Category: PM Kisan Samman Nidhi Yojana

  • PM KISAN : या राज्यात 21 लाख अपात्र घेत आहेत योजनेचा लाभ; ओळख पटवण्यात यश, होणार वसुली

    हॅलो कृषी ऑनलाईन : पीएम किसान (PM Kisan) योजना ही केंद्र सरकारची अत्यंत महत्वाकांक्षी योजना आहे. देशातल्या अनेक शेतकऱ्यांना या योज़नेचा मोठा लाभ झाला आहे. मात्र काही अपात्र शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतल्याचे आढळून आले आहे. देशातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमध्येही अपात्रांची ओळख पटली आहे. राज्य सरकारच्या तपासणीत 21 अपात्र लाभार्थ्यांची ओळख पटली आहे. जे आतापर्यंत पीएम किसान अंतर्गत मिळालेल्या हप्त्याचा लाभ घेत होते.

    उत्तर प्रदेशचे कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री सूर्य प्रताप शाही यांनी पीएम किसानच्या (PM Kisan) अपात्र लाभार्थ्यांच्या ओळखीची माहिती दिली आहे. बुधवारी माहिती देताना ते म्हणाले की उत्तर प्रदेशमध्ये पीएम किसान अंतर्गत निवडलेले 21 लाख शेतकरी चौकशीत अपात्र आढळले आहेत. ते म्हणाले की, अपात्र ठरलेल्यांमध्ये आयकर भरणारे अनेक जण आहेत. त्याच वेळी, असे अनेक लोक सामील होते, जे पती-पत्नीच्या हप्त्याचा फायदा घेत होते.

    अपात्र लाभार्थ्यांकडून हप्ता वसूल केला जाईल

    आता पीएम किसानच्या अपात्र लाभार्थ्यांकडून हप्ता वसूल केला जाईल. ज्या अंतर्गत अशा अपात्र लोकांना पीएम किसान अंतर्गत आतापर्यंत केलेल्या पेमेंटची संपूर्ण देय रक्कम भरावी लागेल. खरं तर, पीएम किसान (PM Kisan) योजनेंतर्गत केंद्र सरकार दरवर्षी नोंदणीकृत शेतकऱ्यांच्या खात्यावर 6 हजार रुपये पाठवते, जे एका वर्षात तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवले जाते. आतापर्यंत केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यावर 11 हप्ते पाठवले आहेत.

    उत्तर प्रदेशमध्ये, पीएम किसान योजनेचे (PM Kisan) इतर अपात्र लाभार्थी आता ओळखले जाऊ शकतात. ज्याची चौकशी सुरू आहे. खरं तर, उत्तर प्रदेशमध्ये PM किसान योजनेअंतर्गत एकूण 2.85 कोटी शेतकरी नोंदणीकृत आहेत. यापैकी १ कोटी ७१ लाख लाभार्थींच्या पडताळणीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यापैकी २१ लाख अपात्र लाभार्थ्यांची ओळख पटली आहे. त्याचबरोबर १ कोटीहून अधिक लाभार्थ्यांची पडताळणी करणे बाकी आहे. अशा स्थितीत आता अन्य अपात्र लाभार्थ्यांची ओळख पटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

     

  • PM Kisan : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 31 ऑगस्टपर्यंत विशेष मोहीम

    हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारची अत्यंत महत्वाकांक्षी योजना म्हणजे पीएम किसान योजना होय. आता शेतकरी या योजनेच्या १२ हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. अशातच या योजनेअंतर्गत नोंदणी झालेल्या लाभार्थ्यांच्या ई-केवायसीचे काम 100 टक्के पूर्ण करण्यासाठी 31 ऑगस्टपर्यंत ही विशेष मोहिम राबवण्यात येत आहे. या माध्यमातून गाव पातळीवरील शासकीय कर्मचाऱ्यांनी लाभार्थ्यांशी प्रत्यक्ष संपर्क करणे तसेच विशेष शिबीरे घेण्याचे निर्देश पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत.

    ई-केवायसी करणे अनिवार्य

    –प्रधानमंत्री किसान सन्मान निधी पोर्टलवर नोंदणी झालेल्या लाभार्थ्यांनी ई-केवायसी करणे अनिवार्य आहे.
    –या योजनेच्या माध्यमातून राबवण्यात येत असलेल्या मोहिमेद्वारे ई-केवायसी न झालेल्या लाभार्थ्यांची माहिती संबंधित गावाच्या व्हॉट्सअप ग्रुपवर देण्यात येणार आहे.
    –ग्रामपंचायत कार्यालय, चावडी, तलाठी कार्यालय, विकास संस्था, बँक, पतसंस्था यांच्या नोटीस फलकावरही तत्काळ लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
    — दवंडी देऊनही याबाबतची माहिती देण्यात येणार आहे.
    –ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक, कोतवाल, पोलीस पाटील, सरपंच यांच्यामार्फत प्रलंबित यादीतील लाभार्थ्यांना प्रत्यक्ष किंवा दूरध्वनीद्वारे संपर्क करुन ई-केवायसीचे महत्व आणि कार्यपद्धती समजावण्यात येणार आहे.
    –मोबाईलद्वारे प्रक्रीया पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहेत.
    –तसेच नजिकच्या काळात सरकार सेवा केंद्रावरही याद्या उपलब्ध करुन देऊन त्याठिकाणी ई-केवासी पूर्ण करण्याचे काम करेल अशी माहितीही देण्यात आले आहे.

    ई-केवायसी प्रकरणी संनियंत्रणासाठी उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय समित्या नेमण्यात आल्या आहेत. प्रत्येक गावामध्ये सनियंत्रण अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे. ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यकांना संबंधित गावात ई-केवायसीसाठी 29, 30 व 31 ऑगस्ट रोजी विशेष शिबीरे घेण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. या तिनही दिवशी संनियंत्रण अधिकाऱ्यांनी गावांमध्ये उपस्थित राहून ई-केवायसीचे काम 100 टक्के पूर्ण करावे, अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिल्या आहेत.