मान्सून निरोप घेणार! शेतकऱ्यांनी काय करावे नियोजन ?

हॅलो कृषी ऑनलाईन : हवामान विभागाने 5 ते 10 ऑक्टोबर दरम्यान मान्सून महाराष्ट्राचा निरोप घेणार असल्याची माहिती दिली आहे. मान्सून वेळेत परतत आहे. त्यामुळं शेतकऱ्यांनी आता नेमकी कोणती कामं करावीत. पिकांच्या बाबतीत शेतकऱ्यांनी काय नियोजन करावं यासंदर्भातील माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना दिली आहे.

कांद्याची लागवड :

साधारणात: बियाणे टाकल्यापासून 45 दिवसांमध्ये कांद्याची रोपे लागवडीसाठी तयार होता. त्यामुळं आता कांद्याचे बी टाकले तरी चालेल अशी माहिती माणिकराव खुळे यांनी दिली आहे.

द्राक्ष आणि डाळिंब छाटणी

द्राक्ष बागेची छाटणी शेतकऱ्यांनी केली तरी चालेल. छाटणी करण्यास अडचण काही नाही. कारण, सध्या पावसाचा जोर कमी झाला आहे. पाऊस निरोप घेण्याच्या तयारीत आहे. त्यामुळं द्राक्ष बागांच्या छाटणीला सुरुवात केली तरी चालेत. त्याचबरोबर डाळींबाची पानगळणी केली तरी चालेल. कारण आता जर पानाची छाटणी सुरु केली तर मार्च ते एप्रिलपर्यंत पिक बाजारात येईल. ‘हस्त बहार’ नियोजन करण्यास सध्याचा काळ योग्य जाणवत आहे.

खरीपातील पिकांची काढणी

खरीपातील आगाप मका, बाजरी, भुईमूग, सोयाबीन, कडधान्ये ही पिके परतणीच्या स्टेजमध्ये असण्याची शक्यता आहे. त्यांच्या काढणीच्या तसेच पशुधनासाठीच्या मुरघास प्रक्रिया आणि साठवणीच्या नियोजनासाठीचा वातावरणाच्या नजरेतून सध्याचा काळ योग्य जाणवत आहे. त्याचे योग्य ते नियोजन करण्यास शेतकऱ्यांनी सुरुवात करावी सोयाबीन आणि बाजरीचे पिक काढणी करण्याच्या स्टेजमध्ये आहे. त्यासाठी पूर्वनियोजन करावे लागते. विशेषत: मजूर लावून करायची असेल तर त्याचे नियोजन मशीननं काढणी करायची असेल तर त्याचे शेतकऱ्यांनी आत्ताच नियोजन करावं

मुरघास तयार करण्यासाठी मकेची काढणी करावी

आगाप मका आता काडणी करायला सुरुवात केली तरी चालेल. ज्या शेतकऱ्यांना मुरघास तयार करायचा आहे, असा शेतकऱ्यांनी मकेची तोडणी करावी असे खुळे यांनी सांगितले आहे. तर बाजरी, भुईमूग, सोयाबीन, ही पिकं 15 ऑक्टोबरच्यानंतर काढणीसाठी येणार आहेत, त्यादृष्टीनं शेतकऱ्यांनी आत्तापासूनच नियोजन करावे.

संदर्भ : एबीपी माझा

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *