Category: e-pik pahani

  • E-Pik Pahani By District Magistrate Aanchal Goyal

    हॅलो कृषी ऑनलाईन : परभणी प्रतिनिधी

    जिल्ह्यात मागील काही दिवसापासून होत असलेल्या अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे बाधीत झालेल्या पिकांची १८ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी (E-Pik Pahani) ई-पीक पाहणी या पथदर्शी प्रकल्पातंर्गत महाराष्ट्र शासनाने विकसित केलेल्या मोबाईल अप्लिकेशनद्वारे पिकांची नोंदी घेण्यासाठी सेलू आणि जिंतूर तालुक्यातील गावातील शेतीच्या बांधावर प्रत्यक्ष जाऊन प्रात्यक्षिक द्वारे कामकाजाची पाहणी केली. ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले, त्या सर्वांची ई-पिक पाहणी करुन अहवाल सादर करण्याच्या सूचना संबंधितांना त्यांनी यावेळी दिल्या. तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना ई-पिक पाहणी करण्यास प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी जिल्हाधिकारी गोयल यांनी केले.

    यावेळी जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी सेलू (E-Pik Pahani) तालूक्यातील वालूर, मोरेगाव, मौ. खुपसा, हातनूर, चिखलठाणा (बु.) रायपूर या शिवारातील तर जिंतूर तालुक्यातील चारठाणा, रायखेडा, चांदज या शिवारातील पिकांची पाहणी करत शेतकऱ्यांची ई-पिक ॲपद्वारे पाहणी व नोंद केली. तसेच उपस्थित सरपंच व शेतकरी बांधवाना संपूर्ण गावातील ई-पिक पाहणीचे काम पूर्ण करण्याबाबत मार्गदर्शन केले.

    यावेळी उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार, तहसीलदार (E-Pik Pahani) सेलू दिनेश झांपले, तहसीलदार जिंतूर सखाराम मांडवगडे, सेलू तालुका कृषि अधिकारी जोगदंड, जिंतूर तालुका कृषि अधिकारी काळे यांच्यासह संबंधीत गावातील सरपंच, तलाठी, कृषि सहाय्यक आदींची यावेळी उपस्थिती होती.

  • जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाथरी तालुक्यातील गावांमध्ये ई-पिक पाहणी

    हॅलो कृषी ऑनलाईन : पाथरी ता . प्रतिनिधी

    परभणी जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी बुधवार 12 ऑक्टोबर रोजी पाथरी तालुक्यातील वाघाळा रेणापुर या गावांमध्ये भेट देत ई – पिक पाहणी केली . यावेळेस स्थानिक शेतकऱ्यांशी त्यांनी चर्चा करत 15 ऑक्टोबर पर्यंत ई -पिक पाहणी करून घेण्याचे आवाहन केले .यासोबतच उर्वरित शेतकऱ्यांना ई -पिक पाहणी करण्यास मदत करण्यासंदर्भात महसूल प्रशासनाला निर्देश दिले .

    जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी सकाळी ९.३० ते ११ वा दरम्यान पाथरी तालुक्यातील रेनापुर ,वाघाळा शिवारामध्ये असणाऱ्या पिकांची पाहणी करत शेतकर्‍याची ई -पीक अँप द्वारे पाहणी व नोंद केली .रेनापुर येथे आशश्रोबा नबाजी आव्हाड यांच्या शेतामध्ये त्यांचा मुलगा सखाराम आव्हाड यांच्या मोबाईलवर ई-पिक नोंद करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले . तर वाघाळा येथेही त्यांनी गावातील अर्ध्या अधिक शेतकऱ्यांचे पीक पाहणी नोंद झाली नसल्याचे निदर्शनास आणून देत पुढील तीन दिवसात नोंदणी करून घेण्यासंदर्भात सूचना केल्या.

    यावेळी स्थानिक शेतकऱ्यांनी त्यांना परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानी संदर्भात निवेदन दिले आहे . यावेळी उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी , तहसीलदार सुमन मोरे ,तलाठी दीक्षित , तलाठी कुलकर्णी मा .सभापती दादासाहेब टेंगसे ,सरपंच बंटी घुंबरे , सरपंच चोखोबा उजगरे , संदीप टेंगसे लक्ष्मणराव टेंगसे , अनुप घुंबरे .पद्माकर मोकाशे ,माणिकआप्पा घुंबरे , राजेभाऊ वनकळसे , सुदामराव घुंबरे आदींची उपस्थिती होती.