Category: cotton

  • How Much Will Cotton Get Per Muhurta Rate?

    हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो, मागील हंगामात कापसाला (Cotton Rate) दहा हजारहून अधिक भाव मिळाला. त्यामुळे यंदाच्या हंगामात कापसाचे भाव किती रहाणार ? याबाबत कापूस उत्पादकांसह व्यापाऱ्यांमध्ये देखील उत्सुकता आहे. अमेरिकन बाजारात घडणाऱ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भारतीय बाजारात कापसाचे दर मुहूर्ताला आठ ते नऊ हजार रुपये इतकेच राहण्याची शक्यता जाणकारांनी वर्तवली आहे.

    परदेशात कापसाची उत्पादकता घटण्याची शक्यता

    कापूस (Cotton Rate) व्यापार क्षेत्रातील जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानात अतिवृष्टीमुळे तर चीनमध्ये कोरड्या दुष्काळामुळे कापसाचे उत्पादन कमी होणार, अशी चर्चा रंगली होती. अमेरिकेतही मध्यंतरी पाऊस कमी होता. त्यामुळे तिथेही कापसाची उत्पादकता कमी होईल, अशी शक्यता होती.

    अमेरिकेच्या बाजारात आता मात्र कापसाचे भाव पडू लागले आहेत. गेल्या वर्षी एक पाउंड रुईचा भाव एक डॉलर ७० सेंट पर्यंत वाढला होता. तो मध्यंतरी एक डॉलर १५ सेंट पर्यंत घसरला. त्यानंतर कमी उत्पादकतेच्या शक्यतेमुळे त्यात वाढ होत एक डॉलर ३० सेंटपर्यंत तो पोहोचला. भारताचा विचार करता पंजाब- हरियानाच्या बाजारपेठेत नवीन कापसाची आवक सुरू झाली आहे.

    या कापसाला सुरुवातीला नऊ हजार ते दहा हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. त्यामुळे यंदाही कापसाला चांगले दर मिळतील, अशी अपेक्षा होती. परंतु अचानक अमेरिकन बाजारात कापसाच्या दरात घट झाली. एक पाउंड रुईचा दर हा एक डॉलर १२ सेंट पर्यंत घसरला. त्यामुळे येत्या काळात भावातील ही पडझड आणखी होण्याची शक्यता आहे.

    किती राहील सरकीला दर ?

    अमेरिकन बाजारात सध्या असलेला दर कायम राहिल्यास दसऱ्याच्या मुहूर्तावर खरेदी होणाऱ्या कापसाला आठ ते नऊ हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळेल. यात सरकीचे भाव (Cotton Rate) तीन हजार रुपये प्रतिक्विंटलचे राहतील, असा अंदाज आहे. सोयाबीनमधील मंदीच्या पार्श्वभूमीवर हे दर कमी मिळण्याची शक्यता आहे.

    विशेष म्हणजे एक डॉलर १२ सेंट प्रतिपाऊंड रुईचा भाव हा अमेरिकेच्या बाजारात १९९४-९५ साली होता. त्यावेळी भारतातील कापसाचे दर २५०० ते २७०० रुपये क्विंटल होते. यंदा ते ८००० रुपये राहतील, असेही जाणकारांनी सांगितले.

  • धुळ्यात पावसाचा कपाशीला फटका; रोग किडींचा प्रादुर्भाव, कसे कराल व्यवस्थापन ? जाणून घ्या

    हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातल्या काही भागात पावसाने उघडीप दिली आहे मात्र काही भागात अद्यापही पाऊस पडतो आहे. धुळे जिल्यात देखील पाऊस झाल्यामुळे त्याचा मोठा फटका कपाशीच्या पिकांना बसला आहे. सतत बदलणाऱ्या वातावरणामुळे कपाशीच्या पिकावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. तर रस शोषण करणाऱ्या अळीचा देखील प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे याचा परिणाम कापसाच्या उत्पादनावर होणार असल्यामुळे शेतकरी चिंतीत आहे. यामुळं शासनाने नुकसानीचे पंचनामे करावे अशी मागणी शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.

