Category: Lumpy

  • Lumpy: दिलासादायक ! राज्यात लंपीची लागण झालेली 93 हजारांहून अधिक गुरे झाली बरी

    हॅलो कृषी ऑनलाईन : लंपीत्वचा (Lumpy) रोगाने संपूर्ण भारतातील गुरांना संक्रमित केले आहे. एकट्या महाराष्ट्रात 32 जिल्ह्यांतील 3,30 गावांमध्ये हजारो गुरे लंपी रोगाने ग्रस्त आहेत. मात्र आता दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. राज्याचे पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह म्हणाले की, राज्यात आतापर्यंत या आजाराने ग्रस्त 93 हजार 166 जनावरे बरी झाली आहेत. सध्या बाधित गुरांवर उपचार सुरू आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये आज एकूण 140.97 लाख लसीचे डोस उपलब्ध करण्यात आले असून त्यापैकी 135.58 लाख जनावरांचे मोफत लसीकरण करण्यात येणार आहे. सचिंद्र प्रताप सिंह म्हणाले की, राज्यात लवकरच आठ टक्के लसीकरणाचे काम केले जाणार आहे.

    लंपी (Lumpy) त्वचारोगाच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील पशुपालक शेतकरी चिंतेत आहेत. याचा फटका दूध व्यवसायालाही बसत आहे. पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह म्हणाले की, जळगाव, अहमदनगर, धुळे, अकोला, औरंगाबाद, बीड, कोल्हापूर, सांगली, वाशिम, जालना, हिंगोली, नंदुरबार आणि मुंबई उपनगरी जिल्ह्यांमध्ये वाढत्या लंपी रोगाच्या पार्श्वभूमीवर लसीकरण पूर्ण झाले आहे. खाजगी संस्था, सहकारी दूध संस्था आणि वैयक्तिक पशुपालकांनी केलेल्या लसीकरणाच्या आकडेवारीनुसार, सुमारे 97 टक्के जनावरांचे लसीकरण करण्यात आले आहे. बाधित गावातील एकूण 1 लाख 43 हजार 89 बाधित जनावरांपैकी 93 हजार 166 पशुधन उपचाराने बरे झाल्याची माहिती आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिली.

    महाराष्ट्र पशू व मत्स्य विद्यापीठाने कीटक नियंत्रणासाठी काही मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत. त्या सूचनांचा अवलंब करून राज्यातील पशुसंवर्धन आणि ग्रामपंचायतीमार्फत गोशाळांमधील कीड नियंत्रण आणि निर्जंतुकीकरणाच्या महत्त्वाच्या बाबी मोहिमेच्या स्वरूपात राबवल्या जात आहेत. यावेळी पशुपालक प्रताप सिंह यांनी शासकीय व खाजगी पशुवैद्यकांनी दिलेल्या प्रगत उपचार प्रोटोकॉलनुसार उपचार करण्याचे आवाहन केले.

    पशुपालकांनी केवळ शासकीय अधिकाऱ्यांकडे जाऊन औषध-लसीकरणाची व्यवस्था करावी, अशी सूचनाही त्यांनी केली. ते म्हणाले की, शासनाने मोफत औषध आणि लसीकरणाचे नियोजन केले आहे. सर्व पशुधन (Lumpy) मालकांना विनंती आहे की त्यांनी आपल्या जनावरांवर उपचार करण्यासाठी स्थानिक पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना सहकार्य करावे.

     

     

     

  • ‘लम्पी स्कीन’ने दगावलेल्या जनावरांसाठी मिळणाऱ्या मदतीच्या निकषात बदल…

    हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यभरात लंपी या रोगाचा प्रादुर्भाव झाला असून त्यामुळे अनेक जनावरांचा मृत्यू झाला आहे. शासनाकडून या रोगाला अटकाव घालण्याचे प्रयत्न सुरु आहेत. या आजाराने मृत झालेल्या जनावरांच्या ठरावीक संख्येइतक्या जनावरांनाच नुकसानभरपाई दिली जात होती. आता त्यात बदल करत संख्येचे निर्बंध दूर करून जितकी जनावरे ‘लम्पी स्कीन’ने दगावतील तितक्या जनावरांना नुकसानभरपाई मिळणार आहे. पशुसंवर्धन आयुक्त सच्चिंद्र प्रताप सिंग यांनी मंगळवारी (ता. ४) जुन्या आदेशात बदल करून नवीन आदेश काढला आहे.

    लम्‍पीची साथ आल्यानंतर मृत पावलेल्या जनावरांबाबत संबंधित पशुपालकांना अर्थसाह्य देण्याचे आदेश शासनाने दिले होते. मात्र जे पशुपालक हे अल्‍प भूधारक, अत्यल्‍प भूधारक आहेत, त्‍यांनाच हा लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तसेच हा लाभ केवळ एका शेतकऱ्या‍साठी तीन जनावरांच्या मृत्यूपर्यंतच होता. या शासन निर्णयात आता बदल करण्यात आला आहे. नव्या निर्णयानुसार, सर्व शेतकरी व पशुपालकांना या निर्णयाचा लाभ होईल. तसेच जनावरांच्या संख्येवर घातलेली मर्यादाही उठवण्याचा महत्त्‍व‍पूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

    किती मिळणार रक्कम ?

    गाय किंवा म्‍हैस लम्‍पी स्कीनने मृत पावल्यास संबंधित पशुपालकास ३० हजार रुपये, ओढकाम करणारी जनावरे, जसे की बैल मृत पावला तर २५ हजार व वासरू असेल, तर १६ हजार रुपये मदत देण्यात येईल. जितकी जनावरे लम्पी स्कीनने दगावतील तितक्या सर्व जनावरांसाठी मिळणार मदत
    अल्पभूधारक, अत्यल्प भूधारक हे निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. राष्ट्रीय आपत्ती निवारण धोरणातील आर्थिक निकषांप्रमाणे पशुधन मृत पावलेल्या सर्व पशुपालकांना अर्थसाह्य मिळणार आहे. केवळ ‘लम्पी स्कीन’ने मृत झालेल्या जनावरांनाच्या पशुपालकांनाच मिळणार भरपाई मिळणार आहे.

  • प्रादुर्भाव झालेल्या पशुधनांसाठी विलगीकरण कक्ष उभारा : बच्चू कडू

    हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यभरात लंपी या त्वचा रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात पसरत आहे. एवढेच नाही तर यामुळे पशुधनाच्या जीवाला धोका निर्माण झाला असून पशुपालक चिंतेत आहेत. दरम्यान या आजाराच्या नियंत्रणासाठी विलगीकरण कक्ष तयार करून प्रादुर्भाव झालेल्या जनावरांना औषध उपचार करण्याकरिता तेथे एकत्रित ठेवण्याबाबतचे पत्र अचलपूर मतदारसंघाचे आमदार बच्चू कडू यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.

    राज्यामध्ये लम्पी स्कीन आजाराचा प्रसार वाढता असून त्यामध्ये पशुपालकांच्या घरी जाऊन पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी, कर्मचारी औषधोपचार करीत आहेत. परंतु पशुसंवर्धन खात्यामध्ये मनुष्यबळ कमी असल्याने यात अपेक्षित यश मिळत नसल्याचे चित्र आहे. औषधोपचार न मिळाल्याने राज्यात जनावर दगावत आहेत.त्या पार्श्वभूमीवर छावणी योजनेच्या धर्तीवर विलगीकरण कक्षाची स्थापना करावी, अशा सूचना आमदार बच्चू कडू यांनी दिल्या आहेत. ज्या ठिकाणी पर्याप्त जागा उपलब्ध आहेत अशा ठिकाणी तयारी करून छावण्यांची उभारणी करावी.

    येथे गोवंशीय पशू एकत्रित ठेवल्यास पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना आजारी जनावरांवर उपचार करणे व आवश्यकतेनुसार उत्तरीय तपासणीसाठी नमुना गोळा करणे, मृत पशूंची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणे, पशुपालकांनी पशूची काळजी घरीच घ्यावी.अत्यावश्यक औषधी शासन स्तरावर खरेदी करता येत नाही. परंतु पशूंना वाचवण्यासाठी अत्यावश्यक आहेत त्या औषधी आम्ही खरेदी करून पशुपालकांना उपलब्ध करून देत आहोत. आजारी पशूंचे विलगीकरण करणे ही बाब नवीन आहे.

    तरीसुद्धा प्रायोगिक तत्त्वावर चांदूरबाजार, अचलपूर येथे हा प्रयोग करणार असल्याचे बच्चू कडू यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्र राज्य राजपत्रित पशुवैद्यकीय संघटनेचे अध्यक्ष डॉ. रामदास गाडे यांनी देखील लम्पी स्कीचा प्रादुर्भाव असलेल्या भागात चारा छावण्यांच्या धर्तीवर विलगीकरण छावण्या उभारण्याची गरज व्यक्त केली आहे.

     

  • जाणून घ्या ‘लंपी’च्या प्रसाराबद्दल महत्वाची माहिती

    हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी आणि पशुपालक मित्रांनो राज्यातील जवळपास ३० जिल्ह्यांमध्ये लंपी या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे सध्या पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या रोगाच्या प्रसारासाठी कीटक हे मुख्य कारणीभूत आहेत. त्यामुळे या रोगाचा प्रसार रोखण्यासाठी काही महत्वाच्या बाबी लक्षात घेणे गरजेचे आहे. पशुधन व्यवस्थापनाबाबतची ही माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समिती यांच्यामार्फत देण्यात आली आहे.

    –गोवंशीय पशुधनामध्ये सध्या लम्पी स्कीन डीसीज होत आहे. यांचा प्रसार अनेक मार्गापैकी एक म्हणजे किटकवर्गीय चावणाऱ्या माशांमार्फत होतो. त्या किटकवर्गीय माशा व त्यांचे नियंत्रण कशा पद्धतीने करता येईल ? जाणून घेऊया

    किटकवर्गीय माशा : यामध्ये सर्वात जास्त हिमॅटोबीया प्रजातीची माशी, त्यानंतर टॅबॅनस, स्टोमोक्षीस, क्यूलिफॉईडस आणि डास, या सर्व प्रजातीच्या माशा रक्त शोषण करतात व लम्पी स्कीन डिसीजचे विषाणू यांत्रीक पध्दतीने प्रसारीत करतात.

    1)हिमॅटोबीया : ही माशी पशुधनास अठ्ठेचाळीस वेळेस चावे व टाकलेल्या ताज्या शेणावरती अंडी घालते.

    अ) शेणाची योग्य विल्हेवाट लावणे व शेणाचा खड्डा पॉलीथीन/ताडपत्रीने आच्छादित करणे.
    ब) पशुधनाच्या शरीरावर वनस्पतीजन्य अथवा रासायनिक किटकनाशकाच्या द्रावणाची फवारणी करणे.

    2)टॅबॅनस : ही माशी आकाराने मोठी असून गाय/म्हैस यांना प्रखर सुर्यप्रकाशामध्ये चावा घेते व त्याजागी रक्त वाहते.

    अ) पशुधनास प्रखर सुर्यप्रकाशामध्ये (सकाळी 10 ते सायं. 5 पर्यंत) चरावयास सोडू नये व गोठयात ठेवावे.

    3)स्टोमोक्सीस : या प्रजातीच्या माशा मुत्राने माखलेल्या वैरणीवरती आपली अंडी घालतात.

    अ) गोठयातील अर्वरीत वैरण शेणाच्या खड्डयामध्ये टाकावी.
    ब) या माशा देखील प्रखर सुर्यप्रकाश असताना चावतात म्हणून प्रखर सुर्यप्रकाशाच्या वेळा सोडून पशुधनास चरावयास सोडावे.

     

  • Lumpy : लम्पी संक्रमित गायींचे दूध मानवांसाठी धोकादायक आहे का ? दुधातील विषाणू कसे नष्ट करायचे ?

    हॅलो कृषी ऑनलाईन : भारतातील अनेक राज्यांमध्ये लम्पी स्किन (Lumpy) व्हायरसने गायींच्या मृत्यूने कहर केला आहे. एका सर्वेक्षणानुसार देशभरात आतापर्यंत सुमारे ७० हजार गायींचा मृत्यू झाला आहे. या विषाणूमुळे पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. लम्पी व्हायरसमुळे अनेक भागात दुधाच्या व्यवसायावरही परिणाम झाला आहे. सध्या अनेक राज्यांमध्ये या विषाणूचे लसीकरण सुरू झाले आहे. चला तर मग आजच्या या लेखात जाणून घेऊया की लंपी संसर्ग झालेल्या गायींच्या दुधाचे सेवन मानवांसाठी कसे आहे.

    दुधावर लम्पी विषाणूचा प्रभाव

    लखनौ विभागाचे मुख्य पशुवैद्यकीय अधिकारी आणि तज्ज्ञांच्या मते, गायींच्या दुधात लम्पी (Lumpy) विषाणूचा प्रभाव निश्चितपणे दिसून येतो. परंतु ते दुधापासून दूर केले जाऊ शकते. दूध काढल्यानंतर प्रथम दूध चांगले उकळून घ्यावे व नंतर ते स्वच्छ भांड्यात ठेवावे. असे केल्याने विषाणू दुधातच नष्ट होतात. यानंतरच तुम्ही गायीचे दूध वापरू शकता.

    लक्षात ठेवा की विषाणूची लागण झालेल्या गायींच्या वासरांना दूर ठेवा. कारण गाईच्या दुधापासून वासरे या विषाणूचे बळी ठरू शकतात. तसे, आजपर्यंत देशातील मानवांमध्ये लम्पी व्हायरसचा कोणताही प्रभाव दिसून आलेला नाही, परंतु तरीही वैज्ञानिकांनी ते टाळण्याचा सल्ला दिला आहे.

    दूध कमी होणे

    व्हायरसमुळे गायीचे दूध कमी होत आहे. याचा सर्वाधिक परिणाम दूध (Lumpy) व्यवसायावर होत आहे. राजस्थानमध्ये दुधाचे प्रमाण दररोज ३ ते ४ लाख लिटर कमी होत आहे. एवढेच नाही तर इतर राज्यांतही गाईच्या दुधाची स्थिती अशीच आहे. अशा परिस्थितीत, सरकारने सर्व पशुपालकांना त्यांच्या गायींना या विषाणूपासून वाचवण्यासाठी काउ पॉक्स लस घेण्यास सांगितले आहे. ही लस प्रथम शेळ्यांमध्ये वापरली गेली. जेणेकरून त्यांना विषाणूचा संसर्ग टाळता येईल.

     

     

     

     

  • लसीकरण झालेल्या बैलांना शर्यतीस परवानगी देण्याची बैलगाडा चालकांची मागणी…

    हॅलो कृषी ऑनलाईन : सकलेन मुलाणी सातारा

    सातारा जिल्ह्यातील 10 तालुक्यांमध्ये जनावरांना लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव झालाय. त्यामुळे जिल्ह्यात उद्भवलेल्या गाय आणि बैल वर्गीय पशुधनातील लम्पी चर्मरोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी 7 सप्टेंबरपासून जनावरांच्या वाहतुकीवर,बाजार भरवण्यावर आणि शर्यतीवर बंदी घातली आहे. बैलगाडा प्रेमी आणि आयोजकांनी लसीकरण झालेल्या बैलांना बैलगाडा शर्यतीमध्ये भाग घेण्यासाठी परवानगीची मागणी केली आहे.

    अन्यथा बैलाची किंमत कमी होईल…

    बैलांना रोज फेरी मारणे तसेच स्पर्धेमध्ये पळवणे हे गरजेचे आहे. अन्यथा शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे बैल या सगळ्या गोष्टी विसरून जाऊ शकतात आणि त्या बैलाची किंमत कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन लसीकरण झालेल्या जनावरांना या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी पात्र करून काही अटी शर्ती घालून परवानगी द्यावी अशी मागणी बैलगाडा प्रेमी करत आहेत.

    साताऱ्यात लंपीचा उद्रेक

    दरम्यान सातारा जिल्ह्यातील जनावरांना लंपी त्वचा रोगाचा उद्रेक वाढू लागला आहे. जिल्ह्यातील 11 तालुक्यांपैकी 10 तालुक्यात या रोगाचा शिरकाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. जिल्ह्यात शुक्रवारी एका दिवसात 5 जनावरांचा लंपी आजाराने मृत्यू झाला आहे. लंपी रोगाने जिल्ह्यातील 10 तालुक्यातील 71 गावे बाधित झाली आहेत. आत्तापर्यंत 573 जनावरांना लंपीची लागण झाली आहे, तर 82 जनावरे उपचाराने बरी झाली आहेत. 449 जनावरांवर सध्या उपचार करण्यात येत आहे.

    जिल्ह्यातील 3 लाख 52 हजार जनावरांना पशुसंवर्धन विभागामार्फत लसीकरण करण्यात येणार आहे. त्यापैकी 1 लाख 43 हजार 63 जनावरांना लसीकरण करण्यात आले आहे.. पशुसंवर्धन विभागाकडे 2 लाख 81 हजार 900 लसमात्रा उपलब्ध असल्याची माहिती पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर अंकुश परिहार आणि जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर संजय शिंदे यांनी दिली आहे.

    लम्पीची लक्षणे आणि बचाव

    १) लक्षणे

    १)या आजाराचा संसर्ग झाल्यास प्रथम जनावरांच्या डोळयातून आणि नाकातून पाणी येते.
    २)लसिकाग्रंथीना सूज येते.
    ३)सुरुवातीला जनावरांना ताप येतो.
    ४)दुधाचे प्रमाण कमी होते.
    ५)चारा खाणे, पाणी पिणे कमी होते.
    ६)हळूहळू डोके, मान, मायांग, कास इत्यादी भागाच्या त्वचेवर 10 ते 50 मिमी व्यासाच्या गाठी येतात.
    ७)तोंडातील व्रणामुळे आजारी जनावरांना चारा खाण्यास त्रास होतो.
    ८)डोळ्यातील व्रणामुळे चिपडे येतात, तसेच डोळ्यांची दृष्टी बाधित होते.
    ९)पायावर सूज येवून काही जनावरे लंगडतात.

    काय घ्यावी काळजी ?

    लम्पी त्वचा रोग हा संसर्गजन्य रोग असल्याने उपचार करण्यापेक्षा रोग येऊच नये याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजना व रोग आल्यास त्याचा प्रसार होऊ नये याकरिता पशुपालकांनी आवश्यक ती काळजी घेण्याची आवश्यकता आहे.

    १)बाह्य किटकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी गोठ्यांची व्यवस्थित स्वच्छता राखावी.
    २)निरोगी जनावरांना बाधित जनावरांपासून वेगळे बांधावे.
    ३)गायी व म्हशींना एकत्रित ठेवण्यात येवू नये.
    ४)रोग सदृश लक्षणे आढळल्यास जवळच्या पशुवैद्यकीय संस्था प्रमुखांना तातडीने संपर्क साधावा.
    ५)बाधित जनावरांच्या पिण्याच्या पाण्याकरिता व तसेच चराईकरिता स्वतंत्र व्यवस्था करावी.
    ६)गोठ्यात त्रयस्थांच्या भेटी टाळाव्यात.
    ७)बाधित परिसरात स्वच्छता करावी व निर्जंतुक द्रावणाची परिसरात फवारणी करावी.
    ८)फवारणीसाठी 1 टक्के फॉर्मलीन किंवा 2 ते 3 टक्के सोडियम हायपोक्लोराईट, फिनॉल 2 टक्के यांचा वापर करावा
    ९)या रोगाने ग्रस्त जनावरांचा मृत्यू झाल्यास मृतदेहाची शास्त्रीय पद्धतीने कमीत कमी ८ फूट खोल खड्डयात गाडून विल्हेवाट लावावी.
    १०)मृत जनावरांच्या खाली व वर चुन्याची पावडर टाकण्यात यावी.

  • सातारा जिल्ह्यात लंपीचा उद्रेक 11 पैकी 10 तालुक्यात शिरकाव

    हॅलो कृषी ऑनलाईन : सकलेन मुलाणी सातारा

    राज्यात लंपी या रोगाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत आहे. सातारा जिल्ह्यातील जनावरांना लंपी त्वचा रोगाचा उद्रेक वाढू लागला आहे. जिल्ह्यातील 11 तालुक्यांपैकी 10 तालुक्यात या रोगाचा शिरकाव मोठ्या प्रमाणात झाला आहे.

    जिल्ह्यात शुक्रवारी एका दिवसात 5 जनावरांचा लंपी आजाराने मृत्यू झाला आहे. लंपी रोगाने जिल्ह्यातील 10 तालुक्यातील 71 गावे बाधित झाली आहेत. आत्तापर्यंत 573 जनावरांना लंपीची लागण झाली आहे, तर 82 जनावरे उपचाराने बरी झाली आहेत. 449 जनावरांवर सध्या उपचार करण्यात येत आहे.

    जिल्ह्यातील 3 लाख 52 हजार जनावरांना पशुसंवर्धन विभागामार्फत लसीकरण करण्यात येणार आहे. त्यापैकी 1 लाख 43 हजार 63 जनावरांना लसीकरण करण्यात आले आहे.. पशुसंवर्धन विभागाकडे 2 लाख 81 हजार 900 लसमात्रा उपलब्ध असल्याची माहिती पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर अंकुश परिहार आणि जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर संजय शिंदे यांनी दिली आहे.

    लम्पीची लक्षणे आणि बचाव

    १) लक्षणे

    १)या आजाराचा संसर्ग झाल्यास प्रथम जनावरांच्या डोळयातून आणि नाकातून पाणी येते.
    २)लसिकाग्रंथीना सूज येते.
    ३)सुरुवातीला जनावरांना ताप येतो.
    ४)दुधाचे प्रमाण कमी होते.
    ५)चारा खाणे, पाणी पिणे कमी होते.
    ६)हळूहळू डोके, मान, मायांग, कास इत्यादी भागाच्या त्वचेवर 10 ते 50 मिमी व्यासाच्या गाठी येतात.
    ७)तोंडातील व्रणामुळे आजारी जनावरांना चारा खाण्यास त्रास होतो.
    ८)डोळ्यातील व्रणामुळे चिपडे येतात, तसेच डोळ्यांची दृष्टी बाधित होते.
    ९)पायावर सूज येवून काही जनावरे लंगडतात.

    काय घ्यावी काळजी ?

    लम्पी त्वचा रोग हा संसर्गजन्य रोग असल्याने उपचार करण्यापेक्षा रोग येऊच नये याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजना व रोग आल्यास त्याचा प्रसार होऊ नये याकरिता पशुपालकांनी आवश्यक ती काळजी घेण्याची आवश्यकता आहे.

    १)बाह्य किटकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी गोठ्यांची व्यवस्थित स्वच्छता राखावी.
    २)निरोगी जनावरांना बाधित जनावरांपासून वेगळे बांधावे.
    ३)गायी व म्हशींना एकत्रित ठेवण्यात येवू नये.
    ४)रोग सदृश लक्षणे आढळल्यास जवळच्या पशुवैद्यकीय संस्था प्रमुखांना तातडीने संपर्क साधावा.
    ५)बाधित जनावरांच्या पिण्याच्या पाण्याकरिता व तसेच चराईकरिता स्वतंत्र व्यवस्था करावी.
    ६)गोठ्यात त्रयस्थांच्या भेटी टाळाव्यात.
    ७)बाधित परिसरात स्वच्छता करावी व निर्जंतुक द्रावणाची परिसरात फवारणी करावी.
    ८)फवारणीसाठी 1 टक्के फॉर्मलीन किंवा 2 ते 3 टक्के सोडियम हायपोक्लोराईट, फिनॉल 2 टक्के यांचा वापर करावा
    ९)या रोगाने ग्रस्त जनावरांचा मृत्यू झाल्यास मृतदेहाची शास्त्रीय पद्धतीने कमीत कमी ८ फूट खोल खड्डयात गाडून विल्हेवाट लावावी.
    १०)मृत जनावरांच्या खाली व वर चुन्याची पावडर टाकण्यात यावी.

  • ‘लंपी’ चा प्रसार करणाऱ्या कीटकांपासून कशी कराल सुटका ? जाणून घ्या

    हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात लंपी या रोगाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होतो आहे. या रोगाचा प्रसार हा मुख्यतः कीटकांमार्फत होतो. मात्र या कीटकांना रोखण्याच्या उपाययोजना जाणून घेऊयात …

    लम्पी स्कीन रोग याचा प्रसार हा अनेक मार्गानी होतो. त्यापैकी चावा घेणाऱ्या किटीक वर्गीय माशा या एक प्रमुख होय. यामध्ये टॅबॅनस, स्टोमोक्सिस हिमॅटोबिया, क्यूलीकॉईडस, डास व काही प्रजातींचे गोचीडे यांचा समावेश होतो.

    1.पशुधनास प्रखर उन्हाच्या वेळेस चारावयास सोडू नये (सकाळी 10 ते 17 पर्यंत गोठयात ठेवावे)
    2. शेणाचा उकिरडा/खड्डा शेण टाकल्यानंतर पॉलिथीन/ताडपत्रीने झाकून टाकावा.
    3. गोठयात स्वच्छता ठेवावी.
    4.पशुधनाच्या शरीरावर कमीत कमी एक आठवडयाच्या अंतराने 5% निम सिड कर्नल एक्सट्रक्ट (निम अर्क) (NSKE) अथवा वनस्पतीजन्य 10 मिली निम तेल + 10 मिली निलगीरी तेल + 10 मिली कारंज तेल + 2 ग्रॅम अंगाचा साबण + 1 लिटर पाणी हे द्रावण फवारावे.
    5. गोठयाची स्वच्छता करून गोचीडाची अंडी गोळा करून शेकोटीमध्ये जाळावी.
    6. आजार सदृश लक्षणे आढळल्यास जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क साधावा.
    7. रोग नियंत्रणासाठी पशुवैद्यकाच्या सल्ल्याने पशुधनास लसीकरण करून घ्यावे.

