error: Content is protected !!
error: Content is protected !!
हॅलो कृषी ऑनलाईन : विरोधी पक्षनेते आंबादास दानवे आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाची ते भेट घेत आहेत. आज बीड शहराजवळच्या सामनापूर येथे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्या कुटुंबाचे सांत्वन केले यावेळी दानवे यांच्यासमोर आपल्या व्यथा मांडताना एका तरुण शेतकऱ्याला अश्रू अनावर झाले होते. यावेळी बोलतांना तरुण म्हणाला की, अशा आर्थिक परिस्थितीत नोकरी नाही,कुठे काम मिळत नाही. यामुळे ग्रामीण भागातील तरुण प्रचंड नैराश्यात गेले आहेत. भविष्यात आपलं काय होणार आहे हे कुणालाच काहीच कळत नाही, असे सांगताना तो ढसाढसा रडायला लागला.
यावेळी बोलताना आंबादास दानवे म्हणाले की, राज्यात दिवसाला दररोज सरासरी 3 शेतकरी आत्महत्या करतायत. या खोके सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे राज्यात गेल्या दोन महिन्यात जवळपास 200 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. दरम्यान आज बीड जिल्हातील समनापुर येथील नवनाथ शेळके या आत्महत्याग्रस्त शेकऱ्याच्या घरी सांत्वनपर भेट देत कुटुंबियांशी संवाद साधत प्रशासनाला लवकरात लवकर मदत देण्याचे सुचना केल्या आहेत. दिड लाख रुपयांचे कर्ज व्याजासह साडेपाच लाखांवर जाऊन पोहचले. कर्ज कसे फिटणार याची चिंता उराशी घेऊन या शेतकऱ्याने मुत्यू जवळ केला, असल्याचं दानवे म्हणाले.
अतिवृष्टीनंतर शेतकऱ्यांना मदत मिळाली नाहीं. फक्त घोषणाचा पाऊस होतोय. अतिवृष्टी, बॅंकांची थकबाकी, यंदाची खरीप व दुबार पेरणीसाठी खाजगी सावकारांकडून 15-20 टक्क्यांनी कर्ज काढावे लागत आहे. त्यामुळे खोके सरकारला हात जोडून विनंती आहे की, दिल्लीश्वरांच्या समोर लोटांगन तसेच तुमच्या सोबत आलेल्या आमदारांची नाराजी नाट्य दुर झाले असेल तर शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडेही लक्ष द्यावे, अशी टीका दानवे यांनी शिंदे सरकारवर केली.
हॅलो कृषी ऑनलाईन : मागच्या काही दिवसात महाराष्ट्राने मोठी राजकीय उलथापालथ अनुभवली आहे. उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले. सध्या एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत. मात्र माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्याची दखल केवळ राष्ट्रीय स्तरावर नाही शेतकऱ्यांच्या मनात अद्यापही असल्याचे दिसून आले. बैलपोळा सणानिमित्त माजीमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी खास संदेश बैलाच्या पाठीवर लिहिण्यात आला होता. त्याची चर्चा आता होऊ लागली आहे.
सोलापुरातील बार्शी तालुक्यातील शेतकरी अविनाश कापसे यांच्या बैलाच्या पाठीवर झुल नाही तर लिहण्यात आलेला एक संदेश राज्य़भर व्हायरल होत आहे, ” मुख्यमंत्री म्हणून तुमचे योगदान विसरता येणार नाही, माझा बळीराजा कोरोना काळातही तुमच्यामुळे सुरक्षित राहिला आहे ” . अशा आशयाचा संदेश बैलाच्या पाठीवर लिहण्यात आलेला आहे. त्यामुळे जवळचे दुरावले तरी सोन्या बैलाची थाप असल्याची चर्चा आता रंगू लागली आहे.
सोन्या अन् शिल्याची जोडी
बैल पोळ्या दिवशी बैलजोडीने केलेल्या कामाच्या ऋणाईत हा सण साजरा केला जातो. शिवाय बैलावर साजश्रृंगार करुन ढोल-ताशाच्या गजरात त्यांची मिरवणूक काढली जाते. मात्र, जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील सोन्या अन् शिल्याची बैलजोडी ही वेगळ्याच बाबीने चर्चेत आली आहे. यामधील सोन्याच्या पाठीवरील जो संदेश आहे तो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सध्याचे राजकारण काही का असेना पण कोरोना काळात उद्धव ठाकरे यांनी केलेले कार्य न विसरता येण्यासारखे आहे असाच संदेश पोळ्याच्या दिवशी देण्यात आल आहे.