NDRF च्या निकषाने शेतकऱ्यांना मदत द्या; शेतकऱ्यांचे तहसीलदारांना निवेदन

हॅलो कृषी ऑनलाईन : परभणी

जुलै महिन्यातील सततच्या पाऊस तर ऑगस्ट महिन्यातील 25 दिवसाच्या पावसाचा खंडामुळे पिके सुकून गेली असुन खरिप पिकांची प्रत्यक्ष पाहणी करत २५ % विमा अग्रीम व एनडीआरफ च्या निकषाने मदत करावी अशी मागणी वाघाळा येथील सरपंच बंटी घुंबरे व स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे.

सोमवार १२ सप्टेंबर रोजी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि , वाघाळा गाव पाथरी मंडळामध्ये येत असून ते पाथरी पासुन दक्षिणेश 18 किमी आहे. तर बाभळगाव मंडळा पासुन 5 किमी अंतरावर आहे. जुलै महिन्यातील सततच्या पावसामुळे सोयाबीन कापूस , तुर , मुग , पिके पिवळी पडून समाधानकारक वाढ झाली नाही नंतर ऑगस्ट महिन्यात 25 दिवस पावसाचा खंड पडल्यामुळे वरील पिके सुकून गेली आहेत. त्यात पिकाचे नजरी 60 ते 70 टक्के नुकसान झाले आहे. यामुळे शेतकर्यावर अस्मानी संकट आले असुन शेतकऱ्याचा जीव मेटाकुटीला आला आहे. प्रत्यक्ष सर्वेक्षण करून शेतकर्याना एन डी आर एफ ( NDRF ) च्या तीन हेक्टर च्या मर्यादेत पंचनामे करून विमा कंपनीला 25 % टक्के अग्रिम रक्कम देण्यास भाग पड़ावे अशी करण्यात आली आहे .

दिलेल्या निवेदनावर सरपंच बंटी घुंबरे , विजयकुमार घुंबरे ,पद्माकर मोकाशे ,दत्तराव नागमोडे यांच्यासह वाघाळा येथील ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत .

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *