Category: Heavy Rain

  • तळहाताच्या फोडाप्रमाणं जपलेलं पीक पाण्यात; आम्हाला मदत द्या म्हणत शेतकऱ्यांचं शेतातच अर्धनग्न आंदोलन

    हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यभरात मागच्या दोन तीन दिवसांपासून सुरु असलेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना अक्षरश: नाकीनऊ आणले आहे. शेतांना तळ्याचे स्वरूप आल्यामुळे काढणीला आलेल्या सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. परभणी जिल्याला देखील पावसाचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे सोयाबीन कापूस या दोन्ही पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. हे नुकसान लक्षात घेता सरकारचे डोळे उघडण्यासाठी परभणीच्या मिरखेल येथील शेतकऱ्यांनी चक्क पाणी साचलेल्या सोयाबीनच्या शेतातच अर्धनग्न होऊन आंदोलन केले आहे. यावेळी नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

    यावेळी सोयाबीनचे पूर्ण शेत जलमय झालं आहे. या कृषी प्रधान देसात शेतकरी राजा आहे, असं सांगितलं जातं की शेतकरी राजा आहे. मात्र, त्याला नावाला राजा ठेवलं आहे. पण त्याचा जगण्याचा पूर्ण अधिकार या प्रशासकीय व्यवस्थेनं हिरावला आहे. त्यामुळं आम्ही आज अर्धनग्न अवस्थेत शासनाचा निषेध करत असल्याची भूमिका शेतकऱ्यांनी मांडली.

    आमचं मोठं नुकसान झालं ,मदत करा

    सोयाबीन तळहाताच्या फोडाप्रमाणं जपून काढणीला आले असताना मुसळधार पाऊस झाला अन सोयाबीन, कापसात गुडघ्याइतके पाणी साचल्यानं दोन्ही नगदी पीक हातून गेले आहे. पीक विमा कंपनीच्या छाताडावर बसा आणि मदत द्या अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. आमची शासनानं तत्काळ दखल घ्यावी. आमच्या गावात पावसाचा अतिरेक झाला आहे. आमचं मोठं नुकसान झालं आहे, त्यामुळं आम्हाला मदत करा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

    परभणीच्या मिरखेल येथील शेतकऱ्यांनी हीच परिस्थिती विशद केली आहे. मिरखेल येथील पाणी साचलेल्या सोयाबीनच्या शेतात शेतकऱ्यांनी अर्धनग्न होऊन आंदोलन केले आहे. यावेळी शेतकऱ्यांनी सरकारकडे पीक विमा आणि नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.

     

     

  • पावसात भिजली हजारो क्विंटल लाल मिरची; नुकसान भरपाई देण्याची मागणी




    पावसात भिजली हजारो क्विंटल लाल मिरची; नुकसान भरपाई देण्याची मागणी | Hello Krushi











































    हॅलो कृषी ऑनलाईन : परतीच्या पावसाने राज्यात दाणादाण उडवून दिली आहे. सोयाबीनसह अन्य खरीप पिकांचे यामुळे मोठे नुकसान झाले आहे. नंदुरबार जिल्ह्यात देखील परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. एवढेच नाही तर व्यापाऱ्यांनी खरेदी केलेलया लाल मिरचीला देखील मोठा फटका बसला आहे. त्यामुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये देखील चिंता व्यक्त केली जात आहे.

    नंदूरबार म्हणजे लाल मिरची ची मोठी बाजारपेठ आहे. या बाजारपेठेत केवळ राज्यातून नव्हे तर परराज्यातून देखील मिरची विक्रीसाठी येत असते. सध्या मिरचीला चांगला दरही मिळतो आहे. मात्र परतीच्या पावसामुळे नंदूरबार बाजार समितीत ओली मिरची खरेदी करुन पथार्‍यांवर वाळवण्यासाठी टाकली असता ओली होऊन खराब झाली आहे. हजारो क्विंटल मिरची पावसाच्या पाण्यात भिजल्यामुळे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. याची नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी व्यापारी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

    मिरचीला विमा कवच द्या

    खरेदी केलेल्या मिरचीला विमा सुरक्षा कवच द्यावे परतीचा पाऊस आणि आवकळी पाऊस यामुळे मोठे नुकसान होत असते. मात्र, सरकार याकडं लक्ष देत नसल्यानं व्यापाऱ्यांना मोठा फटका बसत असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितले.

     

    error: Content is protected !!





  • परतीच्या पावसाने दाणादाण ! सोयाबीन, कपाशीचे मोठे नुकसान, शेतकरी चिंतेत

    हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात सतत पडत असलेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. दोन दिवसांपासून राज्याच्या विविध भागांत मुसळधार पाऊस सुरू आहे, अशी स्थिती आहे. त्यामुळे या पावसाचा शेतकऱ्यांच्या पिकांवर परिणाम होत असल्याने शेतकऱ्यांची अडचण होत आहे. बुलढाणा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकरी नाराज असून, पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतात काढलेली पिके पूर्णपणे भिजली आहेत.

    यासोबतच पुणे, नाशिक, सोलापूर, मराठवाड्यासह राज्यातील काही भागात पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार, राज्यातील कोकण आणि विदर्भात १४ ऑक्टोबरपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे.

    सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान

    महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात रात्रीपासून पाऊस सुरू आहे. जिल्ह्यातील शेगाव, संग्रामपूर, नांदुरा, मलकापूर, बुलडाणा, चिखली या तालुक्यांमध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात सोयाबीन आणि कपाशीची सर्वाधिक लागवड केली जाते. जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांनी आपापल्या शेतात सोयाबीन पिकाची काढणी केली होती. मात्र, पावसाने शेतकऱ्यांच्या कष्टाचे चीज केले. काढणीस आलेले सोयाबीन पीक उद्ध्वस्त झाले आहे.

    शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान

    यावेळी शेतात पिकाची काढणी सुरू झाली आहे. अशा स्थितीत अचानक आलेल्या पावसामुळे तयार पिकाचे नुकसान होत आहे. या पावसामुळे पिकांची नासाडी होत आहे. जिल्ह्यात सोयाबीन आणि कपाशीची काढणी सुरू आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांकडून सोयाबीनची काढणी पूर्ण झाली आहे. परंतु, पावसामुळे सोयाबीन खराब होत आहे. दुसरीकडे सोयाबीनबरोबरच कापूस पिकांनाही फटका बसला आहे. एकीकडे पावसाने शेतकऱ्यांना त्रास दिला, तर दुसरीकडे सोयाबीनला बाजारात अत्यंत कमी भाव मिळत आहे. सोयाबीनचे भाव कोसळल्याने शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान होत आहे.

     

     

     

  • उद्यापासून मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर येणार पैसे; पहा कोणत्या जिल्ह्याला शासनाची किती मदत ?




    उद्यापासून मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर येणार पैसे; पहा कोणत्या जिल्ह्याला शासनाची किती मदत ? | Hello Krushi












































    हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या वर्षी जुलै ऑगस्ट मध्ये राज्यात अतिवृष्टी झाली. त्यामुळे मराठवाड्यासह राज्यातील अनेक भागात शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र एकनाथ शिंदे सरकारने नव्या निकषांसह अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याचे जाहीर केले. सरकारने राज्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागासाठी 3 हजार कोटी रुपयांची घोषणा केली होती. त्यापैकी मराठवाडा विभागाकरिता 1106 कोटी रुपये प्राप्त झाले आहेत

    मराठवाड्याला मिळालेल्या मदतीचे वितरण उद्यापासून म्हणजेच गुरुवार (22) पासून केले जाणार आहे. शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर हे पैसे जमा होणार आहेत. मराठवाड्यात अतिवृष्टी, पुरासह गोगलगायमुळे तब्बल 10 लाख 81 हजार 761.18 हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. मराठवाड्यातील जालना,परभणी, हिंगोली,नांदेड, लातूरसह उस्मानाबाद जिल्ह्यासाठी नुकसानभरपाईची रक्कम प्राप्त झाली आहे.

    दरम्यान औरंगाबाद जिल्ह्याला नुकसानभरपाईच्या यादीतून वगळण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठा संताप पाहायला मिळत आहे. विशेष औरंगाबाद जिल्ह्यातील अनेक भागात अतिवृष्टीमुळे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतजमीन वाहून गेली आहे. पिकांचे नुकसान झाले आहे. मात्र असे असतानाही औरंगाबाद जिल्ह्याला नुकसानभरपाईमधून वगळण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

    कोणत्या जिल्ह्याला किती मदत ?

    जिल्हा  बाधित शेतकरी  बाधित क्षेत्र  अनुदान 
    जालना  6898 2311.79 हेक्टर  3 कोटी 71 लाख 84 हजार 
    परभणी  1557 1179 हेक्टर 1 कोटी 60 लाख 34 हजार 
    हिंगोली  133970 113620 हेक्टर 157 कोटी 4 लाख 52 हजार 
    नांदेड  741946 527491 हेक्टर 717 कोटी 88 लाख 92 हजार 
    लातूर  49160 27425.37 हेक्टर 37 कोटी 30 लाख 83 हजार 
    उस्मानाबाद  75739 66723.20 हेक्टर 90 कोटी 74 लाख 36 हजार 

    error: Content is protected !!





