Category: Nandurbar News

  • पावसात भिजली हजारो क्विंटल लाल मिरची; नुकसान भरपाई देण्याची मागणी




    पावसात भिजली हजारो क्विंटल लाल मिरची; नुकसान भरपाई देण्याची मागणी | Hello Krushi











































    हॅलो कृषी ऑनलाईन : परतीच्या पावसाने राज्यात दाणादाण उडवून दिली आहे. सोयाबीनसह अन्य खरीप पिकांचे यामुळे मोठे नुकसान झाले आहे. नंदुरबार जिल्ह्यात देखील परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. एवढेच नाही तर व्यापाऱ्यांनी खरेदी केलेलया लाल मिरचीला देखील मोठा फटका बसला आहे. त्यामुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये देखील चिंता व्यक्त केली जात आहे.

    नंदूरबार म्हणजे लाल मिरची ची मोठी बाजारपेठ आहे. या बाजारपेठेत केवळ राज्यातून नव्हे तर परराज्यातून देखील मिरची विक्रीसाठी येत असते. सध्या मिरचीला चांगला दरही मिळतो आहे. मात्र परतीच्या पावसामुळे नंदूरबार बाजार समितीत ओली मिरची खरेदी करुन पथार्‍यांवर वाळवण्यासाठी टाकली असता ओली होऊन खराब झाली आहे. हजारो क्विंटल मिरची पावसाच्या पाण्यात भिजल्यामुळे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. याची नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी व्यापारी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

    मिरचीला विमा कवच द्या

    खरेदी केलेल्या मिरचीला विमा सुरक्षा कवच द्यावे परतीचा पाऊस आणि आवकळी पाऊस यामुळे मोठे नुकसान होत असते. मात्र, सरकार याकडं लक्ष देत नसल्यानं व्यापाऱ्यांना मोठा फटका बसत असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितले.

     

    error: Content is protected !!





  • शेतकरी का करीत आहेत स्वतःच्याच शेतातील पिके नष्ट ? रोष कृषी विभागावर

    हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात खरीप हंगामाच्या सुरुवातीपासूनच पीक धोक्यात आले आहे. सुरुवातीला पाऊस न पडल्याने जूनमध्ये जुलै महिन्यात पेरण्या झाल्या. त्यामुळे पेरणीसह सुरू झालेला पाऊस जवळपास महिनाभर सुरूच आहे. खरिपातील या नैसर्गिक संकटातून सोयाबीन, उडीद, मूग ही पिके सावरत असतानाच आता या पिकांवर आर्मीवर्म कीटकांचा प्रादुर्भाव वाढला आहे. महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातील पिकांवर फॉल आर्मीवॉर्म किडींचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी सध्या संकटात सापडला आहे. कृषी विभागाकडून मदत न मिळाल्याने शेतकरी नाराजी व्यक्त करत आहेत.

    हा धोका फळधारणेच्या वेळी निर्माण झाल्याने त्याचा थेट परिणाम उत्पादनावर होणार असल्याचे बोलले जात आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना पिके उपटून टाकावी लागत आहेत. सोयाबीन हे खरीप हंगामातील प्रमुख पीक आहे. सोयाबीन पिकाला चांगला भाव मिळाल्याने मराठवाड्यात तसेच विदर्भात सोयाबीनचे क्षेत्र वाढत आहे. दरम्यान पावसाचीही शक्यता होती. आता हवामान मोकळे झाल्याने सोयाबीन, उडीद, मूग, तूर या पिकांवर किडींचा प्रादुर्भाव वाढला आहे. राज्यात खरीप हंगामात सोयाबीनची सर्वाधिक पेरणी झाली असून हे पीकही धोक्यात आले आहे.

    आर्मीवर्म किडीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शेतकरी त्रस्त

    पिके बहरात असताना या फॉल आर्मीवॉर्मचा प्रादुर्भाव वाढत आहे. या अळीचा थेट प्रादुर्भाव पिकांच्या पानांवर होतो आणि फळांच्या उत्पादनावरही परिणाम होतो. केवळ सोयाबीनच नाही तर तूर, उडीद, मूग या पिकांचीही हीच स्थिती आहे. एकदा अळीचा प्रादुर्भाव झाला की तो झपाट्याने पसरतो. त्यामुळे वेळीच योग्य ती उपाययोजना करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे मदतीचे आवाहन केले आहे. महाराष्ट्रात आजकाल अनेक जिल्ह्यांतील शेतकरी पिकांवरील कीड, रोगांमुळे त्रस्त आहेत. पिकांवर महागडी औषधे फवारूनही कोणताही परिणाम होत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे खर्चात वाढच होत आहे.

    शेतकऱ्यांनी कृषी विभागावर केला आरोप 

    हंगामाच्या सुरुवातीला कृषी विभागाकडून उत्पादन वाढीबाबत मार्गदर्शन केले जाते, असे शेतकरी सांगतात. परंतु, गरजेच्या वेळी कृषी अधिकारी शेतकऱ्यांकडे जात नाहीत. आता निसर्गाच्या लहरीपणामुळे आणि रोग व किडींचा वाढता प्रादुर्भाव पाहता शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करून दिलासा देणे हे कृषी विभागाचे काम होते. मात्र याकडे लक्ष दिले जात नाही. त्यामुळे उत्पादन कसे वाढणार? असा सवाल शेतकऱ्यांनी केला आहे.