Category: hingoli

  • काढणीपश्चात नुकसान विमाभरपाई लाभासाठी दावे दाखल करण्याचे आवाहन

    हॅलो कृषी ऑनलाईन : हिंगोली

    पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गंत स्थानिक नैसर्गिक आपत्ती काढणीपश्चात नुकसान या जोखिमेचा लाभ मिळावा यासाठी पीकविमाधारक शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे विमा दावे (पूर्वसूचना-इंटीमेशन) दाखल कराव्यात, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवराज घोरपडे यांनी केले आहे.

    हिंगोली जिल्ह्यासाठी आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इंन्शूरन्स कंपनी लिमिटेड पुणे या कंपनीची निवड करण्यात आली आहे. खरीपातील सोयाबीन, कपाशी, तूर, मूग, उडिद,ज्वारी या पिकांना विमा संरक्षण आहे. चालू खरीप-२०२२ हंगामात अतिवृष्टी, पूर इत्यादी कारणामुळे स्थानिक नैसर्गिक आपत्ती व काढणीपश्चात नुकसान या जोखिमेसाठी विमा संरक्षण उपलब्ध आहे.

    सद्यस्थितीत सोयाबीन पीक कापणीसाठी तयार असून काही ठिकाणी कापणी झालेले सोयाबीन शेतातच पडून आहे. सध्या चालू असलेल्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी स्थानिक नैसर्गिक आपत्ती अथवा काढणीपश्चात नुकसान या जोखिमेच्या लाभासाठी इंटिंमेशन (माहिती) दाखल करणे ही अट अनिवार्य आहे. पावसाने नुकसान झालेल्या सर्व पीकविमाधारक शेतकऱ्यांनी दावे (इंटिमेशन) तत्काळ दाखल करावेत, असे आवाहन घोरपडे यांनी केले आहे.

    अधिक माहीतीसाठी या नंबरवर संपर्क 

    शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे इंटिमेशन (माहिती) देण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध आहेत. त्यात पीएमएफबीआय पोर्टल, कंपनीचा टोल फ्री क्र. १८००१०३७७१२, कंपनीचा ई-मेल आयडी : [email protected] , केंद्र शासनाचे क्रॉप इन्शूरन्स ॲप व ऑफलाईन पद्धतीद्वारे इंटिमेशन (माहिती) देता येते. इंटिमेशन (माहिती) देण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही.

  • सायेब…अनुदानाचं पैकं लवकर द्या, मग आई दिवाळीला पोळ्या करेल…शेतकऱ्याच्या चिमुकल्याचं मुख्यमंत्र्यांना पत्र एकदा वाचाच

    हॅलो कृषी ऑनलाईन : कधी शेतमालाला दर नाही, कधी नैसर्गिक आपत्तीमुळे हातचं पीक वाया जातं शेतकऱ्याचं दुःख शेतकऱ्यालाच माहिती… शेतकऱ्याची सध्याची परिस्थिती आणि व्यथा सांगणारं एका चिमुकल्यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लिहलेलं पत्र सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हिंगोलीच्या एका शाळेत शिकणाऱ्या शेतकऱ्याच्या पोरानं हे पत्र मुख्यमंत्र्यांना लिहलं आहे.

    काय आहे पत्रात ?

    ” एकनाथ शिंदे
    मंत्री सायेब, मुंबई

    माझे बाबा शेती करतात आमच्या घरी शेती कमी आहे. असे बाबा म्हणतात मी बाबाले म्हणलं की मले गुपचूप खायला पैसे द्या की, माह्या संग भांडण करतात. म्हणतात यावर्षी सगळी सोयाबीन गेली वावर इकतो देतो तुला दहा रुपये… आईने दसऱ्याला पुरणाच्या पोळ्या पण नाही केल्या. आई म्हणे इथं इख खायला पैसे नाहीत वावरातली सोयाबीन गेली. महे बाबा दुसऱ्याच्यात कामाला जातात मी आईला म्हटलं. दिवाळीला पोळ्या कर ती म्हणे की बँकेत अनुदान आलं की करू पोळ्या….

    साहेब आमच्या घरी सणाला पोळ्यालाबी गुपचूप ले पैसे नाहीत आम्हाला घर नाही. आम्हाले काहीच नाही. मी बाबा संग भांडण केलं की ती आई म्हणे आपल्या जवळच्या गावात शेतकऱ्याच्या पोराने पैसे मागितले म्हणून फाशी घेतली आता मी बाबाले पैसे नाही मागत…

    साहेब आमचं घर पहा की, तुम्ही या अनुदानाचे पैसे लवकर द्या मग दिवाळीला आई पोळ्या करते. तुम्ही या पोळ्या खायले साहेब…

    तुमचा आणि बाबा चा लाडका,”
    प्रताप कावरथे वर्ग सहावा,
    जिल्हा परिषद शाळा गोरेगाव हिंगोली…

    अशा आशयाचे हे पत्र मुख्यमंत्र्यांना या चिमुकल्याने लिहले आहे. पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. एकीकडे मंत्री राजकारणात व्यस्त असताना शेतकऱ्याची खरी व्यथा जाणून या चिमुकल्याच्या घरी दिवाळीला पोळ्या बनतील का ? शेतकऱ्याला अनुदान मिळेल का ? शेतकऱयांचे प्रश्न मार्गी लागतील का ? असा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहत नाही.

     

  • हिंगोली जिल्ह्यातील संपावर असेलेले शेतकरी आक्रमक, रस्त्यावर दूध ओतून सरकारचा निषेध




    हिंगोली जिल्ह्यातील संपावर असेलेले शेतकरी आक्रमक, रस्त्यावर दूध ओतून सरकारचा निषेध | Hello Krushi











































    हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या वर्षी राज्यतल्या अनेक भागांना अतिवृष्टीचा मोठा अटक बसला आहे. त्यामुळे ऐन खरिपात शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. हिंगोली जिल्हा देखील याला अपवाद नाही. या जिल्ह्यात जूलै आणि ऑगस्ट महिन्यात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर राज्यशासनाकडून अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याचे जाहीर करण्यात आले. काही भागात मदत मिळवायला सुरुवातही झाली आहे. मात्र हिंगोलीतील सेनगाव तालुक्यातील तीन मंडळांना अद्यापही मदत मिळाली नाही. याच कारणामुळे मागच्या ६ दिवसांपासून गोरेगाव येथील शेतकरी संपावर गेले आहेत. मात्र आज शेतकऱ्यांमध्ये संताप वाढलेला दिसून आला शेतकरी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. येथील शेतकऱ्यांनी रस्त्यावर दूध ओतून राज्य सरकारचा निषेध केला.

    हिंगोली जिल्ह्यातल्या सेनगाव तालुक्यातल्या तीन मंडळांना शासनाच्या मदतीपासून वंचित राहावं लागलं आहे. पावसामुळे प्रत्यक्षात पिकांचे मोठं नुकसान झालं असताना प्रशासनाने मात्र इथे अतिवृष्टी झाली नसल्याचा दावा केलाय. त्यामुळे या भागातील जवळपास 40 ते 45 गावातील शेतकऱ्यांना शासनापासून मिळणाऱ्या मदतीपासून वंचित राहावं लागलं आहे.

    त्यामुळे गेल्या सहा दिवसांपासून गोरेगाव येथील शेतकरी संपावर गेले आहेत. आज येथील शेतकऱ्यांचा आक्रमक रूप पाहायला मिळालं शेतकऱ्यांनी रस्त्यावर दूध ओतून देत राज्य शासनाचा निषेध व्यक्त केला सेनगाव तालुक्यातील मदतीपासून वंचित असलेल्या या गावांचा तात्काळ नुकसानग्रस्त असलेल्या गावांचे यादीत समावेश करावा आणि तात्काळ मदत करावी अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली आहे.

    error: Content is protected !!





  • बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्रासाठी शासन निर्णय जारी, चालू वर्षात 10 कोटी रुपये देणार




    बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्रासाठी शासन निर्णय जारी, चालू वर्षात 10 कोटी रुपये देणार | Hello Krushi











































    हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात हळदीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. त्यातही हळदीचे सर्वाधिक उत्पादन हिंगोली जिल्ह्यात घेतले जाते. हळदीसाठी ओळखल्या जाणाऱ्या हिंगोली जिल्ह्यात आता बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्र उभारले जाणार आहे. याबाबत शासन निर्णय जरी झाला असून या संशोधन केंद्रासाठी १०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे चालू आर्थिक वर्षात १० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे.

    महाविकास आघाडी सरकारनं 2022 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्राला मंजुरी दिली होती. त्यानंतर आता शिंदे सरकार स्थापन होताच या संशोधन केंद्रासंदर्भात शासन निर्णय करण्यात आला आहे. 14 सप्टेंबला हा शासानिर्णय काढण्यात आला आहे. चालू आर्थिक वर्षांमध्ये दहा कोटी रुपये निधी वितरित करत असल्याची माहिती या शासन निर्णयात आहे. हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात हे हळद संशोधन केंद्र उभारले जाणार आहे. बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्र या नावाने हे संशोधनं केंद्र उभारले जाणार आहे.

    भारतीय हळदीला मोठी मागणी

    –भारतीय हळदीला जगभरातून मागणी वाढत आहे. यंदा देशातून हळदीची विक्रमी निर्यात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
    –यंदा देशातून 2 लाख टन हळदीच्या निर्यात होण्याची शक्यता आहे.
    –गेल्या तीन वर्षापासून हळद निर्यातीत भारताचे आकडे वाढत असल्याचे दिसत आहे.
    — गेल्या वर्षी देशातून 1 लाख 83 हजार 868 टन हळदीची निर्यात झाली होती.
    — यंदा वर्ष अखेपर्यंत दोन लाख टनांहून अधिक हळदीची निर्यात शक्य असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

     

    error: Content is protected !!





  • मुख्यमंत्री साहेब आम्ही महाराष्ट्रात राहतो का.. बिहारमध्ये…? शेतकऱ्याने रक्ताने लिहिले पत्र, मागितली भरपाई

    हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात यावर्षी अतिवृष्टीमुळे पिकांचे अधिक नुकसान झाले आहे. मात्र, राज्य सरकारने पंचनामा करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली आहे. याअंतर्गत 15 सप्टेंबरपासून मदतीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. मात्र, दुसरीकडे असे अनेक जिल्हे आणि असे अनेक तालुके आहेत, ज्यांना पंचनामा करण्यापासून दूर ठेवण्यात आले आहे, त्यामुळे तेथील शेतकऱ्यांची निराशा झाली आहे. अशा परिस्थितीत हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील एका शेतकऱ्याने आपल्या रक्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे. ज्यात शेतकऱ्याला नुकसान भरपाईच्या प्रक्रियेपासून दूर ठेवल्याचा सवाल केला आहे.

    शेतकऱ्याने रक्ताने लिहिलेल्या पत्रात मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला आहे की ते महाराष्ट्रात राहतात की बिहारमध्ये? शेतकरी पुढे म्हणाले की, आम्ही सुद्धा महाराष्ट्रात राहत असून आमच्या तालुक्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे, आम्हालाही मदतीची गरज आहे.शेतकऱ्याने मागणी केली आहे.

    शेतकरी दु:खी आहेत

    यावर्षी तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने नाल्यांचे व नद्यांचे पाणी शेतात शिरल्याचे शेतकरी सांगतात. यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नवीन सरकार पंचनामा करून शेतकऱ्यांना मदत करेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली. मात्र, सेनगाव तालुक्यातील काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडली आहे.

    सेनगाव तालुक्यात अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या भागांचे पंचनामे भरण्यात आले. अतिवृष्टीग्रस्तांना 32 कोटी 23 लाख 47 हजार 200 रुपयांची मदत वाटप करण्यात येणार असल्याचे तालुका प्रशासनाने सांगितले. मात्र, सेनगाव तालुक्यातील गोरेगाव, आजेगाव, बाभूळगाव, पुसेगाव या चार मंडळांना अतिवृष्टीतून वगळण्यात आले असून, पंचनामा झाला नाही. अशा स्थितीत येथील शेतकऱ्यांची निराशा झाली आहे.

    काय आहे पत्रात ?

    मा. मुख्यमंत्री महाराष्ट्रात एकनाथ शिंदे साहेब,

    विषय:-आम्ही महाराष्ट्रात राहतो का.. बिहारमध्ये…? अतिवृष्टीतून वगळ्याल्या प्रकरणी…

    सेनगाव तालुक्यात पेरण्याच्या सुरुवातीला मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. अनेक शेतकरी देशोधडीला लागले. सगळे राजकारणात गुंतले होते. सोबत कृषी विभागालाही विसर पडला..

    सेनगाव तालुक्यातील शेतकरी मरणाच्या दारात उभा असताना आपण अनेक मंडळे नाकारली. तालुक्यात सर्व दूर पाऊस असताना आपण तीन मंडळे अतिवृष्टीतून नाकारली. मग आम्ही महाराष्ट्रात नसून बिहारमध्ये राहतो का.?

    साहेब, अधिवेशनात घोषणा केली.. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही.. मग हे काय खाजगी कंपनीने नाकी नऊ आणले? जगायचे कसे ते सांगा..

    अन्यथा अंगात राहिलेल्या बाकी रक्ताने अभिषेक करून आम्ही आमचे जीव सोडून देऊ.. अनुदान द्या..