  • अचानक पाण्याचा लोंढा आला, तब्बल 700 पोती आले ट्रॅक्टरसह वाहून गेले ; शेतकऱ्यांचे 20 लाखांचे नुकसान

    हॅलो कृषी ऑनलाईन : सकलेन मुलाणी सातारा

    मागच्या दोन तीन दिवसांपासून राज्यातील अनेक भागात दमदार पावसाने हजेरी लावली आहे. सातारा जिल्ह्यातील कराड येथील पेरले येथे अचानक नदीला पाणी आल्यामुळे तब्बल ७०० पोती आले व ट्रॅक्टर तारळी नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना घडली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे जवळपास २० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

    याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, कराड तालुक्यातील पेरले येथील विक्रम सिंह गुलाबराव कदम व युवराज लक्ष्मण जाधव हे आपल्या शेतातील तब्बल सातशे ते आठशे पोती आले ट्रॅक्टर मध्ये भरून तारळी नदीत धुण्यासाठी गेले होते.

    शनिवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ते तारळी नदीत गेले होते त्यावेळी नदीत पाणी कमी असल्याने ट्रॅक्टर पाण्यात उभा करून ते आले धुत होते दरम्यान याचवेळी अचानक जोरात पाऊस पडल्याने तारळी नदीत पाण्याचा लोंढा आला आणि पाणी वाढले यामुळे आल्यासह ट्रॅक्टर पाण्यात बुडाला व यामधील सुमारे आठशे पोती म्हणजेच एकूण सुमारे 30 हजार किलो आले वाहून गेले. यामुळे विक्रम सिंह कदम व युवराज जाधव यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे यामध्ये विक्रम सिंह कदम यांची आले भरलेली सहाशे पोती तर युवराज जाधव यांची सुमारे 100 पोती होती..

    या शेतकऱ्यांसह लोकांनी वाहून जाणारे आले वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र पाण्याचा वेग प्रचंड असल्याने त्यांना यश आले नाही दरम्यान पाण्याची पातळी अद्यापही जास्त असल्याने जॉन डीअर ट्रॅक्टर व ट्रॉली अद्यापही नदीपात्रातच आहे. अचानक लोंढा आल्याने आल्यासह ट्रॅक्टर बुडाला ही घटना गावात समजतात पेरले पुलावर गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती.

     

  • दिलासादायक ! ‘या’ दिवशी थेट खात्यात जमा होणार अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईची रक्कम

    हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या खरीप हंगामात लहरी हवामानामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. मात्र दिलासादायक बाब म्हणजे मध्यंतरी झालेल्या अतिवृष्टीमुळे जे नुकसान झाले त्याची नुकसानभरपाई लवकरच शेतकऱ्यांना मिळणार आहे. ३ हजार ५०१ कोटी रुपयांची मदत सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे.

    कधी येणार शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे ?

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सरकार आल्यापासून यंदाच्या वर्षी मदतीचे निकष देखील बदलले आहेत. सोमवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा केली जाणार असल्याचे राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची प्रतिक्षा लवकरच संपणार असून भरपाईची ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यामध्ये जमा होणार आहेत. जुलैमध्ये नुकसान होऊन देखील अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना एक नया पैसा देखील मिळालेला नाही. शेतकऱ्यांनी वेळोवेळी मागणी केली, शिवाय विरोधकांनीही हा मुद्दा पावसाळी अधिवेशनात मांडला. अखेद दोन दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा होणार असल्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले आहे.

    25 लाख 93 हजार शेतकऱ्यांना मिळणार मदत

    जुलै महिन्यात राज्यात अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले होते. सलग महिनाभर पाऊस लागून राहिला होता. त्यामुळे सोयाबीन, उडीद आणि मूगाचे मोठे नुकसान झाले होते. शासनाच्या माध्यमातून पंचनामे प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर ह्या मदतीची घोषणा करण्यात आली आहे. राज्यातील 25 लाख 93 हजार शेतकऱ्यांसाठी 3 हजार 501 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. 23 लाख 81 हजार हेक्टरावरील पिकांचे नुकसान झाले होते. शिवाय एका शेतकऱ्यास 3 हेक्टरपर्यंतची नुकसानभरपाई मिळणार आहे.