    देशातील 18.5 लाख गुरांना लंपीची लागण

    सध्या देशातील 15 हून अधिक राज्यांतून लंपी त्वचेच्या आजाराची प्रकरणे नोंदवली गेली आहेत. आतापर्यंत देशभरात सुमारे 18.5 लाख गुरांना चर्मरोगाची लागण झाली आहे. त्यापैकी 12.5 लाख प्रकरणे एकट्या राजस्थानमधून नोंदवली गेली आहेत.

    23 एप्रिल रोजी पहिले प्रकरण उघडकीस आले

    लंपी त्वचा रोग देशभरात झपाट्याने पसरला आहे. उदाहरणार्थ, शून्य प्रकरणांपासून ते जवळजवळ (Lumpy) दशलक्ष प्रकरणांपर्यंतचा प्रवास 5 महिन्यांत व्हायरसने कव्हर केला आहे, जो चिंताजनक आहे. खरं तर, 23 एप्रिल रोजी लंपी त्वचेच्या आजाराची पहिली केस नोंदवली गेली होती, ज्या दरम्यान गुजरातमधील कच्छमध्ये पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर अनेक राज्यांतील गुरांना ढेकूण त्वचारोगाने ग्रासले. ढेकूळ त्वचारोगाचा झपाट्याने होणारा प्रसार हा चिंतेचा विषय आहे.

    75000 हून अधिक गुरांचा मृत्यू

    आत्तापर्यंत 75000 हून अधिक गुरे लंपी त्वचेच्या (Lumpy) आजाराने दगावली आहेत. त्यापैकी सर्वाधिक प्रकरणे राजस्थानमधूनच नोंदवली गेली आहेत. यानंतर पंजाब, हरियाणा, राजस्थान, जम्मू आणि काश्मीर, हिमाचल, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, नवी दिल्ली, झारखंड या राज्यांमध्ये गुरांच्या त्वचेच्या आजारामुळे मृत्यू झाल्याची प्रकरणे नोंदवली गेली आहेत. याचा सर्वाधिक फटका गाईंना बसला आहे.

  • 18.5 Lakh Cattle Infected In The Country

    हॅलो कृषी ऑनलाईन : कोरोना महामारीनंतर देश पुन्हा एकदा संसर्गजन्य आजाराच्या (Lumpy) विळख्यात सापडला आहे. यावेळी लंपी त्वचेच्या आजाराने गुरांचा बळी घेतला आहे. लम्पी त्वचेच्या आजाराने देशभरात वेगाने पाय पसरले आहेत आणि गुरांना लागण केली आहे. उदाहरणार्थ, सध्या देशातील 15 हून अधिक राज्यांतून लंपी त्वचेच्या आजाराची प्रकरणे नोंदवली गेली आहेत. आतापर्यंत देशभरात सुमारे 18.5 लाख गुरांना चर्मरोगाची लागण झाली आहे. त्यापैकी 12.5 लाख प्रकरणे एकट्या राजस्थानमधून नोंदवली गेली आहेत.

    23 एप्रिल रोजी पहिले प्रकरण उघडकीस आले

    लंपी त्वचा रोग देशभरात झपाट्याने पसरला आहे. उदाहरणार्थ, शून्य प्रकरणांपासून ते जवळजवळ (Lumpy) दशलक्ष प्रकरणांपर्यंतचा प्रवास 5 महिन्यांत व्हायरसने कव्हर केला आहे, जो चिंताजनक आहे. खरं तर, 23 एप्रिल रोजी लंपी त्वचेच्या आजाराची पहिली केस नोंदवली गेली होती, ज्या दरम्यान गुजरातमधील कच्छमध्ये पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर अनेक राज्यांतील गुरांना ढेकूण त्वचारोगाने ग्रासले. ढेकूळ त्वचारोगाचा झपाट्याने होणारा प्रसार हा चिंतेचा विषय आहे.

    75000 हून अधिक गुरांचा मृत्यू

    आत्तापर्यंत 75000 हून अधिक गुरे लंपी त्वचेच्या (Lumpy) आजाराने दगावली आहेत. त्यापैकी सर्वाधिक प्रकरणे राजस्थानमधूनच नोंदवली गेली आहेत. यानंतर पंजाब, हरियाणा, राजस्थान, जम्मू आणि काश्मीर, हिमाचल, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, नवी दिल्ली, झारखंड या राज्यांमध्ये गुरांच्या त्वचेच्या आजारामुळे मृत्यू झाल्याची प्रकरणे नोंदवली गेली आहेत. याचा सर्वाधिक फटका गाईंना बसला आहे.

    प्रतिबंधासाठी लसीकरण मोहीम

    त्वचा रोग प्रतिबंधक. ज्या अंतर्गत बाधित गुरांना गाउट पॉक्सची लस दिली जात आहे. जे त्यांचा प्रभावी परिणाम दाखवत आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, एकट्या राजस्थानला 30 लाख लसी देण्यात आल्या आहेत. त्याच बरोबर लंपी त्वचारोगाच्या प्रतिबंधासाठी गोट पोक्सच्या १.५ कोटी डोसची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याच वेळी, लंपी त्वचा रोगाची लस देखील देशात विकसित केली गेली आहे. ज्याचे उत्पादन सध्या सुरू आहे.

     

     

  • ‘गोधन खतरे मे है’ सांगणारे, गोधन सांकटात असताना एक शब्दही बोलत नाहीत : पवारांची टीका

    हॅलो कृषी ऑनलाईन : देशासह राज्यांमध्ये लंपीचा कहर वाढत असल्यामुळे एकीकडे पशुपालक हे चिंतित असताना लंपीवरून आता राजकारण ही तापायला सुरुवात झाली आहे. :राजकीय अजेंडा सेट करण्यासाठी ‘गोधन खतरे मे है’ सांगणारे नेते आज गोधन खऱ्या अर्थाने संकटात असताना एक शब्दही बोलत नाहीत. अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे. याशिवाय केंद्रीय माध्यमांवर ही त्यांनी टीका करीत म्हंटले आहे की, “राजकारणासाठी ज्यांचा तिसरा डोळा क्षणार्धात उघडतो तो अद्यापही उघडलेला नाही. चित्ते रुळले असतील तर राष्ट्रीय मीडियानेही लम्पीकडं लक्ष केंद्रित करायला हरकत नाही”.

    लंपी बाबत केंद्र सरकरच्या कारभारावर टीका करणारी फेसबुक पोस्ट रोहित पवार यांनी लिहिली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हंटले आहे की, ” देशात ८२ हजार जनावरं लंम्पी आजाराने दगावली तर लाखो जनावरं लंम्पीग्रस्त असल्याने पशुधनावर आणि पर्यायाने बळीराजासमोर मोठं संकट उभं राहिलंय. राज्याचे पशुसंवर्धन मंत्री स्वतः जातीने लक्ष ठेवून असल्याने काही अंशी दिलासा नक्कीच मिळत आहे.

    अतिरिक्त मदत मिळणं गरजेचं

    मृत पावलेल्या पशुधनास NDRF निकषात असलेल्या मदतीप्रमाणे राज्यसरकार स्वतःच्या तिजोरीतून ३० हजार रुपयांची मदत देत आहे. परंतु सात वर्षे जुने NDRF निकष आणि दुधाळ जनावरांच्या वाढलेल्या किंमती बघता ही मदत पुरेशी नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळं अतिरिक्त मदत मिळणं गरजेचं आहे.
    केंद्र सरकारने लम्पी आजाराला साथीचा रोग म्हणून घोषित केल्यास SDRF मधील ‘आपत्ती निवारण आणि पुनर्वसन’ या सेक्शन अंतर्गत मदत देता येऊ शकते. असं झाल्यास शेतकऱ्यांना राज्य शासनाची ३० हजार आणि SDRF ची ३० हजार अशी एकूण ६० हजार रुपये पर्यंत मदत मिळू शकते. राज्यशासनाने या संदर्भात केंद्राकडे त्वरित पाठपुरावा करायला हवा.

    राजकीय अजेंडा सेट करण्यासाठी ‘गोधन खतरे मे’ सांगणारे नेते आज गोधन खऱ्या अर्थाने संकटात असताना एक शब्दही बोलत नाहीत. राजकारणासाठी ज्यांचा तिसरा डोळा क्षणार्धात उघडतो तो अद्यापही उघडलेला नाही. चित्ते रुळले असतील तर राष्ट्रीय मीडियानेही लम्पीकडं लक्ष केंद्रित करायला हरकत नाही”. अशा पद्धतीने फेसबुक पोस्ट द्वारे त्यांनी केंद्र सरकारची कानउघाडणी केली आहे.