गलती: सामग्री सुरक्षित है !!
गलती: सामग्री सुरक्षित है !!
राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी गुरुवारी परभणी जिल्ह्यातील जिंतूर व परभणी तालुक्यातील ऑक्टोबर मध्ये सततच्या पावसाने व अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेताची पाहणी केली .यावेळी पाथरी तालुक्यातील युवा शेतकरी संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेत पाथरी तालुक्यात झालेल्या खरीप पिकांच्या नुकसानीनंतर या ठिकाणी ओला दुष्काळ जाहीर करत अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ पिक विमा व आर्थिक मदत द्यावी अशी लेखी स्वरूपात मागणी केली .
राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी गुरुवार 27 ऑक्टोबर रोजी परभणी जिल्ह्यातील पीक नुकसानीची पाहणी केली व त्यानंतर ते हिंगोली येथे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी जाणार होते .तत्पूर्वी सायंकाळ उशिरा त्यांनी परभणी जिल्ह्यातील नुकसानी संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालय मध्ये आढावा बैठक घेतली यानंतर पत्रकारांशी संवाद साधला .
जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पाथरी तालुक्यातील युवा शेतकरी संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली. यावेळी ऑक्टोबर महिन्यामध्ये खरीप पिके काढणीच्या वेळी अतिवृष्टीचा व सततचा पाऊस झाल्यामुळे पाथरी तालुक्यातील चारही महसूल मंडळातील खरीप पिकांचे 80 टक्कांपेक्षा जास्त नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्या असल्याचे लेखी निवेदनातून निदर्शनास आणून दिले. दरम्यान 15 ऑक्टोबर ते 21 ऑक्टोबर पर्यंत सलग सहा दिवस उपोषण व आंदोलन केल्यानंतर प्रशासनाने 25 ऑक्टोबर पर्यंत पंचनामे करत अहवाल पुढील कारवाईसाठी वरिष्ठांकडे पाठवण्याचे आश्वासन दिले होते. यासंदर्भातही शिष्टमंडळाने राज्यमंत्र्याच्या निदर्शनास आणून दिले. कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकऱ्याला मदत देण्यात येईल परभणी जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 63 हजार शेतकऱ्यांचे पंचनामे झाले असून उर्वरित पंचनामे तात्काळ पूर्ण करण्यात येऊन सर्व शेतकऱ्यांना मदत करण्यात येईल कुणीही वंचित राहणार नाही असा यावेळी शिष्टमंडळाला शब्द दिला.
दरम्यान पाथरी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मागण्या संदर्भात लवकरच सकारात्मक निर्णय न घेतल्यास पुन्हा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी शिष्टमंडळाने कृषिमंत्र्यांना दिला आहे. शिष्टमंडळात श्याम धर्मे , डॉ . महेश कोल्हे , अमोल भाले पाटील ,संदीप टेंगसे ,गजानन घुंबरे , दिपक टेंगसे यांचा सहभाग होता .
हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यामध्ये परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या ऐन काढणीस आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अशात विरोधी पक्षनेते, शेतकरी संघटना, आणि शेतकऱ्यांमधूनही ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करण्यात येत आहे. मात्र राज्य सरकारकडून अद्याप नुकसानीची पाहणी करण्यात येत आहे. राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार परभणी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी गेले असता एक महत्वाची माहिती त्यांनी दिली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी प्रसंगी केंद्राकडेही आम्ही मदतीसाठी जाणार आहोत. अशी माहिती त्यांनी दिली आहे.
यावेळी बोलताना सत्तार म्हणाले की, राज्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे नुकसान झालेलं आहे. मी स्वतः आणि माझे अधिकारी बांधावर जाऊन किती नुकसान झाले, याची माहिती गोळा करत आहोत. साधारणतः सात आठ दिवसांमध्ये ही माहिती आल्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बसून कॅबिनेटमध्ये राज्यातील शेतकऱ्यांना मदतीचा जो काही निर्णय आहे तो घेतील. त्याचप्रमाणे केंद्राकडेही आम्ही मदतीसाठी जाणार आहोत. त्यांचेही पथक राज्यात पाहणीसाठी येईल, त्यानंतर केंद्र सरकार, राज्य आणि पीक विमा अशी तीन प्रकारची मदत शेतकऱ्यांना दिली जाईल. एकही शेतकरी पिक विमा पासून किंवा मदतीपासून वंचित राहणार नाही, याची काळजी आम्ही घेत आहोत. तसेच राज्यात ओला दुष्काळात संदर्भात परिस्थिती नाहीये, मी हे 4 वेळेला बोललो आहे. जी काय परिस्थिती आहे ती परिस्थिती आम्ही पाहून शेतकऱ्यांना मदत करणार असल्याचे सांगितले आहे.
कृषिमंत्री अब्दुल सत्तार आज परभणी दौऱ्यावर होते. त्यांनी जिंतूर आणि असोला या ठिकाणी शेतीच्या नुकसानीची पाहणी केली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये एक आढावा बैठक घेऊन जिल्ह्यातील नुकसानीचाही त्यांनी आढावा घेतला. यानंतर पत्रकार परिषद घेऊन त्यांनी ही माहिती दिली आहे. दरम्यान, राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज परभणीच्या जिंतूर तालुक्यातील मालेगाव परिसरातील नुकसानीची पाहणी केली. यावेळी तूर कापूस आदी पिकांची शेतात जाऊन पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांशी संवादही साधला तर लवकरच शेतकऱ्यांना मदत दिली जाईल, असेही सांगितलं. शिवाय शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचेही अब्दुल सत्तार यांनी यावेळी सांगितले.
हॅलो कृषी ऑनलाईन : राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी मराठवाडयातील औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी शेताच्या बांधावर जाऊन पाहणी केली. परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करावे असे निर्देश कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी अधिकाऱ्यांना दिले. पंचनामा करीत असतांना एकही नुकसानग्रस्त शेतकरी पंचनामा अभावी मदतीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याची सूचना सत्तार यांनी दिल्या. तर पंचनाम्यानंतर 15 दिवसांत मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असल्याची माहिती यावेळी अब्दुल सत्तार यांनी दिली आहे.
यावेळी बोलतांना सत्तार म्हणाले की, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी हताश न होता धीर धरावा. शेतकऱ्यांच्या पाठीशी राज्य सरकार खंबीरपणे उभे आहे. कृषीमंत्री या नात्याने प्रत्येक जिल्ह्यात पावसामुळे झालेल्या पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्याची सूचना मुख्यमंत्री महोदयांनी मला केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अजिबात निराश होऊ नये. पावसामुळे कापूस, मका, सोयाबीन या पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या सर्व पिकांचे वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. पंचनाम्याचा अहवाल शासनास प्राप्त झाल्यानंतर तो मंत्रिमंडळ बैठकीत ठेऊन त्यावर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी तातडीने सहानुभूतीपूर्वक निर्णय घेतला जाईल असेही अब्दुल सत्तार म्हणाले.
कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी औरंगाबाद तालुक्यातील दुधड, लाडसावंगी,शेकटा, जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील अंबडगाव, धोपटेश्वर , लालवाडी, जालना तालुक्यातील जामवाडी ,पानशेंद्रा, अंबड तालुक्यातील अंतरवाला, गोलापांगरी, वडीगोद्री, बीड जिल्ह्यातील बीड, गेवराई, पाडळसिंगी, जप्ती पारगाव गावातील शिवार परिसरातील शेत बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली.
हॅलो कृषी ऑनलाईन : परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. विरोधी पक्षनेत्यांसह इतर राजकीय व्यक्तींनी तसेच शेकरी संघटनांनी देखील राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. मात्र राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी ओला दुष्काळ जाहीर करणार की नाही याबाबत माहिती दिली आहे. राज्यात सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा अशी स्थिती नाही. पण ज्या भागामध्ये नुकसान झालं आहे, त्या भागाचे पंचनामे केल्यावरच आपल्याला किती नुकसान झालं ते समजेल असेही सत्तार म्हणाले.
याबाबतीत पुढे बोलताना सत्तार म्हणाले, परतीचा पाऊस हा काही पहिल्या वर्षी झाला असे नाही. प्रत्येक वेळी तो पडतो, त्याचा अंदाज लावता येत नाही असेही सत्तार म्हणाले. जिथे जिथे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, त्याबाबतची माहिती आमच्याकडे येत आहे. त्या नुकसानीचा आकडा लकरच कळेल. त्या शेतकऱ्यांना मदत देण्यात येईल असे सत्तार म्हणाले. प्रत्येक वेळी कृषी विभागाची मंत्रीमंडळ बैठकीत चर्चा होते. साडेपाच हजार कोटी रुपयांची नुकसान भरपाई सरकारनं आतापर्यंत दिली आहे. पुढच्या काळातही सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी उभं असल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले असल्याचे सत्तार म्हणाले.
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी केली आहे. मात्र, ओला दुष्काळ जाहीर करावा अशी परिस्थिती नाही. पण ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालं आहे तो शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही नाही याची दक्षता कृषी अधिकारी, जिल्हाधिकारी घेतील असे सत्तार म्हणाले. पंचनामा करण्याचे तत्काळ आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. पण वस्तुनिष्ठ पंचनामे होत नाहीत तोपर्यंत अंतिम नुकसानीचा आकडा येणार नाही असे सत्तार म्हणाले.
