Category: Parbhani News

  • अतिवृष्टिबाधितांना रब्बी पेरणीसाठी बियाणे, खते मोफत उपलब्ध करून देण्याची मागणी

    हॅलो कृषी ऑनलाईन : परभणी

    अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिके नष्ट झाल्यामुळे परभणी जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करून दुष्काळग्रस्तांच्या योजना मंजूर कराव्या, शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत करावी, रब्बी पेरणीसाठी बियाणे, खते मोफत उपलब्ध करून द्यावीत, आदी मागण्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे (NCP) जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली.

    राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी, माजी आमदार विजय भांबळे, विजय गव्हाणे, परभणी तालुकाध्यक्ष संतोष देशमुख, प्रसाद बुधवंत आदींच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्याकडे मागण्यांचे निवेदन दिले. त्यात शेतकऱ्यांचे कर्ज वसुल करू नये., शेती, उद्योगाचे वीज बिल माफ करावे, वीज कनेक्शन तोडून नयेत, रोजगार हमीची कामाकरिता सवलत विद्यार्थ्यांची फी माफ करणे, महसूल माफ करणे, शेतकऱ्यांना रोजगार उपलब्ध करून देणे आदी उपाययोजना कराव्यात.

    शेती पिकांचे पंचनामे करण्याचा सोपस्कार न करता जिरायती पिकास सरसकट १० हजार रुपये प्रती एकरी तर फळपीकास २५ हजार रुपये प्रति एकरी मदत शासनाने मंजूर करावी. पीक कापणी प्रयोगाची अट न ठेवता पीकविमा योजनेचा लाभ विशेष बाब म्हणून मंजूर करावा. पीकविमा तत्काळ द्यावा, विहित केलेल्या तारखेनंतर महसूल विभागाचे तलाठी यांनी पीकपेरा नोंद करावी आदी मागण्यांचा समावेश आहे.

     आंचल गोयल यांनी केली ई-पिक पाहणी

    जिल्ह्यात मागील काही दिवसापासून होत असलेल्या अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे बाधीत झालेल्या पिकांची १८ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी ई-पीक पाहणी या पथदर्शी प्रकल्पातंर्गत महाराष्ट्र शासनाने विकसित केलेल्या मोबाईल अप्लिकेशनद्वारे पिकांची नोंदी घेण्यासाठी सेलू आणि जिंतूर तालुक्यातील गावातील शेतीच्या बांधावर प्रत्यक्ष जाऊन प्रात्यक्षिक द्वारे कामकाजाची पाहणी केली. ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले, त्या सर्वांची ई-पिक पाहणी करुन अहवाल सादर करण्याच्या सूचना संबंधितांना त्यांनी यावेळी दिल्या. तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना ई-पिक पाहणी करण्यास प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी जिल्हाधिकारी गोयल यांनी केले.

     

  • विजतारांच्या घर्षणाने अर्धा एकर ऊस जळून खाक; शेतकर्‍याचे आर्थिक नुकसान




    विजतारांच्या घर्षणाने अर्धा एकर ऊस जळून खाक; शेतकर्‍याचे आर्थिक नुकसान | Hello Krushi











































    हॅलो कृषी ऑनलाईन : परभणी प्रतिनिधी

    शेतातून गेलेल्या विजतारांच्या घर्षणामुळे लागलेल्या आगी मध्ये अर्धा एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यात येणाऱ्‍या ढालेगाव येथे घडली आहे .यावेळी शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे .

    पाथरी तालुक्यातील ढालेगाव येथील शेतकरी माणीक बालासाहेब शिंदे यांच्या ढालेगाव शिवारात मालकिच्या गट क्र . 50 मध्ये क्षेत्र 0 हे 20 आर एवढ्या क्षेत्रावर ऊस असुन आज रविवार 02 ऑक्टोबर रोजी सकाळी 10:40 वाजता विजेच्या शेतातून विजावितरणच्या तारांमध्ये घर्षण होऊन लागलेल्या आगीत ऊस जळून खाक झाला आहे .

    दरम्यान शेतकर्‍याने प्रशासनाकडे ऊसाचा पंचनामा करण्यात येऊन नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी केली आहे .

    error: Content is protected !!





  • पाऊस झाला गायब ! परभणी जिल्ह्यातील शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत; फुलोर्‍यातील पिके टाकतायेत माना




    पाऊस झाला गायब ! परभणी जिल्ह्यातील शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत; फुलोर्‍यातील पिके टाकतायेत माना | Hello Krushi












































    हॅलो कृषी ऑनलाईन : परभणी प्रतिनिधी

    परभणी जिल्ह्यात मागील पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने खरिप हंगाम धोक्यात आला आहे. मागील वर्षी सरासरी पेक्षा जास्त पाऊस झाल्याने खरीप पिके हातची गेल्याने जिल्हातील शेतकरी आर्थिक संकटात पडला होता. यातुन यावर्षीचा हंगाम बाहेर काढेल असे वाटत असताना सुरुवातीला सतत पडणारा पाऊस गरज असताना मात्र गायब झाला आहे. जिल्ह्यातील खरिप हंगामातील कापुस , सोयाबीन पिके फुल अवस्थेत असुन यावेळी पावसाची मोठी गरज आहे. विहीर बोअरवेल माध्यमांतून पाण्याची सोय असणारे शेतकरी स्पिंकलर, ठिंबक व पाटपाणी देत पिके जोपासणाच्या प्रयत्न करीत आहेत. मात्र कोरडवाहू शेतकरी हतबल झाला आहे. जिल्ह्यात यावर्षी अधिच पर्जन्यमान असमान झाले आहे. काही महसुल मंडळात सरासरी पेक्षा अधिक तर काही मंडळात कमी पाऊस पडला आहे. अधिक पाऊस झालेल्या ठिकाणी पिकांना पाण्याची गरज असताना कमी पर्जन्यमान असणाऱ्या मंडळात स्थिती अधिक बिकट आहे .

    उदाहरणार्थ जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील दोन महसूल मंडळामध्ये यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे . यात कासापूरी व हादगाव महसुल मंडळाचा समावेश आहे. पाथरी तालुक्यात जून पासून ऑगस्टपर्यंत सरासरी 470 मिलिमीटर एवढा पाऊस पडत असतो .यंदा तो अर्ध्या तालुक्यामध्ये सरासरी पेक्षा जास्त तर अर्ध्या तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पडला आहे .प्रशासनाकडून मिळालेल्या पर्जन्यमान अहवालानुसार पाथरी तालुक्यातील कासापुरी महसूल मंडळामध्ये जून पासून आतापर्यंत 262 मिलिमीटर पाऊस पडला असून तो सरासरीच्या 55 टक्के एवढा आहे. तर अशीच काही परिस्थिती शेजारील हादगाव महसूल मंडळामध्ये आहे. या ठिकाणी सरासरीच्या 69 टक्के एवढाच पाऊस झाला आहे .याचा परिणाम म्हणून खरिपातील पिकांना आता मोठ्या पावसाची अथवा जायकवाडी धरणातून पाणी आवर्तनाची मोठी गरज आहे .जूनच्या सुरुवातीपासूनच या दोन महसूल मंडळाला पावसाने पाठ दाखवल्याने शेतकरी अडचणी सापडला आहे.

    याउलट पाथरी महसूल मंडळ व बाभळगाव महसुल मंडळा मध्ये जून पासून ऑगस्ट पर्यंत सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याचे पाहायला मिळत आहे .
    अनुक्रमे 106 . 9 टक्के व 103 . 8 टक्के असा सरासरीपेक्षा जास्त पाऊस या दोन महसूल मंडळामध्ये पडला आहे. त्यामुळे एकाच हंगामात पाथरी तालुक्यातील उत्तर व दक्षिण भागांमध्ये पावसाचे असमान पर्जन्यमान झाल्याने एकीकडे अधिकच्या पावसाने पिके खराब होत असून दुसरीकडे पावसाअभावी पिके माना टाकत आहेत. सध्या जायकवाडी धरणातून गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग चालू आहे. असा विसर्ग डाव्या कालव्यात केल्यास पिकांना संजीवनी देता येईल. स्थानिक शेतकरी जायकवाडीतून कॅनॉलला पाणी सोडण्यात यावे अशी मागणी करत आहेत .





    error: Content is protected !!