Category: Pathri News

  • नुकसानीचे पंचनामे करण्याऐवजी सरसकट ओला दुष्काळ जाहीर करा ; पाथरी वकील संघाची मागणी

    हॅलो कृषी ऑनलाईन : पाथरी ता . प्रतिनिधी

    परतीच्या पावसाने परभणी जिल्ह्यासह पाथरी तालुक्यात सोयाबीन कापूस या खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले असल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसानीचे पंचनामे करण्याऐवजी सरसकट पिक विमा देत ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी पाथरी वकील संघाच्या वतीने प्रशासनाकडे करण्यात आली आहे .या संदर्भात बुधवारी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे.

    पाथरी वकील संघाच्या वतीने बुधवार 19 ऑक्टोबर रोजी महसूल प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे यामध्ये म्हटले आहे की ,मागील काही दिवसापासून परभणी जिल्हा व पाथरी तालुक्यात परतीच्या पावसाने सोयाबीन कापूस या खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले असल्यामुळे व रब्बी पेरणीचा हंगाम सुरू झाला असल्यामुळे पीक नुकसानीचे पंचनामे करण्याऐवजी पाथरी तालुक्यात सरसकट ओला दुष्काळ जाहीर करून बाधित शेतकऱ्यांना पीक विमा व नुकसान भरपाई त्वरित देण्यात यावी अशी मागणी केली आहे . यावेळी मागील 5 दिवसापासून तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसलेल्या शेतकरी बांधवांच्या मागण्या शासनाने मान्य कराव्यात सोबतच या आंदोलनास पाठिंबा असल्याचे ही दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे .

    यावेळी निवेदनावर पाथरी वकील संघाचे अध्यक्ष एडवोकेट बी . इ . दाभाडे , सचिव एडवोकेट बी .एल .रोकडे ,एडवोकेट व्ही . एस .गात ,एडवोकेट डी .बी . निसरगंध ,एडवोकेट डी . टी . मगर ,एडवोकेट बी .पी . चव्हाण , ऍड. आर . व्ही .गिराम यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

  • विद्युत तारेचा स्पर्शाने बैल जोडीचा मृत्यू; शेतकऱ्यावर मोठे संकट




    विद्युत तारेचा स्पर्शाने बैल जोडीचा मृत्यू; शेतकऱ्यावर मोठे संकट | Hello Krushi











































    हॅलो कृषी ऑनलाईन : पाथरी ता. प्रतिनिधी

    परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातुन एक मन हेलावणारी घटना समोर आली आहे. शेतात चरण्यासाठी गेलेल्या बैलजोडीला विजप्रवाहीत तारांचा स्पर्श झाल्याने बैलजोडीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार १३ ऑक्टोबर रोजी दुपारी घडली असुन या घटनेने खेडूळा ता . पाथरी जि.परभणी येथील शेतकर्‍यावर मोठे संकट कोसळले आहे .

    पाथरी तालुक्यातील खेडूळा गावचे रहिवाशी असणारे शेतकरी महादेव सोपानराव वऱ्हाडे यांची शेती सारोळा खुर्द शिवारात गट क्र . ४४ मध्ये आहे . शुक्रवारी त्यांच्या मालकीचे बैल शेतामध्ये चरत असता आचानक पाऊस व जोरात वारा सुटल्यामुळे विजेची तार तुटुन बैलाच्या अंगावर पडुन विद्यतु प्रवाहीत तारेचा स्पर्श झाल्याने दोन्ही बैलाचा जागीच मुत्यु झाला आहे .

    यात या शेतकऱ्याचे दिड लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असून ऐन रब्बी पेरणीच्या तोंडावर बैलजोडी दगावल्याने मोठे संकट कोसळले आहे . याप्रकरणी शेतकर्‍याने महसुल प्रशासनाला पंचनामा करत नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.

    error: Content is protected !!





  • पिकविमा अग्रीम व निराधारांच्या विविध मागण्यांसाठी पाथरीत रास्ता रोको; महिलांचा लक्षणीय सहभाग

    हॅलो कृषी ऑनलाईन : पाथरी ता. प्रतिनिधी

    जिल्ह्यातील सर्व महसुल मंडळातील शेतकऱ्यांना खरिपातील पाऊस खंडामुळे झालेल्या नुकसानीपोटी पिकविमा अग्रीम ,यासह निराधार महिलांच्या विविध मागण्यांसाठा भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने शहरातील सेलू कॉर्नर परिसरात राष्ट्रीय महामार्गावर तब्बल दोन तास रास्ता रोको आंदोलन केले .