    धुळे तालुक्यात तसेच साक्री तालुक्यात यंदा पावसानं दमदार हजेरी लावली. यामुळं शेतांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं आहे. पावसामुळं कपाशीच्या बोंडांचे नुकसान झाले असून, प्राथमिक अंदाजानुसार धुळे तालुक्यातील 30 हजार हेक्टर क्षेत्राला या अतिवृष्टीचा फटका बसला आहे. गेल्या वर्षी धुळे तालुक्यात 1 लाख 7 हजार 109 हेक्टरवर कपाशीची पेरणी झाली होती त्यात 77 हजार 295 हेक्टरवर कापूस होता. यंदा 1 लाख 747 हेक्टरवर पेरणी झाली असून, त्यापैकी तब्बल 84 हजार 961 हेक्टरवर कापसाची पेरणी करण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कापसाच्या लागवडीचे क्षेत्र अकरा हजार हेक्टरनं वाढलं आहे.

    मागील दोन वर्षात कापसाला चांगला दर मिळत असल्यामुळे यंदा देखील कापूस लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल राहिला आहे. मागील वर्षी देखील पावसामुळे कापसाच्या उत्पन्नांत घट झाली होती. आता या वर्षी देखील तीच स्थिती होईल या भीतीने शेतकऱ्यांमध्ये चिंता आहे. आधीच जुलै महिन्यात झालेल्या पावसामुळे नुकसान झाले आहे. त्यातूनही पीक कसेबसे वाचवल्यानंतर आता पुन्हा रोग आणि किडींचे संकट उभे आहे.

    सद्य स्थितीत कापूस पिकातील व्यवस्थापन

    –कापूस पिकात वापसा स्थिती निर्माण होण्यासाठी शेतात अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते शेताबाहेर काढण्याची व्यवस्था करावी. फवारणीची कामे पुढे ढकलावीत.
    –कापूस पिकात रसशोषण करणाऱ्या किडींच्या (मावा, फुलकिडे) व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्काची किंवा लिकॅनीसिलीयम लिकॅनी (जैविक बुरशीजन्य किटकनाशक) एक किलो ग्रॅम किंवा फलोनिकॅमिड 50% 60 ग्रॅम किंवा डायनेटोफ्यूरॉन 20% 60 ग्रॅम किंवा फिप्रोनिल 5% 600 मिली प्रति एकर तिन दिवसानंतर पावसाची उघाड बघून फवारणी करावी.
    –कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी हेक्टरी 5 गुलाबी बोंडअळीसाठीचे कामगंध सापळे लावावेत. कापूस पिकातील डोमकळ्या वेचून नष्ट कराव्यात. प्रादूर्भाव जास्त आढळून आल्या प्रोफेनोफॉस 50% 400 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% 88 ग्रॅम किंवा प्रोफेनोफॉस 40% + सायपरमेथ्रीन 4% 400 मिली प्रति एकर आलटून पालटून तिन दिवसानंतर पावसाची उघाड बघून फवारावे.

     

  • पुढचे 2 दिवस पावसाचा अंदाज कशी घ्याल कापूस,तूर,भुईमूग, मका आदी पिकांची काळजी ?

    हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो, हवामान खात्याकडून मान्सूनच्या परतीचा संदेश मिळाला आहे. त्यामुळे काही भागात पावसाची तीव्रता कमी झाली असली तरी विदर्भ मराठवाड्यासह काही भागात पुढील दोन दिवस मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.

    पीक व्यवस्थापन

    १) कापूस : पुढील तिन दिवसाचा पावसाचा अंदाज लक्षात घेता पाऊस झाल्यानंतर कापूस पिकात वापसा स्थिती निर्माण होण्यासाठी शेतात अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते शेताबाहेर काढण्याची व्यवस्था करावी. फवारणीची कामे पुढे ढकलावीत. कापूस पिकात रसशोषण करणाऱ्या किडींच्या (मावा, फुलकिडे) व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्काची किंवा लिकॅनीसिलीयम लिकॅनी (जैविक बुरशीजन्य किटकनाशक) एक किलो ग्रॅम किंवा फलोनिकॅमिड 50% 60 ग्रॅम किंवा डायनेटोफ्यूरॉन 20% 60 ग्रॅम किंवा फिप्रोनिल 5% 600 मिली प्रति एकर तिन दिवसानंतर पावसाची उघाड बघून फवारणी करावी. कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी हेक्टरी 5 गुलाबी बोंडअळीसाठीचे कामगंध सापळे लावावेत. कापूस पिकातील डोमकळ्या वेचून नष्ट कराव्यात. प्रादूर्भाव जास्त आढळून आल्या प्रोफेनोफॉस 50% 400 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% 88 ग्रॅम किंवा प्रोफेनोफॉस 40% + सायपरमेथ्रीन 4% 400 मिली प्रति एकर आलटून पालटून तिन दिवसानंतर पावसाची उघाड बघून फवारावे.

    २)तूर : पाऊस झाल्यानंतर तूर पिकात वापसा स्थिती निर्माण होण्यासाठी शेतात अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते शेताबाहेर काढण्याची व्यवस्था करावी. फवारणीची कामे पुढे ढकलावीत. तूर पिकावरील पाने गुंडाळणारी अळीच्या व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्काची किंवा क्विनॉलफॉस 25% 16 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून तिन दिवसानंतर पावसाची उघाड बघून फवारणी करावी.

    ३) भुईमूग : भुईमूग पिकात वापसा स्थिती निर्माण होण्यासाठी शेतात अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते शेताबाहेर काढण्याची व्यवस्था करावी. फवारणीची कामे पुढे ढकलावीत. भूईमूग पिकात मावा, फुलकिडे याच्या व्यवस्थापनासाठी इमिडाक्लोप्रिड 17.8 एस एल 2 मिली किंवा क्विनॉलफॉस 25 ईसी 20 मिली किंवा ऑक्झीडीमेटॉन मिथाईल 25 ईसी 20 मिली किंवा लॅमडा सायहॅलोथ्रीन 5 ईसी 6 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून तिन दिवसानंतर पावसाची उघाड बघून फवारणी करावी. मध्यम ते हलकी, भुसभुशीत, सेंद्रिय पदार्थ आणि कॅल्शियमचे भरपूर प्रमाण असलेल्या जमिनीत रब्बी भुईमूग पिकाची लागवड करावी. भुसभुशीत जमिनीत भरपूर प्रमाणात हवा खेळती राहते यामुळे मुळांची चांगली वाढ होऊन आऱ्या सुलभरीतीने जमिनीत जाण्यास तसेच शेंगा पोसण्यासाठी मदत होते.

    ४)मका : मका पिकात वापसा स्थिती निर्माण होण्यासाठी शेतात अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते शेताबाहेर काढण्याची व्यवस्था करावी. फवारणीची कामे पुढे ढकलावीत. काढणीस तयार असलेल्या मधु मका पिकाची काढणी करून घ्यावी.

    ५)रब्बी ज्वारी : रब्बी ज्वारीची लागवड मध्यम ते भारी पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत करावी. हलकी जमिन शक्यतो टाळावी कारण अशा जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता राहत नाही मग पिकाच्या संवेदनशील काळात पाणी कमी पडते.

    ६) रब्बी सूर्यफूल : रब्बी सूर्यफुलाची लागवड मध्यम ते भारी ओलावा टिकवून ठेवणाऱ्या, उत्तम निचरा असणाऱ्या व जमिनीचा सामू 6.5 ते 8 असणाऱ्या जमिनीत करावी. पाणथळ किंवा आम्लयूक्त जमिन लागवडीसाठी टाळावी.

  • खरिपातील कापसावर थ्रिप्स तर सोयाबीन वर लष्करी अळीचा हल्ला ;बळीराजा हवालदिल !

    हॅलो कृषी ऑनलाईन : गजानन घुंबरे, परभणी प्रतिनिधी

    खरीप हंगामात लागवड करण्यात आलेल्या कापूस पिकावर थ्रिप्स चा प्रादुर्भाव झाल्याने कापुस लाल झाला पडला असून दुसरीकडे सोयाबीन पिकावर लष्करी अळीने हल्लाबोल केला आहे .अतिवृष्टी व पावसाच्या खंडानंतर आधीच उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट येणार असताना आता किटकांनी हल्ला केल्याने परभणी जिल्हातील शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे.

    जिल्हातील शेतकऱ्यांच्या पाठीमागे लागलेली संकटाची मालिका थांबायचे नाव घेत नाहीये .आधी मान्सूनचे उशिरा आगमन झाले त्यामुळे पेरण्या उशिरा झाल्या . त्यात अतिवृष्टी पावसाचा खंड यामुळे जिल्ह्यातील शेतीशिरात पेरणी केलेले क्षेत्र यातून मिळणारे अपेक्षित उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटणार आहे.

    आपण जिल्ह्यातील पाथरी तालुक्यात येणाऱ्या शेतकऱ्यांनी पेरणी केलेल्या क्षेत्राची प्रतिनिधी माहिती घेतल्यानंतर जिल्ह्याचे चित्र याविषयी कल्पना येईल .मागील आठवड्यात खरिपातील पावसाच्या खंडानंतर शेतकऱ्यांना विमा अग्रीम देण्यासाठी ५२ महसूल मंडळापैकी आठ महसूल मंडळांची निवड करण्यात आली आहे .त्यामध्ये निकषांमध्ये बसत असतानाही पाथरी तालुक्यातील सर्वच महसूल मंडळ वगळण्यात आले आहेत नेमकी काय परिस्थिती पाथरी तालुक्यातील महसूल मंडळामध्ये आहे याविषयी आपण घेतलेला हा मागवा व सद्य परिस्थिती.

    यंदा पाथरी तालूक्यातील चार महसूल मंडळातील शेतकऱ्यांनी खरिपाच्या प्रस्तावित क्षेत्रापैकी ऊस वगळता ७१ .७२% क्षेत्रावर म्हणजे ३७ हजार ३८० हेक्टर हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी पूर्ण केली .यामध्ये सर्वाधिक १६ हजार ६५४ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी तर मागील वर्षी मिळालेल्या चांगल्या दरामुळे १६ हजार ४३२ हेक्टरवर कापूस पिकाची लागवड स्थानिक शेतकऱ्यांनी केली होती.

    जुलै महिन्यामध्ये अतिवृष्टी सदृश पाऊस झाला. सततच्या पावसाने खरिपात पेरणी केलेल्या पिकांची वाढ खुंटल्या गेली .ही पिके कशीबशी सावरत असताना ऐन फुल लागण्याच्या अवस्थेमध्ये ऑगष्ट महिण्यात पावसाने मोठा खंड दिला .१० ऑगस्ट पासून ते ५ सप्टेंबर पर्यंत तालुक्यात येणाऱ्या चारही महसूल मंडळांमध्ये यावेळी पावसाने ओढ दिली होती .या खंडामुळे फुल अवस्थेत असणाऱ्या सोयाबीनला मोठा फटका बसला तर कापसामध्ये ही पातेगळ होऊन स्थानिक शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने केलेली मेहनत वाया गेली .आस्मानी संकटापुढे स्थानिक शेतकरी हातबल होता दरम्यान अग्रीम विमा मिळेल अशा आशेवर असणारा शेतकरी चारही महसूल मंडळ अग्रीम विमा देण्यातून वगळण्यात आल्याने सुलतानी संकटाने होरपळून निघाला.

    दरम्यान ५ सप्टेंबर पासून तालुक्यातील सर्वच महसूल मंडळामध्ये पावसाचे जोरदार पुनरागमन झाले होते .दोन दिवसापासून पावसाने विश्रांती घेतली असून शेत शिवारात मात्र सर्वच पिकांवर किडींचा मोठा प्रादुर्भाव झाला आहे. सततच्या फवारण्या करूनही कापूस पिकावर थ्रिप्स चा प्रादुर्भाव झाला असून यामुळे कापूस लाल पडला आहे तर कापसाची पातेगळ मोठ्या प्रमाणात झाल्याने कापसामध्ये ४०% पेक्षा जास्त शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार असल्याचे स्थानिक शेतकरी सांगत आहेत .महागड्या फवारण्या करूनही हा रोग काही आटोक्यात येत नसल्याचे शेतकरी सांगत आहेत .तर दुसरीकडे सर्वाधिक पेरणी क्षेत्र असलेल्या फुलगळ होऊन उभ्या असलेल्या सोयाबीन पिकावर पिवळा मोझॅक हा बुरशीजन्य रोग व मोठ्या प्रमाणात पाणी खाणाऱ्या लष्करी अळीचा हल्ला झाल्या असल्याचे विदारक चित्र पाहायला मिळत आहे . सततच्या या संकटांच्या मालिकेने स्थानिक शेतकरी मात्र हातबल झाला असुन व्यथा सांगावी तरी कोणाला ? असा त्याच्यापुढे प्रश्न पडला आहे .

  • वेळीच करा कापूस पिकातील आकस्मिक मर व्यवस्थापन…..!

    हॅलो कृषी ऑनलाईन : परभणी प्रतिनिधी

    बऱ्याच ठिकाणी पावसाच्या दिर्घ उघडीप नंतर झालेल्या मोठ्या पावसामुळे कपाशीच्या शेतामधील झाडे अचानक जागेवर सुकू लागलेली आहेत. याला आकस्मिक मर असे म्हणतात. कपाशीच्या आकस्मिक मर मध्ये दीर्घकाळ पाण्याचा ताण पडल्यानंतर जमिनीचे तापमान वाढलेले असते अशावेळी सिंचन दिल्यास अथवा मोठे पाऊस पडल्यास झाडाला धक्का बसून अचानक झाड सुकते आणि कालांतराने झाडाची पाने गळतात. सिंचन दिल्यानंतर किंवा मोठे पाऊस पडल्यानंतर ३६-४८ तासांत आकस्मिक मर ची लक्षणे दिसू लागतात. सुकल्यानंतर पानगळ होऊन कालांतराने झाडे मरतात त्यामुळे उत्पादनात मोठे नुकसान होऊ शकते.

    आकस्मिक मर व्यवस्थापन

    १. अतिरिक्त पाण्याचा लवकरात लवकर निचरा करवा.
    २. वापसा येताच कोळपणी व खुरपणी करावी.
    ३. लवकरात लवकर २०० ग्रॅम युरिया+ १०० ग्रॅम पालाश (पोटॅश) + २५ ग्रॅम कॉपर ऑक्सीक्लोराईड प्रति १० लिटर पाण्यात मिसळून तयार द्रावणाची प्रति झाड १५० मिली याप्रमाणे आळवणी करावी.
    किंवा
    १ किलो १३:००:४५ + २ ग्रॅम कोबाल्ट क्लोराईड + २५० ग्रॅम कॉपर ऑक्सीक्लोराईड २०० लिटर पाण्यातून मिसळून तयार द्रावणाची प्रति झाड १०० मिली आळवणी करावी.
    ४. वरील प्रमाणे द्रावणाची आळवणी केल्यानंतर सुकू लागलेल्या झाडाजवळची माती पायाने लवकरात लवकर दाबून घ्यावी.

    वरील सर्व उपाययोजना शेतामध्ये झाडे सुकू लागलेली दिसताच लवकरात लवकर म्हणजे २४ ते ४८ तासाच्या आत कराव्यात जेणेकरून पुढील होणारे मोठे नुकसान वेळीच टाळता येईल.

    डॉ.जी.डी.गडदे, डॉ.डी.डी.पटाईत
    कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र, परभणी
    आणि
    डॉ. ए.डी.पांडागळे
    कापूस संशोधन केंद्र, नांदेड
    वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी

     

    अधिक माहितीसाठी संपर्क करा
    कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र
    वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ
    परभणी
    ☎ ०२४५२-२२९०००

  • खुशखबर ! जळगावात कापसाच्या मुहुर्तालाच मिळाला 16 हजार रुपये प्रति क्विंटलचा दर




    खुशखबर ! जळगावात कापसाच्या मुहुर्तालाच मिळाला 16 हजार रुपये प्रति क्विंटलचा दर | Hello Krushi








































    हॅलो कृषी ऑनलाईन : मागील वर्षांपासून कापसाला चांगला भाव शेतकऱ्यांना मिळत आहे. यंदाच्या खरिपात देखील कापसाची चांगली लागवड करण्यात आली असून शेतकऱ्यांना चांगला भाव मिळण्याची अपेक्षा आहे.अशातच कापूस उत्पदक शेतकऱ्यांसाठी एक खुशखबर आहे. जळगावातल्या बोदवड बाजारपेठ मध्ये कापसाला मुहुर्तालाच 16 हजार रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्यात आनंदाचे वातावरण आहे.

    केळीनंतर जळगावात कापसाचेही चांगले उत्पादन घेतले जाते. जळगावातील बोदवड इथेही खरेदीचा मुहूर्त करण्यात आला. यावेळी सातगाव डोंगरी बाजार पेठेत विक्रमी असा सोळा हजार रुपये प्रति क्विंटल भाव काढण्यात आला आहे. मात्र, केवळ 67 किलो कापूस या ठिकाणी खरेदी करण्यात आला. सोळा हजार हा भाव कायम राहणार नसला तरी दहा ते अकरा हजार रुपये प्रति क्विंटल भाव हा कायम राहण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांच्या मध्ये समाधान आहे.
    कापूस खरेदीचा हंगाम अजून सुरु व्हायचा असला तरी अनंत चतुर्थी निमित्ताने कापूस खरेदी करण्याची खानदेशात परंपरा आहे. या परंपरेनुसार काल (31 ऑगस्ट) धरणगाव जिनिंग असो तर्फे कापूस खरेदी मुहूर्त करण्यात आला.

    कोणत्या बाजारपेठेत किती दर मिळाला

    बोदवड बाजारपेठ: 16000 रुपये
    सातगाव डोंगरी : 14 हजार 772 रुपये
    बाळद : 11 हजार 551 रुपये
    धरणगाव : 11 हजार 153 रुपये
    कासोदा : 11011 रुपये
    कजगाव : 11000 रुपये

     

    error: Content is protected !!





  • कृषी विभाग कापूस मूल्य साखळी विकास व उत्पादकता वाढ प्रकल्पाअंतर्गत प्रशिक्षण शिबिर

    हॅलो कृषी ऑनलाईन : परभणी प्रतिनिधी

    कृषी विभागाच्या कापूस मूल्य साखळी विकास व उत्पादकता वाढ प्रकल्पाअंतर्गत पाथरी तालुक्यातील वडी येथे 30 ऑगस्ट रोजी शेतकरी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

    या प्रशिक्षणासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ कीटक शास्त्रज्ञ डॉ . पी . आर . झंवर उपस्थित होते. याप्रसंगी पाथरी तालुका कृषी अधिकारी व्ही .एस . नांदे ,डॉक्टर एस एस शिंदे , कृषी पर्यवेक्षक बी यु शिंदे ,कृषी सहाय्यक एस डी चव्हाण यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना डॉक्टर झंवर म्हणाले की ,शेतकऱ्यांना नेहमी भेडसावणाऱ्या कापूस पिकावरील बोंड आळी संदर्भात कामगंध सापळे योग्य पद्धतीने लावल्यानंतर त्याचा शेतकऱ्यांना निश्चित फायदा होतो.

    यावेळी नांदेड कृषी अधिकारी नांदे यांनी कापूस मूल्य साखळी साठी उपस्थित शेतकऱ्यांना महत्त्व विशद करून सांगितले .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले यांनी तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी रामदास कुटे , सुरेश कुटे , प्रवीण शिंदे ,प्रताप शिंदे आदींनी परिश्रम घेतले .

  • ढगाळ हवामानामुळे पिकांत कीड, रोगांचा प्रादुर्भाव; तज्ञांच्या सल्ल्याने करा पीक व्यवस्थापन

    हॅलो कृषी ऑनलाईन : मराठवाडयात दिनांक 30 व 31 ऑगस्ट रोजी नांदेड, लातूर, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद व जालना जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील पाच दिवस तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.

    पीक व्‍यवस्‍थापन

    कापूस : कापूस पिकात रसशोषण करणाऱ्या किडींच्या (मावा, फुलकिडे) व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्काची किंवा व्हर्टिसिलीयम लिकॅनी (जैविक बुरशीजन्य किटकनाशक) एक किलो ग्रॅम किंवा फलोनिकॅमिड 50% 60 ग्रॅम किंवा डायनेटोफ्यूरॉन 20% 60 ग्रॅम किंवा फिप्रोनिल 5% 600 मिली प्रति एकर पावसाची उघाड बघून फवारणी करावी. कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी हेक्टरी 5 गुलाबी बोंडअळीसाठीचे कामगंध सापळे लावावेत. कापूस पिकातील डोमकळ्या वेचून नष्ट कराव्यात. प्रादूर्भाव जास्त आढळून आल्या प्रोफेनोफॉस 50% 400 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% 88 ग्रॅम किंवा प्रोफेनोफॉस 40% + सायपरमेथ्रीन 4% 400 मिली प्रति एकर आलटून पालटून पावसाची उघाड बघून फवारावे.

    तूर : तुर पिकात आंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. मूग/उडीद पिकात मावा किडीचा प्रादर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 5 % निंबोळी अर्काची किंवा डायमिथोएट 30 % 240 मिली प्रति एकर पावसाची उघाड बघून फवारणी करावी.

    भुईमूग : भूईमूग पिकात मावा, फुलकिडे याच्या व्यवस्थापनासाठी इमिडाक्लोप्रिड 17.8 एस एल 2 मिली किंवा क्विनॉलफॉस 25 ईसी 20 मिली किंवा ऑक्झीडीमेटॉन मिथाईल 25 ईसी 20 मिली किंवा लॅमडा सायहॅलोथ्रीन 5 ईसी 6 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. वेळेवर पेरणी केलेल्या भुईमूग पिकात अऱ्या सुटण्याच्या अवस्थेत शक्य असल्यास भुईमूगाच्या पिकावरून रिकामे ड्रम फिरवावे. त्यामूळे अऱ्या जमिनीत घुसण्यास मदत होऊन शेंगाची संख्या वाढते परिणामी उत्पादनात वाढ होते.

    मका : उशीरा पेरणी केलेल्या मका पिकावरील लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी थायामिथोक्झाम 12.6 टक्के + लॅमडा सायहॅलोथ्रीन 9.5 झेडसी 5 मिली किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी. वेळेवर पेरणी केलेल्या मका पिकाच्या कणसांची काढणी करून घ्यावी.

     

  • असे करा कपाशीवरील रसशोषक किडींचे व्यवस्थापन

    हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रानो, मागच्या काही दिवसांपासून कापूस बाजारात चांगलीच तेजी आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा कल हा कापूस लागवडीकडे आहे. यंदाच्या खरिपातही कापूस लागवडीला प्राधान्य दिले जाते आहे. मात्र हवामान बदलामुळे कापसावर कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे उत्पन्नात घट येते. आजच्या लेखात आपण कपाशीवरील रसशोषक किडींचे व्यवस्थापन कसे करावे याची माहिती घेऊया…

    १) पांढरी माशी :

    प्रौढ माशी आकाराने लहान शरीरावर पिवळसर झाक असून पंख पांढरे असतात. डोक्यावर दोन तांबडे ठिपके असतात. प्रौढ व पिल्ले पानाच्या खालील बाजूला राहून रस शोषतात. अशी पाने कोमेजतात. अधिक प्रादुर्भावामध्ये पाने लालसर ठिसूळ होऊन शेवटी वाळतात. पिल्लांच्या शरीरातून स्रवणाऱ्या गोड चिकट द्रवामुळे पानावर काळी बुरशी वाढते. तसेच पांढरी माशी रोगाचा प्रसार करते. या किडीचा प्रादुर्भाव कोरडवाहू कपाशीवर सप्टेंबर महिन्यापासून सुरू होतो. नोव्हेंबर महिन्यात अधिक प्रादुर्भाव दिसून येतो.

    २) मावा :

    ही कीड रंगाने पिवळसर किंवा फिकट हिरवी आणि आकाराने अंडाकृती असते. मावा व त्याची पिल्ले पानाच्या खालच्या बाजूने आणि कोवळ्या शेंड्यावर समुहाने राहून रस शोषतात. अशी पाने निस्तेज होऊन आक्रसतात, खालील बाजूला मुरगळलेली दिसतात. त्यामुळे झाडाची वाढ खुंटते. मावा किडीच्या शरीरातून स्रवणाऱ्या गोड चिकट द्रवामुळे पाने चिकट बनतात. कालांतराने त्यावर काळी बुरशी वाढून, पानाच्या अन्न निर्मिती प्रक्रियेत अडथळा निर्माण होतात.

    ३)तुडतुडे :

    प्रौढ व पिल्ले फिकट हिरवे, पाचरी प्रमाणे असतात. समोरच्या पंखावर एक काळा ठिपका असतो. तुडतुड्यांच्या पिल्लांना पंख नसतात. तुडतुड्यांचे एक वैशिष्ट्य म्हणजे ते तिरके चालत चटकन उडी मारतात. प्रौढ व पिल्ले पानाच्या खालील बाजूला राहून रस शोषतात. त्यामुळे पाने प्रथम बाजूने पिवळसर होऊन नंतर तपकिरी होतात. अधिक प्रादुर्भावामध्ये संपूर्ण पाने लाल तांबडी, त्यांच्या कडा मुरगळलेली दिसतात. परिणामी झाडांची वाढ खुंटते. अशा झाडांना पाते, फुले आणि बोंडे कमी प्रमाणात लागतात.

    आर्थिक नुकसान पातळी :

    – १० मावा प्रति पान,

    – ८ ते १० प्रौढ पांढरी माशी किंवा २० पिल्ले प्रति पान,

    – २ ते ३ तुडतुडे प्रति पान

    आढळून आल्यानंतर रासायनिक कीटकनाशकाचा वापर करावा. त्यापूर्वी एकात्मिक नियंत्रण पद्धतीचा अवलंब करत राहावा.

    कसे करावे व्यवस्थापन ?

    -वेळोवेळी प्रादुर्भावग्रस्त फांद्या, पाने व इतर पालापाचोळा जमा करून नष्ट करावा.

    -खुरपणी, कोळपणी करून पीक ताणविरहित ठेवावे.

    -माती परिक्षणानुसार नत्र खतांचा योग्य प्रमाणात वापर करावा. त्यामुळे कपाशीची अनावश्यक कायिक वाढ होणार नाही. अशा पिकावर कीड कमी प्रमाणात राहील.

    -निसर्गतः रसशोषक किडीवर उपजीविका करणारे मित्र कीटक उदा. ढालकीटक, सिरफिड माशी, क्रायसोपा, ॲनसियस असे परोपजीवी कीटक आढळून आल्यास रासायनिक कीटकनाशकांचा वापर टाळावा. मित्र किटकांचे संवर्धन होईल.

    – पांढरी माशीच्या नियंत्रणासाठी पिवळे चिकट सापळे लावावेत.

    -पीक वाढीच्या सुरुवातीपासून निंबोळी अर्क (५ टक्के) किंवा ॲझाडिरॅक्टीन (१००० पीपीएम) २ ते ३ मि.लि. प्रति लिटर या प्रमाणे प्रतिबंधात्मक फवारणी करावी.

    -किडींनी आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यास खालील पैकी कोणत्याही एका रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करावी. (प्रमाण ः प्रति लिटर पाणी)

    फ्लोनिकॅमिड (५० टक्के डब्ल्यूजी) ०.३ ग्रॅम किंवा

    थायामेथोक्झाम (२५ टक्के डब्ल्यूजी) ०.२ ग्रॅम किंवा

    ब्युप्रोफेजीन (२५ टक्के एससी) २ मिलि किंवा

    फिप्रोनील (५ टक्के एससी) ३ मिलि किंवा

    डायफेन्थुरॉन (५० टक्के डब्ल्युपी) १.२ ग्रॅम किंवा

    ॲसीफेट (५० टक्के) अधिक इमिडाक्लोप्रीड (१.८ एसपी) (संयुक्त कीटकनाशक) २ ग्रॅम

    विशेषतः फूल किडीच्या व्यवस्थापनाकरिता,

    फिप्रोनिल (५ टक्के एससी) ३ मिलि किंवा स्पिनेटोरम (११.७ टक्के एससी) ०.८४ मिलि

    टीप : फवारणीसाठी शुद्ध पाणी वापरावे.

    शेतात कीटकनाशकांचे द्रावण तयार करताना व फवारणी करताना चष्मा, हातमोजे व तोंडावर मास्कचा वापर करावा.

    फवारणीसाठीच्या मात्रा हाय व्हॉल्यूम पंपासाठीच्या आहेत.

    संपर्क – ०२४५२-२२८२३५

    (कीटकशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.)

  • यंदाही पांढऱ्या सोन्याचा बोलबाला ! राज्यात कापसाला चांगला दर मिळण्याची शक्यता

    हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो, मागील हंगामात इतर कोणत्याही शेतीमालापेक्षा कोणत्या मालाला चांगला भाव मिळाला तर तो कापसाला मिळाला. मागील हंगामात कापसाचा दर प्रति क्विंटल १४ हजारांपर्यंत पोहचला होता. त्यामुळे कापूस लागवडीतून चांगले उत्पन्न मिळण्याची आशा यंदाही वर्षी शेतकऱ्यांना लागून राहिली आहे. असे असताना एक आनंदाची बातमी म्हणजे नव्या कापसाला प्रति क्विंटल १० हजार रुपयांचा भाव मिळाला आहे.

    महाराष्ट्रात कापसाला चांगला दर मिळण्याची आशा

    यावर्षी हरियाणा राज्यातील पालवाल जिल्ह्यात या हंगामातील नवीन कापसाची आवक सुरु झाली आहे. इथे कापसाला 10 हजार रुपयांचा दर मिळाला आहे. हरियाणा आणि पंजाबच्या इतर भागात सप्टेंबरपासून नवीन कापसाची आवक वाढेल. यामुळे महाराष्ट्रातही या हंगामात कापसाला चांगला दर मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यावर्षी आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाला असलेली मागणी, कापसाचा वाढलेला पेरा, संभाव्य उत्पादन आणि निसर्गाची साथ यामुळे कापसाला चांगला भाव मिळ शकतो.

    उपलब्ध आकडेवारीनुसार देशात कापसाच्या लागवडीत 6.65 टक्क्यांनी वाढ झाली आहे. देशात नवीन कापूस साधारणपणे ऑक्टोबर महिन्यात मार्केटमध्ये येतो. यावेळी मात्र ऑगस्टमध्ये कापसाचे भाव आठ टक्क्यांनी वाढले आहेत. भविष्यात कापसाच्या भावात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या 500 गाठींपेक्षा कमी कापूस बाजारात दाखल झाला आहे. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत या कापसाची किंमत जवळपास दुप्पट आहे. नवीन कापसाला 9 हजार 900 ते 10 हजार रुपये भाव मिळत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या कालावधीत कापसाचा सरासरी भाव 5 हजार रुपये होता. भविष्यात कापसाचा भाव 45 हजार ते 47 हजार रुपये प्रति गाठी असेल असं तज्ज्ञांचं मत आहे.