Category: Soybean Crop

  • तळहाताच्या फोडाप्रमाणं जपलेलं पीक पाण्यात; आम्हाला मदत द्या म्हणत शेतकऱ्यांचं शेतातच अर्धनग्न आंदोलन

    हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यभरात मागच्या दोन तीन दिवसांपासून सुरु असलेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना अक्षरश: नाकीनऊ आणले आहे. शेतांना तळ्याचे स्वरूप आल्यामुळे काढणीला आलेल्या सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. परभणी जिल्याला देखील पावसाचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे सोयाबीन कापूस या दोन्ही पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. हे नुकसान लक्षात घेता सरकारचे डोळे उघडण्यासाठी परभणीच्या मिरखेल येथील शेतकऱ्यांनी चक्क पाणी साचलेल्या सोयाबीनच्या शेतातच अर्धनग्न होऊन आंदोलन केले आहे. यावेळी नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

    यावेळी सोयाबीनचे पूर्ण शेत जलमय झालं आहे. या कृषी प्रधान देसात शेतकरी राजा आहे, असं सांगितलं जातं की शेतकरी राजा आहे. मात्र, त्याला नावाला राजा ठेवलं आहे. पण त्याचा जगण्याचा पूर्ण अधिकार या प्रशासकीय व्यवस्थेनं हिरावला आहे. त्यामुळं आम्ही आज अर्धनग्न अवस्थेत शासनाचा निषेध करत असल्याची भूमिका शेतकऱ्यांनी मांडली.

    आमचं मोठं नुकसान झालं ,मदत करा

    सोयाबीन तळहाताच्या फोडाप्रमाणं जपून काढणीला आले असताना मुसळधार पाऊस झाला अन सोयाबीन, कापसात गुडघ्याइतके पाणी साचल्यानं दोन्ही नगदी पीक हातून गेले आहे. पीक विमा कंपनीच्या छाताडावर बसा आणि मदत द्या अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. आमची शासनानं तत्काळ दखल घ्यावी. आमच्या गावात पावसाचा अतिरेक झाला आहे. आमचं मोठं नुकसान झालं आहे, त्यामुळं आम्हाला मदत करा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

    परभणीच्या मिरखेल येथील शेतकऱ्यांनी हीच परिस्थिती विशद केली आहे. मिरखेल येथील पाणी साचलेल्या सोयाबीनच्या शेतात शेतकऱ्यांनी अर्धनग्न होऊन आंदोलन केले आहे. यावेळी शेतकऱ्यांनी सरकारकडे पीक विमा आणि नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.

     

     

  • सोयाबीनला फूल ना शेंगा, नुकसान भरपाई कधी देणार? शेतकरी थेट जिल्हाधिकारी कार्यालयात




    सोयाबीनला फूल ना शेंगा, नुकसान भरपाई कधी देणार? शेतकरी थेट जिल्हाधिकारी कार्यालयात | Hello Krushi







































    हॅलो कृषी ऑनलाईन : उस्मानाबाद तालुक्यातील सुर्डी शिवारात शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिकाची लागवड केली आहे. खरीप हंगामाच्या सुरुवातीपासूनच नैसर्गिक आपत्तीमुळं यंदा सोयाबीन पिक संकटात सापडले आहे. सुरुवातीलाच अतिवृष्टी आणि गोगलगायींच्या हल्ल्यामुळे पिकांची मोठ्या प्रमाणात नासधूस झाली. फुले लागण्याच्या अवस्थेतच चार-चार वेळा फवारण्या केल्यानंतरही पिकावर अळ्यांचा प्रादुर्भाव वाढला आहे.

    त्यामुळं कोवळ्या शेंगा अळ्यांनी फस्त केल्या आहेत. त्यामुळं सोयाबीन पीक हातून गेल्याची भावना शेतकर्‍यांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळं शेतकरी संकटात सापडले आहेत. त्यामुळं नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी उस्मानाबाद तालुक्यातील सुर्डी येथील शेतकर्‍यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालय गाठून कैफियत मांडली. नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे अशा जोरदार घोषणा देत जिल्हाधिकार्‍यांना मागणीचे निवेदन दिले.

    तत्काळ मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी

    अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानीची पाहणी करण्याचे आदेश शासनाने दिलेले असताना अद्याप महसूल प्रशासनातील एकही व्यक्ती सुर्डी शिवारात फिरकलेली नाही. तलाठी, मंडळ अधिकार्‍यांशी संपर्क साधून नुकसानीची पाहणी करण्याची विनंती केल्यानंतरही कोणी दखल घेण्यास तयार नाही. त्यामुळं संतप्त झालेल्या शेतकर्‍यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जोरदार घोषणाबाजी केली. शिवारातील पिकांच्या झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी आणि पंचनामे करुन तत्काळ आर्थिक मदत द्यावी अशी मागणी या निवेदनात शेतकर्‍यांनी केली आहे.

