Category: Parabhani News

  • पिक विमा व ओला दुष्काळ जाहीर करा; युवा शेतकरी संघर्ष समितीने घेतली कृषिमंत्र्यांची भेट

    हॅलो कृषी ऑनलाईन : परभणी प्रतिनिधी 

    राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी गुरुवारी परभणी जिल्ह्यातील जिंतूर व परभणी तालुक्यातील ऑक्टोबर मध्ये सततच्या पावसाने व अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेताची पाहणी केली .यावेळी पाथरी तालुक्यातील युवा शेतकरी संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेत पाथरी तालुक्यात झालेल्या खरीप पिकांच्या नुकसानीनंतर या ठिकाणी ओला दुष्काळ जाहीर करत अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ पिक विमा व आर्थिक मदत द्यावी अशी लेखी स्वरूपात मागणी केली .

    राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी गुरुवार 27 ऑक्टोबर रोजी परभणी जिल्ह्यातील पीक नुकसानीची पाहणी केली व त्यानंतर ते हिंगोली येथे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी जाणार होते .तत्पूर्वी सायंकाळ उशिरा त्यांनी परभणी जिल्ह्यातील नुकसानी संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालय मध्ये आढावा बैठक घेतली यानंतर पत्रकारांशी संवाद साधला .

    जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पाथरी तालुक्यातील युवा शेतकरी संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली. यावेळी ऑक्टोबर महिन्यामध्ये खरीप पिके काढणीच्या वेळी अतिवृष्टीचा व सततचा पाऊस झाल्यामुळे पाथरी तालुक्यातील चारही महसूल मंडळातील खरीप पिकांचे 80 टक्कांपेक्षा जास्त नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्या असल्याचे लेखी निवेदनातून निदर्शनास आणून दिले. दरम्यान 15 ऑक्टोबर ते 21 ऑक्टोबर पर्यंत सलग सहा दिवस उपोषण व आंदोलन केल्यानंतर प्रशासनाने 25 ऑक्टोबर पर्यंत पंचनामे करत अहवाल पुढील कारवाईसाठी वरिष्ठांकडे पाठवण्याचे आश्वासन दिले होते. यासंदर्भातही शिष्टमंडळाने राज्यमंत्र्याच्या निदर्शनास आणून दिले. कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकऱ्याला मदत देण्यात येईल परभणी जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 63 हजार शेतकऱ्यांचे पंचनामे झाले असून उर्वरित पंचनामे तात्काळ पूर्ण करण्यात येऊन सर्व शेतकऱ्यांना मदत करण्यात येईल कुणीही वंचित राहणार नाही असा यावेळी शिष्टमंडळाला शब्द दिला.

    दरम्यान पाथरी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मागण्या संदर्भात लवकरच सकारात्मक निर्णय न घेतल्यास पुन्हा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी शिष्टमंडळाने कृषिमंत्र्यांना दिला आहे. शिष्टमंडळात श्याम धर्मे , डॉ . महेश कोल्हे , अमोल भाले पाटील ,संदीप टेंगसे ,गजानन घुंबरे , दिपक टेंगसे यांचा सहभाग होता .

  • 40.71 crores insurance allocation on account of farmers

    हॅलो कृषी ऑनलाईन : परभणी प्रतिनिधी

    पंतप्रधान पीक विमा योजनेतील (Pradhan Mantri Pikvima Yojana 2022) मध्य हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी जिल्ह्यात सहा तालुक्यांतील आठ मंडळात 73 हजार 814 सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 40 कोटी 71 लाख 12 हजार रुपये एवढी अग्रीम विमा भरपाई मंजूर करण्यात आली असून लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर विमा रक्कम जमा करण्यास कंपनीकडून सुरुवात झाली आहे.

    खरीप हंगाम 2022 ऑगस्ट महिन्यात परभणी जिल्ह्यातील आठ महसूल मंडळात 26 दिवस पावसाचा खंड पडला होता. त्यामुळे जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी 6 सप्टेंबरला शासकीय अधिकारी व विमा कंपनीचे प्रतिनिधींना (Pradhan Mantri Pikvima Yojana 2022) सोयाबीनच्या नुकसानीसंदर्भात संयुक्त पंचनामे करण्याचे आदेश दिले. त्यानुसार या मंडळातील मागील 7 वर्षातील सरासरी उत्पादकतेच्या तुलनेत यंदा सरासरी उत्पादनात 50 टक्क्यापेक्षा अधिक घट झाली असल्याचे आढळून आले. यामध्ये सर्वाधिक परभणी तालुक्यातील तीन मंडळांचा समावेश आहे.