पहिल्या नुकसानीचे तीन हजार 500 कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले आहेत. 600 कोटी रुपये नंतर दिले त्यानंतर गोगलयीनं नुकसान झालेल्या क्षेत्राला देखील मदत दिली असल्याचे सत्तार म्हणाले. गेल्या 25 वर्षात तत्काळ मदत देण्याच काम पहिल्यांदाच झालं असल्याचे सत्तार म्हणाले. विरोधी पक्षाला फक्त विरोधच करायचा आहे. शेतकऱ्यांना मी विनंती करतो की आत्महत्येसारखं पाऊस उचलू नका. हा अंतिम पर्याय नसल्याचे सत्तार यावेळी म्हणाले.
हॅलो कृषी ऑनलाईन : कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वीय सचिवांना शिवीगाळ केल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. त्याच्या दुसऱ्याच दिवशी अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड मतदारसंघातील प्रस्तावित असलेल्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ ( एमआयडीसी) मध्ये निम्म्या भागात कृषी औद्योगिक पार्क आणि उर्वरित क्षेत्र सर्वसाधारण उद्योग उभारण्यासाठी वापरण्याचा निर्णय घेण्यात आला. उद्योगमंत्री उदय सामंत अध्यक्षतेखालील झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
याबाबत बोलताना उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले, एमआयडीसी स्थापन करण्यासंदर्भात सिल्लोडचे आमदार तथा कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. याच पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आली होती. सिल्लोड परिसरात एमआयडीसी सुरु करायची आहे. या प्रस्तावित एमआयडीसीच्या निम्म्या क्षेत्रात कृषी औद्योगिक पार्क (ॲग्रो इंडस्ट्री पार्क) उभारल्यास कृषी अन्न प्रकिया उद्योगांना चालना मिळेल. तसेच उर्वरित क्षेत्र सर्वसाधारण सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी वापरल्यास औद्योगिक समतोल राखता येईल, असे उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले.
याबाबत बोलतांना कृषी मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले, औरंगाबाद जिल्ह्यात रोजगारासाठी उद्योग उभारणे आणि त्यांना चालना देण्याची गरज आहे. सिल्लोड परिसर हा डोंगरी भाग असून रस्ते, मुबलक पाणी अशा सर्व सोयी सुविधा उपलब्ध आहेत. सिल्लोड हा तीन जिल्ह्यांच्या मध्यभागी असल्याने वाहतूक व्यवस्थासुद्धा उपलब्ध आहे. येत्या काळात कृषी प्रक्रिया उद्योजक आणि इतर कंपन्यांना उद्योग उभारण्याबाबत आवाहन करणार असल्याचे अब्दुल सत्तार म्हणाले.
आमच्या आमदारांची कामे महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात होत नसल्याने आम्ही बंडखोरी करण्याचा निर्णय घेतला असल्याचा दावा सतत शिंदे गटाचे आमदार करतात. त्यामुळे आता नव्याने स्थापन झालेल्या सरकारमध्ये आपले प्रलंबित विकास कामे मार्गी लावण्यासाठी शिंदे गटाचे सर्वच आमदार प्रयत्न करत आहे. दरम्यान अशाच काही प्रलंबित विकास कामांच्या मुद्यावरून अब्दुल सत्तार यांनी रविवारी वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वीय सचिवांना शिवीगाळ केल्याची चर्चा आहे. तर या चर्चेच्या दुसऱ्याच दिवशी अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड मतदारसंघातील प्रलंबित एमआयडीसीचा प्रश्न मार्गी लागला आहे.
संदर्भ : एबीपी माझा
error: Content is protected !!
हॅलो कृषी ऑनलाईन : राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी घोषणा केलेल्या ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ या उपक्रमाची सूरूवात करण्यात आली आहे. या उपक्रमाची सुरुवात अमरावती येथील साद्राबाडी या गावापासून करण्यात आली आहे. काल पासूनच कृषिमंत्री आणि अधिकारी या गावात दाखल झाले.
काल रात्रीच्या वेळी साद्राबाडी गावातील शेतकरी शैलेंद्र सालकर यांच्याकडे कृषी मंत्री अब्दुल सत्तार मुक्कामी राहिले होते. कृषिमंत्री गावात पोहचल्यानंतरण या उपक्रमाचे गावकऱ्यांकडून स्वागत करण्यात आले. आज मेळघाटातील साद्राबाडी या गावातून ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ या उपक्रमाचा शुभारंभ करणार आहेत. आज दिवसभर सत्तार हे प्रत्यक्ष शेतात जाऊन शेतकऱ्यांशी चर्चा करणार आहेत. शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी पदाधिकारी, अधिकारी हे संपूर्ण एक दिवस शेतकऱ्यांसोबत राहून संवाद साधणार आहेत. तसेच प्रत्येकांच्या अडचणी समजून घेणार आहेत.
योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचत नाहीत
यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की , मी इथे आल्यापासून शेतकऱ्यांची दिनचर्या, त्यांची दैनंदिनी, त्यांच्या अडचणी समजून घेण्याच्या प्रयत्न करीत आहे. इथे आल्यानंतर लक्षात आले की, सरकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत पोचतच नाही. अनेक योजनांचा लाभ अद्यापही शेतकऱ्यांपर्यंत पोहचत नाहीत. आज दिवसभर अधिकारी येतील त्यांच्या अडचणी त्या अडचणींवर उपाय कसे काढता येईल हे पाहणार आहोत. १०० दिवसाच्या या कार्यक्रमाची घोषणा झाली आहे. आय ए एस आणि इतर अधिकारी राज्यातल्या शेतकऱ्यांच्याकडे जातील. पूर्ण डेटा जमा करतील शेतकऱ्यांच्या एक दिवसाच्या उत्पन्न आणि खर्चाचा लेखाजोगा मंडला जाईल. शेतकऱ्यांच्या अडचणींवर उपाय काढला जाईल असे सत्तार म्हणाले.
असा असेल आजचा कार्यक्रम
कृषीमंत्री सत्तार हे आज सकाळी दत्तात्रय पटेल यांच्यासोबत शेतात जातील. तिथे सोयाबीन फवारणी होईल आणि त्यांच्याशी चर्चा करतील. त्यांनतर बाजूलाच असलेल्या राजेश डावलकर यांच्या शेतात कापूस डवरणी/फवारणी होईल. नंतर बाबूलाल जावरकर यांच्या शेतात विद्युत पंप दिले त्याची पाहणी आणि सोयाबीन फवारणी होईल. तिथून ते किशोरीलाल धांडे यांच्या शेतात जाऊन त्यांच्या शेतात असलेल्या संत्रा बागेची पाहणी आणि संत्र्याची छाटणी, खत देणे, फवारणी होऊ शकते. त्यांनतर नंदलाल बेठेकर यांना विहीर दिली त्याची पाहणी करतील. तिथून अशोक पटेल यांच्या शेतात ठिंबक संच पाहणी करणार आणि रामगोपाल भिलावेकर यांच्या शेतात तुषार संच पाहणी. आणि मग बाटु धांडे यांच्या शेतात रोटावेटरची पाहणी आणि नथु गाडगे यांच्या शेतात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची ते पाहणी करतील आणि मग पुरुष बचत गट यांची अवजार बँक पाहणी कृषीमंत्री अब्दुल सत्तार करणार आहेत.
हॅलो कृषी ऑनलाइन : शिंदे फडणवीस सरकार ऍक्शन मोड मध्ये आल्याचे दिसून येत आहे. कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी पावसाळी आधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी एक महत्वपूर्ण घोषणा केली. आता राज्यात ‘एक दिवस बळीराजासाठी’ ही संकल्पना राबवण्यात येणार आहे. या संकल्पने अंतर्गत कृषी विभागाचे सचिव, अधिकारी सगळेच शेतकऱ्यांच्या घरी जाऊन त्यांच्या अडीअडचणी, प्रश्न जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहेत.
याबाबत बोलताना सत्तार म्हणाले की, शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखणे, शेतकऱ्यांना समृद्ध करणे हा या योजनेमागचा हेतू असून, राज्यात शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या, अतिवृष्टी, पूर आणि नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे पिकांचे नुकसान यातून त्यांना तातडीने मदत करणे हा या मोहिमेमागील उद्देश आहे. त्यात शेतकऱ्यांचे दुःख शेतकऱ्यांच्या अडचणी या जाणून घेण्यासाठी थेट गावातल्या घरामध्ये अधिकारी पोहोचतील. त्यांच्यासोबत राहतील, शेतात जातील, रात्री मुक्काम करतील. जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे सीईओ, जिल्हा कृषी अधिकारी, विभागीय कृषी अधिकारी, हे शेतकऱ्यांच्या घरी एक दिवस राहतील, असंही सत्तार यांनी स्पष्ट सांगितलं आहे.
शेतकऱ्यांच्या नेमक्या अडचणी जाणून घेणार
90 दिवस राज्यातील विविध जिल्ह्यांत हा मुक्काम असणार आहे. दिवसभरात शेतकरी काम करत असताना काय अडचणी येतात, बॅंकेच कर्ज घेण्यासाठी काय अडचणी आहेत, शेतकरी का आत्महत्या करतोय याचा आढावा या मोहिमेच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे. मोहीम संपल्यानंतर सर्व जिल्ह्यांमधील आढावा घेऊन त्याचा सविस्तर अहवाल तयार करण्यात येणार आहे. त्यानंतर शेतकऱ्यांसाठी नवीन योजना राबवल्या जाणार, असेही सत्तार यांनी अधिवेशनात स्पष्ट केलं आहे.