     

     

    error: Content is protected !!





  • पाऊस झाला गायब ! परभणी जिल्ह्यातील शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत; फुलोर्‍यातील पिके टाकतायेत माना




    पाऊस झाला गायब ! परभणी जिल्ह्यातील शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत; फुलोर्‍यातील पिके टाकतायेत माना | Hello Krushi












































    हॅलो कृषी ऑनलाईन : परभणी प्रतिनिधी

    परभणी जिल्ह्यात मागील पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने खरिप हंगाम धोक्यात आला आहे. मागील वर्षी सरासरी पेक्षा जास्त पाऊस झाल्याने खरीप पिके हातची गेल्याने जिल्हातील शेतकरी आर्थिक संकटात पडला होता. यातुन यावर्षीचा हंगाम बाहेर काढेल असे वाटत असताना सुरुवातीला सतत पडणारा पाऊस गरज असताना मात्र गायब झाला आहे. जिल्ह्यातील खरिप हंगामातील कापुस , सोयाबीन पिके फुल अवस्थेत असुन यावेळी पावसाची मोठी गरज आहे. विहीर बोअरवेल माध्यमांतून पाण्याची सोय असणारे शेतकरी स्पिंकलर, ठिंबक व पाटपाणी देत पिके जोपासणाच्या प्रयत्न करीत आहेत. मात्र कोरडवाहू शेतकरी हतबल झाला आहे. जिल्ह्यात यावर्षी अधिच पर्जन्यमान असमान झाले आहे. काही महसुल मंडळात सरासरी पेक्षा अधिक तर काही मंडळात कमी पाऊस पडला आहे. अधिक पाऊस झालेल्या ठिकाणी पिकांना पाण्याची गरज असताना कमी पर्जन्यमान असणाऱ्या मंडळात स्थिती अधिक बिकट आहे .

    उदाहरणार्थ जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील दोन महसूल मंडळामध्ये यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे . यात कासापूरी व हादगाव महसुल मंडळाचा समावेश आहे. पाथरी तालुक्यात जून पासून ऑगस्टपर्यंत सरासरी 470 मिलिमीटर एवढा पाऊस पडत असतो .यंदा तो अर्ध्या तालुक्यामध्ये सरासरी पेक्षा जास्त तर अर्ध्या तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पडला आहे .प्रशासनाकडून मिळालेल्या पर्जन्यमान अहवालानुसार पाथरी तालुक्यातील कासापुरी महसूल मंडळामध्ये जून पासून आतापर्यंत 262 मिलिमीटर पाऊस पडला असून तो सरासरीच्या 55 टक्के एवढा आहे. तर अशीच काही परिस्थिती शेजारील हादगाव महसूल मंडळामध्ये आहे. या ठिकाणी सरासरीच्या 69 टक्के एवढाच पाऊस झाला आहे .याचा परिणाम म्हणून खरिपातील पिकांना आता मोठ्या पावसाची अथवा जायकवाडी धरणातून पाणी आवर्तनाची मोठी गरज आहे .जूनच्या सुरुवातीपासूनच या दोन महसूल मंडळाला पावसाने पाठ दाखवल्याने शेतकरी अडचणी सापडला आहे.

    याउलट पाथरी महसूल मंडळ व बाभळगाव महसुल मंडळा मध्ये जून पासून ऑगस्ट पर्यंत सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याचे पाहायला मिळत आहे .
    अनुक्रमे 106 . 9 टक्के व 103 . 8 टक्के असा सरासरीपेक्षा जास्त पाऊस या दोन महसूल मंडळामध्ये पडला आहे. त्यामुळे एकाच हंगामात पाथरी तालुक्यातील उत्तर व दक्षिण भागांमध्ये पावसाचे असमान पर्जन्यमान झाल्याने एकीकडे अधिकच्या पावसाने पिके खराब होत असून दुसरीकडे पावसाअभावी पिके माना टाकत आहेत. सध्या जायकवाडी धरणातून गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग चालू आहे. असा विसर्ग डाव्या कालव्यात केल्यास पिकांना संजीवनी देता येईल. स्थानिक शेतकरी जायकवाडीतून कॅनॉलला पाणी सोडण्यात यावे अशी मागणी करत आहेत .





    error: Content is protected !!