Category: Farmer

  • विधानभवन परिसरात आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याचा मृत्यू




    विधानभवन परिसरात आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याचा मृत्यू | Hello Krushi








































    हॅलो कृषी ऑनलाईन : पावसाळी आधीआवेशन सुरु असताना विधानभवनाच्या आवारात पेटवून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकरी सुभाष भानुदास देशमुख (५६) यांचा जे.जे. रुग्णालयात उपचार घेत असताना मृत्यू झाला. ते उस्मानाबाद जिल्ह्यातील तांदुळवाडी येथील होते.

    देशमुख यांना गंभीर जखमी अवस्थेत जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेले सहा दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर निवेदन करत असतानाच ही घटना घडली होती. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित शेतकऱ्याने आयनॉक्सजवळ आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे सांगितले होते. तसेच तो १५ टक्के भाजला असल्याची माहिती सभागृहात दिली होती.

    मात्र, देशमुख यांनी आधीच रॉकेल ओतून घेतले होते. विधानभवनाच्या आवारात आल्यानंतर त्यांनी पेटवून घेतले. आग विझवल्यानंतर ते तळमळत पडले होते. त्यानंतर पोलिसांनी तातडीने त्यांना उपचारासाठी दाखल केले होते. ते ४५ टक्के भाजल्याने अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू होते. सोमवारी दुपारी १२ च्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.

     

    error: Content is protected !!





  • दिलासादायक ! रब्बी हंगामासाठी पिकविमा मंजूर

    हॅलो कृषी ओनलाईन : परभणी

    परभणी रब्बी हंगाम सन २०२१ – २२ मधील पिकांचे नैसर्गीक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानी पोटी शेतकऱ्यांनी काढलेला पीक विमा शासनाने देऊ केला आहे. राज्य शासनाच्या हिश्याची १८७ कोटी १५ लाख ६५ हजार ७३ रुपये शासनाने विमा कंपन्यांना दिले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना रब्बीतील पीक विमा मिळणे निश्चीत झाले असून सद्यस्थितीला आर्थिक संकटात उभे असलेल्या शेतकऱ्यांना हा दिलासा मिळाला आहे.

    केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त भागीदारातुन प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविल्या जाते. ज्या शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचा विमा भरला आहे अशांना नुकसानीच्या प्रमाणात विम्याचा मावेजा दिला जातो. सन २०२१-२२ मधील रब्बी हंगामातील पिकांवर गारपीट त्याचप्रमाणे पावसाचे संकट ओढावले होते. अनेक पिकांचे शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामातील अतोनात नुकसान झाले होते.

    त्यामुळे झालेले नुकसान भरपाई व पीक विमा मिळाला पाहिजे अशी अपेक्षा शेतकऱ्यांमधुन व्यक्त करण्यात राजकीय पक्षांनी शेतकऱ्यांच्या पीक विमा प्रश्नावर आवाज उठविला होता. शासनाने झालेल्या नुकसानीचा विचार करता खरिपातील पाठोपाठ आता रब्बी हंगाम २०२१ – २२ मधील पीक विमाही देऊ केला आहे . यासाठी राज्य शासनाच्या हिश्याची असलेली १८७ कोटी १५ लाख हजार ७३ रुपयांची रक्कम भारतीय कृषी विमा कंपनी, इक्फो टोकीयो जनरल इन्शुरस कंपनी लि., भारती अॅक्सा जनरल इन्शुरस कं.लि., बजाज अलियान्स इन्शुरस कंपनी, एचडीएफसी अग्रो इन्शुरस कंपनी लि . या कंपन्यांना वितरीत करण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काळात शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील पीक विमा मिळणार आहे. ३० सप्टेंबर २०२२ अखेरपर्यंत या पीक विमा रक्कमेचे वाटप होणार असन येत्या रब्बी हंगामातील पेरणीसाठीबळीराजास या पीक विम्यातुन मोठा आधार मिळणार आहे .

    शेतकऱ्यांना कार्यवाहीची प्रतिक्षा

    राज्य शासनाने रब्बी हंगामातील पीक विमा देऊ केला आहे . त्यामुळे ज्या मागील वर्षी आपल्या पिकांचा विमा काढला आहे असे शेतकरी आता मिळणाऱ्या विम्याच्या प्रतिक्षेत आहेत . सततच्या पावसामुळे व पावसाच्या उघडीपीमुळे सुगीवर दुष्काळाचे सावट घोंगावत असल्याने आर्थिक संकटाची भिती शेतकरी बाळगत आहे . दरम्यान , शासनाकडून पीक विम्या संदर्भात कार्यवाहीला करुन शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे.

  • ‘एक दिवस बळीराजासाठी’ अधिकाऱ्यांसह कृषीमंत्री शेतात मुक्कामी; सरकारची नवी संकल्पना जाणून घ्या

    हॅलो कृषी ऑनलाइन : शिंदे फडणवीस सरकार ऍक्शन मोड मध्ये आल्याचे दिसून येत आहे. कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी पावसाळी आधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी एक महत्वपूर्ण घोषणा केली. आता राज्यात ‘एक दिवस बळीराजासाठी’ ही संकल्पना राबवण्यात येणार आहे. या संकल्पने अंतर्गत कृषी विभागाचे सचिव, अधिकारी सगळेच शेतकऱ्यांच्या घरी जाऊन त्यांच्या अडीअडचणी, प्रश्न जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहेत.

    याबाबत बोलताना सत्तार म्हणाले की, शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखणे, शेतकऱ्यांना समृद्ध करणे हा या योजनेमागचा हेतू असून, राज्यात शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या, अतिवृष्टी, पूर आणि नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे पिकांचे नुकसान यातून त्यांना तातडीने मदत करणे हा या मोहिमेमागील उद्देश आहे. त्यात शेतकऱ्यांचे दुःख शेतकऱ्यांच्या अडचणी या जाणून घेण्यासाठी थेट गावातल्या घरामध्ये अधिकारी पोहोचतील. त्यांच्यासोबत राहतील, शेतात जातील, रात्री मुक्काम करतील. जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे सीईओ, जिल्हा कृषी अधिकारी, विभागीय कृषी अधिकारी, हे शेतकऱ्यांच्या घरी एक दिवस राहतील, असंही सत्तार यांनी स्पष्ट सांगितलं आहे.

    शेतकऱ्यांच्या नेमक्या अडचणी जाणून घेणार

    90 दिवस राज्यातील विविध जिल्ह्यांत हा मुक्काम असणार आहे. दिवसभरात शेतकरी काम करत असताना काय अडचणी येतात, बॅंकेच कर्ज घेण्यासाठी काय अडचणी आहेत, शेतकरी का आत्महत्या करतोय याचा आढावा या मोहिमेच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे. मोहीम संपल्यानंतर सर्व जिल्ह्यांमधील आढावा घेऊन त्याचा सविस्तर अहवाल तयार करण्यात येणार आहे. त्यानंतर शेतकऱ्यांसाठी नवीन योजना राबवल्या जाणार, असेही सत्तार यांनी अधिवेशनात स्पष्ट केलं आहे.

  • पाऊस झाला गायब ! परभणी जिल्ह्यातील शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत; फुलोर्‍यातील पिके टाकतायेत माना




    पाऊस झाला गायब ! परभणी जिल्ह्यातील शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत; फुलोर्‍यातील पिके टाकतायेत माना | Hello Krushi












































    हॅलो कृषी ऑनलाईन : परभणी प्रतिनिधी

    परभणी जिल्ह्यात मागील पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने खरिप हंगाम धोक्यात आला आहे. मागील वर्षी सरासरी पेक्षा जास्त पाऊस झाल्याने खरीप पिके हातची गेल्याने जिल्हातील शेतकरी आर्थिक संकटात पडला होता. यातुन यावर्षीचा हंगाम बाहेर काढेल असे वाटत असताना सुरुवातीला सतत पडणारा पाऊस गरज असताना मात्र गायब झाला आहे. जिल्ह्यातील खरिप हंगामातील कापुस , सोयाबीन पिके फुल अवस्थेत असुन यावेळी पावसाची मोठी गरज आहे. विहीर बोअरवेल माध्यमांतून पाण्याची सोय असणारे शेतकरी स्पिंकलर, ठिंबक व पाटपाणी देत पिके जोपासणाच्या प्रयत्न करीत आहेत. मात्र कोरडवाहू शेतकरी हतबल झाला आहे. जिल्ह्यात यावर्षी अधिच पर्जन्यमान असमान झाले आहे. काही महसुल मंडळात सरासरी पेक्षा अधिक तर काही मंडळात कमी पाऊस पडला आहे. अधिक पाऊस झालेल्या ठिकाणी पिकांना पाण्याची गरज असताना कमी पर्जन्यमान असणाऱ्या मंडळात स्थिती अधिक बिकट आहे .

    उदाहरणार्थ जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील दोन महसूल मंडळामध्ये यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे . यात कासापूरी व हादगाव महसुल मंडळाचा समावेश आहे. पाथरी तालुक्यात जून पासून ऑगस्टपर्यंत सरासरी 470 मिलिमीटर एवढा पाऊस पडत असतो .यंदा तो अर्ध्या तालुक्यामध्ये सरासरी पेक्षा जास्त तर अर्ध्या तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पडला आहे .प्रशासनाकडून मिळालेल्या पर्जन्यमान अहवालानुसार पाथरी तालुक्यातील कासापुरी महसूल मंडळामध्ये जून पासून आतापर्यंत 262 मिलिमीटर पाऊस पडला असून तो सरासरीच्या 55 टक्के एवढा आहे. तर अशीच काही परिस्थिती शेजारील हादगाव महसूल मंडळामध्ये आहे. या ठिकाणी सरासरीच्या 69 टक्के एवढाच पाऊस झाला आहे .याचा परिणाम म्हणून खरिपातील पिकांना आता मोठ्या पावसाची अथवा जायकवाडी धरणातून पाणी आवर्तनाची मोठी गरज आहे .जूनच्या सुरुवातीपासूनच या दोन महसूल मंडळाला पावसाने पाठ दाखवल्याने शेतकरी अडचणी सापडला आहे.

    याउलट पाथरी महसूल मंडळ व बाभळगाव महसुल मंडळा मध्ये जून पासून ऑगस्ट पर्यंत सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याचे पाहायला मिळत आहे .
    अनुक्रमे 106 . 9 टक्के व 103 . 8 टक्के असा सरासरीपेक्षा जास्त पाऊस या दोन महसूल मंडळामध्ये पडला आहे. त्यामुळे एकाच हंगामात पाथरी तालुक्यातील उत्तर व दक्षिण भागांमध्ये पावसाचे असमान पर्जन्यमान झाल्याने एकीकडे अधिकच्या पावसाने पिके खराब होत असून दुसरीकडे पावसाअभावी पिके माना टाकत आहेत. सध्या जायकवाडी धरणातून गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग चालू आहे. असा विसर्ग डाव्या कालव्यात केल्यास पिकांना संजीवनी देता येईल. स्थानिक शेतकरी जायकवाडीतून कॅनॉलला पाणी सोडण्यात यावे अशी मागणी करत आहेत .





    error: Content is protected !!