Category: बातम्या

  • दुधाच्या दरात वाढ ! दूध उत्पादकांना दिलासा तर ग्राहकांच्या खिशाला कात्री

    हॅलो कृषी ऑनलाईन : ऐन सणासुदीच्या काळात पेट्रोल, डिझेल, भाजीपाल्यासहीत जवळपास सर्वच वस्तूंच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे. असे असताना आता दुधाच्या किमतीत सुदधा ७ रुपयांची वाढ करण्यात येणार आहे. दुधाची ही दरवाढ मुंबई मध्ये होणार आहे. त्यामुळे मुबईकरांना आता सुट्या दुधासाठी ७ रुपये जादा मोजावे लागणार आहेत.

    ही दूध दरवाढ येत्या एक सप्टेंबर पासून लागू होणार असून मुंबईत एक सप्टेंबर पासून सुटे दूध सात रुपयांनी महागणार आहे. त्यामुळे ग्राहकांना एक लिटर दुधासाठी 80 रुपये मोजावे लागणार आहेत. शिवाय हे नव्हे दर 28 फेब्रुवारी 2023 पर्यंत लागू असतील.

    दरम्यान मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये राज्याच्या इतर भागातून विशेषतः ग्रामीण भागातून दुधाचा पुरवठा केला जातो. जनावरांचा चाऱ्याचा खर्च वाढला हरभऱ्यासारख्या चाराचे दर सुद्धा वाढले आहेत परिणामी याचा फटका आता दूध उत्पादकांना बसताना दिसतोय त्यामुळे दूध उत्पादकांनी सुट्ट्या दुधाच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे एकीकडे दूध उत्पादकांना दिलासा मिळणार आहेत तर दुसरीकडे ग्राहकांच्या खिशाला मात्र कात्री लागणार आहे.

    काही दिवसांपूर्वीच अमूल आणि मदर डेरी च्या दुधात प्रतिलिटर दोन रुपयांची वाढ करण्यात आली होती. गुजरात को-ऑपरेटिव मिल्क मार्केटिंग फेडरेशन अमूल्य दुधाच्या दरात चार टक्क्यांनी वाढ केली त्यामुळे 17 ऑगस्ट पासून अमूल दुधाच्या आणि मदर डेरी च्या दरात वाढ दोन रुपयांनी करण्यात आली आहे.

  • सोलापुरात सोन्या बैलाच्या पाठीवर झूल नाही तर उद्धव ठाकरेंसाठी खास संदेश…

    हॅलो कृषी ऑनलाईन : मागच्या काही दिवसात महाराष्ट्राने मोठी राजकीय उलथापालथ अनुभवली आहे. उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले. सध्या एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत. मात्र माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्याची दखल केवळ राष्ट्रीय स्तरावर नाही शेतकऱ्यांच्या मनात अद्यापही असल्याचे दिसून आले. बैलपोळा सणानिमित्त माजीमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी खास संदेश बैलाच्या पाठीवर लिहिण्यात आला होता. त्याची चर्चा आता होऊ लागली आहे.

    सोलापुरातील बार्शी तालुक्यातील शेतकरी अविनाश कापसे यांच्या बैलाच्या पाठीवर झुल नाही तर लिहण्यात आलेला एक संदेश राज्य़भर व्हायरल होत आहे, ” मुख्यमंत्री म्हणून तुमचे योगदान विसरता येणार नाही, माझा बळीराजा कोरोना काळातही तुमच्यामुळे सुरक्षित राहिला आहे ” . अशा आशयाचा संदेश बैलाच्या पाठीवर लिहण्यात आलेला आहे. त्यामुळे जवळचे दुरावले तरी सोन्या बैलाची थाप असल्याची चर्चा आता रंगू लागली आहे.

    सोन्या अन् शिल्याची जोडी

    बैल पोळ्या दिवशी बैलजोडीने केलेल्या कामाच्या ऋणाईत हा सण साजरा केला जातो. शिवाय बैलावर साजश्रृंगार करुन ढोल-ताशाच्या गजरात त्यांची मिरवणूक काढली जाते. मात्र, जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील सोन्या अन् शिल्याची बैलजोडी ही वेगळ्याच बाबीने चर्चेत आली आहे. यामधील सोन्याच्या पाठीवरील जो संदेश आहे तो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सध्याचे राजकारण काही का असेना पण कोरोना काळात उद्धव ठाकरे यांनी केलेले कार्य न विसरता येण्यासारखे आहे असाच संदेश पोळ्याच्या दिवशी देण्यात आल आहे.

     

  • दिलासादायक ! गोगलगायीमुळं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळणार मदत

    हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या वर्षी पावसामुळे कोवळया सोयाबीन पिकावर मोठ्या प्रमाणात गोगलगायींचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आता या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे कारण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करुन मदतीसाठी प्रस्ताव पाठवण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत.

    विरोधी पक्षनेते अजित पवार, धनंजय मुंडे यांनी वारंवार हा मुद्दा उपस्थित करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली होती. अखेर त्यांच्या मागणीला यश आले आहे. गोगलगायींमुळे सर्वाधिक नुकसान बीड, लातूर आणि उस्मानाबाद या भागात झाले होते. या जिल्ह्यासहित अन्य काही भागातील 1 लाख 63 हजार 889 हेक्टर क्षेत्र गोगलगायीनं बाधित झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी नुकसानीचे पंचनामे करुन अहवाल शासनास द्यावेत. ज्या शेतकऱ्यांचे नुकसान 33 टक्क्यांपेक्षा अधिक असेल त्यांना मदतीसाठीचे प्रस्ताव शासनास सादर करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त व संबंधित जिल्हा प्रशासनास देण्यात आले आहेत. त्यानुसार राज्य सरकारनं नुकसान झालेल्या क्षेत्राचे पंचनामे करुन मदतीसाठी प्रस्ताव पाठवण्याचे आदेश पारित केले आहेत. यामुळं गोगलगायी ग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

    सरसकट हेक्टरी 75 हजार रुपये थेट मदत द्या

    दरम्यान धनंजय मुंडे यांनी मागणीची दाखल घेतल्याने समाधान व्यक्त केले आहे. मात्र गोगलगायीने ग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी 75 हजार रुपये थेट मदत देण्याच्या मागणीवर ते ठाम आहेत. त्यांनी म्हंटले आहे की, हजारो हेक्टरवरील सोयाबीन क्षेत्राच्या चार-चार पेरण्या करुनही शेतकऱ्यांना गोगलगाय नियंत्रण करता आले नाही. पीकही हाती लागणार नाही. अशा बिकट परिस्थितीचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. या परिस्थितीची, आमच्या मागणीची सरकारने दखल घेतली याचे समाधान आहे. मात्र, या पेरण्यांचा खर्च किती वाया गेला असेल याचा अंदाज सरकारने लावणे गरजेचे आहे. नुकसानीची आकडेवारी व शेतकऱ्यांची दयनीय अवस्था समोर असताना पुन्हा निकष, पंचनामे, 33 टक्के कशासाठी? असा सवाल धनंजय मुंडे यांनी केला आहे. गोगलगायीने ग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी 75 हजार रुपये थेट मदत देण्यात यावी, या मागणीवर आम्ही ठाम आहोत.

     

  • ‘एक दिवस बळीराजासाठी’ अधिकाऱ्यांसह कृषीमंत्री शेतात मुक्कामी; सरकारची नवी संकल्पना जाणून घ्या

    हॅलो कृषी ऑनलाइन : शिंदे फडणवीस सरकार ऍक्शन मोड मध्ये आल्याचे दिसून येत आहे. कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी पावसाळी आधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी एक महत्वपूर्ण घोषणा केली. आता राज्यात ‘एक दिवस बळीराजासाठी’ ही संकल्पना राबवण्यात येणार आहे. या संकल्पने अंतर्गत कृषी विभागाचे सचिव, अधिकारी सगळेच शेतकऱ्यांच्या घरी जाऊन त्यांच्या अडीअडचणी, प्रश्न जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहेत.

    याबाबत बोलताना सत्तार म्हणाले की, शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखणे, शेतकऱ्यांना समृद्ध करणे हा या योजनेमागचा हेतू असून, राज्यात शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या, अतिवृष्टी, पूर आणि नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे पिकांचे नुकसान यातून त्यांना तातडीने मदत करणे हा या मोहिमेमागील उद्देश आहे. त्यात शेतकऱ्यांचे दुःख शेतकऱ्यांच्या अडचणी या जाणून घेण्यासाठी थेट गावातल्या घरामध्ये अधिकारी पोहोचतील. त्यांच्यासोबत राहतील, शेतात जातील, रात्री मुक्काम करतील. जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे सीईओ, जिल्हा कृषी अधिकारी, विभागीय कृषी अधिकारी, हे शेतकऱ्यांच्या घरी एक दिवस राहतील, असंही सत्तार यांनी स्पष्ट सांगितलं आहे.

