Category: Paddy

  • भात कापणी करताना लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी





    भात कापणी करताना लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी | Hello Krushi








































    हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात पावसाने उघडीप दिल्याने भात पट्ट्यात अनेक ठिकाणी भात कापणी वेगाने सुरू झाली आहे. भात कापणी करताना काय काळजी घ्यावी? याविषय़ी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने दिलेली माहिती पाहुया. ज्याठिकाणी लागवड केलेली रोपे दाणे भरण्याच्या अवस्थेत आहेत तिथे १० सेंमी पाण्याची पातळी ठेवावी. भात कापणीपुर्वी १० दिवस आगोदर पाण्याचा निचरा करावा.

    –भाताच्या हळव्या जाती पक्व झाल्या असल्यास काढणी करुन घ्यावी.
    –भाताच्या लोंब्यामधील ८० ते ९० टक्के दाणे पक्व झाले असल्यास आणि रोपे हिरवट असतानाच वैभव विळ्याच्या सहाय्याने जमिनीलगत कापणी केल्यास वेळेत व खर्चात बचत होऊ शकते.
    –कापलेला भात वाळण्यासाठी १ ते २ दिवस पसरुन ठेवावा व नंतर मळणी करावी. चांगला उतारा मिळण्यासाठी मळणीयंत्र वापरावे.
    –दाण्यातील ओलाव्याचे प्रमाण १० ते १२ टक्के होईपर्यंत भात वाळवावा. नंतर कोरड्या, स्वच्छ व सुरक्षित जागी धान्याची साठवण करावी.
    –कापणी उशीरा केल्यास लोंबीच्या टोकाचे भरलेले दाणे शेतात गळुन पडतात. भात कांडपाच्यावेळी कणीचे प्रमाण वाढते. पेंढयाची प्रत खालावते आणि पेंढा कमी मिळतो म्हणून भात पिकाची कापणी वेळेतच करावी.

    error: Content is protected !!





  • ऐन सणासुदीच्या काळात बिघडू शकते किचन बजेट ; आता तांदुळही महागणार… !

    हॅलो कृषी ऑनलाईन : खरीप हंगामात भाताची पेरणी कमी झाल्यामुळे भाताचे उत्पादन सुमारे 60-70 लाख टनांनी कमी होण्याची शक्यता आहे. उत्पादनातील या मोठ्या घसरणीच्या दरम्यान, तांदळाच्या किमती वाढू शकतात. त्यामुळे तांदूळ उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे मात्र सर्वसामान्य माणसाला रोजच्या जेवणासाठी जादा पैसे मोजावे लागणार आहेत.

    अशा स्थितीत आधीच मंदावलेल्या अर्थव्यवस्थेवर महागाईचा दबाव आणखी वाढेल. किरकोळ महागाई केवळ 7 टक्क्यांवर पोहोचली आहे. तांदूळ-गहूसारखे खाद्यपदार्थ महाग झाले तर परिस्थिती आणखी बिघडू शकते. आगामी काळातही महागाई उच्च पातळीवर राहील, असा अंदाज तज्ज्ञ आणि विश्लेषकांनी व्यक्त केला आहे. त्याचबरोबर जून-सप्टेंबरमधील अनियमित पाऊस यामुळे धान पिकाची चिंता वाढली आहे.

    काय आहे तज्ञांचे मत ?

    भारताचे तांदूळ उत्पादन 2021-22 या पीक वर्षात 132.29 दशलक्ष टन होते, जे एका वर्षापूर्वी 1243.7 दशलक्ष टन होते. यंदाच्या खरीप हंगामात तांदळाचे उत्पादन ६० ते ७० लाख टनांनी कमी होईल, असा अंदाज अन्न मंत्रालयाने व्यक्त केला आहे. देशातील एकूण तांदूळ उत्पादनात खरीप हंगामाचा वाटा सुमारे ८५ टक्के आहे. तथापि, काही तज्ञांच्या मते, तांदूळ उत्पादनातील घट हे चिंतेचे कारण नाही कारण भारताचा आधीच अस्तित्वात असलेला साठा सार्वजनिक वितरण प्रणाली (PDS) ची मागणी पूर्ण करण्यासाठी पुरेसा आहे. याशिवाय तुकड तांदळाच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा आणि बिगर बासमती निर्यातीवर 20 टक्के शुल्क लावण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे परिस्थिती हाताळण्यास मदत होणार आहे.