Category: Cattles

  • ठंड का असर ! दुधारू पशुओं में दूध कम होने की संभावना, कैसे करें देखभाल?

    हैलो कृषि ऑनलाइन: पूरे राज्य में ठंडमांग में है। ऐसे में बढ़ती ठंड का असर सर्दी पर भी पड़ रहा है. पहले से ही गांठ के प्रकोप से निराश पशुपालकों को अब बढ़ती ठंड का सामना करना पड़ रहा है। ठंड के मौसम के कारण दूध उत्पादन में कमी आने की संभावना है। पशुपालन विभाग ने इस बढ़ती ठंड को देखते हुए पशुओं का ख्याल रखने की अपील की है।

    दुग्ध उत्पादन में गिरावट

    ठंड बढ़ने से दूध उत्पादन में कमी आने की आशंका है। जैसे-जैसे पशु के शरीर में गर्मी की मात्रा कम होती जाती है, इसका असर दूध पर भी पड़ता है। सर्दी से पहले 9 से 10 लीटर दूध देने वाले पशु तापमान गिरने के बाद 4 से 5 लीटर दूध देने लगे हैं। इससे पशुपालक भी पशुओं की देखभाल करने लगे हैं। पशुशालाओं में आग जलाना और पशुओं के शरीर की गर्मी बढ़ाने के लिए उनके अंगों को ढकना जैसे उपाय पशुपालकों द्वारा किए जा रहे हैं। पशुपालन अधिकारी राजेंद्र लांघे ने पशुपालन से अपील की है कि पशुओं के लिए गर्म वातावरण तैयार करें क्योंकि गांठ रोग के बढ़ते प्रसार से अन्य बीमारियों के संक्रमित होने की आशंका रहती है.

    आप क्या ख्याल रखेंगे?

    – पशुओं को रात के समय छप्पर या अस्तबल में बांध देना चाहिए
    -साथ ही रात के समय पशुओं को टाट पहनाएं
    – साथ ही चरनी में बोरियत पैदा करने के लिए आग जलानी चाहिए
    -जहां पशुओं को छप्पर में रखा जाता है, वहां खुले हिस्से को कपड़े या अन्य वैकल्पिक साधनों से ढक देना चाहिए ताकि हवा अंदर न आए और पशुओं को ठंड का अहसास हो।

  • Lumpy: दिलासादायक ! राज्यात लंपीची लागण झालेली 93 हजारांहून अधिक गुरे झाली बरी

    हॅलो कृषी ऑनलाईन : लंपीत्वचा (Lumpy) रोगाने संपूर्ण भारतातील गुरांना संक्रमित केले आहे. एकट्या महाराष्ट्रात 32 जिल्ह्यांतील 3,30 गावांमध्ये हजारो गुरे लंपी रोगाने ग्रस्त आहेत. मात्र आता दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. राज्याचे पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह म्हणाले की, राज्यात आतापर्यंत या आजाराने ग्रस्त 93 हजार 166 जनावरे बरी झाली आहेत. सध्या बाधित गुरांवर उपचार सुरू आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये आज एकूण 140.97 लाख लसीचे डोस उपलब्ध करण्यात आले असून त्यापैकी 135.58 लाख जनावरांचे मोफत लसीकरण करण्यात येणार आहे. सचिंद्र प्रताप सिंह म्हणाले की, राज्यात लवकरच आठ टक्के लसीकरणाचे काम केले जाणार आहे.

    लंपी (Lumpy) त्वचारोगाच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील पशुपालक शेतकरी चिंतेत आहेत. याचा फटका दूध व्यवसायालाही बसत आहे. पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह म्हणाले की, जळगाव, अहमदनगर, धुळे, अकोला, औरंगाबाद, बीड, कोल्हापूर, सांगली, वाशिम, जालना, हिंगोली, नंदुरबार आणि मुंबई उपनगरी जिल्ह्यांमध्ये वाढत्या लंपी रोगाच्या पार्श्वभूमीवर लसीकरण पूर्ण झाले आहे. खाजगी संस्था, सहकारी दूध संस्था आणि वैयक्तिक पशुपालकांनी केलेल्या लसीकरणाच्या आकडेवारीनुसार, सुमारे 97 टक्के जनावरांचे लसीकरण करण्यात आले आहे. बाधित गावातील एकूण 1 लाख 43 हजार 89 बाधित जनावरांपैकी 93 हजार 166 पशुधन उपचाराने बरे झाल्याची माहिती आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिली.

    महाराष्ट्र पशू व मत्स्य विद्यापीठाने कीटक नियंत्रणासाठी काही मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत. त्या सूचनांचा अवलंब करून राज्यातील पशुसंवर्धन आणि ग्रामपंचायतीमार्फत गोशाळांमधील कीड नियंत्रण आणि निर्जंतुकीकरणाच्या महत्त्वाच्या बाबी मोहिमेच्या स्वरूपात राबवल्या जात आहेत. यावेळी पशुपालक प्रताप सिंह यांनी शासकीय व खाजगी पशुवैद्यकांनी दिलेल्या प्रगत उपचार प्रोटोकॉलनुसार उपचार करण्याचे आवाहन केले.

    पशुपालकांनी केवळ शासकीय अधिकाऱ्यांकडे जाऊन औषध-लसीकरणाची व्यवस्था करावी, अशी सूचनाही त्यांनी केली. ते म्हणाले की, शासनाने मोफत औषध आणि लसीकरणाचे नियोजन केले आहे. सर्व पशुधन (Lumpy) मालकांना विनंती आहे की त्यांनी आपल्या जनावरांवर उपचार करण्यासाठी स्थानिक पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना सहकार्य करावे.

     

     

     

  • सातारा जिल्ह्यात लंपीचा उद्रेक 11 पैकी 10 तालुक्यात शिरकाव

    हॅलो कृषी ऑनलाईन : सकलेन मुलाणी सातारा

    राज्यात लंपी या रोगाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत आहे. सातारा जिल्ह्यातील जनावरांना लंपी त्वचा रोगाचा उद्रेक वाढू लागला आहे. जिल्ह्यातील 11 तालुक्यांपैकी 10 तालुक्यात या रोगाचा शिरकाव मोठ्या प्रमाणात झाला आहे.

    जिल्ह्यात शुक्रवारी एका दिवसात 5 जनावरांचा लंपी आजाराने मृत्यू झाला आहे. लंपी रोगाने जिल्ह्यातील 10 तालुक्यातील 71 गावे बाधित झाली आहेत. आत्तापर्यंत 573 जनावरांना लंपीची लागण झाली आहे, तर 82 जनावरे उपचाराने बरी झाली आहेत. 449 जनावरांवर सध्या उपचार करण्यात येत आहे.

    जिल्ह्यातील 3 लाख 52 हजार जनावरांना पशुसंवर्धन विभागामार्फत लसीकरण करण्यात येणार आहे. त्यापैकी 1 लाख 43 हजार 63 जनावरांना लसीकरण करण्यात आले आहे.. पशुसंवर्धन विभागाकडे 2 लाख 81 हजार 900 लसमात्रा उपलब्ध असल्याची माहिती पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर अंकुश परिहार आणि जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर संजय शिंदे यांनी दिली आहे.

    लम्पीची लक्षणे आणि बचाव

    १) लक्षणे

    १)या आजाराचा संसर्ग झाल्यास प्रथम जनावरांच्या डोळयातून आणि नाकातून पाणी येते.
    २)लसिकाग्रंथीना सूज येते.
    ३)सुरुवातीला जनावरांना ताप येतो.
    ४)दुधाचे प्रमाण कमी होते.
    ५)चारा खाणे, पाणी पिणे कमी होते.
    ६)हळूहळू डोके, मान, मायांग, कास इत्यादी भागाच्या त्वचेवर 10 ते 50 मिमी व्यासाच्या गाठी येतात.
    ७)तोंडातील व्रणामुळे आजारी जनावरांना चारा खाण्यास त्रास होतो.
    ८)डोळ्यातील व्रणामुळे चिपडे येतात, तसेच डोळ्यांची दृष्टी बाधित होते.
    ९)पायावर सूज येवून काही जनावरे लंगडतात.

    काय घ्यावी काळजी ?

    लम्पी त्वचा रोग हा संसर्गजन्य रोग असल्याने उपचार करण्यापेक्षा रोग येऊच नये याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजना व रोग आल्यास त्याचा प्रसार होऊ नये याकरिता पशुपालकांनी आवश्यक ती काळजी घेण्याची आवश्यकता आहे.

    १)बाह्य किटकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी गोठ्यांची व्यवस्थित स्वच्छता राखावी.
    २)निरोगी जनावरांना बाधित जनावरांपासून वेगळे बांधावे.
    ३)गायी व म्हशींना एकत्रित ठेवण्यात येवू नये.
    ४)रोग सदृश लक्षणे आढळल्यास जवळच्या पशुवैद्यकीय संस्था प्रमुखांना तातडीने संपर्क साधावा.
    ५)बाधित जनावरांच्या पिण्याच्या पाण्याकरिता व तसेच चराईकरिता स्वतंत्र व्यवस्था करावी.
    ६)गोठ्यात त्रयस्थांच्या भेटी टाळाव्यात.
    ७)बाधित परिसरात स्वच्छता करावी व निर्जंतुक द्रावणाची परिसरात फवारणी करावी.
    ८)फवारणीसाठी 1 टक्के फॉर्मलीन किंवा 2 ते 3 टक्के सोडियम हायपोक्लोराईट, फिनॉल 2 टक्के यांचा वापर करावा
    ९)या रोगाने ग्रस्त जनावरांचा मृत्यू झाल्यास मृतदेहाची शास्त्रीय पद्धतीने कमीत कमी ८ फूट खोल खड्डयात गाडून विल्हेवाट लावावी.
    १०)मृत जनावरांच्या खाली व वर चुन्याची पावडर टाकण्यात यावी.

  • Lumpy : ‘लम्‍पी’ त्वचारोगामुळे राज्यात 271 जनावरांचा मृत्यू

    हॅलो कृषी ऑनलाईन : जनावरांमध्ये होणाऱ्या लंपी या त्वचारोगाचा (Lumpy) मोठ्या प्रमाणात फैलाव राज्यात होताना दिसत आहे. दिनांक १९ सप्टेंबर रोजी मिळालेल्या आकडेवारीनुसार राज्यात ९ हजार ३७५ जनावरांमध्ये ‘लम्‍पी स्कीन’चा प्रादुर्भाव दिसून आला आहे. यापैकी २७१ जनावरांचा मृत्यू झाला आहे. तर या रोगातून ३ हजार २९१ जनावरे बरी झाली आहेत. याबाबतची माहिती माहिती पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिली आहे.

    २५ लाख लस मात्रा उपलब्ध

    सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘‘लम्पी स्कीन (Lumpy) आजाराने राज्यभरात सोमवार अखेर २७१ जनावरांचा मृत्यू झाला आहे. तर ३ हजार २९१ जनावरे आजारमुक्त झाली आहेत,’’ अशी माहिती पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिली. तर ‘‘तातडीच्या लसीकरणासाठी २५ लाख लस मात्रा उपलब्ध झाल्या आहेत. या विविध जिल्ह्यांमधील प्रादर्भावाचे प्रमाण पाहून वितरित केल्या जातील,’’ असेही त्यांनी सांगितले.

    २७१ पशुधन दगावले

    सिंह म्हणाले, ‘‘ राज्यातील २७ जिल्ह्यांमधील १ हजार १०८ गावांत ९ हजार ३७५ जनावरांमध्ये ‘लम्‍पी स्कीन’चा प्रादुर्भाव दिसून आला आहे. बाधितांपैकी ३ हजार २९१ जनावरे बरी झाली आहेत. उर्वरित जनावरांवर उपचार सुरु आहेत. आतापर्यंत २७१ पशुधन मृत झाले आहे. तर तातडीच्या लसीकरणासाठी विविध जिल्ह्यांमध्ये ४९ लाख ८३ लाख लशींच्या मात्रा उपलब्ध आहेत. यापैकी बाधित क्षेत्राच्या ५ कि.मी. परिघातील १ हजार १०८ गावांतील १६ लाख ४५ हजार पशुधनाचे लसीकरण करण्यात आले आहे.’’

    मुंबई नियंत्रित क्षेत्र जाहीर

    ‘लम्पी स्कीन’च्या (Lumpy) प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर मुंबईतही सावधगिरी बाळगली जात आहे. मुंबईत बैलगाड्या, घोडागाडी तसेच अनेक ठिकाणी गायीदेखील पाळल्या जातात. हे लक्षात घेता मुंबईत ‘लम्‍पी स्कीन’चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मुंबई हे ‘नियंत्रित क्षेत्र’ घोषित करण्यात आले आहे. मुंबईत प्राणी आणण्यास सक्त मनाई आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचा इशाराही मुंबई पोलिसांनी दिला आहे.

    लम्पीची लक्षणे आणि बचाव

     लक्षणे

    १)या आजाराचा संसर्ग झाल्यास प्रथम जनावरांच्या डोळयातून आणि नाकातून पाणी येते.
    २)लसिकाग्रंथीना सूज येते.
    ३)सुरुवातीला जनावरांना ताप येतो.
    ४)दुधाचे प्रमाण कमी होते.
    ५)चारा खाणे, पाणी पिणे कमी होते.
    ६)हळूहळू डोके, मान, मायांग, कास इत्यादी भागाच्या त्वचेवर 10 ते 50 मिमी व्यासाच्या गाठी येतात.
    ७)तोंडातील व्रणामुळे आजारी जनावरांना चारा खाण्यास त्रास होतो.
    ८)डोळ्यातील व्रणामुळे चिपडे येतात, तसेच डोळ्यांची दृष्टी बाधित होते.
    ९)पायावर सूज येवून काही जनावरे लंगडतात.

    काय घ्यावी काळजी ?

    लम्पी त्वचा रोग हा संसर्गजन्य रोग असल्याने उपचार करण्यापेक्षा रोग येऊच नये याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजना व रोग आल्यास त्याचा प्रसार होऊ नये याकरिता पशुपालकांनी आवश्यक ती काळजी घेण्याची आवश्यकता आहे.

    १)बाह्य किटकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी गोठ्यांची व्यवस्थित स्वच्छता राखावी.
    २)निरोगी जनावरांना बाधित जनावरांपासून वेगळे बांधावे.
    ३)गायी व म्हशींना एकत्रित ठेवण्यात येवू नये.
    ४)रोग सदृश लक्षणे आढळल्यास जवळच्या पशुवैद्यकीय संस्था प्रमुखांना तातडीने संपर्क साधावा.
    ५)बाधित जनावरांच्या पिण्याच्या पाण्याकरिता व तसेच चराईकरिता स्वतंत्र व्यवस्था करावी.
    ६)गोठ्यात त्रयस्थांच्या भेटी टाळाव्यात.
    ७)बाधित परिसरात स्वच्छता करावी व निर्जंतुक द्रावणाची परिसरात फवारणी करावी.
    ८)फवारणीसाठी 1 टक्के फॉर्मलीन किंवा 2 ते 3 टक्के सोडियम हायपोक्लोराईट, फिनॉल 2 टक्के यांचा वापर करावा
    ९)या रोगाने ग्रस्त जनावरांचा मृत्यू झाल्यास मृतदेहाची शास्त्रीय पद्धतीने कमीत कमी ८ फूट खोल खड्डयात गाडून विल्हेवाट लावावी.
    १०)मृत जनावरांच्या खाली व वर चुन्याची पावडर टाकण्यात यावी.

  • Establishment of Coordinating Cell in Ministry




    lumpy : Establishment of Coordinating Cell in Ministry











































    हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात लंपी या चर्मरोगाचा वाढता प्रादुर्भाव पाहता त्यावर तातडीने नियंत्रण आणण्यासाठी राज्य शासनाकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. राज्यातील शेतकरी पशुपालकांना लंबी रोगाविषयी संपर्क साधण्यासाठी मंत्रालयात समन्वय पक्षाची स्थापना करण्यात आली आहे. (02 2 – 28 45 13 2) या दूरध्वनी क्रमांकावर पशुपालकांनी संपर्क साधावा असावाहन पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव जे पी गुप्ता यांनी केला आहे.

    राज्यात लंपी चर्म रोगावर नियंत्रण आणण्यासाठी लसीकरण करणे, बाधित पशुधनावर औषधोपचार करणे, पशुपालकांना आवश्यक ते मार्गदर्शन करणे इत्यादी कार्यवाही युद्ध पातळीवर सुरू आहे. तथापि काही ठिकाणी पशुपालकांना येणाऱ्या समस्यांचे निराकरण करून त्यांना योग्य मार्गदर्शन करणे तसेच शेतकरी पशु पालकांना संपर्क साधता यावा व क्षेत्रीय कार्यालयाशी समन्वय साधता यावा यासाठी मंत्रालयात रूम नंबर 520 पाचवा मजला (विस्तार) येथे समन्वय कक्ष सुरू करण्यात आला आहे.

    राज्यातील चर्म रोगाचा वेळोवेळी आढावा घेणे, या रोगाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी क्षेत्रीय यंत्रणेला मार्गदर्शन करणे, उपाययोजनांबाबत राज्य शासनाला शिफारस करणे, इत्यादींसाठी पशुसंवर्धन आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय कार्यालयाचे गठन करण्यात आले आहे. यामध्ये तज्ञ व्यक्ती आणि शास्त्रज्ञांचा समावेश देखील करण्यात आला आहे.

    error: Content is protected !!





  • लंपी रोगापासून आपल्या पशुधनाला वाचवण्यासाठी काय काळजी घ्यावी ? जाणून घ्या

    हॅलो कृषी ऑनलाईन : राजस्थान गुजरात मध्ये धुमाकूळ घातल्यानंतर आता ‘लंपी’ या जनावरांना होणाऱ्या रोगाने महाराष्ट्रातही एंट्री केली आहे. आजच्या लेखात आपण या रोगापासून आपल्या पशुधनाला वाचवण्यासाठी काय काळजी घ्यावी ? याची माहिती घेऊया. ही माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी इथल्या तज्ञ व्यक्तींनी दिली आहे.

    –लम्पी स्कीन डिसीज सदृश रोग गायवर्गीय व म्हैसवर्गीय पशूधनात दिसून येत आहे.
    –हा साथीचा विषाणूजन्य रोग असून याचा प्रसार मूख्यत्वे रक्त पिपासू चावणऱ्या किटकवर्गीय माशा, डास, गोचीडे यामूळे होतो.
    –याच्या व्यवस्थापनासाठी रोग बाधीत पशुधन निरोगी पशुधनापासून विलगीकरण करावे अथवा त्यांना एकत्रित चरावयास सोडू नये.
    –रोगबाधीत पशुधनाची ने आण बंद करावी.
    — तसेच साथीच्या काळात गावातून/परिसरातून गोठयास भेटी देणाऱ्याची संख्या मर्यादीत करावी.
    — बाधीत पशुधनाची सुश्रुषा करणाऱ्य पशुवैद्यक डॉक्टरांनी विशिष्ट पोशाख परिधान करावा व सुश्रूषेनंतर हात अल्कोहोत मिश्रीत सॅनीटायझरने धूवून टाकावेत तसेच पादत्राने व पोशाख, गरम पाण्याने निर्जंतूक करून घ्यावा.
    –बाधीत पशुधनाच्या संपर्कामध्ये आलेले वाहन व परिसर तसेच ईतर साहीत्य निर्जंतूक करावे. रोग नियंत्रणासाठी रक्त पिपासू चावणाऱ्या किटकवर्गीय माशा, डास, गोचीडे यांचे निर्मुलन करावे.
    –पशुधन व परिसरावरती रासायनिक/वनस्पतीजन्य किटकनाशकाची फवारणी करावी.

    आजाराचा प्रसार

    –बाधित जनावराच्या त्वचेवरील व्रण, नाकातील स्राव, दूध, लाळ, वीर्य, इ. माध्यमामार्फत हा आजार निरोगी जनावरात पसरतो.
    –संसर्गजन्य असल्याने या विषाणूचा प्रसार हा बाधित जनावरांपासून निरोगी जनावरास स्पर्शाद्वारे सुद्धा होऊ शकतो. त्यामुळे बाधित जनावरे ही निरोगी जनावरांपासून वेगळे ठेवणे आवश्यक आहे.
    –साधारणतः ४ ते १४ दिवस हा कालावधी या आजाराचा संक्रमण कालावधी असतो. संक्रमण झाल्यानंतर १ ते २ आठवडे हा विषाणू रक्तामध्ये राहतो. त्यानंतर शरीराच्या इतर भागात त्याचे संक्रमण होते. त्यामुळे जनावराचे विविध स्राव, जसे डोळ्यातील पाणी, नाकातील स्राव, लाळ, इत्यादींमधून हा विषाणू बाहेर पडून चारा व पाणी दूषित होऊन इतर जनावरांना या आजाराचा संसर्ग होते.
    –त्वचेवरील खपल्यांमध्ये हा विषाणू अंदाजे १८ ते ३५ दिवस जिवंत राहू शकतो. वीर्यामधूनही हा विषाणू बाहेर पडत असल्यामुळे कृत्रिम रेतन किंवा नैसर्गिक संयोगाद्वारेही याचा संसर्ग होऊ शकते.