    शेतकऱ्यांच्या नेमक्या अडचणी जाणून घेणार

    90 दिवस राज्यातील विविध जिल्ह्यांत हा मुक्काम असणार आहे. दिवसभरात शेतकरी काम करत असताना काय अडचणी येतात, बॅंकेच कर्ज घेण्यासाठी काय अडचणी आहेत, शेतकरी का आत्महत्या करतोय याचा आढावा या मोहिमेच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे. मोहीम संपल्यानंतर सर्व जिल्ह्यांमधील आढावा घेऊन त्याचा सविस्तर अहवाल तयार करण्यात येणार आहे. त्यानंतर शेतकऱ्यांसाठी नवीन योजना राबवल्या जाणार, असेही सत्तार यांनी अधिवेशनात स्पष्ट केलं आहे.

  • पाऊस झाला गायब ! परभणी जिल्ह्यातील शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत; फुलोर्‍यातील पिके टाकतायेत माना




    पाऊस झाला गायब ! परभणी जिल्ह्यातील शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत; फुलोर्‍यातील पिके टाकतायेत माना | Hello Krushi












































    हॅलो कृषी ऑनलाईन : परभणी प्रतिनिधी

    परभणी जिल्ह्यात मागील पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने खरिप हंगाम धोक्यात आला आहे. मागील वर्षी सरासरी पेक्षा जास्त पाऊस झाल्याने खरीप पिके हातची गेल्याने जिल्हातील शेतकरी आर्थिक संकटात पडला होता. यातुन यावर्षीचा हंगाम बाहेर काढेल असे वाटत असताना सुरुवातीला सतत पडणारा पाऊस गरज असताना मात्र गायब झाला आहे. जिल्ह्यातील खरिप हंगामातील कापुस , सोयाबीन पिके फुल अवस्थेत असुन यावेळी पावसाची मोठी गरज आहे. विहीर बोअरवेल माध्यमांतून पाण्याची सोय असणारे शेतकरी स्पिंकलर, ठिंबक व पाटपाणी देत पिके जोपासणाच्या प्रयत्न करीत आहेत. मात्र कोरडवाहू शेतकरी हतबल झाला आहे. जिल्ह्यात यावर्षी अधिच पर्जन्यमान असमान झाले आहे. काही महसुल मंडळात सरासरी पेक्षा अधिक तर काही मंडळात कमी पाऊस पडला आहे. अधिक पाऊस झालेल्या ठिकाणी पिकांना पाण्याची गरज असताना कमी पर्जन्यमान असणाऱ्या मंडळात स्थिती अधिक बिकट आहे .

    उदाहरणार्थ जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील दोन महसूल मंडळामध्ये यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे . यात कासापूरी व हादगाव महसुल मंडळाचा समावेश आहे. पाथरी तालुक्यात जून पासून ऑगस्टपर्यंत सरासरी 470 मिलिमीटर एवढा पाऊस पडत असतो .यंदा तो अर्ध्या तालुक्यामध्ये सरासरी पेक्षा जास्त तर अर्ध्या तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पडला आहे .प्रशासनाकडून मिळालेल्या पर्जन्यमान अहवालानुसार पाथरी तालुक्यातील कासापुरी महसूल मंडळामध्ये जून पासून आतापर्यंत 262 मिलिमीटर पाऊस पडला असून तो सरासरीच्या 55 टक्के एवढा आहे. तर अशीच काही परिस्थिती शेजारील हादगाव महसूल मंडळामध्ये आहे. या ठिकाणी सरासरीच्या 69 टक्के एवढाच पाऊस झाला आहे .याचा परिणाम म्हणून खरिपातील पिकांना आता मोठ्या पावसाची अथवा जायकवाडी धरणातून पाणी आवर्तनाची मोठी गरज आहे .जूनच्या सुरुवातीपासूनच या दोन महसूल मंडळाला पावसाने पाठ दाखवल्याने शेतकरी अडचणी सापडला आहे.

    याउलट पाथरी महसूल मंडळ व बाभळगाव महसुल मंडळा मध्ये जून पासून ऑगस्ट पर्यंत सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याचे पाहायला मिळत आहे .
    अनुक्रमे 106 . 9 टक्के व 103 . 8 टक्के असा सरासरीपेक्षा जास्त पाऊस या दोन महसूल मंडळामध्ये पडला आहे. त्यामुळे एकाच हंगामात पाथरी तालुक्यातील उत्तर व दक्षिण भागांमध्ये पावसाचे असमान पर्जन्यमान झाल्याने एकीकडे अधिकच्या पावसाने पिके खराब होत असून दुसरीकडे पावसाअभावी पिके माना टाकत आहेत. सध्या जायकवाडी धरणातून गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग चालू आहे. असा विसर्ग डाव्या कालव्यात केल्यास पिकांना संजीवनी देता येईल. स्थानिक शेतकरी जायकवाडीतून कॅनॉलला पाणी सोडण्यात यावे अशी मागणी करत आहेत .





    error: Content is protected !!





