Category: Eknath Shinde Government

  • दिवाळीसाठी रेशन कार्ड धारकांना किराणा सामान मिळणार 100 रुपयांत

    हॅलो कृषी ऑनलाईन : दिवाळीचा सण जवळ येताच. त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी काही ऑफर्स येत राहतात. कारण दिवाळीच्या वेळी लोक सर्वाधिक खरेदी करतात. आर्थिक दुर्बल नागरिकांना देखील दिवाळी साजरी करता यावी म्हणून महाराष्ट्र सरकारकडून रेशन कार्ड धारकांसाठी १०० रुपयात किराणा सामान दिले जाणार आहे.

    100 रुपयात किराणा

    दिवाळीच्या काळात राज्यातील शिधापत्रिकाधारकांना अधिक आनंद देण्यासाठी महाराष्ट्र मंत्रिमंडळाने चांगली ऑफर देण्याचा निर्णय घेतला आहे.
    या ऑफरचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये लोकांना १०० रुपयांत किराणा सामान दिला जाणार आहे. पण ही ऑफर फक्त महाराष्ट्रातील शिधापत्रिकाधारकांसाठी आहे.

    हे सामान 100 रुपयात

    शिधापत्रिकाधारकांना एक किलो रवा, शेंगदाणे, खाद्यतेल आणि पिवळी डाळ 100 रुपयांना दिली जाणार आहेत.

    लाखो लोकांना फायदा

    सरकारच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातील कोट्यवधी जनतेला फायदा होणार आहे. वास्तविक, राज्यात सुमारे १.७० कोटी कुटुंबे आहेत, ज्यांच्याकडे शिधापत्रिकेची सुविधा आहे. लोक सरकारी रेशन दुकानांना भेट देऊन या ऑफरचा लाभ घेऊ शकतात. पण या ऑफरचा लाभ तुम्ही दिवाळीपर्यंतच घेऊ शकता हे लक्षात ठेवा. या काळात तुम्ही फक्त दिवाळीसाठी रेशन खरेदी करू शकता.

     

  • कारखाने खुशाल सुरु करा; पण मागच्या वर्षीच्या थकीत FRP चं काय? : राजू शेट्टींचा सरकारला सवाल

    हॅलो कृषी ऑनलाईन : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्याक्षतेखाली झालेल्या बैठकीत यंदाचा ऊस गाळप हंगाम १५ ऑक्टोबर पासून सुरु होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. यंदाचा गळीत हंगाम तर जाहीर झाला मात्र मागच्या वर्षीच्या थकीत FRP चं काय असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी सरकारला केला आहे. शिवाय थकीत FRP चे 900 कोटींसह, 200 रुपये अधिकचे मिळेपर्यंत एकही कारखाना सुरु होऊ देणार नाही असा इशारा देखील शेट्टी यांनी दिला आहे.

    आधी थकीत रक्कम द्या आणि मग कारखाने सुरु करा अन्यथा शेतकऱ्यांच्या संघर्षाला सामोरे जा असा इशाराच शेट्टी यांनी दिला आहे. शिवाय मागील वर्षी कारखान्यांना इथेनॉल विक्रीतून मोठ्या प्रमाणात नफा झाला होता. त्यामुळं 200 रुपये अधिक देण्याची कारखान्यांची क्षमता असल्याचे राजू शेट्टी म्हणाले यंदाचा अहानागाम सुरु कराल मात्र मागील थकीत FRP चे काय ? असा थेट सवाल शेट्टी यांनी सरकारला केला आहे.

    आधी शेतकऱ्यांची देणी भागवा…

    पुढे बोलताना शिट्टी म्हणाले , FRP चा रुपयाना रुपया जोपर्यत शेतकऱ्यांना मिळत नाही, तोपर्यंत राज्यातील एकही साखर कारखाना सुरु होऊ देणार नाही. गेल्या वर्षी निर्यात झालेल्या साखरेला चांगला दर मिळाला. देशांतर्गत साखरेला चांगला दर मिळाला. तसेच इथेनॉलच्या उत्पादनामुळं रोख पैसे उपलब्ध झाल्यामुळं साखर कारखान्यांकडे FRP शिवाय 200 रुपये ज्यादा देण्याची क्षमता तयार झाली आहे. हे पैसे जोपर्यंत मिळणार नाहीत तोपर्यंत ऊस उत्पादक आणि साखर कारखानदार हा संघर्ष थांबणार नाही.

    तर ऊसाचा बुडका कारखानदारांच्या पाठित

    15 ऑक्टोबरपासून तुम्हाला साखर कारखाने सुरु करायचे असतील तर खुशार सुरु करा. मात्र, शेतकऱ्यांची FRP आणि 200 रुपये ही देणी भागवा आणि मग कारखाने सुरु करा असे शेट्टी म्हणाले. कारखान्यांना ऊस देण्यासाठीच ऊस लावला आहे. निव्वळ ऊसच मागत राहिलात तर ऊसाचा बुडका कारखानदारांच्या पाठित बसल्याशिवाय राहणार नसल्याचे शेट्टी  म्हणाले.

  • लंपी आजाराने पशुधन गमावलेल्या शेतकऱ्यांना सरकारकडून भरपाई मिळवी : अजित पवार

    हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात लंपी या त्वचारोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होत आहे. पशुधनांमधील वाढता संसर्ग रोखण्यासाठी दूधउत्पादक शेतकऱ्यांमध्ये जागृती आणि जनावरांच्या लसीकरणाचा व्यापक कार्यक्रम राज्य सरकारने हाती घ्यावा. लम्पीग्रस्त जनावरांच्या दुधाबद्दल नागरिकांच्या मनात असलेला संभ्रम, भीती दूर करण्यासाठी मोहीम राबवावी, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत केली.

    सरकारकडून भरपाई मिळावी

    पुढे बोलताना ते म्हणाले, ‘लम्पी स्कीन’ आजाराकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात राज्यात दूधउत्पादनाचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो, ते राज्याला परवडणारे नाही, असेही पवार म्हणाले. ‘लम्पी स्कीन’ आजाराने पशुधन गमावलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून भरपाई मिळावी. पशुधनाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांकडून सक्तीने कर्जवसुली होऊ नये. या आजाराला विमा संरक्षण नसल्याने ते मिळवून देण्यासाठी सरकारने विमा कंपन्यांशी चर्चा करावी. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात सरकारची भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही पवार यांनी केली.

    दरम्यान, देशातील राजस्थान, पंजाब, हरियानासारख्या राज्यानंतर महाराष्ट्रातील पशुधनालाहीविषाणूजन्य ‘लम्पी स्कीन’चा गंभीर धोका निर्माण झाला आहे. सद्यःस्थितीत राज्यातल्या १७ जिल्ह्यांतल्या ५९ तालुक्यांत हजारो जनावरे या आजाराने ग्रस्त असून त्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे.

     

     

  • दिलासादायक ! अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी सुमारे 3 हजार 501 कोटी जिल्ह्यांना सुपूर्द




    दिलासादायक ! अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी सुमारे 3 हजार 501 कोटी जिल्ह्यांना सुपूर्द | Hello Krushi









































    हॅलो कृषी ऑनलाईन : जून जुलै ऑगस्ट 2022 मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे शेती पिकांचे व शेतजमिनीचे नुकसान झाले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भामध्ये अतिवृष्टीग्रस्तांना वाढीव मदत केली जाईल सांगितले होते आणि त्याप्रमाणे मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयही घेण्यात आला होता. त्यानुसार आता अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी सुमारे 3 हजार 501 कोटी जिल्ह्यांना सुपूर्द करण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळण्याची वाट मोकळी झाली आहे.

    राज्यातील ठिकठिकाणच्या पूरग्रस्तांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी कुणाही नुकसानग्रस्तास वाऱ्यावर सोडणार नाही असे सांगितले होते. त्यानुसार राज्य आपत्ती प्रतिसाद निधी आणि राज्य शासनाच्या निधीतून मिळून 3 हजार 501 कोटी निधी जिल्ह्यांना देण्यास मंजुरी देण्यात आली असून मदत व पुनर्वसन विभागाने तसा शासन निर्णय जारी केला आहे.

    अशी मिळणार मदत

    एकनाथ शिंदे सरकारने पूर्वीच्या निकषांमध्ये बदल कारण वाढीव मदत देण्याचे जाहीर केले. वाढीव मदतीप्रमाणे जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी 13600 प्रति हेक्टर, बागायत पिकांसाठी 27 हजार रुपये प्रति हेक्टर आणि बहुवार्षिक पिकांसाठी 36 हजार रुपये प्रति हेक्टर अशी तीन हेक्टर मर्यादेपर्यंत मदत देण्यात येईल.

    error: Content is protected !!





  • दिलासादायक ! ‘या’ दिवशी थेट खात्यात जमा होणार अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईची रक्कम

    हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या खरीप हंगामात लहरी हवामानामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. मात्र दिलासादायक बाब म्हणजे मध्यंतरी झालेल्या अतिवृष्टीमुळे जे नुकसान झाले त्याची नुकसानभरपाई लवकरच शेतकऱ्यांना मिळणार आहे. ३ हजार ५०१ कोटी रुपयांची मदत सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे.

    कधी येणार शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे ?

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सरकार आल्यापासून यंदाच्या वर्षी मदतीचे निकष देखील बदलले आहेत. सोमवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा केली जाणार असल्याचे राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची प्रतिक्षा लवकरच संपणार असून भरपाईची ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यामध्ये जमा होणार आहेत. जुलैमध्ये नुकसान होऊन देखील अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना एक नया पैसा देखील मिळालेला नाही. शेतकऱ्यांनी वेळोवेळी मागणी केली, शिवाय विरोधकांनीही हा मुद्दा पावसाळी अधिवेशनात मांडला. अखेद दोन दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा होणार असल्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले आहे.

    25 लाख 93 हजार शेतकऱ्यांना मिळणार मदत

    जुलै महिन्यात राज्यात अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले होते. सलग महिनाभर पाऊस लागून राहिला होता. त्यामुळे सोयाबीन, उडीद आणि मूगाचे मोठे नुकसान झाले होते. शासनाच्या माध्यमातून पंचनामे प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर ह्या मदतीची घोषणा करण्यात आली आहे. राज्यातील 25 लाख 93 हजार शेतकऱ्यांसाठी 3 हजार 501 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. 23 लाख 81 हजार हेक्टरावरील पिकांचे नुकसान झाले होते. शिवाय एका शेतकऱ्यास 3 हेक्टरपर्यंतची नुकसानभरपाई मिळणार आहे.