Category: PM Kisan Nidhi sanman Yojana

  • PM Kisan : 12वा हप्ता जाहीर होण्यापूर्वी मोठा बदल, आता फक्त मोबाईल नंबरवरून शेतकरी जाणून घेऊ शकणार स्टेट्स

    हॅलो कृषी ऑनलाईन : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM Kisan) ही देशातील सर्वात मोठी सरकारी योजना आहे. ज्याच्याशी 12 कोटी शेतकरी थेट जोडले गेले आहेत. या योजनेअंतर्गत केंद्र सरकार दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यावर ६ हजार रुपये पाठवते. जे शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्षभरात तीन हप्त्यांमध्ये पाठवले जातात.

    म्हणजेच शेतकऱ्यांच्या खात्यात ४ महिन्यांत २ हजार रुपये हप्ता म्हणून पाठवले जातात. आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर 11 हप्ते पाठविण्यात आले असून 12 वा हप्ता वाटपासाठी काऊंट टाउन सुरू झाले आहे. पण, त्याआधी केंद्र सरकारने या योजनेच्या एका नियमात महत्त्वपूर्ण बदल केला आहे. ज्या अंतर्गत आता नोंदणीकृत शेतकऱ्यांना फक्त मोबाईल क्रमांकावरून हप्त्याची स्थिती कळू शकणार आहे. हा मोठा बदल थेट 11 कोटींहून अधिक नोंदणीकृत शेतकर्‍यांना प्रभावित करेल.

    पीएम किसान योजनेंतर्गत, शेतकर्‍यांना पूर्वी स्थिती जाणून घेण्यासाठी त्यांचा आधार आणि मोबाईल क्रमांक आवश्यक होता. ज्या अंतर्गत शेतकरी पीएम किसान (PM Kisan) वेबसाइटवर त्यांचा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक टाकून हप्त्याची स्थिती सहज जाणून घेऊ शकतात. मात्र, नव्या बदलांनंतर आता आधारऐवजी शेतकऱ्यांना हप्त्यासह इतर स्थिती केवळ मोबाईल क्रमांकावरूनच कळणार आहे.

    स्थिती जाणून घेणे महत्त्वाचे का आहे?

    शेतकऱ्यांसाठी पीएम किसानची (PM Kisan) स्थिती जाणून घेणे का महत्त्वाचे आहे. हा प्रश्न सर्वसामान्य आहे. खरं तर, केंद्र सरकारने पीएम किसान योजना पारदर्शक करण्यासाठी आणि योजनेचा लाभ घेत असलेल्या अपात्र लोकांना ओळखण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. त्यामुळे या योजनेतून अनेक अपात्रांची नावे काढण्यात आली आहेत. त्याच वेळी, 12 वा हप्ता रिलीज होणार आहे. अशा परिस्थितीत शेतकर्‍यांनी घरी बसून त्यांच्या मोबाईलवरून पीएम किसानची स्थिती जाणून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे त्यांचा वेळ आणि पैसा वाचतो.

    12वा हप्ता दिवाळीपूर्वी रिलीज होणार!

    पीएम किसान योजनेचा 11 वा हप्ता जुलैमध्ये जारी करण्यात आला. यासोबतच 12वा हप्ता जाहीर करण्याची तयारी सुरू झाली होती. ज्यांना अंतिम रूप देण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 12वा हप्ता जारी करण्याबाबत केंद्र सरकार लवकरच अंतिम निर्णय घेणार आहे. ज्या अंतर्गत 12 व्या हप्त्याचे पैसे दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात येतील.

     

     

     

     

     

  • This Major Change Happened On The Website Of PM Kisan Yojana; Find Out

    हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील एक मोठा वर्ग शेतीवर अवलंबून आहे आणि याच्या मदतीने उदरनिर्वाह करत आहे. या शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी सरकारही आपल्या स्तरावर अनेक प्रयत्न करत आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM Kisan) ही देखील अशीच योजना आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी ही देखील अशीच योजना आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपये दिले जातात. दर 4 महिन्यांच्या अंतराने 2-2 हजार रुपये करून ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवली जाते.

    पीएम किसानच्या १२व्या हप्त्याची प्रतिक्षा

    आतापर्यंत या योजनेचे 11 हप्ते 10 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवण्यात आले आहेत. ताज्या अपडेटनुसार, सप्टेंबर महिन्याच्या कोणत्याही तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपयांची रक्कम (PM Kisan) पाठवली जाऊ शकते.

    पीएम किसान योजनेच्या वेबसाइटवर मोठा बदल

    सध्या पीएम किसान (PM Kisan) सन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर एक मोठा बदल दिसत आहे. ई-केवायसी आयोजित करण्याच्या तारखेबाबत वेबसाइटवर दिले जाणारे अपडेट पूर्णपणे काढून टाकण्यात आले आहेत. ई-केवायसी करण्याची अंतिम तारीख ३१ ऑगस्ट २०२२ असा संदेश वेबसाईटवर येत होता. आता मात्र आता असा संदेश दिसत आहे की, ” पीएम किसान चा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना ई -केवाय सी करणे अनिवार्य असून पीएम किसनच्या पोर्टलवर ओटीपी च्या माध्यमातून तसेच जवळच्या सीएससी केंद्रावर जाऊन बायोमेट्रिक पद्धतीने इकेवायसी करता येईल ” असा संदेश दिसत आहे. असा अंदाजही वर्तवला जात आहे की हा 12वा हप्ता लवकर रिलीज होण्याचे संकेत देखील असू शकतो.

    पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये घट

    पीएम किसान सन्मान निधीचा (PM Kisan) लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांच्या जमिनीच्या नोंदींची पडताळणी सातत्याने सुरू आहे. या दरम्यान अनेक लाभार्थी अपात्र असल्याचे समोर येत आहे. अशा अपात्रांना सतत नोटिसा पाठवून चुकीच्या पद्धतीने मिळालेल्या सर्व हप्त्यांची वसुली केली जात आहे. यावेळी या योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये मोठी घट होणार असल्याचे मानले जात आहे.

  • PM Kisan : करोडो शेतकरी 2000 रुपयांच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत, कधी येणार पैसे ?

    हॅलो कृषी ऑनलाईन : मोदी सरकारची सर्वात मोठी शेतकरी योजना पीएम किसान योजनेच्या 12 व्या हप्त्याची तारीख अद्याप ठरलेली नाही. कुठे दुष्काळ तर कुठे अतिपावसाने हैराण झालेले शेतकरी या योजनेंतर्गत मिळणाऱ्या 2000 रुपयांची आतुरतेने वाट पाहत आहेत. केंद्रीय कृषी मंत्रालयाने पैसे पाठवण्याची तयारी पूर्ण केल्याचे सांगण्यात आले. पण, त्याची तारीख पीएमओकडून अंतिम असेल. कारण पैसे फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदीच ट्रान्सफर करतील. मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले की, सप्टेंबरच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यादरम्यान पैसे हस्तांतरित केले जाऊ शकतात.

    यावेळी सरकार 11 कोटी शेतकऱ्यांना 22,000 कोटी रुपयांची मोठी रक्कम एकाच वेळी हस्तांतरित करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. आतापर्यंत 11 हप्त्यांमधून शेतकऱ्यांना 2 लाख कोटींहून अधिक रक्कम देण्यात आली आहे. ही योजना 1 डिसेंबर 2018 पासून सुरू आहे. ज्या अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6000-6000 रुपये दिले जातात.

    लाखो शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेले नाही

    केंद्र सरकारने लाभार्थ्यांच्या पडताळणीसाठी ई-केवायसी अनिवार्य केले आहे. आतापर्यंत लाखो शेतकर्‍यांना हे काम मिळाले नसल्याचे सांगण्यात येत आहे. तर ई-केवायसीची अंतिम तारीख ३१ ऑगस्ट होती. हे काम न करणाऱ्या शेतकऱ्यांचे पैसे रोखले जाऊ शकतात. ई-केवायसी हे देखील पैसे ट्रान्सफर होण्यास उशीर होण्याचे एक कारण असू शकते असे सांगण्यात आले आहे. अधिकाधिक शेतकऱ्यांनी हे काम करावे, जेणेकरून ते पैसे मिळण्यास पात्र आहेत की नाही हे त्यांना कळू शकेल.

    तुम्ही स्वतःही अर्ज करू शकता

    देशात 14.5 कोटी शेतकरी कुटुंबे आहेत. मात्र आतापर्यंत केवळ 11.37 कोटी कुटुंबांनाच लाभ मिळत आहे. अपात्र शेतकऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत पैसे मिळू नयेत, तर पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळावा, हा शासनाचा हेतू आहे. अशा परिस्थितीत लाभार्थींची संख्या वाढवण्यासाठी शासनाने शेतकऱ्यांना स्वत: योजनेसाठी अर्ज करण्याची सुविधा दिली आहे. म्हणजे आता तुम्हाला अर्जासाठी कृषी अधिकाऱ्यांकडे जाण्याची गरज नाही. हे काम तुम्ही घरी बसून करू शकता. अशा परिस्थितीत, तुम्ही अद्याप अर्ज केला नसेल, तर लगेच फॉर्म भरा.

  • पीएम किसान योजनेच्या 12व्या हप्त्याबाबत मोठी अपडेट, या तारखेला खात्यात 2000 रुपये येतील

    हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारची प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना देशभरातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे, कारण या योजनेद्वारे सरकार शेतकऱ्यांच्या खात्यावर 6000 रुपयांची आर्थिक मदत पाठवते. ही रक्कम 1 वर्षात 3 हप्त्यांमध्ये पाठवली जाते. पीएम किसान चा ११ वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला असून आता १२ व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे.

    मात्र या योजनेसाठी ई-केवायसी करण्याची शेवटची तारीख निघून गेली आहे. अशा परिस्थितीत पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना, ज्यांनी ई-केवायसी केलेले नाही, त्यांना यावेळी 12 व्या हप्त्याच्या पैशासाठी खूप संघर्ष करावा लागू शकतो.

    पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता कधी येईल?

    शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी अशी आहे की, 5 सप्टेंबरपर्यंत पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 12 वा हप्ता देशातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात पूर्णपणे हस्तांतरित होण्याची अपेक्षा आहे. याशिवाय ज्या शेतकऱ्यांची बँक खाती आधारशी जोडली गेली आहेत, त्यांच्या खात्यात पुढील हप्ताच हस्तांतरित केला जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.

    70 लाख शेतकरी पीएम किसान योजनेच्या 12व्या हप्त्यापासून वंचित राहू शकतात.

    माहितीनुसार, देशातील सुमारे 70 लाख शेतकरी या योजनेच्या पुढील हप्त्यापासून वंचित राहू शकतात. मात्र, अद्याप वंचित राहिलेल्या लाभार्थ्यांची आकडेवारी शासनाला प्राप्त झालेली नाही. पण पुढील 1 ते 2 दिवसांच्या दरम्यान त्यांच्या संख्येची पुष्टी होऊ शकते अशी बातमी आहे.

  • PM Kisan : मोठी बातमी ! ई -केवायसी करण्याच्या मुदतीत आणखी वाढ होणार

    हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील 55 ते 60 टक्के लोकसंख्येसाठी शेती (PM Kisan) हा एकमेव उत्पन्नाचा स्रोत आहे. येथील अर्थव्यवस्थेचा मोठा भाग शेतीवर अवलंबून आहे. PM किसान योजना ही शेकऱ्यांसाठी लाभदायक ठरत असून अनेक शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत. या योजनेत पारदर्शकता यावी याकरिता ई -केवायसी करणे बंधनकारक केले आहे. त्याची अंतिम मुदत ३१ ऑगस्ट होती मात्र आता ती आणखी वाढवण्यात येऊ शकते.

    मराठवाडा विभागाच्या माहिती आणि जनसंपर्क खात्यानुसार एक ट्विट करण्यात आले आहे. त्यानुसार ई -केवायसी करण्याची अंतिम मुदत वाढवण्याच्या कृषी मंत्री सत्तार यांच्या मागणीला केंद्रीय कृषी मंत्री तोमर यांच्याकडून परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे अद्यापही ज्या शेतकऱ्यांनी ई -केवायसी
    केले नाही त्यांना मोठा दिलासा मिळू शकतो. मात्र अद्याप पीएम किसान च्या वेबसाईटवर याबाबत अधिकृत माहिती देण्यात आली नाही.

    कसे कराल ई केवायसी

    –सर्वप्रथम पीएम किसान (PM Kisan) योजनेच्या वेबसाइट pmkisan.gov.in वर जा.
    –येथे तुम्हाला फार्मर कॉर्नर दिसेल, जिथे E-KYC टॅबवर क्लिक करा.
    –आता एक नवीन पेज उघडेल, जिथे तुम्हाला आधार क्रमांक टाकावा लागेल आणि सर्च टॅबवर क्लिक करावे लागेल.
    –आता तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरील क्रमांकावर OTP पाठवला जाईल.
    –सबमिट OTP वर क्लिक करा.
    –आधार नोंदणीकृत मोबाइल ओटीपी प्रविष्ट करा आणि तुमचे ई-केवायसी केले जाईल.

  • PM Kisan : योजनेसंदर्भांत वाचा महत्वाची अपडेट; अन्यथा मिळणार नाहीत योजनेचे पैसे

    हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारची अत्यंत महत्वाकांक्षी योजना म्हणजे पीएम किसान (PM Kisan)  योजना होय. देशभरातील शेतकरी या योजनेच्या १२ व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. असे असताना केंद्र सरकारने या योजनेत पारदर्शकता यावी याकरिता इ के वाय सी करणे बंधनकारक केले आहे. इ केवाय सी करण्याची अंतिम मुदत् 31 ऑगस्ट 2022 आहे. त्यापूर्वी शेतकऱ्यांनी ई केवायसी करणे बंधनकारक आहे. अन्यथा या योज़नेचे पैसे शेतकऱ्यांना मिळणार नाहीत.

    सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना पुढील लाभ प्राप्त होण्यासाठी ई केवायसी (PM Kisan)  प्रक्रिया 31 ऑगस्ट 2022 पर्यंत कण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. सदर मुदतीत ई- केवायसी प्रमाणीकरण प्रक्रिया पूर्ण न करणाऱ्या लाभार्थीस पी एम किसान सन्मान निधीच्या पुढील हप्त्याचा लाभ दिला जाणार नाही.

    तरी सर्व लाभार्थी यांनी www.pmkisan.gov.in या website ला जाऊन farmer corner या टॅब मध्ये किंवा pmkisan मोबाईल ऍप मध्ये OTP द्वारे मोफत e -KYC करता येईल(सोबत लिंक दिली आहे) किंवा नजिकच्या CSC केंद्राशी संपर्क साधुन आपली e-KYC तात्काळ करुन घ्यावी. अधिक माहितीसाठी (PM Kisan) कृषी विभागातील कृषी सहाय्यक,कृषी पर्यवेक्षक,मंडळ कृषी अधिकारी ,तालुका कृषी अधिकारी यांचेशी संपर्क करावा. सोबत e-KYC करण्यासाठी लिंक दिलेली आहे.

    https://exlink.pmkisan.gov.in/aadharekyc.aspx