Category: Heavy Rain

  • शेतकऱ्यांच्या विकासासाठी कृती आराखडा तयार करणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    हॅलो कृषी ऑनलाईन : पंतप्रधान पीक विमा योजनेतील मध्य हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी राज्यातील  जिल्ह्यात सहा तालुक्यांतील आठ मंडळात 73 हजार 814 सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 40 कोटी 71 लाख 12 हजार रुपये एवढी अग्रीम विमा भरपाई मंजूर करण्यात आली आहे. लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर विमा रक्कम जमा करण्यास कंपनीकडून सुरुवात करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय लोखंडे यांनी दिली आहे. नाशिक सहकारी साखर कारखाना लि. पळसे संचलित मे.दीपक बिल्डर्स अण्ड डेव्हलपर्स २०२२-२३ च्या गळीत हंगामाचा प्रारंभ मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी ते बोलत होते.

    परभणी तालुक्यातील तीन मंडळांचा समावेश

    खरीप हंगाम 2022 ऑगस्ट महिन्यात परभणी जिल्ह्यातील आठ महसूल मंडळात 26 दिवस पावसाचा खंड पडला होता. त्यामुळे जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल यांनी 6 सप्टेंबरला शासकीय अधिकारी व विमा कंपनीचे प्रतिनिधींना सोयाबीनच्या नुकसानीसंदर्भात संयुक्त पंचनामे करण्याचे आदेश दिले. त्यानुसार या मंडळातील मागील 7 वर्षातील सरासरी उत्पादकतेच्या तुलनेत यंदा सरासरी उत्पादनात 50 टक्क्यापेक्षा अधिक घट झाली असल्याचे आढळून आले. यामध्ये सर्वाधिक परभणी तालुक्यातील तीन मंडळांचा समावेश आहे.

    पीक विमा योजनेतील प्रतिकूल परिस्थिती मुळे झालेले नुकसान या जोखीम बाबीअंतर्गंत या आठ मंडळातील शेतकऱ्यांना संभाव्य विमा भरपाईपैकी 25 टक्के अग्रीम रक्कम महिन्याभरात देण्याचे आदेश जिल्हाधिकारी गोयल यांनी आयसीआयसीआय लोम्बार्डं जनरल विमा कंपनीला 9 सप्टेंबर रोजी दिले होते. त्यानुसार या आठ मंडळातील सोयाबीनसाठी विमा संरक्षण घेतलेल्या सर्व 73 हजार 814 शेतकऱ्यांना 40 कोटी 71 लाख 12 हजार रुपये एवढी अग्रीम विमाभरपाई महसूल मंडळनिहाय मंजूर करण्यात आली. यासाठी प्रधान सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त धिरज कुमार, संचालक विस्तार विकास पाटील व मुख्य सांख्यिकी विनय आवटे यांच्या मदतीने ही रक्कम मिळाली.

    तालुक्यानुसार किती मिळणार मदत ?

    गंगाखेड तालुक्यातील माखणी मंडळातील 13,626 शेतकऱ्यांना 6697 प्रति हेक्टरीप्रमाणे 5.26 कोटी
    जिंतूर तालुक्यातील दुधगाव मंडळातील 9,184 शेतकऱ्यांना 6,421 प्रमाणे 5.16 कोटी
    मानवत तालुक्यातील रामपुरी मंडळातील 6,063 शेतकऱ्यांना 6248 प्रति हेक्टरीप्रमाणे 3.99 कोटी
    परभणी तालुक्यातील जांब मंडळातील 10,953 शेतकऱ्यांना 6392 प्रतिहेक्टरी प्रमाणे 6.40 कोटी
    परभणी तालुक्यातील सिंगणापूर मंडळातील 8,063 शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी 6,363 प्रमाणे 4.80 कोटी
    झरी मंडळातील 10,537 शेतकऱ्यांना 6,193 प्रतिहेक्टरी याप्रमाणे 6.01 कोटी
    पुर्णा तालुक्यातील चुडावा मंडळातील 8,778 शेतकऱ्यांना 7,018 प्रतिहेक्टरीप्रमाणे 4.31 कोटी रुपये
    सोनपेठ मंडळातील 6,005 शेतकऱ्यांना 6,763.85 प्रतिहेक्टरी प्रमाणे 4.16 कोटी

    रुपयांची विमा भरपाई देण्यात येत असून 73 हजार 814 शेतकऱ्यांच्या खात्यावर 40.71 कोटी रुपये जमा होत असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांनी कळविले आहे.

