Category: Pathari News

  • प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर पाथरीतील शेतकऱ्यांचे उपोषण सहाव्या दिवशी मागे

    हॅलो कृषी ऑनलाईन : पाथरी ता. प्रतिनिधी

    पिक विमा व ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी मागील सहा दिवसांपासून सुरू असलेले परभणी जिल्ह्यातील पाथरी तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांचे आंदोलन सहाव्या दिवशी उपजिल्हाधिकारी शैलेश लाहोटी यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर मागे घेण्यात आले आहे.

    पाथरी तहसील कार्यालयासमोर मागील आठवड्यात 15 ऑक्टोबर पासून चालू असलेले शेतकरी बेमुदत उपोषण व आंदोलन प्रशासनाकडून गुरुवार 20 ऑक्टोबर रोजी लेखी आश्वासन देण्यात आल्यानंतर तात्पुरत्या स्वरूपात वापस घेण्यात आले आहे. प्रशासनाकडून उपजिल्हाधिकारी शैलेश लाहोटी व तहसीलदार सुमन मोरे यांनी उपोषणकर्त्यांना पाथरी येथील उपविभागीय कार्यालया मध्ये चर्चेसाठी बोलावले होते. त्यानंतर त्यांनी उपोषण स्थळी येत उपोषणकर्त्या शेतकऱ्यांना येत्या 25 तारखेपर्यंत तालुक्यातील तीनही महसूल मंडळांमध्ये झालेल्या खरीप पिक नुकसानीचे पंचनामे करत अनुदानासाठी अहवाल सादर करणार असल्याचे लेखी पत्र दिल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.

    यावेळी आंदोलक शेतकरी पांडुरंग शिंदे ,अमोल भाले पाटील, संदीप टेंगसे ,महेश कोल्हे, विष्णु काळे ,पांडुरंग सोनवणे ,बापूराव कोल्हे , श्याम धर्मे,परमेश्वर नवले, ऋषीकेश नाईक ,सिद्धेश्वर इंगळे ,अविराज टाकळकर , पिंकू शिंदे ,प्रताप शिंदे , गोपाळ साखरे , माऊली गिराम, विष्णु उगले , नकुल गायकवाड , पिन्टू घुंबरे ,पंकज नाईक,भारत फुके ,महारुद्र वाकणकर ,शाहरुख सत्तार , सुनिल पितळे , माऊली काळे ,अरुण काळे , सुनिल काळे , नरेश फुके , रणजित शिंदे, यांच्यासह शिवसेना उपजिल्हाप्रमुख रवींद्र धर्मे ,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे श्रीकांत विटेकर ,कॉम्रेड दीपक लिपणे ,भोगावचे प्रगतीशील शेतकरी अर्जुन साबळे ,तुकाराम हरकळ , विजय कोल्हे ,आदींची उपस्थिती होती .दरम्यान प्रारंभी उपोषण पाठींबा देण्यासाठी शिवसेना (ठाकरे गट ) जिल्हाप्रमुख विशाल कदम यांनी भेट दिली होती .

  • पिकविमा ओला दुष्काळाच्या मागणीसाठी शिवसेनेचा पाथरीत रास्तारोको; राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुक ठप्प

    हॅलो कृषी ऑनलाईन : परभणी प्रतिनिधी

    शिवसेनेच्या वतीने ओला दुष्काळ व पिकविमा मागणीसाठी परभणी जिल्ह्यात बुधवारी ठिकठिकाणी रास्ता रोको करण्यात आला. यावेळी परभणीत आंदोलनाचे नेतृत्व करत असताना परभणीचे आ.राहुल पाटील यांनी जिल्ह्यात जोपर्यंत ओला दुष्काळ जाहीर करत पिक विमा देण्यात येणार नाही तोपर्यंत विधानसभेचे सत्र सुरू होऊ देणार नाही ! असा इशारा दिला आहे .

    जिल्ह्यातील पाथरी शहरात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 61 वर सेलू कॉर्नर येथे 19 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 ते 12 वाजण्याच्या दरम्यान रास्ता रोको करण्यात आला .यावेळी माजलगाव , सेलू परभणी कडे जाणारी वाहतुक ठप्प झाली होती . सेलू कॉर्नर परिसर शिवसैनिकांनी सरकार विरोधी घोषणाबाजी करून दणाणून सोडले होते. सुमारे एक तास रास्ता रोको आंदोलन झाल्यानंतर तहसील समोर ओला दुष्काळ व पिक विमा मागणीसाठी बसलेल्या उपोषणकर्त्यांना पाठिंबा देण्यासाठी उपोषणकर्त्यांची भेट घेत यावेळी शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला.

    दरम्यान प्रशासनाकडून आंदोलन ठिकाणी जात नायब तहसीलदार एस.बी कट्टे यांनी मागण्याचे निवेदन स्विकारले . पोलीसांकडून मोठा बंदोबस्त यावेळी ठेवण्यात आला होता. यावेळी आंदोलनामध्ये शिवसेना उपजिल्हाप्रमुख रवींद्र धर्मे , मा . जि.प सदस्य माणिकअप्पा घुंबरे , रंगनाथ वाकणकर , उपतालुका प्रमुख रावसाहेब निकम , बालासाहेब शिंदे ,सत्यनारायण घाटूळ , माऊली गलबे , अनंता नेब , शरद कोल्हे , ज्ञानेश्वर शिंदे , रणजित गिराम,

    तुकाराम हारकळ , रामचंद्र आम्ले , पांडूरंग शिंदे , अविराज टाकळकर , सिध्देश्वर इंगळे , राजु नवघरे , कृष्णा शिंदे , किसन रणेर , सुरेश नखाते , सुर्यकांत नाईकवाडे , प्रमोद चाफेकर , दिपक कटारे , राधे गिराम, प्रताप शिंदे , जयराम नवले , सुंदर दिवटे , भारत मस्के आदी शिवसेना ( ठाकरे गट) , युवासेना पदाधिकारी यांच्या सह तालुक्यातील शिवसैनिक व शेतकरी उपस्थित होते .

  • तानाजी सावंतांनी आमच्या हातात चाॅकलेट ठेवलं; पीक विम्याच्या मागणीवरून शेतकरी संतापले





    तानाजी सावंतांनी आमच्या हातात चाॅकलेट ठेवलं; पीक विम्याच्या मागणीवरून शेतकरी संतापले | Hello Krushi













































    हॅलो कृषी ऑनलाईन : मागील ८ दिवसांपासून राज्यभरात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे ऐन काढणीला आलेल्या सोयाबीन कापूस आणि इतर पिकांचे मोठे नुकनं झाले आहे. म्हणूनच पीक विम्याच्या मागणीसाठी पाथरी येथे मागील ४ दिवसांपासून शेतकऱ्यांनी उपोषण सुरु केले आहे. या उपोषणकर्त्यांशी फोनवरून संवाद साधत पालकमंत्री तानाजी सावंत यांनी यावर मार्ग काढण्याचे आश्वसन दिले होते. मात्र या आश्वसनाचे केवळ चॉकलेटचं हातात ठेवले असून प्रत्यक्षात मात्र काहीच घडत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी आता उपोषणाचे रूपांतर आंदोलनात केले आहे. आज अर्धनग्न होऊन बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले.

    पालकमंत्री तानाजी सावंत यांचे आश्वसन

    14 ऑक्टोबर रोजी या भागात जोरदार पाऊस झाल्यानंतर 15 ऑक्टोबर पासून बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले. त्यानंतर परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत यांना युवा सेना जिल्हाप्रमुख शिंदे गट दीपक टेंसे यांच्या मदतीने कॉन्फरन्स कॉल करत उपोषणकर्त्यांशी थेट संपर्क साधला. यावेळी शेतकऱ्यांनी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी नंतर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून सरकारने लक्ष देण्याची मागणी केली. यावेळी तानाजी सावंत यांनी शनिवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास परभणी जिल्ह्यातील अतिवृष्टी संदर्भात बातम्या पाहिल्या त्याच दिवशी पाहिले शेतकऱ्यांचे फोन आले असून पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. या संदर्भात माहिती घेतली असून उद्याच्या कॅबिनेट मीटिंगमध्ये अतिवृष्टीचा विषय मांडणार असल्याचा शेतकऱ्यांना सांगितलं. मात्र प्रत्यक्षात आतापर्यंत काहीच ठोस पावलं उचलली गेली नसल्यामुळे उपोषण कर्त्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. शेतकऱ्यांनी संतप्त होऊन आता आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. पालकमंत्री तानाजी सावंत यांनी केवळ आमच्या हातात चॉकलेटच ठेवलं अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून उमटत आहे.

    शिवाय जोपर्यंत ओला दुष्काळ जाहीर करत नाही आणि पीक विमा उतरवला जात नाही. तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहणार किंबहुना हे आंदोलन अधिक तीव्र करणार असल्याचं इथल्या शेतकऱ्यांनी सांगितले आहे. आज अर्धनग्न होत बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले आहे तर उद्या जलसमाधी आंदोलन करण्यात येईल अशी माहिती इथल्या शेतकऱ्यांनी दिली आहे.

    दिवाळी साजरी कशी करायची ?

    दिवाळी सण तोंडावर आला असताना शेतकऱ्याच्या हातात काहीच नाही अशी प्रतिक्रिया देखील इथल्या शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. आम्ही दिवाळी सण साजरा करायचा की नाही ? असा सवाल देखील इथल्या शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. लवकरात लवकर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे आणि प्रशासनाने यात लक्ष घातलं पाहिजे अशी मागणी इथल्या आंदोलनकर्त्यांनी केली आहे.

    error: Content is protected !!





  • अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचे पाथरी तहसील कार्यालयासमोर उपोषण; ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

    हॅलो कृषी ऑनलाईन : पाथरी ता प्रतिनिधी

    शुक्रवारी दिवसभर झालेल्या अतिवृष्टी मुळे खरिपातील सोयाबीन ,कापूस पिकाचे मोठे नुकसान झाले असल्याने ओला दुष्काळ जाहीर करावा व खरीपातील काढणी चालू असलेल्या पिकांच्या नुकसान भरपाई पोटी शेतकऱ्यांना तात्काळ अनुदान व पिक विमा देण्यात यावा या मागणीसाठी पाथरी तहसील कार्यालयासमोर शनिवार 15 ऑक्टोबर पासून तालुक्यातील शेतकऱ्यांसह युवक काँग्रेस, राष्ट्रवादी युवक काँग्रेस व युवासेना यांच्या वतीने बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे. यावेळी महसूल प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे.

    मागील काही दिवसापासून पाथरी तालुक्यातील शेत शिवारात झालेल्या परतीच्या पावसाने खरीपातील काढणी चालू असलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे .त्यात शुक्रवारी दिवसभर ढगफुटी सदृश्य पाऊस झाला .त्यामुळे पाथरी तालुक्यातील चारही महसूल मंडळातील शेतांना तळ्याचे स्वरूप आले होते . यामध्ये खरीपात काढणी सुरु असलेल्या सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले आहे . यासंदर्भात शनिवार १५ ऑक्टोबर रोजी सकाळी महसुल प्रशासनाला शेतकऱ्यांसह युवक काँग्रेस , राष्ट्रवादी युवक काँग्रेस व युवासेना ( ठाकरे गट ) यांनी ओला दुष्काळ जाहीर करून पंचनामे ,निकष न लावता थेट हेक्टरी १ लाख रुपये मदत जाहीर अशी निवेदनातुन मागणी केली आहे . सोबतच मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षीय कार्यकर्त्यांसह स्थानिक अतिवृष्टीग्रस्त शेतकरी आता तहसील कार्यालया समोर उपोषणाला बसले आहेत . मागण्या मान्य झाल्याशिवाय उपोषण सोडणार नसल्याची भुमिका यावेळी उपोषणकर्त्यांनी घेतली आहे.

    यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, काही दिवसापासुन पाथरी तालुक्यातील सर्व मंडळात परतीच्या पावसाने धुमाकुळ घातला आहे . त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पिकाचे आतोनात नुकसान झाले आहे . त्यामुळे शेतकऱ्याला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही . या आसमानी संकटातुन शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी शासनानी पिक विमा व ओला दुष्काळ तात्काळ जाहिर करुण हेक्टरी 1 लाख मदत जाहिर करावी . सदरील मदत कोणतेही निकष व पंचनामे न करता जाहिर करत तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावी .अशी मागणी केली आहे. जोपर्यंत ही मदत शासन जाहिर करत नाही तो पर्यंत तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या वतीणे शनिवार १५ ऑक्टोबर पासुन उपोषन करण्यात येणार आहे असा इशारा यावेळी देण्यात आला आहे .

    उपोषण स्थळी तालुक्यातील शेतकरी यांच्यासह युवा सेनेचे पांडुरंग शिंदे, युवक काँग्रेसचे महेश कोल्हे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे विष्णू काळे, संदीप टेंगसे, माजी पं.स.सभापती राजेश ढगे, माणिकअप्पा घुंबरे ,अमोल भाले पाटील, सुनील पितळे, शरद कोल्हे, ज्ञानेश्वर शिंदे, परमेश्वर नवले, राजु नवघरे, सुर्यकांत नाईकवाडे, पांडूरंग सोनवण, अविराज टाकळकर, प्रताप शिंदे, ऍड बी .जी . गायकवाड, अमृत अडसकर, सिध्देश्वर इंगळे, ऋषीकेश नाईक, महारुद्र वाकणकर, कृष्णा गलबे,आदी शेतकरी मोठ्या संख्येने साखळी पद्धतीने उपोषण करणार आहेत .

  • पाथरी तालुक्यातील सर्व महसुल मंडळांचा 25 टक्के पिकविमा अग्रीम अधिसुचनेत समावेश करण्याची मागणी

    हॅलो कृषी ऑनलाईन : परभणी प्रतिनिधी

    पिकविमा सर्वेक्षणात केवळ पर्जन्यमान या बाबीचा अहवाल ग्राह्य धरल्याने व पाथरी तालुक्यात असणारे मंडळनिहाय पर्जन्यमापके व त्यांचे अंतर , संख्या पाहता तालुक्याचे पर्जन्यमान अहवाल काढणे योग्य नाही म्हणत तालुक्यातील चारही महसूल मंडळांचा 25 टक्के पीक विमा अग्रीम साठी अधिसूचनेत समावेश करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ओबीसी सेल अध्यक्ष तथा परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक दत्तराव मायंदळे यांनी तहसील प्रशासनाला दिलेल्या निवेदनात केली आहे .

    शुक्रवार 16 सप्टेंबर रोजी राकाँ चे ओबीसी सेल अध्यक्ष दत्तराव मांयदळे यांच्यासह 50 हून अधिक शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने पाथरी तहसील प्रशासनाला पिक विमा अग्रीम देण्यातून चारही मंडळाला चुकीच्या निकषाने वगळल्याचे निदर्शनास आणून देत या सर्व महसूल मंडळांचा अधिसूचनेत समावेश करावा या मागणीचे निवेदन दिले आहे .

    यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्हाधिकार्यांनी पिकविमा 25 टक्के अग्रीम देण्याकरीता सर्वेक्षण करण्यासाठी अधिसुचना काढतांना पिक परिस्थिती अहवाल , प्रर्जन्यमान अहवाल , स्थानिक प्रसार माध्यमांचा अहवाल दुष्काळ जन्य परिस्थिती आदी बांबींचा विचार करणे आवश्यक होता . परंतु जिल्हाधिकारी यांनी ही अधिसुचना काढतांना केवळ प्रर्जन्यमान अहवालाचा विचार केलेला दिसत आहे . आणि प्रर्जन्यमान अहवाल तयार करतांना प्रत्येक महसुल मंडळात केवळ 1 प्रर्जन्यमापक यंत्र बसविलेले आहे . त्यात एका यंत्राच्या आधारे तालुक्यातील महसुल मंडळाचे प्रर्जन्यमान अहवाल तयार करणे संयुक्तीक नाही नसल्याने म्हणत चुकीचे आहे असे म्हटले आहे . त्यामुळे अहवालाचा हा एकमेव निकष ग्रहीत न धरता इतर बाबींचा ही विचार करुन पाथरी तालुक्यातील चारही महसुल मंडळाचा 25 % विमा अग्रीम अधिसुचनेत ग्रहीत धरावे अशी मागणी केली आहे . अन्यथा पाथरी चारही महसुल मंडळातील शेतकरी तहसील कार्यालयासमोर आंदोलन करतील असा इशारा दिला आहे .

    दरम्यान पाथरी तालुक्यातील सर्व गावांमध्ये जनावरामध्ये लम्पी त्वचा रोगामुळे पशूपालकासह इतर नागरीकांमध्ये देखील धडकी भरली आहे हे निदर्शनास आणून देत या आजारामूळे जनावरे दगावतात, जनावरांची जिवीत हानी होऊ नये याकरीता लम्पी रोग लसीकरण मोहीम तात्काळ राबविण्यात यावी अशीही मागणी निवेदन देत यावेळी करण्यात आली आहे. दिलेल्या निवेदनावर चारही महसूल मंडळातील 50 हून अधिक शेतकऱ्यांच्या स्वाक्षरी आहेत .