     

  • राज्यात पुन्हा जोरदार पावसाचा अंदाज; कशी घ्यावी पिकांची काळजी ? वाचा कृषी सल्ला

    हॅलो कृषी ऑनलाईन : मराठवाडयात दिनांक 06 सप्टेंबर रोजी परभणी, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, हिंगोली, नांदेड व औरंगाबाद जिल्हयात; दिनांक 07 सप्टेंबर रोजी लातूर, हिंगोली, परभणी, नांदेड, उस्मानाबाद, बीड जिल्हयात तर दिनांक 08 सप्टेंबर रोजी लातूर, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, जालना जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 08 सप्टेंबर रोजी हिंगाली, परभणी, नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. दिनांक 09 सप्टेंबर रोजी औरंगाबाद व जालना; दिनांक 10 सप्टेंबर रोजी औरंगाबाद जिल्हयात तूरळक ठिकाणी मुसळधार पावसाची तर दिनांक 09 सप्टेंबर रोजी हिंगोली, परभणी, नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी मुसळधार ते खुप मुसळधार पावसाची शक्यता आहे. सद्य हवामानानुसार वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.

    पीक व्यवस्थापन

    पुढील पाच दिवसाचा पावसाचा अंदाज लक्षात घेता पाऊस झाल्यानंतर कापूस, तुर, भुईमुग व मका पिकात वापसा स्थिती निर्माण होण्यासाठी शेतात अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते शेताबाहेर काढण्याची व्यवस्था करावी. फवारणीची कामे पुढे ढकलावीत. पुढील पाच दिवसाचा पावसाचा अंदाज लक्षात घेता वेळेवर लागवड केलेल्या व काढणीस तयार असलेल्या मुग/उडीद पिकाची काढणी लवकरात लवकर करून घ्यावी. काढणी केलेल्या शेंगाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. शेंगा पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्यावी.

    फळबागेचे व्‍यवस्‍थापन

    पुढील पाच दिवसाचा पावसाचा अंदाज लक्षात घेता पाऊस झाल्यानंतर केळी, द्राक्ष व सिताफळ बागेत वापसा स्थिती निर्माण होण्यासाठी बागेत अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते बागेबाहेर काढण्याची व्यवस्था करावी. फवारणीची कामे पुढे ढकलावीत.

    भाजीपाला

    पुढील पाच दिवसाचा पावसाचा अंदाज लक्षात घेता पाऊस झाल्यानंतर भाजीपाला पिकात वापसा स्थिती निर्माण होण्यासाठी शेतात अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते शेताबाहेर काढण्याची व्यवस्था करावी. फवारणीची कामे पुढे ढकलावीत. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची काढणी लवकरात लवकर करून घ्यावी.

    फुलशेती

    पुढील पाच दिवसाचा पावसाचा अंदाज लक्षात घेता पाऊस झाल्यानंतर फुल पिकात वापसा स्थिती निर्माण होण्यासाठी शेतात अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते शेताबाहेर काढण्याची व्यवस्था करावी. गणपती उत्सवामूळे बाजारपेठेत फुलांना अधिक मागणी आहे. काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी लवकरात लवकर करावी व प्रतवारी करून बाजारपेठेत पाठवावी.

     

  • जोरदार पावसामुळे पिके पुन्हा पाण्याखाली; शेतकरी चिंतेत




    जोरदार पावसामुळे पिके पुन्हा पाण्याखाली; शेतकरी चिंतेत | Hello Krushi








































    हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातल्या विविध भागात सध्या जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. लातुरला देखील काल पावसाने झोडपून काढले. त्यामुळे लातूर आणि आसपासच्या भागातील शेतात पाणी साचून मोठे नुकसान झाले आहे. बरेच दिवस पावसाने उघडीप दिल्यामुळे पिकांनी माना टाकल्या होत्या. शेतकरी पावसाची वाट पाहत होते. पण काल जोरदार झालेल्या पावसामुळे पिकांना जीवदान मिळण्याऐवजी पिके वाहून जाण्याची वेळ आली आहे.

    ऐन शेंगा भरण्याच्या अवस्थेत असलेल्या सोयाबीन पिकाला याचा मोठा फटका बसला आहे. शेतात पाणी साचून राहिले आहे. शिवाय इतर पिकांचे देखील मोठे निक्सन झाले आहे. औसा तालुक्यात देखील सारखीच परिस्थिती असून कमी कालावधीत झालेल्या तुफान पावसामुळे सखल भागात पाणी जमा झाले आहे. ज्या शेतीतून पाणी जाण्यास वाट नाही अशा शेतकऱ्यांचे मोठे नुकसान आहे.

    पुन्हा पावसाचा जोर वाढणार

    हवामान खाताना वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढचे तीन-चार दिवस राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये हलक्या किंवा मध्यम गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे पाचव्या दिवसापासून राज्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे गुरुवारपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.

    error: Content is protected !!