     

  • राज्यात ओला दुष्काळ जाहीर करणार की नाही? कृषीमंत्र्यांनी दिली माहिती

    हॅलो कृषी ऑनलाईन : परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. विरोधी पक्षनेत्यांसह इतर राजकीय व्यक्तींनी तसेच शेकरी संघटनांनी देखील राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. मात्र राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी ओला दुष्काळ जाहीर करणार की नाही याबाबत माहिती दिली आहे. राज्यात सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा अशी स्थिती नाही. पण ज्या भागामध्ये नुकसान झालं आहे, त्या भागाचे पंचनामे केल्यावरच आपल्याला किती नुकसान झालं ते समजेल असेही सत्तार म्हणाले.

    याबाबतीत पुढे बोलताना सत्तार म्हणाले, परतीचा पाऊस हा काही पहिल्या वर्षी झाला असे नाही. प्रत्येक वेळी तो पडतो, त्याचा अंदाज लावता येत नाही असेही सत्तार म्हणाले. जिथे जिथे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, त्याबाबतची माहिती आमच्याकडे येत आहे. त्या नुकसानीचा आकडा लकरच कळेल. त्या शेतकऱ्यांना मदत देण्यात येईल असे सत्तार म्हणाले. प्रत्येक वेळी कृषी विभागाची मंत्रीमंडळ बैठकीत चर्चा होते. साडेपाच हजार कोटी रुपयांची नुकसान भरपाई सरकारनं आतापर्यंत दिली आहे. पुढच्या काळातही सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी उभं असल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले असल्याचे सत्तार म्हणाले.

    शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही

    विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी केली आहे. मात्र, ओला दुष्काळ जाहीर करावा अशी परिस्थिती नाही. पण ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालं आहे तो शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही नाही याची दक्षता कृषी अधिकारी, जिल्हाधिकारी घेतील असे सत्तार म्हणाले. पंचनामा करण्याचे तत्काळ आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. पण वस्तुनिष्ठ पंचनामे होत नाहीत तोपर्यंत अंतिम नुकसानीचा आकडा येणार नाही असे सत्तार म्हणाले.

    पहिल्या नुकसानीचे तीन हजार 500 कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले आहेत. 600 कोटी रुपये नंतर दिले त्यानंतर गोगलयीनं नुकसान झालेल्या क्षेत्राला देखील मदत दिली असल्याचे सत्तार म्हणाले. गेल्या 25 वर्षात तत्काळ मदत देण्याच काम पहिल्यांदाच झालं असल्याचे सत्तार म्हणाले. विरोधी पक्षाला फक्त विरोधच करायचा आहे. शेतकऱ्यांना मी विनंती करतो की आत्महत्येसारखं पाऊस उचलू नका. हा अंतिम पर्याय नसल्याचे सत्तार यावेळी म्हणाले.

  • पीक नुकसानीबाबत माहिती भरताना काय घ्यावी काळजी ?

    हॅलो कृषी ऑनलाईन : बुलडाणा

    पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना विमा संरक्षित पिकांचे क्षेत्र स्थानिक नैसर्गिक आपत्ती व काढणीपश्चात नुकसान या जोखिमेच्या बाबीअंतर्गत नुकसान झाल्यास घटना घडल्यापासून ७२ तासांच्या आत नुकसानीबाबत पूर्वसूचना विमा कंपनीस देणे अनिवार्य आहे.

    त्यानुषंगाने नुकसानीबाबत तक्रार दाखल करताना प्रत्येक शेतकऱ्याने काही बाबी विचारात घ्याव्यात, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष डाबरे यांनी केले आहे.याबाबत डाबरे यांनी म्हटले आहे, की सोयाबीन, मका व ज्वारी या पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांनी नुकसानीबाबत तक्रार दाखल करताना काढणीपश्चात नुकसान या जोखिमेच्या बाबीअंतर्गत तक्रार दाखल करावी व पिकांची स्थिती नमूद करणे अनिवार्य आहे.

    माहिती भरताना काय काळजी घ्यावी

    १)Standing Crop Harvested व Cut & Spread Bundled For Drying असे पर्याय दिलेले असून, त्यापैकी Cut & Spread / Bundled For Drying हा पर्याय निवडावा.

    २)नुकसानीची टक्केवारी शंभर टक्के नमूद करावी.

    ३)कापूस व तूर या पिकांचे नुकसान झाल्यास स्थानिक नैसर्गिक आपत्ती (Localized Calimity) या जोखिमेच्या बाबीअंतर्गत तक्रार दाखल करावी.

    ४)पिकाची स्थिती (Status Of Crop At The Time Of Incidence) Standing Crop हा पर्याय निवडावा.

    ५)नुकसानीची टक्केवारी ही प्रत्यक्ष नुकसानीच्या प्रमाणात नमूद करावी.

    ६)प्रत्येक गटातील प्रत्येक पिकांसाठी स्वतंत्रपणे तक्रार दाखल करावी.

    ७)तक्रार दाखल झाल्यानंतर प्रत्येक तक्रारीसाठी स्वतंत्र तक्रार क्रमांक शेतकऱ्यांच्या मोबाईलवर येईल.

    ८)सदरील तक्रार क्रमांक जतन करून ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

     

  • अतिवृष्टिबाधितांना रब्बी पेरणीसाठी बियाणे, खते मोफत उपलब्ध करून देण्याची मागणी

    हॅलो कृषी ऑनलाईन : परभणी

    अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिके नष्ट झाल्यामुळे परभणी जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करून दुष्काळग्रस्तांच्या योजना मंजूर कराव्या, शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत करावी, रब्बी पेरणीसाठी बियाणे, खते मोफत उपलब्ध करून द्यावीत, आदी मागण्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे (NCP) जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली.

    राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी, माजी आमदार विजय भांबळे, विजय गव्हाणे, परभणी तालुकाध्यक्ष संतोष देशमुख, प्रसाद बुधवंत आदींच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्याकडे मागण्यांचे निवेदन दिले. त्यात शेतकऱ्यांचे कर्ज वसुल करू नये., शेती, उद्योगाचे वीज बिल माफ करावे, वीज कनेक्शन तोडून नयेत, रोजगार हमीची कामाकरिता सवलत विद्यार्थ्यांची फी माफ करणे, महसूल माफ करणे, शेतकऱ्यांना रोजगार उपलब्ध करून देणे आदी उपाययोजना कराव्यात.

    शेती पिकांचे पंचनामे करण्याचा सोपस्कार न करता जिरायती पिकास सरसकट १० हजार रुपये प्रती एकरी तर फळपीकास २५ हजार रुपये प्रति एकरी मदत शासनाने मंजूर करावी. पीक कापणी प्रयोगाची अट न ठेवता पीकविमा योजनेचा लाभ विशेष बाब म्हणून मंजूर करावा. पीकविमा तत्काळ द्यावा, विहित केलेल्या तारखेनंतर महसूल विभागाचे तलाठी यांनी पीकपेरा नोंद करावी आदी मागण्यांचा समावेश आहे.

     आंचल गोयल यांनी केली ई-पिक पाहणी

    जिल्ह्यात मागील काही दिवसापासून होत असलेल्या अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे बाधीत झालेल्या पिकांची १८ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी ई-पीक पाहणी या पथदर्शी प्रकल्पातंर्गत महाराष्ट्र शासनाने विकसित केलेल्या मोबाईल अप्लिकेशनद्वारे पिकांची नोंदी घेण्यासाठी सेलू आणि जिंतूर तालुक्यातील गावातील शेतीच्या बांधावर प्रत्यक्ष जाऊन प्रात्यक्षिक द्वारे कामकाजाची पाहणी केली. ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले, त्या सर्वांची ई-पिक पाहणी करुन अहवाल सादर करण्याच्या सूचना संबंधितांना त्यांनी यावेळी दिल्या. तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना ई-पिक पाहणी करण्यास प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी जिल्हाधिकारी गोयल यांनी केले.

     

  • पावसामुळे पिकांचे नुकसान, तूर आणि भाजीपाला पिकांची कशी काळजी घ्यावी ?

    हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यभरात परतीचा पाऊस मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्यामुळे काढणीस आलेल्या पिकांचे तसेच भाजीपाला पिकाचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.

    १)तूर

    –पाऊस झालेल्या ठिकाणी तुर पिकात साचलेल्या पाण्याचा निचरा करावा.

    –तुर पिकात फायटोप्थोरा ब्लाईट प्रादूर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी वापसा येताच लवकरात लवकर ट्रायकोडर्मा 100 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून खोडाभोवती आळवणी व खोडावर पावसाची उघाड बघून फवारणी करावी.

    –तूर पिकावरील पाने गुंडाळणारी अळीच्या व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्काची किंवा क्विनॉलफॉस 25% 16 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.

    २)भाजीपाला पिके

    –पाऊस झालेल्या ठिकाणी भाजीपाला पिकात साचलेल्या पाण्याचा निचरा करावा.

    –टोमॅटो पिकावरील करपा याच्या व्यवस्थापनासाठी ॲझोऑक्सीस्ट्रोबीन 18.2% + डायफेनकोनॅझोल 11.4% एससी 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.

    –काकडीवर्गीय भाजीपाला पिकात डाउनी मिल्ड्यू चा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी अझोऑक्सीस्ट्रोबिन 23% एससी 2.5 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.

    — भाजीपाला (मिरची, वांगे व भेंडी) पिकात रसशोषण करणाऱ्या किडींच्या व्यस्थापनासाठी लिकॅनीसिलीयम लिकॅनी (जैविक बुरशीजन्य किटकनाशक) 40 मिली किंवा पायरीप्रॉक्सीफेन 5% + फेनप्रोपाथ्रीन 15% 10 मीली किंवा डायमेथोएट 30% 13 मीली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.

    –काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी. जमिनीत वापसा येताच भाजीपाला पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे.

  • How To Manage Caotton And Soybean Crop

    हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सर्वत्र परतीच्या पावसाने (Crop Management) धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे ऐन काढणीला आलेल्या सोयबीन आणि कापूस या दोन प्रमुख पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.

    पीक व्यवस्थापन

    १) कापूस :

    पाऊस झालेल्या ठिकाणी कापूस पिकात साचलेल्या पाण्याचा निचरा करावा.

    –कापूस पिकात दहिया रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या (Crop Management) व्यवस्थापनासाठी ॲझोक्सिस्ट्रोबीन 18.2% + डायफेनकोनॅझोल 11.4% एससी 10 मिली किंवा क्रेसोक्सिम-मिथाइल 44.3% एससी 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.

    — कापूस पिकात रसशोषण करणाऱ्या किडींच्या (मावा, फुलकिडे, पांढरी माशी) व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्काची किंवा लिकॅनीसिलीयम लिकॅनी (जैविक बुरशीजन्य किटकनाशक) एक किलो ग्रॅम किंवा फलोनिकॅमिड 50% 60 ग्रॅम किंवा डायनेटोफ्यूरॉन 20% 60 ग्रॅम किंवा पायरीप्रॉक्झीफेन 5% +डायफेन्थुरॉन 25% (पूर्व मिश्रित किटकनाशक) 400 ग्रॅम प्रति एकर पावसाची उघाड बघून फवारणी करावी.

    –कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी हेक्टरी 5 गुलाबी बोंडअळीसाठीचे कामगंध सापळे लावावेत. प्रादूर्भाव जास्त आढळून आल्यास प्रोफेनोफॉस 50% 400 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% 88 ग्रॅम किंवा प्रोफेनोफॉस 40% + सायपरमेथ्रीन 4% 400 मिली किंवा थायोडीकार्ब 75% 400 ग्रॅम प्रति एकर आलटून पालटून पावसाची उघाड बघून फवारावे.

    — कापूस पिकात लाल्या रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 20 ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून पंधरा दिवसाच्या अंतराने दोन फवारण्या घ्याव्यात.

    २) सोयाबीन

    –पाऊस झालेल्या ठिकाणी काढणी न केलेल्या सोयाबीन पिकात साचलेल्या पाण्याचा निचरा करावा.

    –पावसाचा अंदाज लक्षात घेता काढणी केलेले सोयाबीन पिक गोळा करून शेडमध्ये किंवा ढिग करून ताडपत्रीने/पॉलिथीनने झाकून ठेवावे.