    जिल्ह्यातील शेतकरी प्रश्न व निराधार महिलांच्या विविध मागण्यांसाठी शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती ते सेलू कॉर्नर पर्यंत मोर्चा काढून कॉम्रेड राजन क्षीरसागर यांच्या नेतृत्वात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा वतीने शुक्रवार 23 सप्टेंबर रोजी सकाळी साडेअकरा ते दुपारी दीडच्या दरम्यान दोन तास रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलकांची समजूत घालण्यासाठी यावेळी पाथरीच्या तहसीलदार सुमन मोरे यांनी आंदोलकांची भेट घेत या ठिकाणी त्यांच्या मागण्यांची निवेदन स्वीकारले.

    यावेळी दिलेल्या प्रशासनास निवेदनात म्हटले आहे की, पावसाच्या खंडामुळे तसेच अवेळी पावसामुळे शेतकरी हातचे आलेले पीक गमावून बसले आहेत सोयाबीन , कापूस , मूग , तूर , पावसा आभावी जळून गेले आहेत त्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे कधीही भरून निघणारे नुकसान झाले आहे . पाथरी तालुका पिक विमा 25 टक्के अग्रीम विम्यातून वगळले आहे . सर्व जिल्हांना अग्रीम दिला परंतु त्यामधूनही परभणी जिल्हा वगळला आहे . पिक विम्याच्या माध्यमातून शेतकर्‍याला मिळणारा आधारही काढून घेण्याचं काम मायबाप सरकारने केले आहे . याशिवाय मराठवाड्यात परभणी आणि बीड वगळता सर्व जिल्ह्याला अतिवृष्टी अनुदान देण्यात आले.

    असे निवेदनात नमुद करत हेतूपूर्वक परभणी जिल्हा आणि त्यामधील पाथरी तालुका पूर्णतः वगळण्याचे षडयंत्र राजकारण्यांनी केले आहे असा आरोप यावेळी करण्यात आला आहे .

    यावेळी आंदोलकांनी अतिवृष्टीग्रस्त अनुदान संपूर्ण पाथरी तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट देण्यात यावे , पावसाच्या विलंबामुळे सोयाबीन कापूस हातचे गेले आहे त्यामुळे 25 % विमा अग्रीम रक्कम विमा कंपनीने त्वरित द्यावी , श्रावणबाळ संजय गांधी निराधार , इंदिरा गांधी निराधार लाभधारकांना गेली सहा महिने झाले मानधन दिले नाही ते त्वरित देण्यात यावे , संजय गांधी निराधार , श्रावण बाळ योजना , इंदिरा गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना हेतूपूर्वक डावलण्यात आलेले अर्ज तात्काळ निकाली काडून त्यांना मानधन चालू करावे , मंजरथ येथील मानव विकास अंतर्गत बस सेवा तात्काळ सुरू करावी , नायब तहसीलदार यांना निलंबित करावे , सर्व बँकांनी शेतकऱ्यांना पीक कर्ज पुरवठा करावा , ऊस लागवडीच्या नोंदी तात्काळ घेण्यात याव्यात ,रेणुका शुगर्स कारखान्याने 86032 या जातीच्या उसाची लागवड सक्तीची करणे तात्काळ बंद करावे , सेलु रस्ता तात्काळ दुरुस्ती करावा आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

    रास्तारोको आंदोलनात कॉ .सुधीर कोल्हे कॉ . ज्ञानेश्वर काळे कॉ . तुकाराम शिंदे कॉ . लिंबाजी शिंदे कॉ . बळीराम तोंडे कॉ.नारायण दळ वे कॉ . मुंजाभाऊ लिपणे कॉ . शरद झुटे कॉ . अनिता दुपडे , कॉ . श्रीनिवास वाकणकर कॉ . शेख बडेसाब कॉ . अनिस शेख कॉ . ज्ञानेश्वर कॉ . सचिन काळे कॉ . गणेश नखाते यांच्यासह शेतकरी व निराधार महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता .