PM Kisan : योजनेसंदर्भांत वाचा महत्वाची अपडेट; अन्यथा मिळणार नाहीत योजनेचे पैसे

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारची अत्यंत महत्वाकांक्षी योजना म्हणजे पीएम किसान (PM Kisan)  योजना होय. देशभरातील शेतकरी या योजनेच्या १२ व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. असे असताना केंद्र सरकारने या योजनेत पारदर्शकता यावी याकरिता इ के वाय सी करणे बंधनकारक केले आहे. इ केवाय सी करण्याची अंतिम मुदत् 31 ऑगस्ट 2022 आहे. त्यापूर्वी शेतकऱ्यांनी ई केवायसी करणे बंधनकारक आहे. अन्यथा या योज़नेचे पैसे शेतकऱ्यांना मिळणार नाहीत.

सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना पुढील लाभ प्राप्त होण्यासाठी ई केवायसी (PM Kisan)  प्रक्रिया 31 ऑगस्ट 2022 पर्यंत कण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. सदर मुदतीत ई- केवायसी प्रमाणीकरण प्रक्रिया पूर्ण न करणाऱ्या लाभार्थीस पी एम किसान सन्मान निधीच्या पुढील हप्त्याचा लाभ दिला जाणार नाही.

तरी सर्व लाभार्थी यांनी www.pmkisan.gov.in या website ला जाऊन farmer corner या टॅब मध्ये किंवा pmkisan मोबाईल ऍप मध्ये OTP द्वारे मोफत e -KYC करता येईल(सोबत लिंक दिली आहे) किंवा नजिकच्या CSC केंद्राशी संपर्क साधुन आपली e-KYC तात्काळ करुन घ्यावी. अधिक माहितीसाठी (PM Kisan) कृषी विभागातील कृषी सहाय्यक,कृषी पर्यवेक्षक,मंडळ कृषी अधिकारी ,तालुका कृषी अधिकारी यांचेशी संपर्क करावा. सोबत e-KYC करण्यासाठी लिंक दिलेली आहे.

https://exlink.pmkisan.gov.in/aadharekyc.aspx

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *