुळे लसणाची मागणीही कमी राहिली आहे. मात्र, येत्या काही महिन्यांतही लसणाच्या दरात वाढ होण्याची शक्यता नाही.
    खरे तर हिवाळ्यात लसणाचे भाव वाढतात. पण, त्याआधीच लसणाचे भाव अत्यंत घसरले आहेत. त्याचबरोबर फेब्रुवारीमध्ये नवीन पीक येईल. त्यामुळे जुन्या लसणाची मागणी कमी होईल.

    महाराष्ट्रातील लसूण बाजारभाव

    बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
    22/09/2022
    मुंबई – कांदा बटाटा मार्केट क्विंटल 1700 500 3500 2000
    सोलापूर लोकल क्विंटल 99 700 3000 1400
    नागपूर लोकल क्विंटल 840 500 3500 2750
    21/09/2022
    मुंबई – कांदा बटाटा मार्केट क्विंटल 1550 500 3500 2000
    सातारा क्विंटल 4 500 3000 1750
    सोलापूर लोकल क्विंटल 125 600 2800 1500
    नागपूर लोकल क्विंटल 700 500 3500 2750
    20/09/2022
    मुंबई – कांदा बटाटा मार्केट क्विंटल 411 500 3000 1750
    सातारा क्विंटल 40 500 3000 1750
    सोलापूर लोकल क्विंटल 284 900 2800 1600
    पुणे- खडकी लोकल क्विंटल 1 2500 2500 2500
    नागपूर लोकल क्विंटल 460 500 4000 3550
    19/09/2022
    जुन्नर – नारायणगाव क्विंटल 6 1000 4200 3500
    मुंबई – कांदा बटाटा मार्केट क्विंटल 2564 500 3000 1750
    सोलापूर लोकल क्विंटल 238 1000 3000 2400

     

  • धुळ्यात पावसाचा कपाशीला फटका; रोग किडींचा प्रादुर्भाव, कसे कराल व्यवस्थापन ? जाणून घ्या

    हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातल्या काही भागात पावसाने उघडीप दिली आहे मात्र काही भागात अद्यापही पाऊस पडतो आहे. धुळे जिल्यात देखील पाऊस झाल्यामुळे त्याचा मोठा फटका कपाशीच्या पिकांना बसला आहे. सतत बदलणाऱ्या वातावरणामुळे कपाशीच्या पिकावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. तर रस शोषण करणाऱ्या अळीचा देखील प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे याचा परिणाम कापसाच्या उत्पादनावर होणार असल्यामुळे शेतकरी चिंतीत आहे. यामुळं शासनाने नुकसानीचे पंचनामे करावे अशी मागणी शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.

    धुळे तालुक्यात तसेच साक्री तालुक्यात यंदा पावसानं दमदार हजेरी लावली. यामुळं शेतांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं आहे. पावसामुळं कपाशीच्या बोंडांचे नुकसान झाले असून, प्राथमिक अंदाजानुसार धुळे तालुक्यातील 30 हजार हेक्टर क्षेत्राला या अतिवृष्टीचा फटका बसला आहे. गेल्या वर्षी धुळे तालुक्यात 1 लाख 7 हजार 109 हेक्टरवर कपाशीची पेरणी झाली होती त्यात 77 हजार 295 हेक्टरवर कापूस होता. यंदा 1 लाख 747 हेक्टरवर पेरणी झाली असून, त्यापैकी तब्बल 84 हजार 961 हेक्टरवर कापसाची पेरणी करण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कापसाच्या लागवडीचे क्षेत्र अकरा हजार हेक्टरनं वाढलं आहे.

    मागील दोन वर्षात कापसाला चांगला दर मिळत असल्यामुळे यंदा देखील कापूस लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल राहिला आहे. मागील वर्षी देखील पावसामुळे कापसाच्या उत्पन्नांत घट झाली होती. आता या वर्षी देखील तीच स्थिती होईल या भीतीने शेतकऱ्यांमध्ये चिंता आहे. आधीच जुलै महिन्यात झालेल्या पावसामुळे नुकसान झाले आहे. त्यातूनही पीक कसेबसे वाचवल्यानंतर आता पुन्हा रोग आणि किडींचे संकट उभे आहे.

    सद्य स्थितीत कापूस पिकातील व्यवस्थापन

    –कापूस पिकात वापसा स्थिती निर्माण होण्यासाठी शेतात अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते शेताबाहेर काढण्याची व्यवस्था करावी. फवारणीची कामे पुढे ढकलावीत.
    –कापूस पिकात रसशोषण करणाऱ्या किडींच्या (मावा, फुलकिडे) व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्काची किंवा लिकॅनीसिलीयम लिकॅनी (जैविक बुरशीजन्य किटकनाशक) एक किलो ग्रॅम किंवा फलोनिकॅमिड 50% 60 ग्रॅम किंवा डायनेटोफ्यूरॉन 20% 60 ग्रॅम किंवा फिप्रोनिल 5% 600 मिली प्रति एकर तिन दिवसानंतर पावसाची उघाड बघून फवारणी करावी.
    –कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी हेक्टरी 5 गुलाबी बोंडअळीसाठीचे कामगंध सापळे लावावेत. कापूस पिकातील डोमकळ्या वेचून नष्ट कराव्यात. प्रादूर्भाव जास्त आढळून आल्या प्रोफेनोफॉस 50% 400 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% 88 ग्रॅम किंवा प्रोफेनोफॉस 40% + सायपरमेथ्रीन 4% 400 मिली प्रति एकर आलटून पालटून तिन दिवसानंतर पावसाची उघाड बघून फवारावे.

     

  • राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात; भावही नाही, साठवणुकीचा कांदाही सडू लागलाय…

    हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात कांद्याची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांची समस्या वाढत आहे. गेल्या पाच महिन्यांपासून कांद्याचे दर घसरत आहेत. राज्यातील शेतकऱ्यांना 8 ते 10 रुपये किलोने कांदा विकावा लागत आहे. एकीकडे भाव कमी मिळत आहेत तर दुसरीकडे ज्या शेतकऱ्यांनी एप्रिलपासून भाव वाढण्याच्या अपेक्षेने साठवून ठेवलेला कांदा आता ३० ते ४० टक्के सडला आहे. म्हणजेच शेतकऱ्यांना दुहेरी नुकसान सोसावे लागत आहे.

    महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भरत दिघोळे सांगतात की, यंदा नाफेडने सुरुवातीपासूनच चुकीच्या पद्धतीने खरेदी केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कमी दराने खरेदी केली. यंदा नाफेडने 9 ते 12 रुपये प्रतिकिलो दराने खरेदी केली असून, त्याचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे.

    शेतकऱ्यांमधून नाफेडवर नाराजी

    नाफेडने यंदा चुकीच्या पद्धतीने खरेदी केल्याचे संस्थेचे अध्यक्ष भरत दिघोळे यांचे म्हणणे आहे. कारण यावेळी नाफेडने मंडईतून खरेदी न करता फेडरेशन ऑफ फार्मर प्रोड्युसर कंपनीला खरेदीचे अधिकार दिले होते. त्यामुळेही शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान झाले आहे. नाफेडने यावर्षी जी खरेदी केली ती शेतकऱ्यांच्या हिताची नव्हती, असे दिघोळे यांचे म्हणणे आहे.

    सरकारने कांद्याच्या निर्यातीकडे लक्ष दिले नाही

    महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री पियुष गोयल यांना पत्र लिहून नाफेडमार्फत कांद्याची खरेदी करण्याची विनंती केली होती. नाफेडने यापूर्वीच २ लाख ३८ हजार टन कांदा खरेदी केला आहे. त्यात 2 लाख टनांनी वाढ करावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती.

    मात्र, नाफेडचे खरेदीचे धोरण चुकीचे असल्याचे महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भरत दिघोळे यांचे म्हणणे आहे. गतवर्षी २३ ते २४ रुपये किलो दराने कांदा खरेदी केला होता, मग यंदा केवळ ९ ते १२ रुपये भाव कसा दिला? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. कांदा निर्यातीवर भर द्यायला हवा होता. मात्र सरकारने तसे केले नाही.

    काय आहे शेतकऱ्यांचे म्हणणे ?

    भरत दिघोळे यांनी सांगितले की, कांद्याच्या निर्यातीच्या चुकीच्या धोरणामुळे यंदा कांद्याचे दर खूपच कमी आहेत. उत्पादन जास्त आहे असे सरकार म्हणत असताना निर्यात जास्त व्हायला हवी होती. पण असे झाले नाही. फारशी निर्यात होऊ शकली नाही. राज्य सरकारने केंद्र सरकारशी बोलून कांद्याच्या निर्यातीकडे जास्तीत जास्त लक्ष द्यावे, जेणेकरून शेतकऱ्यांना भावाच्या बाबतीत दिलासा मिळेल, अशी मागणी संघटनेने राज्य सरकारला पत्र लिहून केली होती. याशिवाय कांद्याला किमान आधारभूत किंमतीखाली आणण्याची मागणीही संघटनेने केली असून, त्यावर शेतकऱ्यांचा नफा खर्चानुसार ठरवून द्यावा अशी मागणी केली होती.

     

     

  • उद्यापासून मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर येणार पैसे; पहा कोणत्या जिल्ह्याला शासनाची किती मदत ?




    उद्यापासून मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर येणार पैसे; पहा कोणत्या जिल्ह्याला शासनाची किती मदत ? | Hello Krushi












































    हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या वर्षी जुलै ऑगस्ट मध्ये राज्यात अतिवृष्टी झाली. त्यामुळे मराठवाड्यासह राज्यातील अनेक भागात शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र एकनाथ शिंदे सरकारने नव्या निकषांसह अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याचे जाहीर केले. सरकारने राज्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागासाठी 3 हजार कोटी रुपयांची घोषणा केली होती. त्यापैकी मराठवाडा विभागाकरिता 1106 कोटी रुपये प्राप्त झाले आहेत

    मराठवाड्याला मिळालेल्या मदतीचे वितरण उद्यापासून म्हणजेच गुरुवार (22) पासून केले जाणार आहे. शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर हे पैसे जमा होणार आहेत. मराठवाड्यात अतिवृष्टी, पुरासह गोगलगायमुळे तब्बल 10 लाख 81 हजार 761.18 हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. मराठवाड्यातील जालना,परभणी, हिंगोली,नांदेड, लातूरसह उस्मानाबाद जिल्ह्यासाठी नुकसानभरपाईची रक्कम प्राप्त झाली आहे.

    दरम्यान औरंगाबाद जिल्ह्याला नुकसानभरपाईच्या यादीतून वगळण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठा संताप पाहायला मिळत आहे. विशेष औरंगाबाद जिल्ह्यातील अनेक भागात अतिवृष्टीमुळे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतजमीन वाहून गेली आहे. पिकांचे नुकसान झाले आहे. मात्र असे असतानाही औरंगाबाद जिल्ह्याला नुकसानभरपाईमधून वगळण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

    कोणत्या जिल्ह्याला किती मदत ?

    जिल्हा  बाधित शेतकरी  बाधित क्षेत्र  अनुदान 
    जालना  6898 2311.79 हेक्टर  3 कोटी 71 लाख 84 हजार 
    परभणी  1557 1179 हेक्टर 1 कोटी 60 लाख 34 हजार 
    हिंगोली  133970 113620 हेक्टर 157 कोटी 4 लाख 52 हजार 
    नांदेड  741946 527491 हेक्टर 717 कोटी 88 लाख 92 हजार 
    लातूर  49160 27425.37 हेक्टर 37 कोटी 30 लाख 83 हजार 
    उस्मानाबाद  75739 66723.20 हेक्टर 90 कोटी 74 लाख 36 हजार 

    error: Content is protected !!





  • Lumpy : ‘लम्‍पी’ त्वचारोगामुळे राज्यात 271 जनावरांचा मृत्यू

    हॅलो कृषी ऑनलाईन : जनावरांमध्ये होणाऱ्या लंपी या त्वचारोगाचा (Lumpy) मोठ्या प्रमाणात फैलाव राज्यात होताना दिसत आहे. दिनांक १९ सप्टेंबर रोजी मिळालेल्या आकडेवारीनुसार राज्यात ९ हजार ३७५ जनावरांमध्ये ‘लम्‍पी स्कीन’चा प्रादुर्भाव दिसून आला आहे. यापैकी २७१ जनावरांचा मृत्यू झाला आहे. तर या रोगातून ३ हजार २९१ जनावरे बरी झाली आहेत. याबाबतची माहिती माहिती पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिली आहे.

    २५ लाख लस मात्रा उपलब्ध

    सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘‘लम्पी स्कीन (Lumpy) आजाराने राज्यभरात सोमवार अखेर २७१ जनावरांचा मृत्यू झाला आहे. तर ३ हजार २९१ जनावरे आजारमुक्त झाली आहेत,’’ अशी माहिती पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिली. तर ‘‘तातडीच्या लसीकरणासाठी २५ लाख लस मात्रा उपलब्ध झाल्या आहेत. या विविध जिल्ह्यांमधील प्रादर्भावाचे प्रमाण पाहून वितरित केल्या जातील,’’ असेही त्यांनी सांगितले.

    २७१ पशुधन दगावले

    सिंह म्हणाले, ‘‘ राज्यातील २७ जिल्ह्यांमधील १ हजार १०८ गावांत ९ हजार ३७५ जनावरांमध्ये ‘लम्‍पी स्कीन’चा प्रादुर्भाव दिसून आला आहे. बाधितांपैकी ३ हजार २९१ जनावरे बरी झाली आहेत. उर्वरित जनावरांवर उपचार सुरु आहेत. आतापर्यंत २७१ पशुधन मृत झाले आहे. तर तातडीच्या लसीकरणासाठी विविध जिल्ह्यांमध्ये ४९ लाख ८३ लाख लशींच्या मात्रा उपलब्ध आहेत. यापैकी बाधित क्षेत्राच्या ५ कि.मी. परिघातील १ हजार १०८ गावांतील १६ लाख ४५ हजार पशुधनाचे लसीकरण करण्यात आले आहे.’’

    मुंबई नियंत्रित क्षेत्र जाहीर

    ‘लम्पी स्कीन’च्या (Lumpy) प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर मुंबईतही सावधगिरी बाळगली जात आहे. मुंबईत बैलगाड्या, घोडागाडी तसेच अनेक ठिकाणी गायीदेखील पाळल्या जातात. हे लक्षात घेता मुंबईत ‘लम्‍पी स्कीन’चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मुंबई हे ‘नियंत्रित क्षेत्र’ घोषित करण्यात आले आहे. मुंबईत प्राणी आणण्यास सक्त मनाई आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचा इशाराही मुंबई पोलिसांनी दिला आहे.

    लम्पीची लक्षणे आणि बचाव

     लक्षणे

    १)या आजाराचा संसर्ग झाल्यास प्रथम जनावरांच्या डोळयातून आणि नाकातून पाणी येते.
    २)लसिकाग्रंथीना सूज येते.
    ३)सुरुवातीला जनावरांना ताप येतो.
    ४)दुधाचे प्रमाण कमी होते.
    ५)चारा खाणे, पाणी पिणे कमी होते.
    ६)हळूहळू डोके, मान, मायांग, कास इत्यादी भागाच्या त्वचेवर 10 ते 50 मिमी व्यासाच्या गाठी येतात.
    ७)तोंडातील व्रणामुळे आजारी जनावरांना चारा खाण्यास त्रास होतो.
    ८)डोळ्यातील व्रणामुळे चिपडे येतात, तसेच डोळ्यांची दृष्टी बाधित होते.
    ९)पायावर सूज येवून काही जनावरे लंगडतात.

    काय घ्यावी काळजी ?

    लम्पी त्वचा रोग हा संसर्गजन्य रोग असल्याने उपचार करण्यापेक्षा रोग येऊच नये याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजना व रोग आल्यास त्याचा प्रसार होऊ नये याकरिता पशुपालकांनी आवश्यक ती काळजी घेण्याची आवश्यकता आहे.

    १)बाह्य किटकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी गोठ्यांची व्यवस्थित स्वच्छता राखावी.
    २)निरोगी जनावरांना बाधित जनावरांपासून वेगळे बांधावे.
    ३)गायी व म्हशींना एकत्रित ठेवण्यात येवू नये.
    ४)रोग सदृश लक्षणे आढळल्यास जवळच्या पशुवैद्यकीय संस्था प्रमुखांना तातडीने संपर्क साधावा.
    ५)बाधित जनावरांच्या पिण्याच्या पाण्याकरिता व तसेच चराईकरिता स्वतंत्र व्यवस्था करावी.
    ६)गोठ्यात त्रयस्थांच्या भेटी टाळाव्यात.
    ७)बाधित परिसरात स्वच्छता करावी व निर्जंतुक द्रावणाची परिसरात फवारणी करावी.
    ८)फवारणीसाठी 1 टक्के फॉर्मलीन किंवा 2 ते 3 टक्के सोडियम हायपोक्लोराईट, फिनॉल 2 टक्के यांचा वापर करावा
    ९)या रोगाने ग्रस्त जनावरांचा मृत्यू झाल्यास मृतदेहाची शास्त्रीय पद्धतीने कमीत कमी ८ फूट खोल खड्डयात गाडून विल्हेवाट लावावी.
    १०)मृत जनावरांच्या खाली व वर चुन्याची पावडर टाकण्यात यावी.

  • हिंगोली जिल्ह्यातील संपावर असेलेले शेतकरी आक्रमक, रस्त्यावर दूध ओतून सरकारचा निषेध




    हिंगोली जिल्ह्यातील संपावर असेलेले शेतकरी आक्रमक, रस्त्यावर दूध ओतून सरकारचा निषेध | Hello Krushi











































    हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या वर्षी राज्यतल्या अनेक भागांना अतिवृष्टीचा मोठा अटक बसला आहे. त्यामुळे ऐन खरिपात शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. हिंगोली जिल्हा देखील याला अपवाद नाही. या जिल्ह्यात जूलै आणि ऑगस्ट महिन्यात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर राज्यशासनाकडून अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याचे जाहीर करण्यात आले. काही भागात मदत मिळवायला सुरुवातही झाली आहे. मात्र हिंगोलीतील सेनगाव तालुक्यातील तीन मंडळांना अद्यापही मदत मिळाली नाही. याच कारणामुळे मागच्या ६ दिवसांपासून गोरेगाव येथील शेतकरी संपावर गेले आहेत. मात्र आज शेतकऱ्यांमध्ये संताप वाढलेला दिसून आला शेतकरी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. येथील शेतकऱ्यांनी रस्त्यावर दूध ओतून राज्य सरकारचा निषेध केला.

    हिंगोली जिल्ह्यातल्या सेनगाव तालुक्यातल्या तीन मंडळांना शासनाच्या मदतीपासून वंचित राहावं लागलं आहे. पावसामुळे प्रत्यक्षात पिकांचे मोठं नुकसान झालं असताना प्रशासनाने मात्र इथे अतिवृष्टी झाली नसल्याचा दावा केलाय. त्यामुळे या भागातील जवळपास 40 ते 45 गावातील शेतकऱ्यांना शासनापासून मिळणाऱ्या मदतीपासून वंचित राहावं लागलं आहे.

    त्यामुळे गेल्या सहा दिवसांपासून गोरेगाव येथील शेतकरी संपावर गेले आहेत. आज येथील शेतकऱ्यांचा आक्रमक रूप पाहायला मिळालं शेतकऱ्यांनी रस्त्यावर दूध ओतून देत राज्य शासनाचा निषेध व्यक्त केला सेनगाव तालुक्यातील मदतीपासून वंचित असलेल्या या गावांचा तात्काळ नुकसानग्रस्त असलेल्या गावांचे यादीत समावेश करावा आणि तात्काळ मदत करावी अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली आहे.

    error: Content is protected !!





  • कारखाने खुशाल सुरु करा; पण मागच्या वर्षीच्या थकीत FRP चं काय? : राजू शेट्टींचा सरकारला सवाल

    हॅलो कृषी ऑनलाईन : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्याक्षतेखाली झालेल्या बैठकीत यंदाचा ऊस गाळप हंगाम १५ ऑक्टोबर पासून सुरु होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. यंदाचा गळीत हंगाम तर जाहीर झाला मात्र मागच्या वर्षीच्या थकीत FRP चं काय असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी सरकारला केला आहे. शिवाय थकीत FRP चे 900 कोटींसह, 200 रुपये अधिकचे मिळेपर्यंत एकही कारखाना सुरु होऊ देणार नाही असा इशारा देखील शेट्टी यांनी दिला आहे.

    आधी थकीत रक्कम द्या आणि मग कारखाने सुरु करा अन्यथा शेतकऱ्यांच्या संघर्षाला सामोरे जा असा इशाराच शेट्टी यांनी दिला आहे. शिवाय मागील वर्षी कारखान्यांना इथेनॉल विक्रीतून मोठ्या प्रमाणात नफा झाला होता. त्यामुळं 200 रुपये अधिक देण्याची कारखान्यांची क्षमता असल्याचे राजू शेट्टी म्हणाले यंदाचा अहानागाम सुरु कराल मात्र मागील थकीत FRP चे काय ? असा थेट सवाल शेट्टी यांनी सरकारला केला आहे.

    आधी शेतकऱ्यांची देणी भागवा…

    पुढे बोलताना शिट्टी म्हणाले , FRP चा रुपयाना रुपया जोपर्यत शेतकऱ्यांना मिळत नाही, तोपर्यंत राज्यातील एकही साखर कारखाना सुरु होऊ देणार नाही. गेल्या वर्षी निर्यात झालेल्या साखरेला चांगला दर मिळाला. देशांतर्गत साखरेला चांगला दर मिळाला. तसेच इथेनॉलच्या उत्पादनामुळं रोख पैसे उपलब्ध झाल्यामुळं साखर कारखान्यांकडे FRP शिवाय 200 रुपये ज्यादा देण्याची क्षमता तयार झाली आहे. हे पैसे जोपर्यंत मिळणार नाहीत तोपर्यंत ऊस उत्पादक आणि साखर कारखानदार हा संघर्ष थांबणार नाही.

    तर ऊसाचा बुडका कारखानदारांच्या पाठित

    15 ऑक्टोबरपासून तुम्हाला साखर कारखाने सुरु करायचे असतील तर खुशार सुरु करा. मात्र, शेतकऱ्यांची FRP आणि 200 रुपये ही देणी भागवा आणि मग कारखाने सुरु करा असे शेट्टी म्हणाले. कारखान्यांना ऊस देण्यासाठीच ऊस लावला आहे. निव्वळ ऊसच मागत राहिलात तर ऊसाचा बुडका कारखानदारांच्या पाठित बसल्याशिवाय राहणार नसल्याचे शेट्टी  म्हणाले.

  • महत्वाची बातमी ! ऊस वाहतुकीसाठी बैलांचे लसीकरण करणे बंधनकारक

    हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात जनावरांना होणाऱ्या लंपी या रोगाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून यावर्षीच्या ऑक्टोबर मध्ये सुरु होणाऱ्या गाळप हंगामासाठी वापरल्या जाणाऱ्या बैलांना लसीकरण करणे बंधनकारक असणार आहे. या संदर्भांत बैल घेऊन जाणाऱ्या मजुरांच्या याद्या सादर करण्याचे आदेश साखर आयुक्तांनी दिले आहेत.

    राज्यात ऊस गाळपासाठी हार्वेस्टर, वाहतुकीकरिता ट्रॉली यांचा वापर वाढला असला तरी अद्यापही बैलगाडी द्वारे उसाची वाहतूक ही मोठ्या प्रमाणावर केली जाते. ‘लम्पी स्कीन’ रोगाचा प्रादुर्भाव काही भागांमध्ये दिसून आल्यामुळे सर्वच साखर कारखान्यांमधील कार्यकारी संचालक, महाव्यवस्थापक व शेती अधिकाऱ्यांनी काळजी घेण्याची गरज आहे, असे आयुक्तालयाने स्पष्ट केले आहे. आपापल्या साखर कारखान्याकडे बाहेरच्या जिल्ह्यातून बैलगाडीकरीता बैल घेऊन येणाऱ्या ऊस तोडणी मजुरांच्या नावांची गावनिहाय यादी अद्ययावत करा. ही यादी तातडीने संबंधित मजूर ज्या जिल्ह्यातून येणार आहेत त्या जिल्ह्याच्या पशुसंवर्धन उपआयुक्त पाठवा,” अशा सूचना आयुक्तांनी साखर कारखान्यांना दिल्या आहेत.

    याबाबत बोलताना साखर आयुक्त शेखर गायकवाड म्हणाले की , “राज्याचा ऊस गाळप हंगाम ऑक्टोबरमध्ये सुरू होईल. त्यासाठी नेहमीप्रमाणे हजारो बैल विविध कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात येतील. ‘लम्पी स्कीन’च्या पार्श्वभूमीवर प्रत्येक जनावराचे आरोग्यविषयक नियोजन महत्त्वाचे राहील. त्यामुळे कारखान्यांकडे बैल घेऊन येणाऱ्या मजुरांची यादी संबंधित जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडे पाठविण्याच्या सूचना आम्ही राज्यातील सर्व साखर कारखान्यांना दिल्या आहेत. यामुळे लम्पी स्कीन रोग प्रतिबंधक लसीकरण काटेकोरपणे राबविण्यास मदत मिळेल.”

    १५ ऑक्टोबर पासून सुरु होणार यंदाचा गाळप हंगाम

    दरम्यान यंदाचा गाळप हंगाम हा येत्या १५ ऑक्टोबर पासून सुरु होणार असल्याची माहिती आहे . याबाबतची घोषणा मुक्ख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल (१९) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर देण्यात आली. त्यामुळे गाळप हंगाम सुरु होण्याच्या तसेच लंपीच्या पार्श्वभूमीवर ऊस वाहतूक करणाऱ्या बैलांचे लसीकरण करणे बंधनकारक करण्यात आले आहे.