    –काढणी केलेले सोयाबीन पिक पावसात भिजणार नाही याची दक्षता घ्यावी.

    –काढणी केलेले सोयाबीन उन्हात वाळवूनच मळणी करावी.

    –पुढील हंगामात बियाण्यासाठी सोयाबीनचा वापर करावयाचा (Crop Management) असल्यास सोयाबीनची मळणी 350 ते 400 आरपीएम थ्रेशरवर करावी जेणेकरून बियाण्याची उगवण क्षमता कमी होण्यापासून टाळता येईल.

    –मळणी केलेले सोयाबीन साठवणूकीपूर्वी पून्हा तिन ते चार दिवस उन्हात वाळवावे जेणेकरून साठवणूकी दरम्यान होणाऱ्या बूरशींपासून बियाण्याचे संरक्षण होईल.

  • तानाजी सावंतांनी आमच्या हातात चाॅकलेट ठेवलं; पीक विम्याच्या मागणीवरून शेतकरी संतापले





    तानाजी सावंतांनी आमच्या हातात चाॅकलेट ठेवलं; पीक विम्याच्या मागणीवरून शेतकरी संतापले | Hello Krushi













































    हॅलो कृषी ऑनलाईन : मागील ८ दिवसांपासून राज्यभरात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे ऐन काढणीला आलेल्या सोयाबीन कापूस आणि इतर पिकांचे मोठे नुकनं झाले आहे. म्हणूनच पीक विम्याच्या मागणीसाठी पाथरी येथे मागील ४ दिवसांपासून शेतकऱ्यांनी उपोषण सुरु केले आहे. या उपोषणकर्त्यांशी फोनवरून संवाद साधत पालकमंत्री तानाजी सावंत यांनी यावर मार्ग काढण्याचे आश्वसन दिले होते. मात्र या आश्वसनाचे केवळ चॉकलेटचं हातात ठेवले असून प्रत्यक्षात मात्र काहीच घडत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी आता उपोषणाचे रूपांतर आंदोलनात केले आहे. आज अर्धनग्न होऊन बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले.

    पालकमंत्री तानाजी सावंत यांचे आश्वसन

    14 ऑक्टोबर रोजी या भागात जोरदार पाऊस झाल्यानंतर 15 ऑक्टोबर पासून बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले. त्यानंतर परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत यांना युवा सेना जिल्हाप्रमुख शिंदे गट दीपक टेंसे यांच्या मदतीने कॉन्फरन्स कॉल करत उपोषणकर्त्यांशी थेट संपर्क साधला. यावेळी शेतकऱ्यांनी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी नंतर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून सरकारने लक्ष देण्याची मागणी केली. यावेळी तानाजी सावंत यांनी शनिवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास परभणी जिल्ह्यातील अतिवृष्टी संदर्भात बातम्या पाहिल्या त्याच दिवशी पाहिले शेतकऱ्यांचे फोन आले असून पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. या संदर्भात माहिती घेतली असून उद्याच्या कॅबिनेट मीटिंगमध्ये अतिवृष्टीचा विषय मांडणार असल्याचा शेतकऱ्यांना सांगितलं. मात्र प्रत्यक्षात आतापर्यंत काहीच ठोस पावलं उचलली गेली नसल्यामुळे उपोषण कर्त्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. शेतकऱ्यांनी संतप्त होऊन आता आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. पालकमंत्री तानाजी सावंत यांनी केवळ आमच्या हातात चॉकलेटच ठेवलं अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून उमटत आहे.

    शिवाय जोपर्यंत ओला दुष्काळ जाहीर करत नाही आणि पीक विमा उतरवला जात नाही. तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहणार किंबहुना हे आंदोलन अधिक तीव्र करणार असल्याचं इथल्या शेतकऱ्यांनी सांगितले आहे. आज अर्धनग्न होत बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले आहे तर उद्या जलसमाधी आंदोलन करण्यात येईल अशी माहिती इथल्या शेतकऱ्यांनी दिली आहे.

    दिवाळी साजरी कशी करायची ?

    दिवाळी सण तोंडावर आला असताना शेतकऱ्याच्या हातात काहीच नाही अशी प्रतिक्रिया देखील इथल्या शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. आम्ही दिवाळी सण साजरा करायचा की नाही ? असा सवाल देखील इथल्या शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. लवकरात लवकर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे आणि प्रशासनाने यात लक्ष घातलं पाहिजे अशी मागणी इथल्या आंदोलनकर्त्यांनी केली आहे.

    error: Content is protected !!





  • मुसळधार पावसामुळे 4 हजार कोंबड्या पाण्यात बुडाल्या, महिला शेतकऱ्याने रडत रडत सांगितली व्यथा

    हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात पावसाने दडी मारल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. अतिवृष्टीमुळे शेतातील तयार पिके नष्ट होत आहेत. त्याचवेळी बीड जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याशिवाय पावसामुळे जनावरेही मरत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढत आहेत. जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात अतिवृष्टीमुळे ४ हजार कोंबड्या पाण्यात वाहून गेल्या.

    पावसामुळे पोल्ट्री फर्मचे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर पावसामुळे पोल्ट्रीमध्ये तुडुंब पाणी भरल्याने ४ हजार कोंबड्या पाण्यात वाहून गेल्याचे पीडित शेतकरी खंडू झगडे यांनी सांगितले. आता फक्त काही 100 कोंबड्या उरल्या आहेत. याशिवाय कोंबड्यांना खाण्यासाठी 95 पोत्यांमध्ये भरलेले धान्यही पावसाच्या पाण्याने वाहून गेले. अशा परिस्थितीत प्रशासनाकडून मदतीची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

    महिला शेतकऱ्याने तिचा त्रास कथन केला

    जिल्ह्यातील महिला शेतकरी कुसुमबाई झगडे म्हणाल्या की, अतिवृष्टीमुळे आमच्या म्हशी, शेळ्या, कोंबड्या पाण्यात वाहून गेल्या. यामध्ये आपण खूप काही गमावले आहे. अगोदरच आमची गुरे लंपी त्वचेच्या आजाराने मरत आहेत आणि आता उरलेली जनावरे अवकाळी पावसामुळे मरत आहेत. असे घर चालते. आमची आर्थिक स्थिती बिकट झाली. अतिवृष्टीमुळे पिकांबरोबरच जनावरेही पाण्यात बुडाली होती.

    पिकांचे अधिक नुकसान

    राज्यभरात पावसाने ओढ दिल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सोयाबीन व कापूस पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. सध्या अनेक जिल्ह्यांमध्ये पिकांची काढणी सुरू आहे. अशा स्थितीत परतीच्या पावसाने तयार पिकांची नासाडी केली. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आमची दिवाळी अंधारात जाणार असल्याचे शेतकरी सांगतात.राज्य सरकारने नुकसानभरपाई जाहीर केली असली, तरी ती किती दिवस शेतकऱ्यांच्या हाती येईल, याची कल्पना नाही. महाराष्ट्रातील अनेक भागात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

    त्याचबरोबर अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांनी अर्धनग्न अवस्थेत शेतात उभे राहून राज्य सरकारचा निषेध केला. अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात सर्वाधिक सोयाबीन पिकाचे नुकसान झाले आहे.

     

     

     

     

  • परभणी अतिवृष्टीची माहीती घेतली, विषय कॅबिनेटमध्ये ठेवणार ! पालकमंत्र्यांचे शेतकऱ्यांना दुरध्वनी वरून आश्वासन

    हॅलो कृषी ऑनलाईन : पाथरी तालुका प्रतिनिधी

    मागील आठ दिवसापासून सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे व शुक्रवार 14 ऑक्टोबर रोजी झालेल्या ढगफुटी सदृश पावसानंतर शेत शिवारात खरीपातील सोयाबीन ,कापुस पिकाचे प्रचंड नुकसान झाले असल्याने स्थानिक शेतकऱ्यांनी प्रशासनास निवेदन देत शनिवार 15 ऑक्टोबर पासून बेमुदत उपोषण सुरू केले असून उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत यांनी युवासेनाजिल्हाप्रमुख (शिंदे गट ) दीपक टेंगसे यांच्या मदतीने कॉन्फरन्स कॉल करत उपोषणकर्त्यांची थेट संपर्क साधला.

    यावेळी शेतकऱ्यांनी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी नंतर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असुन मायबाप सरकारने लक्ष देण्याची मागणी केली .प्रशासनाकडून केवळ कागदी घोडे नाचवले जात असल्याचे पालकमंत्र्यांच्या कानावर घातले .दरम्यान पालकमंत्री तानाजी सावंत यांनी मी शनिवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास परभणी जिल्ह्यातील अतिवृष्टी संदर्भात बातम्या पाहिल्या , त्यादिवशी पाहिले ,शेतकऱ्यांचे फोन आले असून पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. यासंदर्भात माहिती घेतली असुन उद्याच्या कॅबिनेट मीटिंगमध्ये अतिवृष्टीचा विषय मांडणार असल्याने शेतकऱ्यांनी काळजी करू नये व ऊन वाऱ्यात उपोषणास न बसता लेकरा बाळांची काळजी घ्यावी. असे आवाहन यावेळी त्यांनी उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्यांना केले आहे .

    दरम्यान दुसऱ्या दिवशी भर पावसात उपोषण करते उपोषण स्थळी बसून होते . साखळी पद्धतीने या ठिकाणी शेतकरी उपोषणासाठी तालुका भरातून येत असून मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सोडणार नसल्याचा निर्धार यावेळी त्यांनी बोलून दाखवला आहे.

    शिवाय जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर पाथरी येथे चालू असलेल्या शेतकरी उपोषणाला रविवारी सायंकाळी उशिरा जिल्हा कृषी अध्यक्ष व्ही डी लोखंडे , प्रभारी तालुका कृषी अधिकारी गोविंद कोल्हे , तहसीलदार सुमन मोरे यांच्यासह विमा कंपनीच्या जिल्हा प्रतिनिधींनी भेट देत उपोषण मागे घेण्याची मागणी केली परंतु मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण मागे घेणार नाही असे उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्यांनी प्रशासनाला सांगितले आहे . यावेळी उपोषणकर्ते शेतकरी अधिकारी यांच्यात शाब्दीक चकमक झाली .

  • पालघरच्या GI टॅग भात पिकाचे पावसामुळे नुकसान, शेतकऱ्यांनी सरकारकडे केली भरपाईची मागणी

    हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. राज्यात गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे सोयाबीन, कापूस, मका यासह अनेक पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अवकाळी पावसामुळे पालघर जिल्ह्यातील भातशेतीला अधिक फटका बसला आहे. पालघरमध्ये जीआय टॅग असलेल्या भाताची लागवड केली जाते. उदाहरणार्थ, जिल्ह्यातील ७५ हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावरील भातशेती पावसामुळे अडचणीत आली आहे. तेव्हापासून शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. नुकसानीचे कारण देत सरकारने दिवाळीपूर्वी मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

    पालघरमध्ये कोलम भाताची लागवड केली जाते

    पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात शेतकरी वडा कोलम भाताची लागवड मोठ्या प्रमाणावर करतात.वडा कोलमला जीआय (भौगोलिक संकेत) टॅग मिळालेला आहे. हा तांदूळ पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात घेतला जातो. देशांतर्गत बाजारात त्याची किंमत 60-70 रुपये प्रति किलो आहे. त्यामुळे परदेशातही याला खूप मागणी आहे. जिल्ह्यातील शेतकरी बहुतांशी या भातशेतीवर अवलंबून आहेत. अशा अवकाळी पावसामुळे धानाचे तयार पीक नासाडी होत आहे. याचा परिणाम शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीवरही होणार आहे.

    अवकाळी पावसाने केला कहर

    राज्याच्या विविध भागात पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. राज्यात सध्या मुसळधार पाऊस पडत असून नद्यांना पूर आला आहे. या पावसाने सर्व काही हिरावून घेतल्याचे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. जिल्ह्यात 75 हजार हेक्‍टरहून अधिक भाताचे तयार पीक अतिवृष्टीमुळे पूर्णपणे वाहून गेले आहे. त्यामुळे येथील शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. सध्या जिल्ह्यात भातपीक काढणी सुरू असून, अशा स्थितीत पावसामुळे नुकसान होण्याची भीती असल्याने शेतकऱ्यांची चिंताही वाढली आहे. दिवाळीपूर्वी नुकसान झालेल्या पिकांची भरपाई सरकारकडे देण्याची मागणी शेतकरी करत आहेत.