Category: Satara News

  • अचानक पाण्याचा लोंढा आला, तब्बल 700 पोती आले ट्रॅक्टरसह वाहून गेले ; शेतकऱ्यांचे 20 लाखांचे नुकसान

    हॅलो कृषी ऑनलाईन : सकलेन मुलाणी सातारा

    मागच्या दोन तीन दिवसांपासून राज्यातील अनेक भागात दमदार पावसाने हजेरी लावली आहे. सातारा जिल्ह्यातील कराड येथील पेरले येथे अचानक नदीला पाणी आल्यामुळे तब्बल ७०० पोती आले व ट्रॅक्टर तारळी नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना घडली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे जवळपास २० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

    याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, कराड तालुक्यातील पेरले येथील विक्रम सिंह गुलाबराव कदम व युवराज लक्ष्मण जाधव हे आपल्या शेतातील तब्बल सातशे ते आठशे पोती आले ट्रॅक्टर मध्ये भरून तारळी नदीत धुण्यासाठी गेले होते.

    शनिवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ते तारळी नदीत गेले होते त्यावेळी नदीत पाणी कमी असल्याने ट्रॅक्टर पाण्यात उभा करून ते आले धुत होते दरम्यान याचवेळी अचानक जोरात पाऊस पडल्याने तारळी नदीत पाण्याचा लोंढा आला आणि पाणी वाढले यामुळे आल्यासह ट्रॅक्टर पाण्यात बुडाला व यामधील सुमारे आठशे पोती म्हणजेच एकूण सुमारे 30 हजार किलो आले वाहून गेले. यामुळे विक्रम सिंह कदम व युवराज जाधव यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे यामध्ये विक्रम सिंह कदम यांची आले भरलेली सहाशे पोती तर युवराज जाधव यांची सुमारे 100 पोती होती..

    या शेतकऱ्यांसह लोकांनी वाहून जाणारे आले वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र पाण्याचा वेग प्रचंड असल्याने त्यांना यश आले नाही दरम्यान पाण्याची पातळी अद्यापही जास्त असल्याने जॉन डीअर ट्रॅक्टर व ट्रॉली अद्यापही नदीपात्रातच आहे. अचानक लोंढा आल्याने आल्यासह ट्रॅक्टर बुडाला ही घटना गावात समजतात पेरले पुलावर गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती.

     

  • सार्वजनिक मालमत्ता व शेतीपिकाच्या नुकसानीचे अहवाल तातडीने सादर करावेत : शंभूराज देसाई

    हॅलो कृषी ऑनलाईन : सातारा जिल्ह्यात अतिवृष्टीने नुकसान झाले असून अजूनही तीन ते चार दिवस अतिवृष्टी होण्याची शक्यता गृहीत धरुन सार्वजनिक मालमत्ता व शेतीपिकाच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन लवकरात लवकर एकत्रितच अहवाल सादर करण्यात यावा, म्हणजे आवश्यक ती मदत देण्यासाठी निधीची तरतूद करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्य उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.

    जिल्ह्यातील झालेल्या अतिवृष्टीमुळे सार्वजनिक मालमत्ता व शेतीपिकाच्या नुकसानीच्या अनुषंगाने आढावा बैठक नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय येथे घेण्यात आली. त्यावेळी श्री. देसाई बोलत होते. यावेळी आमदार महेश शिंदे, आमदार दीपक चव्हाण, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल यांचेसह विविध विभागाचे विभागप्रमुख उपस्थित होते.

    लवकरात लवकर अहवाल सादर करा

    यावेळी श्री. देसाई म्हणाले, जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीने शेतपिकाचे, शेतजमिनीचे नुकसान, घर पडझडीचे नुकसान, पशुधनाचे नुकसान यासर्व बाबींचा मागील आठवड्यातील व पुढील तीन-चार दिवसांमध्ये होणाऱ्या अतिवृष्टीमुळे जे नुकसान होईल त्याचा संबंधित विभागाने नुकसान भरपाईचा एकत्रित अहवाल लवकरात लवकर सादर करावा, म्हणजे निधीची तात्काळ तरतूद करता येईल. ज्या पाझर तलावांचे नुकसान झाले आहे त्याचाही अहवाल सादर करावा. तसेच जे निकषात बसत नाही, परंतू नुकसान झाले आहे असा प्रस्तावही विशेष बाब म्हणून सादर करावा.

    रस्ते, वीज, प्रादेशिक पाणीपुरवठा योजना यासारख्या व अन्य सार्वजनिक मालमत्ता नुकसानीचे परिपूर्ण प्रस्तावही सादर करण्यात यावेत. ज्या कुटूंबांचे संपूर्ण नुकसान झाले आहे. त्यांना प्रशासनाने तातडीची मदत देण्याची व्यवस्था करावी.