Category: Maharashtra

  • दिवाळीसाठी रेशन कार्ड धारकांना किराणा सामान मिळणार 100 रुपयांत

    हॅलो कृषी ऑनलाईन : दिवाळीचा सण जवळ येताच. त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी काही ऑफर्स येत राहतात. कारण दिवाळीच्या वेळी लोक सर्वाधिक खरेदी करतात. आर्थिक दुर्बल नागरिकांना देखील दिवाळी साजरी करता यावी म्हणून महाराष्ट्र सरकारकडून रेशन कार्ड धारकांसाठी १०० रुपयात किराणा सामान दिले जाणार आहे.

    100 रुपयात किराणा

    दिवाळीच्या काळात राज्यातील शिधापत्रिकाधारकांना अधिक आनंद देण्यासाठी महाराष्ट्र मंत्रिमंडळाने चांगली ऑफर देण्याचा निर्णय घेतला आहे.
    या ऑफरचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये लोकांना १०० रुपयांत किराणा सामान दिला जाणार आहे. पण ही ऑफर फक्त महाराष्ट्रातील शिधापत्रिकाधारकांसाठी आहे.

    हे सामान 100 रुपयात

    शिधापत्रिकाधारकांना एक किलो रवा, शेंगदाणे, खाद्यतेल आणि पिवळी डाळ 100 रुपयांना दिली जाणार आहेत.

    लाखो लोकांना फायदा

    सरकारच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातील कोट्यवधी जनतेला फायदा होणार आहे. वास्तविक, राज्यात सुमारे १.७० कोटी कुटुंबे आहेत, ज्यांच्याकडे शिधापत्रिकेची सुविधा आहे. लोक सरकारी रेशन दुकानांना भेट देऊन या ऑफरचा लाभ घेऊ शकतात. पण या ऑफरचा लाभ तुम्ही दिवाळीपर्यंतच घेऊ शकता हे लक्षात ठेवा. या काळात तुम्ही फक्त दिवाळीसाठी रेशन खरेदी करू शकता.

     

  • सायेब…अनुदानाचं पैकं लवकर द्या, मग आई दिवाळीला पोळ्या करेल…शेतकऱ्याच्या चिमुकल्याचं मुख्यमंत्र्यांना पत्र एकदा वाचाच

    हॅलो कृषी ऑनलाईन : कधी शेतमालाला दर नाही, कधी नैसर्गिक आपत्तीमुळे हातचं पीक वाया जातं शेतकऱ्याचं दुःख शेतकऱ्यालाच माहिती… शेतकऱ्याची सध्याची परिस्थिती आणि व्यथा सांगणारं एका चिमुकल्यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लिहलेलं पत्र सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हिंगोलीच्या एका शाळेत शिकणाऱ्या शेतकऱ्याच्या पोरानं हे पत्र मुख्यमंत्र्यांना लिहलं आहे.

    काय आहे पत्रात ?

    ” एकनाथ शिंदे
    मंत्री सायेब, मुंबई

    माझे बाबा शेती करतात आमच्या घरी शेती कमी आहे. असे बाबा म्हणतात मी बाबाले म्हणलं की मले गुपचूप खायला पैसे द्या की, माह्या संग भांडण करतात. म्हणतात यावर्षी सगळी सोयाबीन गेली वावर इकतो देतो तुला दहा रुपये… आईने दसऱ्याला पुरणाच्या पोळ्या पण नाही केल्या. आई म्हणे इथं इख खायला पैसे नाहीत वावरातली सोयाबीन गेली. महे बाबा दुसऱ्याच्यात कामाला जातात मी आईला म्हटलं. दिवाळीला पोळ्या कर ती म्हणे की बँकेत अनुदान आलं की करू पोळ्या….

    साहेब आमच्या घरी सणाला पोळ्यालाबी गुपचूप ले पैसे नाहीत आम्हाला घर नाही. आम्हाले काहीच नाही. मी बाबा संग भांडण केलं की ती आई म्हणे आपल्या जवळच्या गावात शेतकऱ्याच्या पोराने पैसे मागितले म्हणून फाशी घेतली आता मी बाबाले पैसे नाही मागत…

    साहेब आमचं घर पहा की, तुम्ही या अनुदानाचे पैसे लवकर द्या मग दिवाळीला आई पोळ्या करते. तुम्ही या पोळ्या खायले साहेब…

    तुमचा आणि बाबा चा लाडका,”
    प्रताप कावरथे वर्ग सहावा,
    जिल्हा परिषद शाळा गोरेगाव हिंगोली…

    अशा आशयाचे हे पत्र मुख्यमंत्र्यांना या चिमुकल्याने लिहले आहे. पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. एकीकडे मंत्री राजकारणात व्यस्त असताना शेतकऱ्याची खरी व्यथा जाणून या चिमुकल्याच्या घरी दिवाळीला पोळ्या बनतील का ? शेतकऱ्याला अनुदान मिळेल का ? शेतकऱयांचे प्रश्न मार्गी लागतील का ? असा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहत नाही.

     

  • ‘लम्पी स्कीन’ने दगावलेल्या जनावरांसाठी मिळणाऱ्या मदतीच्या निकषात बदल…

    हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यभरात लंपी या रोगाचा प्रादुर्भाव झाला असून त्यामुळे अनेक जनावरांचा मृत्यू झाला आहे. शासनाकडून या रोगाला अटकाव घालण्याचे प्रयत्न सुरु आहेत. या आजाराने मृत झालेल्या जनावरांच्या ठरावीक संख्येइतक्या जनावरांनाच नुकसानभरपाई दिली जात होती. आता त्यात बदल करत संख्येचे निर्बंध दूर करून जितकी जनावरे ‘लम्पी स्कीन’ने दगावतील तितक्या जनावरांना नुकसानभरपाई मिळणार आहे. पशुसंवर्धन आयुक्त सच्चिंद्र प्रताप सिंग यांनी मंगळवारी (ता. ४) जुन्या आदेशात बदल करून नवीन आदेश काढला आहे.

    लम्‍पीची साथ आल्यानंतर मृत पावलेल्या जनावरांबाबत संबंधित पशुपालकांना अर्थसाह्य देण्याचे आदेश शासनाने दिले होते. मात्र जे पशुपालक हे अल्‍प भूधारक, अत्यल्‍प भूधारक आहेत, त्‍यांनाच हा लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तसेच हा लाभ केवळ एका शेतकऱ्या‍साठी तीन जनावरांच्या मृत्यूपर्यंतच होता. या शासन निर्णयात आता बदल करण्यात आला आहे. नव्या निर्णयानुसार, सर्व शेतकरी व पशुपालकांना या निर्णयाचा लाभ होईल. तसेच जनावरांच्या संख्येवर घातलेली मर्यादाही उठवण्याचा महत्त्‍व‍पूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

    किती मिळणार रक्कम ?

    गाय किंवा म्‍हैस लम्‍पी स्कीनने मृत पावल्यास संबंधित पशुपालकास ३० हजार रुपये, ओढकाम करणारी जनावरे, जसे की बैल मृत पावला तर २५ हजार व वासरू असेल, तर १६ हजार रुपये मदत देण्यात येईल. जितकी जनावरे लम्पी स्कीनने दगावतील तितक्या सर्व जनावरांसाठी मिळणार मदत
    अल्पभूधारक, अत्यल्प भूधारक हे निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. राष्ट्रीय आपत्ती निवारण धोरणातील आर्थिक निकषांप्रमाणे पशुधन मृत पावलेल्या सर्व पशुपालकांना अर्थसाह्य मिळणार आहे. केवळ ‘लम्पी स्कीन’ने मृत झालेल्या जनावरांनाच्या पशुपालकांनाच मिळणार भरपाई मिळणार आहे.

  • द्राक्ष विमा योजनेत सहभागी होण्यासाठी ‘ही’ आहे अंतिम तारीख; जाणून घ्या सर्व माहिती

    हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो, तुम्ही देखील द्राक्ष बागायतदार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे द्राक्ष बागेस नुकसान झाल्यास विमा कवच शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाचे ठरते. यंदाच्या वर्षी द्राक्ष विमा योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम मुदत १५ ऑक्टोबर २०२२ निश्चित करण्यात आली आहे.

    योजना द्राक्ष पिकासाठी अधिसूचित जिल्ह्यामधील, अधिसूचित तालुक्यातील, अधिसूचित महसूल मंडळात लागू आहे. या योजनेअंतर्गत नुकसानभरपाई निश्‍चित करण्यासाठी अधिसूचित महसूल मंडळ पातळीवर शासनामार्फत उभारलेल्या संदर्भ हवामान केंद्रावरील आकडेवारी गृहीत धरण्यात येते.

    या योजनेअंतर्गत दोन वर्षे वय झालेल्या द्राक्ष पिकासाठी राज्याचे दोन भाग केले असून, त्या त्या भागानुसार हवामान धोके व नुकसान भरपाई रक्कम यात बदल आहे. द्राक्ष पिकास खाली नमूद केलेल्या विमा संरक्षण कालावधीत निवडक हवामान धोक्यामुळे होणाऱ्या संभाव्य पीक नुकसानीस (आर्थिक) खालील प्रमाणे विमा संरक्षण निश्‍चित केले आहे.

    द्राक्ष (अ) समाविष्ट जिल्हे ः नाशिक, नगर, धुळे, बुलडाणा

    द्राक्ष (ब ) समाविष्ट जिल्हे ः सांगली, सोलापूर, पुणे, औरंगाबाद, उस्मानाबाद, जालना, सातारा, बीड, लातूर, नांदेड, कोल्हापूर

    टिप : विमाधारक शेतकऱ्यांचे गारपिटीमुळे नुकसान झाल्यास ,नुकसान झाल्यापासून ७२ तासांचे आत नुकसानीची माहिती विमा कंपनीस / संबंधित मंडळ कृषी अधिकारी यांना कळविणे आवश्यक आहे. त्यानंतर नुकसानग्रस्त क्षेत्राचे वैयक्तिक पंचनामे करून नुकसानीचे प्रमाण निश्‍चित केले जाणार आहे.

    शेतकऱ्यांसाठी विमा हप्ता

    हवामान धोके—विमा संरक्षित रक्कम रुपये प्रति हेक्टर—शेतकऱ्यांसाठी विमा हप्ता रुपये प्रति हेक्टर

    कमी तापमान,वेगाचा वारा, जादा तापमान—३,२०,०००—-१६०००

    गारपीट—१०६६६७ —-५३३४

    कोण घेऊ शकतो या योजनेत सहभाग ?

    १) या योजनेत अधिसूचित क्षेत्रात, अधिसूचित फळपिकासाठी कुळाने, भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसहित इतर सर्व शेतकरी भाग घेऊ शकतात.

    २) पीककर्ज घेणाऱ्या आणि बिगर कर्जदारांसाठी योजनेतील सहभाग ऐच्छिक राहणार आहे.

    ३) बिगर कर्जदार शेतकरी विहित मुदतीत बँकेने किंवा ऑनलाइन फळपीक विमा पोर्टल www.pmfby.gov.in वर विमा हप्ता जमा करून सहभाग घेऊ शकतात. त्यासाठी आधार कार्ड, जमीन धारणा ७ /१२ , ८(अ) उतारा व पीक लागवड स्वयंघोषणा पत्र, फळबागेचा जिओ टॅगिंग केलेला फोटो , बँक पासबुक वरील बँक खाते बाबत सविस्तर माहिती लागेल. कॉमन सर्व्हिस सेंटर मार्फत अर्ज ऑनलाइन भरता येतील.

    ४) एक शेतकरी त्याच्याकडे एकापेक्षा अधिक फळपिके असल्यास योजना लागू असलेल्या पिकांसाठी तो विमा योजनेत सहभाग घेऊ शकतो (मात्र त्या फळपिकासाठी ते महसूल मंडळ अधिसूचित असणे आवश्यक आहे)

    ५) एक शेतकरी ४ हेक्टरच्या मर्यादेत विमा संरक्षण घेऊ शकतो.

    ६) शेतकऱ्यांसाठी विमा हप्ता, विमा संरक्षित रकमेच्या ५ टक्क्यांच्या मर्यादेत असतो. याहून अधिकचा हप्ता केंद्र व राज्य शासनाकडून अनुदान म्हणून देण्यात येतो. मात्र विमा हप्ता ३५ टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास शेतकऱ्यांना ५ टक्क्यांपेक्षा जास्त विमा हप्ता भरावा लागतो.

    ७) या विमा योजनेअंतर्गत हवामान धोक्याच्या ट्रिगर कार्यान्वित झाल्यास त्या महसूल मंडळातील त्या पिकासाठी भाग घेतलेल्या शेतकऱ्यास नुकसानभरपाई रक्कम संबंधित विमा कंपनीकडून देण्यात येणार आहे.

     

  • राज्यातील 25 लाख हेक्टर जमीन नैसर्गिक शेतीखाली आणणार : देवेंद्र फडणवीस




    राज्यातील 25 लाख हेक्टर जमीन नैसर्गिक शेतीखाली आणणार : देवेंद्र फडणवीस | Hello Krushi












































    हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील 25 लाख हेक्टर जमीन ही नैसर्गिक शेतीखाली आणणार असल्याचे वक्तव्य राज्यचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात 2025 पर्यंत 25 लाख हेक्टर जमीन नैसर्गिक शेतीखाली आणण्यात येणार आहे. अशी माहिती त्यांनी पुणे येथे आयोजित ‘नैसर्गिक शेती’ राज्यस्तरीय परिषद 2022 या कार्यक्रमामध्ये बोलताना दिली.

    यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नैसर्गिक शेतीसाठी 2015-16 मध्ये केंद्र स्तरावर मिशन सुरू केले. महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात 2016-17 मध्ये सुरू केलेले डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन यशस्वी ठरले आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांचे गट तयार झाले. केंद्र व राज्य शासनाच्या योजनांना एकत्र करून उत्पादन खर्च कमी करण्यासाठी आणि त्यांना सेंद्रीय शेतीकडे वळवण्यासाठी प्रयत्न करण्यात आला. या मिशनचा कालावधी संपत असला तरी त्यास नव्याने मुदतवाढ देण्यात येईल. यात अजून काही जिल्हे समाविष्ट करण्यात येतील आणि नैसर्गिक शेतीला चालना दिली जाईल असेही फडणवीस म्हणाले. नैसर्गिक शेती हा शेतकऱ्यांसाठी महत्वाचा विषय आहे. 1905 मध्ये इंग्रज सरकारने अल्बर्ट हॉवर्ड यांना कृषी सल्लागार म्हणून पाठवले. त्यांनी पारंपरिक शेती विज्ञानाधारीत असून त्यात चक्रीय अर्थव्यवस्था आहे असल्याचे फडणवीस म्हणाले. यावेळी गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत हे देखील उपस्थित होते.

    स्मार्ट प्रकल्पाला गती देणार

    मागील काळात नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना सुरू केली. विविध गावांमध्ये केंद्रीत पद्धतीने राबवण्यास सुरुवात केले. जागतिक बँकेने साडेचार हजार कोटी रुपयांचा निधी यासाठी दिला. या मिशनला गती देण्याचे काम शासन करणार आहे. स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने सुरू करण्यात आलेला ‘स्मार्ट’ प्रकल्प महाराष्ट्रातल्या 10 हजार गावांमध्ये सुरु करण्यात आला. या प्रकल्पावर 2 हजार 100 कोटी खर्च करून व त्यांच्या माध्यमातून बाजारपेठेची श्रृंखला तयार करून शेतकऱ्याला योग्य भाव देण्यासाठी राबवण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून साठवणूक व्यवस्था, विविध श्रृंखला तयार करणे, मार्गदर्शन, बाजाराशी लिंकेज याद्वारे शेतकऱ्यांचे सक्षमीकरण करून त्यांना निधी उपलब्ध करून देण्याचे काम करण्यात येत आहे. या प्रकल्पालाही गती देण्यात येत असल्याचं फडणवीसांनी सांगितलं

     

    error: Content is protected !!





  • वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मिळणाऱ्या नुकसान भरपाईत वाढ; पहा आता किती मिळेल रक्कम ?

    हॅलो कृषी ऑनलाईन : वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात पाळीव पशु किंवा मनुष्याची जीवितहानी झाल्यास, किंवा अपंगत्व अथवा जखमी झाल्यास शासनाकडून संबंधित पशुपालकाला किंवा जीवितहानी झालेल्या मनुष्याच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई मिळते. वन्यप्राण्यांच्या हल्लाप्रकरणी आर्थिक परवड लक्षात घेऊन अर्थसाहाय्य आणि नुकसान भरपाईत नुकतीच शासनाने वाढ केली आहे. यासंबंधी नव्या निर्णयाची माहिती पत्रकाद्वारे पशुसंवर्धन विभागामार्फ़त देण्यात आली आहे.

    नव्या निर्णयानुसार मदतीची रक्कम

    1) मनुष्यांकरिता

    वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात व्यक्तीचा मृत्यू झाल्यास – २० लाख
    व्यक्ती कायमस्वरूपी अपंग झाल्यास – ५ लाख
    व्यक्ती गंभीर जखमी झाल्यास – सव्वा लाख रुपये

    2) पाळीव प्राणी

    १)(गाय, म्हैस व बैल) मृत्यू झाल्यास बाजार भाव किमतीच्या ७५ टक्के किंवा ७० हजार यापैकी जी रक्कम कमी असेल ती रक्कम
    २) मेंढी, बकरी व इतर पशुधनांचा मृत्यू झाल्यास बाजार भाव किमतीच्या ७५ टक्के किंवा १५ हजार यापैकी कमी असणारी रक्कम
    ३)गाय, म्हैस, बैल या जनावरांना कायम अपंगत्व आल्यास बाजार भाव किमतीच्या ५० टक्के किंवा १५ हजार देण्यात येतील.

    कशी मिळेल रक्कम ?

    पाळीव प्राण्यांवर होणाऱ्या हल्ल्यांसाठी देण्यात येणारी नुकसान भरपाईची रक्कमही शासनाने वाढवली आहे. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे व्यक्ती मृत झाल्यास रुपये २० लाख पैकी २० लाख रुपये देय असलेल्या व्यक्तीला तत्काळ धनादेशाद्वारे व उर्वरित रक्कम दहा लाख त्यांच्या राष्ट्रीयकृत बँकेत असलेल्या दरमहा व्याज देणाऱ्या संयुक्त खात्यामध्ये ठेव रक्कम जमा करण्यात येईल. रुपये दहा लाखांपैकी रुपये पाच लाख पाच वर्षांकरिता ठेव रकमेमध्ये तर उर्वरित रुपये पाच लाख १० वर्षांकरिता फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवण्यात येतील.

    दहा वर्षांनंतर वारसांना पूर्ण रक्कम मिळेल. तसेच व्यक्ती किरकोळ जखमी झाल्यास औषधोपचारासाठी येणारा खर्च देण्यात येईल. मात्र खासगी रुग्णालयात औषधोपचार करणे आवश्यक असल्यास रकमेची मर्यादा रुपये २० हजार प्रती व्यक्ती अशी आहे, असे सांगण्यात आले.

    पशुधनासाठी नुकसान भरपाई

    गाय, म्हैस व बैल यांचा वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास बाजार भाव किमतीच्या ७५ टक्के किंवा ७० हजार यापैकी जी रक्कम कमी असेल ती रक्कम देय होईल. मेंढी, बकरी व इतर पशुधनांचा मृत्यू झाल्यास बाजार भाव किमतीच्या ७५ टक्के किंवा १५ हजार यापैकी कमी असणारी रक्कम मिळेल. गाय, म्हैस, बैल या जनावरांना कायम अपंगत्व आल्यास बाजार भाव किमतीच्या ५० टक्के किंवा १५ हजार देण्यात येतील, असेही सांगण्यात आले.

  • जाणून घ्या, हळदीवरील करपा, कंदकुज आणि कंद माशीचे व्यवस्थापन…!

    हॅलो कृषी ऑनलाईन : सध्यपरिस्थितीत हळद वाढीच्या अवस्थेमध्ये आहे बऱ्याच ठिकाणी सततचा रिमझिम पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे सध्या हळदीवर करपा, पानावरील ठिपके आणि कंदमाशीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. तरी येणाऱ्या काळात या बुरशीजन्य रोगांचा, कंदकुज तसेच कंदमाशीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी या रोगांचे तसेच कंदमाशीचे खालील प्रमाणे व्यवस्थापन वेळीच करणे अत्यंत गरजेचे आहे.

    हळदीमधील पानावरील ठिपके आणि करपा व्यवस्थापन

    १. करपाजन्य रोगग्रस्त पाने वेळोवेळी जमा करून जाळून नष्ट करावीत आणि शेतात स्वच्छता राखावी.

    २. रासायनिक व्यवस्थापन खालील प्रमाणे करावे.

    प्रादुर्भाव कमी असल्यास
    कार्बेडेंझीम ५० टक्के – ४०० ग्रॅम किंवा
    मॅन्कोझेब ७५ टक्के -५०० ग्रॅम किंवा
    कॉपर ऑक्झीक्लोराइड ५० टक्के – ५०० ग्रॅम यापैकी एका बुरशीनाशकाची प्रति एकर याप्रमाणे सोबत स्टिकर मिसळून फवारणी करावी.

    प्रादुर्भाव जास्त असल्यास
    एजोक्सिस्ट्रोबीन १८.२ टक्के + डायफेनोकोनॅझोल ११.४ टक्के (पूर्वमिश्रित बुरशीनाशक) – २०० मिली किंवा
    प्रोपीकोनॅझोल २५ टक्के – २०० मिली किंवा
    क्लोरथॅलोनील ७५ टक्के – ५०० ग्रॅम
    यापैकी एका बुरशीनाशकाची प्रति एकर याप्रमाणे सोबत स्टिकर मिसळून फवारणी करावी.

    हळदीमधील कंदकुज व्यवस्थापन

    १. कंदकुज करीता प्रतिबंधात्मक उपाय म्हणून एकरी २ ते २.५ किलो ट्रायकोडर्मा शेणखतामध्ये मिसळून जमिनीतून द्यावे.

    २. जास्त पावसामुळे शेतात साठलेल्या अतिरिक्त पाण्याचा वेळोवेळी निचरा करावा. जेणेकरून कंदकुज होण्यास कारणीभूत असलेल्या बुरशीचा प्रसार कमी करता येईल.

    ३.कंदकूज झाली असल्यास जमिनीतून
    कार्बेडेंझीम ५०% -१ ग्रॅम किंवा
    मॅन्कोझेब ७५ टक्के -३ ग्रॅम किंवा
    कॉपर ऑक्झीक्लोराइड ५० टक्के -५ ग्रॅम
    यापैकी एका बुरशीनाशकाची प्रति लिटर पाण्यात मिसळून दरवेळी महिन्यातून एकदा आळवणी करावी.
    (आळवणी करताना जमिनीमध्ये वापसा असावा. आळवणी केल्यानंतर पिकास पाण्याचा थोडा ताण द्यावा.)

    हळदी वरील कंदमाशी व्यवस्थापन:

    १. प्रत्येक १५ दिवसांच्या अंतराने
    क्विनॉलफॉस (२५% प्रवाही) २० मि.ली. किंवा
    डायमिथोएट (३०% प्रवाही ) १५ मि.ली. यापैकी एका कीटकनाशकाची प्रति १० लिटर पाणी या प्रमाणे झाडावर आलटून पालटून फवारणी करावी व सोबत चांगल्या दर्जाचे स्टिकर मिसळावे.

    २. उघडे पडेलेल्या कंदाजवळ कंदमाशीची मादी अंडी घालते त्यामुळे उघडे पडलेले कंद मातीने वेळोवेळी झाकून घ्यावेत. वेळेवर हळदीची भरणी करावी.

    ३. पीक तण विरहित ठेवावे.

    ४. जमिनीतून क्‍लोरपायरीफॉस ५० टक्के ५० मि.लि. प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात घेऊन आळवणी करावी. याच पद्धतीने कीटकनाशकाची आळवणी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून एक महिन्याच्या अंतराने प्रत्येक महिन्यात निश्चित करावी.

    ५. हळद पीक काढल्यानंतर शेतात राहिलेल्या पिकांचे अवशेष, सडके कंद नष्ट करावेत.

    ६. तसेच एकरी २-३ पसरट तोंडाची भांडी वापरून प्रत्येक भांड्यात भरडलेले एरंडीचे बी २०० ग्रॅम घेऊन त्यात १ ते १.५ लिटर पाणी घ्यावे. ८ ते १० दिवसांनी या मिश्रणामध्ये तयार होणाऱ्या विशिष्ट गंधाकडे कंदमाशीचे प्रौढ आकर्षित होतात व त्यात पडून मरतात.

    (संदर्भ: हळद संशोधन केंद्र, कसबे डिग्रज जि. सांगली)

    टीप : हळद पिकावर केंद्रीय कीटकनाशक मंडळातर्फे लेबल क्‍लेम नसल्याने विद्यापीठ शिफारशीत संशोधनाचे निष्कर्ष दिले आहेत.