    आजाराची लक्षणे

    –हा विषाणूजन्य आजार असल्याने बाधित जनावरे अशक्त होतात. जनावरांची दूध उत्पादन क्षमता घटते. प्रजनन क्षमतेवरही विपरीत परिणाम होतो.
    –सुरुवातीस २ ते ३ दिवस जनावरास बारीक ताप जाणवतो. यानंतर जनावरांच्या सर्व शरीरावर कडक व गोल आकाराच्या गाठी येतात. या गाठी साधारणपणे पाठ, पोट, पाय व जननेन्द्रिय इ. भागात येतात.
    –बाधित जनावरांच्या डोळ्यातून व नाकातून पाणी येते. तोंडातील व्रणामुळे आजारी जनावरांना चारा खाण्यास त्रास होतो. पायावरील गाठींमुळे जनावरे लंगडतात.
    –निमोनिया व श्वसन संस्थेची लक्षणे आढळतात. डोळ्यांमधील व्रणामुळे जनावरांच्या दृष्टीत बाधा होऊ शकते.
    –अशक्तपणामुळे जनावरांना या आजारातून बरे होण्यास बराच कालावधी लागतो.

    उपचार

    –हा आजार विषाणूजन्य असल्याने यावर खात्रीशीर उपचार होऊ शकत नाही. परंतु विषाणूजन्य आजाराची बाधा झालेल्या जनावरास प्रतिकारशक्ती कमी झाल्याने इतर जिवाणूजन्य आजाराची बाधा होण्याची दाट शक्यता असल्याने जिवाणू प्रतिबंधक औषधी म्हणजे प्रतिजैविके देणे आवश्यक आहे.
    –त्यासोबत ताप कमी करणारी औषधे, प्रतिकार शक्तिवर्धक जीवनसत्त्व अ व ई तसेच त्वचेवरील व्रणांसाठी मलमाचा वापर करणे गरजेचे आहे.
    –वेदनाशामक व अँटि हिस्टॅमिनिक औषधांचाही आवश्यकतेप्रमाणे वापर करावा.
    –जनावरास मऊ व हिरवा चारा व तसेच मुबलक पाणी उपलब्ध करून द्यावे.
    –तोंडातील व्रणास २ टक्के पोटॅशिअम परमॅग्नेट द्रावणाने धुऊन तोंडात बोरोग्लीसरीन लावावे. लिव्हर टॉनिकच्या वापराने जनावरे लवकर बरे होण्यास मदत होते.

  • जनावरांमधील कासदाह आजारावर अशा पद्धतीने घरीच करा उपचार

    हॅलो कृषी ऑनलाईन : पशुपालकांनो अनेकदा दुधाळ जनावरांना कासेचे आजार होतात. त्यापैकीच कासदाह हा एक आजार आहे. जनावरांचे सड किंवा कास खराब झाल्यास जनावरांची उत्पादकता कमी होते. परिणामी अशा जनावरांचे बाजारमुल्यही कमी होते. त्यासाठी आजाराची लक्षणे ओळखून त्वरित उपचार करणे गरजेचे असते. गुजरात येथील नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाने कासदाह आजारावर नैसर्गीक उपचारांची शिफारस केली आहे. ही औषधे घरात सहज उपलब्ध होणारे जीन्नस वापरुन कमी खर्चात तयार करता येतात.

    हा आजार होण्याची कारणे

    –मोठी कास असणाऱ्या तसेच संकरित जनावरांमध्ये कास दाह होण्याचे प्रमाण जास्त असते.
    –वाढत्या वयाची जनावरे म्हणजे तिसऱ्या- चौथ्या वेतातील जनावरांमध्येही कासदाहाचे प्रमाण जास्त असते.
    –जनावरे बसण्याची आणि सभोवतालच्या जागेची अस्वच्छता.
    –धार काढणाऱ्या व्यक्तीची अस्वच्छता.
    –दूध पूर्ण न काढले गेल्यामुळे. कासेला जखम झालेली असणे इ.

    औषध कसे तयार करायचे?

    कोरफड, हळद, चुना आणि लिंबू वापरुन हे औषध तयार होते. यामध्ये २५० ग्रॅम कोरफड, ५० ग्रॅम हळद, १५ ग्रॅम चुना एकत्र मिक्सरमध्ये वाटून पेस्ट तयार करावी.

    वापरण्याची पद्धत

    –मुठभर पेस्टमध्ये १५० ते २०० मिली पाणी घालून पातळ मिश्रण तयार करावे.

    –जनावराची कास स्वच्छ धुऊन तयार केलेले मिश्रण पूर्ण सडावर लावावे. हे मिश्रण दिवसातून १० वेळा सलग पाच दिवस लावावे.

    –२ लिंबाचे काप दिवसातून दोन वेळा सलग तीन दिवस चारावे.

    –दुधामध्ये रक्त किंवा लालसरपणा असेल तर वरील मिश्रणामध्ये दोन मुठी कडीपत्ता व गुळ याची पेस्ट दिवसातून दोनवेळा चारावी.