    पीक विमा योजनेतील प्रतिकूल परिस्थिती मुळे झालेले नुकसान या जोखीम बाबीअंतर्गंत या आठ मंडळातील शेतकऱ्यांना संभाव्य विमा भरपाईपैकी 25 टक्के अग्रीम रक्कम महिन्याभरात देण्याचे आदेश जिल्हाधिकारी श्रीमती गोयल यांनी आयसीआयसीआय लोम्बार्डं जनरल विमा कंपनीला 9 सप्टेंबर रोजी दिले होते. त्यानुसार या आठ मंडळातील सोयाबीनसाठी विमा संरक्षण घेतलेल्या सर्व 73 हजार 814 शेतकऱ्यांना 40 कोटी 71 लाख 12 हजार रुपये एवढी अग्रीम विमाभरपाई महसूल मंडळनिहाय मंजूर करण्यात आली. यासाठी प्रधान (Pradhan Mantri Pikvima Yojana 2022) सचिव एकनाथ डवले, कृषि आयुक्त धिरज कुमार, संचालक विस्तार विकास पाटील व मुख्य सांख्यिकी विनय आवटे यांचे मार्गदर्शन लाभले.

    गंगाखेड तालुक्यातील माखणी मंडळातील 13,626 शेतकऱ्यांना 6697 प्रति हेक्टरीप्रमाणे 5.26 कोटी, जिंतूर तालुक्यातील दुधगाव मंडळातील 9,184 शेतकऱ्यांना 6,421 प्रमाणे 5.16 कोटी, मानवत तालुक्यातील रामपुरी मंडळातील 6,063 शेतकऱ्यांना 6248 प्रति हेक्टरीप्रमाणे 3.99 कोटी, परभणी तालुक्यातील जांब मंडळातील 10,953 शेतकऱ्यांना 6392 प्रतिहेक्टरी प्रमाणे 6.40 कोटी, परभणी तालुक्यातील सिंगणापूर मंडळातील 8,063 शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी 6,363 प्रमाणे 4.80 कोटी, झरी मंडळातील 10,537 शेतकऱ्यांना 6,193 प्रतिहेक्टरी याप्रमाणे 6.01 कोटी, पुर्णा तालुक्यातील चुडावा मंडळातील 8,778 शेतकऱ्यांना 7,018 प्रतिहेक्टरीप्रमाणे 4.31 कोटी रुपये सोनपेठ मंडळातील 6,005 शेतकऱ्यांना 6,763.85 प्रतिहेक्टरी प्रमाणे 4.16 कोटी रुपयांची विमा भरपाई देण्यात येत असून 73 हजार 814 शेतकऱ्यांच्या खात्यावर 40.71 कोटी रुपये जमा होत असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

  • NDRF च्या निकषाने शेतकऱ्यांना मदत द्या; शेतकऱ्यांचे तहसीलदारांना निवेदन

    हॅलो कृषी ऑनलाईन : परभणी

    जुलै महिन्यातील सततच्या पाऊस तर ऑगस्ट महिन्यातील 25 दिवसाच्या पावसाचा खंडामुळे पिके सुकून गेली असुन खरिप पिकांची प्रत्यक्ष पाहणी करत २५ % विमा अग्रीम व एनडीआरफ च्या निकषाने मदत करावी अशी मागणी वाघाळा येथील सरपंच बंटी घुंबरे व स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे.

    सोमवार १२ सप्टेंबर रोजी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि , वाघाळा गाव पाथरी मंडळामध्ये येत असून ते पाथरी पासुन दक्षिणेश 18 किमी आहे. तर बाभळगाव मंडळा पासुन 5 किमी अंतरावर आहे. जुलै महिन्यातील सततच्या पावसामुळे सोयाबीन कापूस , तुर , मुग , पिके पिवळी पडून समाधानकारक वाढ झाली नाही नंतर ऑगस्ट महिन्यात 25 दिवस पावसाचा खंड पडल्यामुळे वरील पिके सुकून गेली आहेत. त्यात पिकाचे नजरी 60 ते 70 टक्के नुकसान झाले आहे. यामुळे शेतकर्यावर अस्मानी संकट आले असुन शेतकऱ्याचा जीव मेटाकुटीला आला आहे. प्रत्यक्ष सर्वेक्षण करून शेतकर्याना एन डी आर एफ ( NDRF ) च्या तीन हेक्टर च्या मर्यादेत पंचनामे करून विमा कंपनीला 25 % टक्के अग्रिम रक्कम देण्यास भाग पड़ावे अशी करण्यात आली आहे .

    दिलेल्या निवेदनावर सरपंच बंटी घुंबरे , विजयकुमार घुंबरे ,पद्माकर मोकाशे ,दत्तराव नागमोडे यांच्यासह वाघाळा येथील ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत .