Category: aurangabad news

  • पंचनामे होत नसल्याने कृषिमंत्र्यांच्या मतदारसंघातील संतप्त शेतकऱ्याने फळबाग पेटवली





    पंचनामे होत नसल्याने कृषिमंत्र्यांच्या मतदारसंघातील संतप्त शेतकऱ्याने फळबाग पेटवली | Hello Krushi







































    हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात परतीच्या पावसानं शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. केवळ खरीप पिकांचे नाही तर फळबागांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाला आहे. विरोधी पक्षनेते शेतकरी संघटना तसेच शेतकऱ्यांच्या मधून देखील लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी जोर धरू लागली आहे असे असताना. अद्याप पंचनामेच झाले नसल्याकारणाने संतप्त शेतकऱ्यांनी तीन एकर क्षेत्रावरील मोसंबीची बाग जाळून टाकल्याची घटना घडली आहे. ही घटना कृषी मंत्री असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यात घडली आहे.

    अनेकदा प्रयत्न करूनही कोणतीच मदत मिळण्याची आशा नसल्यामुळे अखेर संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी तीन एकर क्षेत्रावरील मोसंबीच्या बागेला आग लावल्यात आणि यात मोसंबीची झाड जळून खाक झाल्यात ही घटना औरंगाबाद जिल्ह्यातल्या उमरविहिरे येथील आहे. सोयगाव तालुक्यात पीकांना सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टी फटका बसला. तर बदलत्या वातावरणामुळे मोसंबी, केळीच्या बागेचं देखील मोठं नुकसान झालं. विशेष म्हणजे ऑगस्टपासून फळांची गळती वाढलेली असताना तालुका कृषी विभागाकडून यावर कोणतीही उपाययोजना दूरच, परंतु अतिवृष्टीच्या नुकसानीची पाहणी करण्याची तसदीही घेतली नाही. मदतीची आशा धूसर होत चालल्याने संतप्त होऊन उमरविहिरे येथील शेतकऱ्यांनी त्यांच्या तीन एकर मोसंबीच्या बागेला आग लावली. यात मोसंबीची झाडे जळून खाक झाली आहेत.

    कृषिमंत्र्यांच्या मतरदार संघाचीच अशी अवस्था

    कृषीमंत्री अब्दुल सत्तार राज्यभरात दौरा करत नुकसानीची पाहणी करून आढावा घेत आहे. सोबतच पंचनामे करण्याचे आदेश देतांना या प्रकियेत एकही बाधित शेतकरी सुटणार नाही अशा सूचना देत आहेत. असे असताना मात्र कृषीमंत्री सत्तार यांच्या मतदारसंघातच अजूनही पंचनामे करणारे पथक बांधावर पोहचले नसल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे खुद्द कृषीमंत्री यांच्या मतदारसंघात अशी परिस्थिती असेल तर इतर जिल्ह्यात काय अवस्था असेल असा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

     

    error: Content is protected !!





  • शेतकऱ्यांना तत्काळ मदत द्या, अन्यथा पाण्याच्या टाकीवरुन उड्या मारु, जनशक्ती शेतकरी संघटना आक्रमक





    शेतकऱ्यांना तत्काळ मदत द्या, अन्यथा पाण्याच्या टाकीवरुन उड्या मारु, जनशक्ती शेतकरी संघटना आक्रमक | Hello Krushi










































    हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात परतीच्या पावसामुळे ऐन काढणीला आलेल्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. परतीच्या पावसाचा सर्वाधिक फटका विदर्भ मराठवाड्याला बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मधून ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी प्रकर्षाने जोर धरू लागली आहे. औरंगाबादेत शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून जनशक्ती शेतकरी संघटना आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. शेतकऱ्यांना तातडीनं मदत करा या मागणीसाठी शेतकऱ्यांनी औरंगाबाद इथं पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करण्यात आले आहे.

    याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, औरंगाबाद जिल्ह्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र शेतकऱ्यांच्याकडे पाहण्यास कोणीही तयार नाही. शिवाय जिल्ह्याला पालकमंत्री संदिपान भुमरे हे औरंगाबादचे आहेत, कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे औरंगाबाद जिल्ह्यातील असूनही शेतकऱ्यांनी न्याया मिळत नाही. एवढे आमदार खासदार मंत्री असतानाही शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही. शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे होते नाहीत, मदत मिळत नाही त्यामुळं शेतकरी संकटात आहे. लाखो रुपये खर्चून शेतकऱ्यांच्या हातात काहीच नसल्याची खंत जनशक्ती शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त करीत पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले.

    अद्याप नुकसानीचे पंचनामेही पूर्ण झाले नाहीत. दिवाळी जाऊनसुद्धा राज्य सरकारनं शेतकऱ्यांना काही मदत दिली नाही. त्यामुळंशेतकऱ्यांना सरकारनं तातडीनं मदत करावी अशी मागणी जनशक्ती शेतकरी संघटनेनं केली आहे. या मागणीसाठी औरंगाबाद येथील पाण्याच्या टाकीवर चढून जनशक्ती शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. पालकमंत्री आणि केंद्रीय मंत्र्यांच्या घराजवळ शोले स्टाईलनं हे आंदोलन करण्यात आलं. मदत न दिल्यास पाण्याच्या टाकीवरुन उड्या मारु असा इशारा देखील आंदोलकांनी दिला आहे.

    error: Content is protected !!





  • समाधानकारक…! कापसाला मुहुर्तालाच मिळाला अकरा हजारांचा भाव

    हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रानो, मागील वर्षी कापसाला १४ हजार रुपयांचा कमाल दर मिळाला होता. यंदा देखील कापसाच्या दरात तेजी असण्याचा अंदाज तज्ञ मंडळींकडून व्यक्त केला जात आहे. तसे पाहायला गेल्यास ग्रामीण भागामध्ये दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर व्यापाऱ्यांकडून कापसाची खरेदी करण्यात येते. औरंगाबाद मध्ये देखील कापसाचे मुहूर्त केले गेले. या दरम्यान कापसाला तब्बल ११ हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.

    औरंगाबाद मधील सिल्लोड तालुक्यातील बनकिन्होळा परिसरात कापसाची मोठी बाजारपेठ असून, दसऱ्याच्या मुहर्तावर कापूस खरेदीला व्यापाऱ्यांकडून प्रारंभ करण्यात आला. यावेळी कापसाला 11 हजार रुपये प्रति क्विंटल प्रमाणे भाव मिळाला आहे. व्यापारी संतोष फरकाडे व दत्ता काकडे यांनी विजया दशमीच्या मुहूर्तावर 11 हजार रुपये प्रति क्विंटल दराने कापसाची खरेदी केल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं आहे.

    पैठण तालुक्यात साडेसात हजारांचा भाव

    सिल्लोड प्रमाणेच पैठण तालुक्यातील टाकळी अंबड व परिसरात विविध ठिकाणी दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर कापूस खरेदीस प्रारंभ करण्यात आला. दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर टाकळी अंबड येथे बुधवारी सकाळी वजन काट्याचे विधिवत पूजन व श्रीफळ वाढवून करण्यात आले. तर विक्रीसाठी आलेल्या कापसाला साधारणतः 7 हजार 700 ते 8 हजार दरम्यान प्रति क्विंटल भाव देण्यात आला. सुजल कृषी उद्योग वतीने पहिल्याच दिवशी 10 क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला. विशेष म्हणजे मागील वर्षी शेवटच्या टप्प्यात या भागात 10 हजाराहून अधिक भाव कपाशीला मिळाला होता.

    कापसाला पावसाचा फटका

    औरंगाबाद जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून मोठ्याप्रमाणावर कापसाची लागवड केली जाते. मात्र यावर्षी सुरवातीपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे शेतात पाणी तुंबल्याने पिकांची वाढ खुटली आहे. तर काही ठिकाणी पिकं पिवळी पडली असल्याचे चित्र होते. त्यामुळे यंदा कापसाची आवक घटण्याची शक्यता आहे. आवक जर घटली तर निश्चीतच कापसाला भाव चांगला मिळू शकतो. मात्र भाव मिळाला तरी पिक घटल्याने शेवटी शेतकऱ्यांचे नुकसानच होणार आहे. यावर्षी मराठवाड्यातील अनेक भागात अतिवृष्टी झाली आहे. तर कापूस वेचणीला आला असताना देखील पावसाची रिपरिप अनेक भागात सुरूच आहे. त्यामुळे कापूस पुर्णपणे ओलसर झाला आहे. विशेष म्हणजे प्रतवारी पाहून कापसाला भाव देण्यात येतो. कापूस ओला असल्यास त्याचे वजन जास्त भरतो, मात्र भाव कमी मिळतो. प्रथमिक माहितीनुसार पहिल्या वेचणीतील कापूस वजन करत असून, ओलाही आहे.

  • औरंगाबाद: सुरक्षाबलों को निशाना बनाने की नक्सलियों की मंशा नाकाम, हथियार-विस्फोटक का जखीरा बरामद

    लाइव सिटीज पटना: बिहार के औरंगाबाद में सुरक्षाबलों को निशाना बनाने की नक्सलियों की मंशा को नाकाम करने में चलाये जा रहे सर्च ऑपरेशन में बड़ी कामयाबी हाथ लगी है. औरंगाबाद की पुलिस और कोबरा 205 बटालियन की संयुक्त कार्रवाई में एक बार फिर नक्सलियों के मंसूबों को ध्वस्त किया गया है. शुक्रवार को समाहरणालय स्थित पुलिस कक्ष में प्रेसवार्ता करते हुए एसपी कांतेश कुमार मिश्रा ने इसकी जानकारी दी. एसपी ने बताया कि गुरुवार को स्थानीय सूत्रों से जानकारी प्राप्त हुई कि नक्सली सुरक्षाबलों को नुकसान पहुंचाने की योजना बना रहे हैं. इसी आधार पर सीआरपीएफ, कोबरा तथा जिला पुलिस की एक संयुक्त टीम गठित कर अजनवा पहाड़ तथा उसके आसपास के जंगली इलाकों में सर्च ऑपरेशन चलाया गया.

    एसपी ने बताया कि मदनपुर के अजनवा पहाड़, कसमर स्थान, बनरवा और निमिया बथान एवं इसके आसपास के इलाके में प्रतिबंधित नक्सली संगठन भाकपा माओवादियों के सशस्त्र दस्ते के द्वारा सुरक्षा बलों पर हमला करने की योजना बनाई जा रही है. सूचना के आधार पर मेरे एवं कोबरा 205 के समादेष्टा के निर्देशन में अभियान एएसपी एवं कोबरा 205 के उप समादेष्टा संजय बेलवाल के नेतृत्व में स्थानीय पुलिस बल के साथ संयुक्त छापेमारी की कार्रवाई की गई. छापेमारी को देखते हुए नक्सलियों के पांव उखड़ गए और वे भाग खड़े हुए.

    एसपी कांतेश कुमार मिश्रा ने बताया कि सुरक्षाबलों को देखते हुए नक्सली भाग खड़े हुए लेकिन इस दौरान माओवादियों द्वारा पहाड़ी क्षेत्रों में छोड़े गए चावल, दाल, तेल, मसाला, नमक, कपड़ा, बर्तन के साथ-साथ 5 किलो का एक और एक किलो का एक केन बम, 250 मीटर कोटैक्स वायर बरामद करते हुए उन सभी सामग्रियों को वही नष्ट कर दिया गया. इसके अलावा पहाड़ी क्षेत्रों से 303 बोर का एक राइफल, 315 बोर का मैगजीन सहित एक राइफल एवं 315 बोर लाइव राउंड के 28 कारतूस जब्त कर मदनपुर थाना लाया गया है.

    The post औरंगाबाद: सुरक्षाबलों को निशाना बनाने की नक्सलियों की मंशा नाकाम, हथियार-विस्फोटक का जखीरा बरामद appeared first on Live Cities.