Category: Rain

  • Weather Update Today Maharashtra

    हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील अनेक भागात परतीच्या पावसाचा (Weather Update) तडाखा सुरूच आहे. कालही मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यात विजांसह परतीचा पाऊस झाला आहे. मागच्या २४ तासात पुण्यातील जुन्नर येथे सर्वाधिक ११० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज (२२) रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांमध्ये विजांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात मुख्यतः उघडिपीसह तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे.

    हवामान स्थिती ?

    अंदमानमधील कमी दाबाच्या क्षेत्रापासून तमिळनाडू, केरळ ते आग्नेय अरबी समुद्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. आग्नेय अरबी समुद्रात केरळच्या किनाऱ्यालगत चक्राकार वारे वरील प्रणालीत मिसळून गेले आहेत. पंजाब आणि परिसरावरही चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. बंगालच्या उपसागरात (Weather Update) उत्तर अंदमान समुद्रालगत कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे. त्याला लागून ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. उद्यापर्यंत (ता. २२) ही प्रणाली आणखी तीव्र होईल. सोमवारपर्यंत (ता. २४) बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाच्या निर्मितीचे संकेत आहेत. ही प्रणाली उत्तरेकडे वळून पश्चिम बंगाल, बांगलादेशाच्या किनाऱ्याकडे जाण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

    या भागाला आज यलो अलर्ट

    हवामान खात्याकडून वर्तवलेल्या अंदाजानुसार (Weather Update) आज कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग मध्य महाराष्ट्रातील नगर, पुणे, सातारा, कोल्हापूर आणि मराठवाडयातील औरंगाबाद, बीड जिल्ह्यात विजांसह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या भागात यलो अलर्ट देण्यात आला आहे.

  • Weather Update: राज्यात पावसाचा तडाखा सुरूच; आज ‘या’ भागात विजांसह पावसाची शक्यता

    हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात अद्यापही परतीच्या पावसाचा (Weather Update) तडाखा सुरूच आहे. दिवसभर उन्हाचा चटका आणि संध्याकाळनंतर गडगडाटी विजांसह पाऊस हे मागील तीन दिवसांपासून राज्यातील बहुतांशी भागातील चित्र आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी दिवाळी पावसातच घालवावी लागते की काय अशी चिन्हे आहेत. तर दुसरीकडे काढणी केलेला पावसात भिजलेला सोयाबीन ,कापूस यासारखा शेतमाल सुकवताना शेतकऱ्यांच्या नाकीनऊ येत आहे. दरम्यान आजही (२०) राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये विजांसह पावसाची शक्यता कायम आहे. उर्वरित राज्यात पावसाचा जोर ओसरण्याची चिन्हे असून, तुरळक ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज आहे.

    हवामान स्थिती ?

    उत्तर अरबी समुद्रापासून तमिळनाडूच्या किनाऱ्यापर्यंत हवेचा कमी दाबाचा (Weather Update) पट्टा सक्रिय आहे. पूर्व-मध्य अरबी समुद्रामध्ये महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगत समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती, तसेच त्यापासून केरळ किनाऱ्यापर्यंत हवेचा दक्षिणोत्तर कमी दाबाचा पट्टा कायम आहे. बंगालच्या उपसागरात उत्तर अंदमान समुद्रालगत ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. आज (ता २०) या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. ही प्रणाली वायव्येकडे सरकताना शनिवारपर्यंत (ता. २२) आणखी तीव्र होईल. सोमवारपर्यंत (ता. २४) बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची निर्मिती होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.

    आज ‘या’ भागाला यलो अलर्ट

    दरम्यान हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज (Weather Update) कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मध्य महाराष्ट्रातील नगर, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर या भागाला यलो अलर्ट देण्यात आला असून या भागात विजांसह पावसाची शक्यता आहे.

  • Weather Update : राज्यात आजही पावसाचा अंदाज; पहा कोणत्या भागाला यलो अलर्ट

    हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यभरामध्ये सुरु असलेला पाऊस काहीसा (Weather Update) ओसरलेला दिसून येत आहे. रविवारी (ता.१६) मराठवाडा, मराठवाड्यात ढगाळ हवामानासह पावसाने हजेरी लावली. परभणी जिल्ह्यातील सेलू, पाथरी, पूर्णा, परभणी तालुक्यांत दुपारनंतर मध्यम ते जोरदार पाऊस झाला. मात्र आजही राज्यात पावसाचा अंदाज कायम आहे. आज (१७) रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या दक्षिण भागासह विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यात हलक्या सरींची शक्यता आहे.

    हवामान स्थिती

    मध्य अरबी समुद्रात समुद्र सपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीवर, तर अग्नेय अरबी (Weather Update) समुद्रात केरळच्या किनाऱ्यालगत १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. केरळच्या किनाऱ्यालगत असलेल्या प्रणाली पासून नैर्ऋत्य बंगालच्या उपसागरापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार तयार झाला आहे. बंगालच्या उपसागरात उत्तर अंदमान समुद्रालगत उद्या (ता. १८) नव्याने चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार होण्याची शक्यता आहे. या वाऱ्यांच्या प्रभावामुळे रविवारपर्यंत (ता. २०) या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.

    आज भागाला यलो अलर्ट

    दरम्यान आज कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नगर, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर. बीड, परभणी, नांदेड, लातूर, उस्मानाबाद बुलडाणा, वाशीम, यवतमाळ. या भागात हवामान (Weather Update) खात्याकडून यलो अलर्ट देण्यात आला असून या भागात विजांसह पावसाची शक्यता आहे.

     

     

  • पुढचे 2 दिवस पावसाचा अंदाज कशी घ्याल कापूस,तूर,भुईमूग, मका आदी पिकांची काळजी ?

    हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो, हवामान खात्याकडून मान्सूनच्या परतीचा संदेश मिळाला आहे. त्यामुळे काही भागात पावसाची तीव्रता कमी झाली असली तरी विदर्भ मराठवाड्यासह काही भागात पुढील दोन दिवस मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.

    पीक व्यवस्थापन

    १) कापूस : पुढील तिन दिवसाचा पावसाचा अंदाज लक्षात घेता पाऊस झाल्यानंतर कापूस पिकात वापसा स्थिती निर्माण होण्यासाठी शेतात अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते शेताबाहेर काढण्याची व्यवस्था करावी. फवारणीची कामे पुढे ढकलावीत. कापूस पिकात रसशोषण करणाऱ्या किडींच्या (मावा, फुलकिडे) व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्काची किंवा लिकॅनीसिलीयम लिकॅनी (जैविक बुरशीजन्य किटकनाशक) एक किलो ग्रॅम किंवा फलोनिकॅमिड 50% 60 ग्रॅम किंवा डायनेटोफ्यूरॉन 20% 60 ग्रॅम किंवा फिप्रोनिल 5% 600 मिली प्रति एकर तिन दिवसानंतर पावसाची उघाड बघून फवारणी करावी. कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी हेक्टरी 5 गुलाबी बोंडअळीसाठीचे कामगंध सापळे लावावेत. कापूस पिकातील डोमकळ्या वेचून नष्ट कराव्यात. प्रादूर्भाव जास्त आढळून आल्या प्रोफेनोफॉस 50% 400 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% 88 ग्रॅम किंवा प्रोफेनोफॉस 40% + सायपरमेथ्रीन 4% 400 मिली प्रति एकर आलटून पालटून तिन दिवसानंतर पावसाची उघाड बघून फवारावे.

    २)तूर : पाऊस झाल्यानंतर तूर पिकात वापसा स्थिती निर्माण होण्यासाठी शेतात अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते शेताबाहेर काढण्याची व्यवस्था करावी. फवारणीची कामे पुढे ढकलावीत. तूर पिकावरील पाने गुंडाळणारी अळीच्या व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्काची किंवा क्विनॉलफॉस 25% 16 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून तिन दिवसानंतर पावसाची उघाड बघून फवारणी करावी.

    ३) भुईमूग : भुईमूग पिकात वापसा स्थिती निर्माण होण्यासाठी शेतात अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते शेताबाहेर काढण्याची व्यवस्था करावी. फवारणीची कामे पुढे ढकलावीत. भूईमूग पिकात मावा, फुलकिडे याच्या व्यवस्थापनासाठी इमिडाक्लोप्रिड 17.8 एस एल 2 मिली किंवा क्विनॉलफॉस 25 ईसी 20 मिली किंवा ऑक्झीडीमेटॉन मिथाईल 25 ईसी 20 मिली किंवा लॅमडा सायहॅलोथ्रीन 5 ईसी 6 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून तिन दिवसानंतर पावसाची उघाड बघून फवारणी करावी. मध्यम ते हलकी, भुसभुशीत, सेंद्रिय पदार्थ आणि कॅल्शियमचे भरपूर प्रमाण असलेल्या जमिनीत रब्बी भुईमूग पिकाची लागवड करावी. भुसभुशीत जमिनीत भरपूर प्रमाणात हवा खेळती राहते यामुळे मुळांची चांगली वाढ होऊन आऱ्या सुलभरीतीने जमिनीत जाण्यास तसेच शेंगा पोसण्यासाठी मदत होते.

    ४)मका : मका पिकात वापसा स्थिती निर्माण होण्यासाठी शेतात अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते शेताबाहेर काढण्याची व्यवस्था करावी. फवारणीची कामे पुढे ढकलावीत. काढणीस तयार असलेल्या मधु मका पिकाची काढणी करून घ्यावी.

    ५)रब्बी ज्वारी : रब्बी ज्वारीची लागवड मध्यम ते भारी पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत करावी. हलकी जमिन शक्यतो टाळावी कारण अशा जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता राहत नाही मग पिकाच्या संवेदनशील काळात पाणी कमी पडते.

    ६) रब्बी सूर्यफूल : रब्बी सूर्यफुलाची लागवड मध्यम ते भारी ओलावा टिकवून ठेवणाऱ्या, उत्तम निचरा असणाऱ्या व जमिनीचा सामू 6.5 ते 8 असणाऱ्या जमिनीत करावी. पाणथळ किंवा आम्लयूक्त जमिन लागवडीसाठी टाळावी.

  • Weather Update Today In Maharastra

    हॅलो कृषी ऑनलाईन : मागच्या काही दिवसांपासून राज्यातल्या अनेक भागात दमदार पावसाने (Weather Update) हजेरी लावली आहे. इथून पुढे दोन तीन दिवस देखील राज्यातलया काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. राज्यात सुरु असलेल्या पावसामुळे धरणांतील पाण्याच्या पातळीमध्ये चांगलीच वाढ झाली आहे.

    हवामान तज्ञ के.एस . होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील 3, 4 दिवस आणि त्यापुढील दिवसात मान्सून (Weather Update) राज्यात सक्रिय राहणार आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रावर याचा परिणाम होऊ शकतो अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. हवामान विभागाने राज्यातील काही जिल्ह्यांना ऑरेंज आणि यलो अलर्ट जरी केले आहेत.

    आज ‘या’ भागाला अलर्ट

    दरम्यान आज दिनांक 14 सप्टेंबर रोजी नाशिक, पुणे, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर आणि पालघर या जिल्ह्यांना हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून या भागात मुसळधार पावसाची (Weather Update) शक्यता आहे. तर सिंधुदुर्ग आणि ठाणे जिल्ह्याला तसेच मुंबईला देखील येलो अलर्ट देण्यात आला असून या भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर उर्वरित जिल्ह्यांना कोणताही अलर्ट हवामान खात्याकडून आज देण्यात आलेला नाही