Category: Delhi Farmers Protest

  • जोपर्यंत किमान हमीभाव कायदा लागू होत नाही, तोपर्यंत शेतकरी आर्थिक संकटात : राजू शेट्टी




    जोपर्यंत किमान हमीभाव कायदा लागू होत नाही, तोपर्यंत शेतकरी आर्थिक संकटात : राजू शेट्टी | Hello Krushi











































    हॅलो कृषी ऑनलाईन : MSP कायद्यासाठी शेतकरी संघटना पुन्हा एकदा आक्रमक झाल्या आहेत. दिल्लीतील पंजाब खोर इथे MSP गॅरंटी किसान मोर्चाचे अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. यावेळी या अधिवेशनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी देखील सहभाग नोंदवला. देशाला अन्न धान्याच्या उत्पादनाच्या बाबतीत आत्मनिर्भर करत असताना शेतकरी मात्र देशोधडीला लागत आहे. देशातील 80 टक्के शेतकरी हे अल्पभुधारक आहेत. त्यामुळं किमान हमीभावाचा कायदा लागू करावा अशी भूमिका यादरम्यान शेट्टींनी मांडली.

    यावेळी बोलताना शेट्टी म्हणाले, महाराष्ट्रातील 460 ग्रामपंचातीच्या गावसभेमध्ये देशाच्या संसदेत हमीभावाचा कायदा मंजूर करावा तसेच राष्ट्रपतींनी तसा त्यांना आदेश द्यावा असे ठराव एकमताने मंजूर केला आहे. लवकरच हे ठराव राष्ट्रपतींना सुपुर्द करणार असल्याची माहिती देखील राजू शेट्टींनी यावेळी दिली. स्वातंत्र्यानंतरच्या 75 वर्षात संसदनं अनेक कायदे केले ते अधिकारी व मंत्र्याच्या इच्छेखातर. मात्र, इतिहासात प्रथमच 2017 पासून किमान हमीभावाच्या कायद्यासाठी शेतकरी रस्त्यावरची लढाई लढत असल्याचे राजू शेट्टी यावेळी म्हणाले.

    केंद्र सरकार शेतकरी विरोधी धोरणं राबवून शेतकऱ्यांची लूट करत असल्याचा आरोप यावेळी राजू शेट्टी यांनी केला आहे. संपुर्ण देशातील शेतकरी ही लूट थांबवण्यासाठी संघटित झालेला आहे. यामुळं याआधी संसद मार्ग आणि जंतर मंतरवर सुरु झालेली ही लढाई आता शेतकऱ्यांच्या थेट बांधावर आणलेली असून काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत तसेच गुजरातपासून आसामपर्यंतचा शेतकरी या लढाईत समाविष्ट झाला असल्याचे राजू शेट्टी म्हणाले.

     

     

    error: Content is protected !!





  • देशात पुन्हा शेतकरी आंदोलन! एमएसपी हमी कायद्याच्या मागणीसाठी 6 ऑक्टोबरपासून दिल्ली ग्रामीण भागात बैठक

    हॅलो कृषी ऑनलाईन : देशात शेतकरी संघटना आणि केंद्र सरकार पुन्हा एकदा आमनेसामने येऊ शकतात. यावेळी शेतकरी संघटना आणि केंद्र सरकार यांच्यातील तणावाचा विषय पिकांच्या किमान आधारभूत किंमत (एमएसपी) हमी कायद्याचा असणार आहे. या संदर्भात शेतकरी संघटना एमएसपी हमी किसान मोर्चाने तयारी पूर्ण केली आहे. त्याअंतर्गत यावेळी दिल्ली ग्रामीणच्या व्यासपीठावरून शेतकरी आंदोलनाची रूपरेषा तयार केली जाणार आहे. यासाठी 6 ते 8 ऑक्टोबर दरम्यान MSP हमी किसान मोर्चाने दिल्ली ग्रामीण भागातील पंजाब खोड गावात सभा आयोजित करण्याची घोषणा केली आहे. शेतकरी संघटना एमएसपी हमी किसान मोर्चाने किसान सभेची तयारी पूर्ण केली आहे.

    28 राज्यातील 3000 शेतकऱ्यांचा सहभाग

    एमएसपी हमी किसान मोर्चाने पिकांसाठी एमएसपी हमी कायदा लागू करण्याच्या मागणीसाठी आयोजित केलेल्या बैठकीची तयारी पूर्ण केली आहे. या बैठकीला 28 राज्यातील शेतकरी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. ज्यांची अंदाजे संख्या 3000 निश्चित करण्यात आली आहे. ज्यामध्ये महिला व पुरुष शेतकरी सहभागी होणार आहेत. याआधी मोर्चाने बैठकीसंदर्भात आपल्या मागण्या घेऊन देशभर जनजागृती दौरा केला होता. त्यानंतर ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.

    बैठकीत पुढील रणनीती ठरवली जाणार

    22 मार्च 2022 रोजी एमएसपी हमी किसान मोर्चाची स्थापना करण्यात आली. या मोर्चात सुमारे 200 शेतकरी संघटना आहेत, ज्या दीर्घकाळापासून शेतकऱ्यांसाठी काम करत आहेत. या मोर्चात सरदार व्हीएम सिंग, राजू शेट्टी, जलपुरुष राजेंद्र सिंह, पीव्ही राजगोपाल, रामपाल जाट, बलराज भाटी, राजाराम त्रिपाठी, के चंद्रशेखर, जसकरण सिंग, अय्याकन्नू यांसारखे शेतकरी नेते प्रमुख भूमिकेत आहेत. आघाडीकडून मिळालेल्या माहितीनुसार, 6 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या या अधिवेशनात एमएसपी हमी कायद्याच्या मागणीसाठी आगामी आंदोलनासह अन्य कार्यक्रमांची रणनीती ठरवली जाणार आहे.