  • दुष्काळात तेरावा…! 17 गोणी फ्लॉवर विकून मिळाला फक्त साडेनऊ रुपयांचा भाव – Hello Krushi

    हॅलो कृषी ऑनलाईन : आधीच बदलत्या हवामानामुळे शेती करणे आणि त्यातून चांगले उत्पन्न घेणे शेतकऱ्यांना मुश्किल झाले आहे. अशातच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातल्या शिरूर इथल्या एका शेतकऱ्याने तब्बल १७ गोणी म्हणजेच जवळपास आठशे फ्लॉवर मुंबई इथल्या बाजार समितीमध्ये विक्रीसाठी पाठवला. मात्र त्याला सर्व खर्च वगळवून केवळ साडेनऊ रुपयांची बिलाची पावती व्यापाऱ्याने पाठवली. त्यामुळे आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्याला आणखी अडचणीत टाकले आहे.

    शेतकऱ्याच्या हातात केवळ ९ रुपये ५० पैसे

    मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत राज्यातल्या विविध भागातून शेतकरी चांगली किंमत मिळण्याच्या अपेक्षेने शेतमाल पाठवत असतात. पुण्यातील शिरूर येथील शेतकरी किसन फराटे यांनी आपल्या उसाच्या शेतात आंतरपीक म्हणून फ्लॉवर पीक घेतले होते. फराटे यांनी व्यापारी सूर्यकांत शेवाळे यांच्याकडे ११ ऑगस्ट रोजी आपला आठशे किलोचा फ्लॉवर पाठवला. या सर्व मालाला एकूण २ हजार ६८४ रुपये इतकाच दर आला. यातून वाहतूक भाडे, हमाली आणि वजनखर्चापोटी २ हजार ६७५ रुपये वळते करून घेण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्याच्या हातात फक्त ९ रुपये ५० पैसे आले.

    याबाबत बोलताना फराटे यांनी सांगितले की , एपीएमसी’ बाजारात मी ८५० किलो फ्लावर विक्रीसाठी आणला होता. त्यासाठी मला केवळ ९.५० रुपये मिळाले.माझे इतकेच म्हणणे आहे की, शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाचा योग्य मोबदला मिळावा. नाहीतर नाहीतर तो शेती का करेल? दरम्यान, ‘एपीएमसी’ घाऊक बाजारात फ्लॉवर कमीत कमी १६ ते जास्तीत जास्त ३० रुपये प्रतिकिलो दराने तर किरकोळ बाजारात ८० ते १०० रुपये प्रतिकिलो किलो दराने विकला जात आहे. शेतकऱ्याच्या हातात मात्र तीन ते चार रुपयेही मिळत नाहीत.

  • सिंधुदुर्ग जिल्ह्यात गव्यांचा उच्छाद, शेती पिकांची नासधूस ; शेतकरी त्रस्त





    सिंधुदुर्ग जिल्ह्यात गव्यांचा उच्छाद, शेती पिकांची नासधूस ; शेतकरी त्रस्त | Hello Krushi
































    error: Content is protected !!

  • Income Tax Department Raids On Factories Of Abhijit Patil,





    Income Tax Department Raids On Factories Of Abhijit Patil,































    error: Content is protected !!

  • प्रकिया उद्योगांसाठी आर्थिक तरतूद वाढवा, राजू शेट्टींची मंत्री पशुपती कुमार यांच्याकडे मागणी





    प्रकिया उद्योगांसाठी आर्थिक तरतूद वाढवा, राजू शेट्टींची मंत्री पशुपती कुमार यांच्याकडे मागणी | Hello Krushi































    error: Content is protected !!

  • ओला दुष्काळ जाहीर करा, संत्र्याला हेक्टरी एक लाख रुपये मदत द्या : मोर्शीत रास्ता रोको आंदोलन





    ओला दुष्काळ जाहीर करा, संत्र्याला हेक्टरी एक लाख रुपये मदत द्या : मोर्शीत रास्ता रोको आंदोलन | Hello Krushi






























    error: Content is protected !!