    डॉ.डी.डी.पटाईत, डॉ.जी.डी.गडदे आणि श्री.एम.बी.मांडगे
    कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र, वनामकृवि, परभणी

    अधिक माहितीसाठी संपर्क करा
    कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र
    वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ
    परभणी
    ☎ ०२४५२-२२९०००

  • केळीच्या दरात पुन्हा घसरण, जोर धरू लागली किमान भाव निश्चित करण्याची मागणी

    हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या समस्या वाढत आहेत. कधी अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान होते तर कधी बाजारात शेतमालाला योग्य भाव मिळत नाही. एकीकडे कांद्याचे भाव गडगडल्याने उत्पादकांची सातत्याने आंदोलने होताना दिसत आहेत, तर दुसरीकडे केळीच्या दरातही घसरण होताना दिसत आहे. नवरात्र संपताच भावात घसरण झाली. 2000 रुपये प्रतिक्विंटलपर्यंत विकल्या जाणाऱ्या केळीचा भाव आता 600-1200 रुपयांवर आला आहे. आता त्याची किमान किंमत निश्चित करण्याची मागणी होत आहे.

    दुसरीकडे, राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये केळीच्या झाडांवर सीएमव्ही रोगामुळे फळबागा खराब होत आहेत. त्यामुळे केळीची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना आता दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे. रोगामुळे झाडाची वाढ थांबते.अशा परिस्थितीत शेतकऱ्यांकडे झाडे उपटून फेकून देण्याशिवाय पर्याय नाही. अशा स्थितीत भावात झालेली घसरणही शेतकऱ्यांसाठी संकटापेक्षा कमी नाही.

    काय म्हणतात शेतकरी?

    महाराष्ट्र केळी उत्पादक संघटनेचे अध्यक्ष किरण चव्हाण सांगतात की, सणानिमित्त बाजारपेठेत केळीला मागणी आहे. मात्र व्यापारी शेतकऱ्यांकडून कमी दराने खरेदी करत आहेत. यातून शेतकऱ्यांना नफा मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या मेहनतीचे खरे फळ व्यापारी खात आहेत. यंदा केळीला काही दिवस विक्रमी भाव मिळाला, मात्र, तो कायम नाही. आता भाव उतरले आहेत. ज्यामुळे नुकसान होत आहे. केळी जनतेसाठी स्वस्त झाली आहे, असे अजिबात नाही.

    किमान भाव निश्चित करण्याची मागणी

    चव्हाण पुढे म्हणाले, सध्या अनेक जिल्ह्यांमध्ये सरासरी दर्जाची केळी चिप्स बनवण्यासाठी वापरली जात आहे. अशा केळीचा भाव 300 – 450 रुपये प्रतिक्विंटल झाला आहे. , मात्र पहिल्या क्रमांकाच्या दर्जाच्या केळीलाही केवळ ६००- १२०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत भाव मिळत आहे.

    गेल्या महिन्यात केळी उत्पादक संघटनेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन केळीचा किमान भाव १८.९० रुपये प्रतिकिलो जाहीर करण्याची मागणी केली होती. त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. दसऱ्यानंतर मुख्यमंत्री पुन्हा केळी संघाची भेट घेणार आहेत. अशा स्थितीत केळी उत्पादकांच्या मागण्या पूर्ण होतील, अशी अपेक्षा आहे.

     

     

     

     

     

  • उसाच्या 265 बेण्याच्या नादाला लागू नका”, भाव हवा असेल तर कोणता ऊस लावावा? अजित पवारांनी दिली यादी…

    हॅलो कृषी ऑनलाईन : हमखास उत्पन्न देणारे पीक म्हणून शेतकरी उसाची लागवड करतात. मागच्या दोन वर्षात तर राज्यात ऊस क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. मागील वर्षी अशा ठिकाणी देखील उसाचे उत्पादन घेतले गेले जिथे परंपरागत उसाची शेती केली गेली नाही. उसाचे क्षेत्र वाढल्यामुळे साखरेचे देखील चांगले उत्पादन राज्यामध्ये झाले आहे. असे असताना विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी उसाबाबत एक महत्वाचा सल्ला दिला आहे. ते शनिवारी (१ ऑक्टोबर) उस्मानाबादमध्ये बोलत होते.

    यावेळी बोलताना पवार यांनी म्हंटले की, सध्या रानं ओली आहेत, वापसा नाही. त्यामुळे आत्ता लगेच उसाची तोडणी झाली तर रिकव्हरी चांगली होणार नाही. रिकव्हरी चांगली आली तरच उतारा चांगला पडतो, साखर जास्त निघते. साखर जास्त निघाली, तर भाव चांगला मिळतो. एका टन ऊसातून किती साखर निघते यावर ते अवलंबून असतं. काही ठिकाणी १० टक्के, ११ टक्के, १२ टक्के निघते. कोल्हापुरात तर टनामागे ११४ किलो साखर निघते. म्हणजे १४ टक्के साखर निघते. एवढा विरोधाभास आहे.”

     २६५ उसाच्या बेण्याच्या नादाला लागू नका

    पुढे बोलताना त्यांनी उसाच्या बेण्याबद्दल सांगितले ते म्हणाले “एका टनातून किती साखर निघणार हे जमिनीच्या पोतावर, उसाचं बेणं कोणतं आहे यावर अवलंबून असतं. माझी तुम्हाला विनंती आहे की इथून पुढे २६५ उसाच्या बेण्याच्या नादाला लागू नका. तुमचा ऊस वेळेवर जायचा असेल, भाव चांगला मिळवायचा असेल तर ८६-०-३२ , ८०-०५, १०-००१, १२-१२-१ ही उसाची बेणी वापरा,” असा सल्ला अजित पवारांनी दिली.

    “आम्ही शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली वसंतदादा शुगर इन्स्ट्युट ही संस्था चालवतो. तिथं नवीन उसाचं बेणं तयार करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. कमी पाण्यात त्या उसाला दशी न पडता उसाचं टनेज जास्त येईल यावर संशोधन करत आहेत. त्यातून काही वाणांचा शोध लगाला.”

    संदर्भ -लोकसत्ता

  • Tur Market Price In Maharashtra Today




    Tur Market Price In Maharashtra Today











































    हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो सध्या तूर आणि उडीद या दोन्ही पिकांना चांगले भाव मिळताना दिसत आहेत. आज सायंकाळी चार वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समितीमधील तुर बाजारभावानुसार आज तुरीला सर्वाधिक 8000 रुपयांचा कमाल दर मिळालेला आहे.

    हा दर अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती इथे मिळाला असून आज अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लाल तुरीची 432 क्विंटल इतकी आवक झाली. याकरिता किमान भाव ४४००, कमाल भाव आठ हजार आणि सर्वसाधारण भाव सात हजार तीनशे पन्नास रुपये इतका मिळाला.

    तर आज सर्वाधिक तुरीची आवक ही अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती येथे झाली असून ही अवक १५४८ क्विंटल इतकी झाली आहे. त्याकरिता किमान भाव 7400, कमाल भाव 7696 आणि सर्वसाधारण भाव 7548 रुपये इतका मिळाला.

    आजचे तूर बाजारभाव

    बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
    27/09/2022
    भोकर क्विंटल 6 4000 6800 5400
    कारंजा क्विंटल 700 6795 7740 7310
    अमरावती गज्जर क्विंटल 3 6951 7400 7175
    लातूर लाल क्विंटल 260 6121 7521 7400
    अकोला लाल क्विंटल 432 4400 8000 7350
    अमरावती लाल क्विंटल 1548 7400 7696 7548
    धुळे लाल क्विंटल 3 5305 5305 5305
    यवतमाळ लाल क्विंटल 101 7000 7515 7257
    नागपूर लाल क्विंटल 104 6800 7561 7370
    हिंगोली- खानेगाव नाका लाल क्विंटल 54 7000 7200 7100
    मलकापूर लाल क्विंटल 157 6000 7940 7525
    गंगाखेड लाल क्विंटल 2 7000 7200 7000
    वर्धा लोकल क्विंटल 7 6525 6895 6750
    काटोल लोकल क्विंटल 20 6700 6700 6700
    जालना पांढरा क्विंटल 11 6000 6000 6000
    माजलगाव पांढरा क्विंटल 51 6700 7212 7000
    गेवराई पांढरा क्विंटल 27 6500 7100 6800

     

    error: Content is protected !!